फॉलोअर

२९ ऑगस्ट २०१८

Facebook remind me Delhi

फेसबुकने जागवली दिल्लीची आठवण !

आठ वर्षांपूर्वी लोकसभेमध्ये अणुऊर्जा संदर्भात एक बिल सादर करण्यात आले होते. हे बिल सादर करण्या मध्ये तत्कालीन पंतप्रधान कार्यालयीन राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोलाची भूमिका बजावली होती. याच कालावधीत दैनिक पुढारी च्या एका महत्त्वपूर्ण कामासाठी संपादक साहेब आदरणीय प्रतापसिंह जाधव यांनी माझी दिल्ली दौऱ्यासाठी पाचारण केले होते.
याची आठवण मला फेसबुकने आज करून दिली.

माननीय संपादक प्रतापसिंह जाधव यांच्यामुळेच मला यावेळी पहिल्यांदाच विमानात बसण्याची संधी मिळाली. विमानात कसे जायचे, कसे बसायचे, तिकीट कसे काढायचे , प्रवेश करायचा याबाबत काहीही माहिती नव्हती. मात्र अचानक एके रात्री साहेबांचा फोन आला तुला तुला उद्याच्या उद्या दिलेल्या जायचे आहे. त्यानंतर साहेबांचे स्वीय सहाय्यक रणजित झेंडे यांनी मेलवर विमानाचे तिकीट पाठवून दिले दुसऱ्या दिवशी सकाळी मी मुंबईला जायला निघालो. ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक यांच्या सोबत मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाऊन पोहोचलो. तानपाठक साहेबांच्या सहकार्यामुळे पहिला विमान प्रवास अगदी सहज झाला. मुंबईतून नऊ वाजता फ्लाईट होते. रात्री अकराच्या सुमारास आम्ही दिल्ली विमानतळावर उतरलो. विमानतळावर उतरल्यापासून पुन्हा विमानतळावर येईपर्यंत काय करायचे, टॅक्सी कुठे पकडायची, दिल्लीतले मुख्य रस्ते कोणते, मेट्रोने प्रवास कसा करायचा याची सर्व माहिती मला तानपाठक यांनी दिली. आमच्या दिल्ली ऑफिसमधील सहकारी रितेश भुयार आणि गिरीश अवघडे यांनी मला सारी दिल्ली फिरून दाखवली.

नामदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून मला लोकसभेत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाहण्याची संधी मिळाली. त्या कालावधीत पुढारीने टोमॅटो एफ एम नुकताच सुरू केला होता, या चॅनेल साठी अन उर्जा आणि अणुकरार याचे महत्व या विषयावर नामदार पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घ्यावी आणि ती टप्प्याटप्प्याने टॉवर प्रसारित करावी असा विचार आमचे आमचे युवा प्रबंध कार्यकारी संपादक योगेश प्रतापसिंह जाधव यांनी मांडला.

मी हा विषय तेव्हाचे दिल्लीचे पुढारी चे प्रमुख धर्मानंद कामत यांच्याबरोबर जाऊन पृथ्वीराज चव्हाण यांच्या कानी घातला.  पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या घराशेजारी पृथ्वीराज चव्हाण यांचे शासकीय निवासस्थान होते. या निवासस्थानात जाऊन माननीय बाबांच्या कानावर मी ही कल्पना मांडली. बाबांनी माननीय साहेबांशी चर्चा केली आणि होकार दिला. दोन दिवसांनी माननीय योगेशदादा दिल्लीत पोहचले.

अणुऊर्जा आणि अणुकरार या विषयावर माननीय योगेश दादा, धर्मानंद कामत, श्रीराम जोशी आणि मी नामदार पृथ्वीराज चव्हाण यांची सविस्तर मुलाखत घेतली. ही मुलाखत टोमॅटोसाठी रेकॉर्ड करण्यात आली आणि त्यानंतर प्रसारित झाली या घटनेला आज आठ वर्षे पूर्ण होत आहेत .

या कालावधीतच मला नामदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत अनेक विषयावर चर्चा करण्याची संधी मिळाली आणि तेव्हापासूनच बाबांचे आणी माझे संबंध दृढ होत गेले.

पुढारीकारांमुळेच हे सर्व शक्य झाहले.

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...