नांदेडकर देतायेत मोफत शुद्ध पाणी
सासवड सतीश मोरे
पाणी जीवन आहे, पाणी अमृत आहे, पाणी तृष्णा भागवते, पाणी समृध्दि आणते. पाण्याशिवाय काही शक्य नाही. पाणी किती महत्वाचे आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पंढरीची वारी करताना थकलेल्या, दमलेल्या वारकर्याला पाणी तरतरी आणते, ताजेतवाने करते. महाराष्ट्र शासनाने वारकरी लोकांना मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवले आहे. वारी मार्गावर सामाजिक कार्यकर्ते व शासन पाणी टॅन्कर उभे करते. पाणी पुरवठा यंत्रणेच्या मदतीला आता नांदेड येथील साईप्रसाद अमृतदिंडी धावून आली आहे. वारी मार्गावर सलग 18 दिवस शुद्ध आणि थंड मिनरल वाॅटर देण्यासाठी 200 स्वयंसेवक यंत्रणा या संस्थेने उभी केली आहे.
2012 साली स्थापन झालेल्या या संस्थेला कुणाचाही चेहरा नाही. नोंदणीकृत संस्था वा ट्रस्ट नाही कोणी अध्यक्ष नाही, पदाधिकारी नाहीत. सारेच स्वयंसेवक म्हणून उस्फूर्त पणे सेवा करतात. सामाजिक कार्यात ही संस्था अग्रेसर आहे. 1400 सदस्य संख्या असलेल्या साईप्रसादने आजवर 70 विवाह लावून दिले आहेत. या संस्थेच्या काही सदस्या गत वर्षी वारीत सहभागी झाले होते. सहा महिन्यापुर्वी वारीत सर्वांना शुद्ध मिनरल व थंड पाणी पुरवठा कसा करता येईल यावर विचार केला. पुणे, सोलापूर, सातारा जिल्हाधिकारी तसेच पुणे आयुक्त, पंढरपूर मंदिर सेवा समिती व ननगरपालिका मुख्याधिकारी यांचेसोबत चर्चा झाली, आळंदी पंढरपूर वारी मार्गाचे सर्वेक्षण केले.
![]() |
संस्थेने या कामी नांदेड, जालना, औरंगाबाद, नगर तसेच वारी मार्गावरील गावातील दाते व लोकवर्गणीतून निधी गोळा केला. पाणी शुद्धीकरण करण्यासाठी दोन ट्रकवर आर ओ प्लान्ट उभ केले आहेत. पाणी थंड करण्यासाठी चिलर आर ओ प्लान्टला जोडले आहेत. गावातील पाणी या प्लान्ट पर्यंत आणण्यासाठी 15 हजार लिटर क्षमतेचे दोन टॅन्कर ठेवले आहेत. विद्युत पुरवठा खंडित झाला तर दोन जनरेटर पण ठेवले आहेत. स्थानिक ठिकाणी पाणी उचलून ते शुद्ध केले जाते. आठ टेम्पो मध्ये 1400 लिटर क्षमतेचे इन्सुलेटेड टॅक असून
त्यामध्ये पाणी साठवले जाते. 40 ठिकाणी पिक अप जीपमध्ये 20 लिटरचे 1000 जार ठेवले आहेत. संस्थेचे स्वयंसेवक या वाहनाबाहेर उभे राहतात. येणाऱ्या वारकरी माऊलीला पोटभर पाणी देतात.
त्यामध्ये पाणी साठवले जाते. 40 ठिकाणी पिक अप जीपमध्ये 20 लिटरचे 1000 जार ठेवले आहेत. संस्थेचे स्वयंसेवक या वाहनाबाहेर उभे राहतात. येणाऱ्या वारकरी माऊलीला पोटभर पाणी देतात.
शुद्ध मिनरल पाणी, तेही मोफत उपलब्ध करून देऊन या संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे. दरम्यान 200 स्वयंसेवकाच्या सोबतीला स्थानिक लोकांनी, तरूणांनी यावे असे आवाहन त्यांनी केले आहे. प्रत्येक गावातील लोकांनी फक्त पाणी द्यावे, आम्ही ते शुद्ध करून माऊलीना देऊ, विठ्ठल भक्तांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा आहे.
वारीत सहभागी वारकरी ठणठणीत रहावा, असे आम्हाला वाटते. वारकरी मिळेल तिथे कोठेही पाणी पिऊन तहान भागवतो. वारकर्याना आजार मुख्यत्वे पाण्यामुळे होतात . ते होऊ नये म्हणून आम्ही शुद्ध मिनरल पाणी मोफत देतो. पाणी बाॅटल विकत घेणे सर्वाना जमत नाही.
. ........... स्वयंसेवक साईप्रसाद
सतीश मोरे
सतीश मोरे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा