फॉलोअर

Jeevanvidya Dhanyapeeth लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Jeevanvidya Dhanyapeeth लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

३० मार्च २०१६

सासु सुनेचे सुख


परवा म्हणजे रविवारी 27 मार्च रोजी विश्वसंत सदगुरू वामनराव पै यांनी निर्माण केलेल्या कर्जत येथील जीवनविद्या ज्ञानपीठामध्ये दुसर्‍यादा जाण्याचा योग आला. दोन महिन्यांपुर्वी बेसिक कोर्स केला. परवा कौटुंबिक सौख्य हा कोर्स पत्नी सोबत केला. खुप छान ठिकाण आहे हे.

ज्ञान , ज्ञान आणि केवळ ज्ञानच हा हेतू डोळ्यासमोर ठेवून ही संस्था साठ वर्षे झटत आहे. अंधश्रद्धेवर प्रहार करून तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे सतत हॅमरिंग करत ही संस्था लोकांना शहाणे करत आहे. तुम्ही ज्ञानी व्हा,  हुशार व्हा, बुद्धीमान व्हा, असे सांगून केवळ तत्वज्ञान नव्हे तर जीवनविद्या शिकवणारे सदगुरू हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या विचारवंतापैकी एक आहेत.


अतिशय सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी हे ज्ञानपीठ आहे. मला मठ निर्माण करायचा नाही, मठात अहंकार वाढून सारेच मठ्ठ होतात,  असे सदगुरू म्हणायचे. त्यामुळे त्यांच्या इच्छेनुसार हे ज्ञानपीठ उभे राहिले आहे. एक वेळ तरी भेट दिली पाहिजे असे हे ज्ञानपीठ आहे.

स्त्री आणि पुरूष  एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, रथाची दोन चाके आहेत, ऐवढेच नव्हे तर स्त्रीयांना फक्त समानता नव्हे सन्मानाची वागणुक द्या. ज्या घरात स्रीयांचा छळ होतो तेथे दुःख, दैन्य वास करते, असा दिव्य संदेश सदगुरूनी दिला आहे. कौटुंबिक सौख्य हा कोर्स करताना मला पुन्हा एकदा सदगुरूच्या सहवासाची जाणीव झाली.

अस्मिता सामंत, अनघा देशपांडे आणि चंद्रकांत निंबाळकर यांनी कुटुंबाचे कल्याण कशात हे सौदाहर्णासहीत उपस्थिताच्या मनात, ह्दयात उतरवले. माझ्या  ज्ञानात भर पडली.

कुटुंब म्हणजे फक्त नवरा बायको आणि मुलं नव्हे तर सासू सासरे, नणंद, भावजय, दिर सारे आहेत.  कुटुंब सुखी व्हायचे असेल तर या सर्व नात्यांमधे संवाद हवा,  गोडवा हवा, एकमेकांना समजून घ्यायला हवे, हा दिव्य विचार मी अनेकदा ऐकला आहे.  रविवारी हाच विचार वेगळ्याच अॅगलने ऐकला,भावला,  नवं खुप  काही कानावर पडलं.  एक दोन नव्हे सात तास न कंटाळता बसण्याची उर्जा येथे मिळाली.

इतरांना समजून घेण्याची कला Art of understanding other people नावाचा एक सुंदर धडा मी बारावीत शिकलो होतो. त्यामधील  एक सुंदर वाक्य मला आठवते.
 
तुम्ही इतरांविषयी कोणत्याही प्रकारची
वाईट प्रतिक्रिया व्यक्त करताना थोडं थांबा
आणि हा विचार करा की
मी त्याच्या जागी असतो तर काय केले असते.

सासू सून या नात्यात गोडवा का नसतो, याचे उत्तर वरिल वाक्यात आहे. कोर्स मध्ये मला हेच ऐकायला मिळाल.  सासु सुनेविषयी किंवा सुनेने सासू विषयी बोलताना, वागताना याचा विचार करायला हवा. सास भी कभी बहू थी या नावाची एक सिरीयल होती, बहू कभी तो सास होनेवाली है या नावाची सिरियल सुरू केली पाहिजे.

सासुबाई तिला झालेल्या त्रास, छळ याचा बदला घेण्यासाठी सुनेला पहिल्या दिवसापासून कात्रीत पकडते, टोचून बोलते,  मुलाचे कान भरते, पुढे जाऊन आणखी बरेच काही करते.
दुसरीकडे सासू नेहमी वाईटच असते, असे माहेरहून ( आईकडून ) शिकून आलेली सुन पहिल्यापासून  माझा पती म्हणजे माझा संसार , बाकी नाती नगण्य ऐवढेच डोक्यात ठेवून वाटचाल सुरू करते. तिला सासू व्हिलन वाटते. अशा परिस्थितीत कोण कोणाला समजून घेत नाही आणि सारे कुटुंब दुःखी होते.


सासू सुनेच्या नात्यात गोडवा येण्यासाठी जीवनविद्येचे ज्ञान आवश्यक आहे.
सदगुरू माऊलींचा मला एक विचार खुप खुप भावला.

सुनेच्या सुखातच मुलाचे सुख दडले आहे
                   आणि
सासुच्या सुखातच नवर्‍याचे सुख लपलेले आहे.

प्रत्येक सासुने, सुनेने हा विचार मनावर सतत बिंबवला तर काही समस्या उद्भवणार नाहीत.

सासुने सुनेची काळजी घ्यायलाच हवी. सुन म्हणून आलेली ती वीस बाबीस वर्षाची मुलगी आई वडील ही सर्व नाती सोडून फक्त माझ्या मुलासाठी आली आहे, तिला आनंद दिला, सुखी ठेवले तर तर आपलाच मुलगा सुखी होईल, हे प्रत्येक सासूआईने ध्यानात ठेवले पाहिजे.

दुसरीकडे सुनेने सासुमध्ये आई पहायला पाहिजे. आपला देखणा, कतृत्ववान नवरा आपल्या सासुमुळेच मिळाला आहे. तो काय  आभाळातून पडलेला नाही.  त्याच्या आईने पण त्याला पंचवीस वर्षे लहानाचा मोठ्ठा केला आहे. नवर्‍याचे आईवर प्रेम आहे, असतेच. त्याची आई म्हणजे आपली सासू सुखी तर आपला नवरा सुखी हे प्रत्येक सुनेने ध्यानात ठेवले पाहिजे.  

सासु सुनेने एकमेकींना समजून घेण्यातच दोघींचे आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचे सुख समाधान सामावले आहे.

                                                                   (  पुर्वार्ध )
                                       ...........सतीश मोरे

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...