नदी आणि साधू एका ठिकाणी राहू शकत नाही, त्यांनी एका ठिकाणी रहायचे नसते.
नदी आणि साधू एका ठिकाणी राहू शकत नाही, त्यांनी एका ठिकाणी रहायचे नसते.वशिष्ठ ऋषींनी अयोध्या नगरीत अजून काही दिवस राहा असा आग्रह विश्वामित्रांना केल्यानंतर विश्वामित्रांनी दिलेलं तर हे वेगळे उत्तर मला रामायण सिरीयल पाहताना ऐकायला मिळालं.
ही मालिका पाहत असताना मला माझी मुलगी देवयानी याने याचा अर्थ विचारला. मी पण तिला याचा अर्थ तुच समजावून सांग,असे देवयानीला सांगितले देवयानीने याचा अर्थ सांगण्याचा थोडा प्रयत्न केला, तो बरोबर होता. मग मी मला उमजलेल्या शब्दात तीला उत्तर दिले.
नदी जर एका जागेवर थांबली तर नदीत झाडे,झुडपे उगवतील, शेवाळ वाढेल. नदीचे डबके तयार होईल आणि नदीमध्ये दुर्गंधी वाढेल व तिची पवित्रता नष्ट होईल. नदीने सतत वाहिले पाहिजे,वहात राहणे, सतत कार्यरत राहणे हा नदीचा उपजत गुण आहे. काठावरच्या सर्व लोकांना पाणी देऊन त्यांची तहान भागवणे, काठावरच्या जमिनीला पाणी देऊन ती जमीन समृद्ध करणे, लोकांची तहान भागवणे हा नदीचा गुणधर्म असतो तो गुणधर्म. जर ती एकाच ठिकाणी थांबून राहिली तर तर नदीचे पावित्र्य संपेल, म्हणून नदीने सतत वाहत राहिले पाहिजे.
साधू असो किंवा ज्ञानी मनुष्य असो त्याचेही असेच असते. त्यानेही नदीप्रमाणे एका ठिकाणी थांबता कामा नये. साधू जर एका ठिकाणी राहिला तर तो त्या गावाच्या भागाच्या प्रेमात पडेल. त्याचा मोह वाढेल. एखाद्या गावात मिळत असणार्या वस्तू, अन्न,मान सन्मान, कौतुक, प्रतिष्ठा याच्या तो प्रेमात पडेल. असे झाले तर तो संन्यासीपणा सोडून देऊन प्रपंच करणारा मनुष्य होऊन जाईल. त्या गावचा होऊन जाईल. तो त्या गावातच थांबून राहिला तर त्याला त्याची तपश्चर्या करण्यामध्ये मोहामुळे अडचणी निर्माण होतील. ज्ञानार्जन करणे, ज्ञानप्रसार करणे आणि तपश्चर्या करणे हे साधूचे कर्तव्य असते, त्याने हे काम केले पाहिजे आणि हे करण्यासाठी त्याला सतत नवीन ठिकाणी जावे लागते. त्यामुळे साधूने कधीही एका ठिकाणी राहू नये.
रामायण मालिकेतील एका वाक्यावर आपण जर विचार केला, चिंतन केले तर एका एका वाक्यात खुप अर्थ लपलेले आहेत आणि हे अर्थ आपल्या पिढीला आपल्या मुलांना समजावून सांगण्यासाठी रामायण ही मालिका रोज पाहिली पाहिजे.
या मालिकेतील प्राचीन काळातील जे शब्द आहे ते शब्द सुद्धा आपल्या मुलांना समजावून सांगितले पाहिजेत, त्याचा अर्थ समजावून सांगितले पाहिजे.
*धन्यवाद भारत सरकार*
आणि *धन्यवाद लाॅकडाऊन*
नदी आणि साधू एका ठिकाणी राहू शकत नाही, त्यांनी एका ठिकाणी रहायचे नसते.वशिष्ठ ऋषींनी अयोध्या नगरीत अजून काही दिवस राहा असा आग्रह विश्वामित्रांना केल्यानंतर विश्वामित्रांनी दिलेलं तर हे वेगळे उत्तर मला रामायण सिरीयल पाहताना ऐकायला मिळालं.
ही मालिका पाहत असताना मला माझी मुलगी देवयानी याने याचा अर्थ विचारला. मी पण तिला याचा अर्थ तुच समजावून सांग,असे देवयानीला सांगितले देवयानीने याचा अर्थ सांगण्याचा थोडा प्रयत्न केला, तो बरोबर होता. मग मी मला उमजलेल्या शब्दात तीला उत्तर दिले.
नदी जर एका जागेवर थांबली तर नदीत झाडे,झुडपे उगवतील, शेवाळ वाढेल. नदीचे डबके तयार होईल आणि नदीमध्ये दुर्गंधी वाढेल व तिची पवित्रता नष्ट होईल. नदीने सतत वाहिले पाहिजे,वहात राहणे, सतत कार्यरत राहणे हा नदीचा उपजत गुण आहे. काठावरच्या सर्व लोकांना पाणी देऊन त्यांची तहान भागवणे, काठावरच्या जमिनीला पाणी देऊन ती जमीन समृद्ध करणे, लोकांची तहान भागवणे हा नदीचा गुणधर्म असतो तो गुणधर्म. जर ती एकाच ठिकाणी थांबून राहिली तर तर नदीचे पावित्र्य संपेल, म्हणून नदीने सतत वाहत राहिले पाहिजे.
साधू असो किंवा ज्ञानी मनुष्य असो त्याचेही असेच असते. त्यानेही नदीप्रमाणे एका ठिकाणी थांबता कामा नये. साधू जर एका ठिकाणी राहिला तर तो त्या गावाच्या भागाच्या प्रेमात पडेल. त्याचा मोह वाढेल. एखाद्या गावात मिळत असणार्या वस्तू, अन्न,मान सन्मान, कौतुक, प्रतिष्ठा याच्या तो प्रेमात पडेल. असे झाले तर तो संन्यासीपणा सोडून देऊन प्रपंच करणारा मनुष्य होऊन जाईल. त्या गावचा होऊन जाईल. तो त्या गावातच थांबून राहिला तर त्याला त्याची तपश्चर्या करण्यामध्ये मोहामुळे अडचणी निर्माण होतील. ज्ञानार्जन करणे, ज्ञानप्रसार करणे आणि तपश्चर्या करणे हे साधूचे कर्तव्य असते, त्याने हे काम केले पाहिजे आणि हे करण्यासाठी त्याला सतत नवीन ठिकाणी जावे लागते. त्यामुळे साधूने कधीही एका ठिकाणी राहू नये.
रामायण मालिकेतील एका वाक्यावर आपण जर विचार केला, चिंतन केले तर एका एका वाक्यात खुप अर्थ लपलेले आहेत आणि हे अर्थ आपल्या पिढीला आपल्या मुलांना समजावून सांगण्यासाठी रामायण ही मालिका रोज पाहिली पाहिजे.
या मालिकेतील प्राचीन काळातील जे शब्द आहे ते शब्द सुद्धा आपल्या मुलांना समजावून सांगितले पाहिजेत, त्याचा अर्थ समजावून सांगितले पाहिजे.
*धन्यवाद भारत सरकार*
आणि *धन्यवाद लाॅकडाऊन*