फॉलोअर

२९ डिसेंबर २०१६

लिंबू, मिरची आणि बिब्बा

🍋🌶🍋🌶🍋🌶🍋🌶🍋
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🔺🙇🏻 मनातील प्रश्न...*

*◾लिंबू मिरची बांधण्याची प्रथा कशी सुरु झाली...?*
*🔺काय आहे नेमके कारण...?*
➖➖➖➖➖➖➖➖➖
_ज्या काळात वाहनांचा शोध लागला नव्हता त्या काळात लोक बैल गाडीतून प्रवास करीत असत. मैलो मैलाच्या ह्या प्रवासात बैलगाडीला लिंबू , मिरची , बिब्बा हा एका टोकदार तारेत ओवून गाडीच्या अश्या भागात बांधत की तो लगेच लोकांचा निदर्शनात पडेल. किंवा प्रत्येक घराच्या बाहेर हे टांगले जात असे जेणे करून घरासमोरून जाणाऱ्या वाटसरूना तो लगेच मिळेल._
🔲🔲🔲

*🔺पण हे का? असा प्रश्न आता तुम्हालाही पडला असेल.*

*🍋▪मैलोन मैल चालत असताना माणसाला तहान लागल्यास पाणी उपलब्ध न झाल्यास लिंबू तोंडात पिळून तोंडात लाळ निर्माण करण्यात येते ज्यामुळे माणसाची तहान तात्पुरती क्षमावता येवू शकते.*

*🌶▪त्या काळी साप नाग यांचा वावर फार मोठा होता, म्हणून चालत जाताना एखादा साप चावल्यास त्याला मिरची खायला देत जेणे करून हा साप विषारी होता कि बिनविषारी ह्याची माहित मिळे. जर साप चावला असताना मिरची तिखट लागली तर साप बिनविषारी होता आणि तिखट नाही लागली कि साप हा विषारी होता. असा अंदाज बांधला जात असे.*

*🍢▪बिब्बा हा उत्कृष्ट एंटीबायोटीक समजला जातो म्हणून जखम झाल्यास , कापल्यास बिब्बा लावला जात असे आणि हे सगळे एका टोकदार तारेत ओवले जात असे जी तार पायातला काटा काढण्यास उपयोगात येई.*
🔲🔲🔲
_अश्या प्रकारे हा प्रथोमपचार बैल गाडीवर , घराच्या दर्शनी भागात लावला जात कारण त्याचा उपयोग प्रथमोपचारा साठी होई. पुढे वाहने आली आणि हा प्रथमोपचार एक अंधश्रद्धा बनून अजून ही चालू आहे. ह्या प्रथमोपचारपद्धतीची कशी अंधश्रद्धा झाली ह्याची माहिती पोहोचावी हा एकच उद्देश...._
➖➖➖➖➖➖➖➖➖
🍋🌶🍋🌶🍋🌶🍋🌶🍋

२३ डिसेंबर २०१६

Passport बदल

📓🌎✈📓🌎✈📓🌎✈
➖➖➖➖➖➖➖➖➖
*☑ पासपोर्ट बनवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल, प्रक्रिया अधिक सोपी!*
➖➖➖➖➖➖➖➖➖
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट बनवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. त्यामुळे पासपोर्ट बनवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सहज झाली आहे. विशेषत: जन्म तारखेवरील वादावरुन अनेकदा पासपोर्ट मिळण्यास अडचणी निर्माण होतात. मात्र, परराष्ट्र खात्याने जाहीर केलेल्या नव्या नियमांमुळे पासपोर्ट मिळण्यास अधिक सोपं जाणार आहे.
🔲🔲🔲

*🔺जन्म तारखेसंदर्भातील बदल :*

_पासपोर्ट नियम, 1980 नुसार, 26 जानेवारी 1989 या दिवशी किंवा या दिवसानंतर ज्यांचा जन्म झाला असेल, त्यांना पासपोर्टसाठी जन्म दाखला सादर करणं बंधनकारक होतं. मात्र, नियमांमधील नव्या बदलानुसार, आता परराष्ट्र खात्याने आणखी काही पर्याय दिले आहेत, ज्यामुळे जन्म दाखल्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होईल._
🔲🔲🔲

*🔺जन्म तारखेचा पुरावा म्हणून खालीलपैकी कोणतंही एक कागदपत्र पासपोर्टसाठी अर्ज करताना अर्जदार सादर करु शकतात :*

▪महापालिका किंवा इतर सरकारी संस्थेमार्फत दिलेला जन्म दाखला.
▪शाळा सोडल्याचा दाखला, स्थलांतर प्रमाणपत्र जन्म तारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल.
▪मात्र, प्रमाणपत्र देणारी शिक्षण संस्था शासन मान्यताप्राप्त असायला हवी.
▪पॅन कार्डआधार कार्ड/ई-आधार कार्डसर्व्हिस रेकॉर्ड (सरकारी नोकरदारांसाठी) किंवा पे पेन्शन ऑर्डर (निवृत्त सरकारी नोकरदार).
▪मात्र, हे कागदपत्र संबंधित संस्थेतील अधिकृत व्यक्तींकडून अटेस्टेड करुन घेणं गरजेचं असेल.
▪ड्रायव्हिंग लायसन्स
▪मतदान ओळखपत्र
▪एलआयसी पॉलिसी बाँड
🔲🔲🔲
 
*🔺पासपोर्ट बनवण्यासंदर्भात..*
*इतर महत्त्वाचे बदल :*

*_आई-वडिलांचं नाव, अनाथ मुलं, कुमारी माता इत्यादींसंदर्भातही परराष्ट्र खात्याने पासपोर्टच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. विशेषत: अनाथालयातील मुलांना याआधी पासपोर्ट बनवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असे. मात्र, नव्या नियमांनंतर त्यांनाही पासपोर्ट बनवण्याची प्रक्रिया सोपी जाणार आहे._*
🔲🔲🔲
*_पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी यापुढे अर्जदार आपल्या नावासह आई किंवा वडील किंवा पालकांचं नाव देता येईल. म्हणजेच यातील कुणाही एकाचं नावही यापुढे ग्राह्य धरलं जाईल, आई-वडील अशा दोघांचीही नावं देण्याची गरज पडणार नाही. सिंगल पॅरेंट्स असलेल्यांना या बदललेल्या नियमाचा मोठा फायदा होणार आहे._*
🔲🔲🔲
▪पासपोर्टसाठी याआधी 15 अॅनेक्सेस असायचे, ते आता 15 वरुन 9 वर आणले आहेत. अॅनेक्सेस A, C, D, E, J आणि K काढून टाकण्यात आले आहेत.
▪सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे यापुढे कोणतंही अॅनेक्सेस अटेस्टेटड, शपथपत्र, नोटरी करुन देण्याची गरज नाही. सर्व अॅनेक्सेस अर्जदार स्वत: प्लेन पेपरवर लिहून पासपोर्टसाठी सादर करु शकतो.
▪अर्जदाराला यापुढे अॅनेक्सेर K किंवा कोणतंही विवाह प्रमाणपत्र सादर करावं लागणार नाही.
▪जर अर्जदार घटस्फोटित असेल, तर त्याला आपल्या घटस्फोटित पती किंवा पत्नीचं नाव देण्याची गरज नाही. किंबहुना, घटस्फोटत प्रमाणपत्रही सादर करण्याची गरज नाही.
▪अनाथ व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचे बदल परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये केले आहेत. पासपोर्टसाठी अर्ज करताना अनाथ व्यक्तींना आपला जन्मदाखला सादर करण्याची गरज नाही. मात्र, अनाथालयाच्या मुख्य व्यक्तीचं त्यासंबंधी पत्र अर्जासोबत जोडावं लागेल.
▪दत्तक घेतलेल्या मुलांनाही पासपोर्टसाठी अर्ज करणं सोपं जाईल. दत्तक घेतल्याचं प्रमाणपत्र सादर न करता, ज्यांनी दत्तक घेतलं आहे, त्यांच्याकडून पत्र अर्जासोबत जोडावं लागेल.
▪साधू, संन्यासी यांना पासपोर्टसाठी अर्ज करायचा असल्यास, ते पालकांच्या जागी आपल्या अध्यत्मिक गुरुचं नाव देऊ शकतात.
▪सरकारी नोकरीत असलेल्यांना आता शासकीय सेवेत असल्याचं ओळख प्रमाणपत्र किंवा एनओसी न मिळाल्यास पासपोर्ट बनवण्यात अडथळे येणार नाहीत. कारण अॅनेक्सर- ‘N’ मध्ये अर्जराद स्वत: पत्र लिहून अर्जासोबत जोडू शकतो. या बदलामुळे आता तातडीने पासपोर्ट हवा असल्यास सरकारी नोकरीत असलेल्यांना अडचणी येणार नाहीत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📓🌎✈📓🌎✈📓🌎✈

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...