फॉलोअर

यशराज देसाई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
यशराज देसाई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२१ मे २०२५

प्रतिभाशाली युवा लेखक यशराज देसाई


प्रतिभाशाली युवा लेखक.....यशराज देसाई 

राजकारणी लोकांच्या घरी राजकारणी, डॉक्टरांच्या घरी डॉक्टर, शिक्षकाच्या घरी शिक्षक,आयपीएस अधिकाऱ्यांच्या घरी आयपीएस किंवा सैनिकांच्या घरी सैनिक जन्माला येतो,अशी अनेक उदाहरणे आपण पाहिली असतील. पण राजकारणी लोकांच्या घरी एक लेखक जन्माला येतो आणि तो अवघ्या वयाच्या 27 व्या वर्षी तत्त्वज्ञान विषयक हे पुस्तक लिहितो असे उदाहरण क्वचितच पाहायला मिळते. 

होय, असा एक तरुण आहे आपल्या पाटण तालुक्यात. विनम्र आणि तितकाच डॅशिंग आणि उंचपुरा अशा युवा लेखकाला भेटण्याचा योग नुकताच मला आला. खरंतर  या पुस्तकाचे प्रकाशन दोन वर्षांपूर्वीच झालं आहे पण त्यानंतरच्या कालावधीत त्यांना भेटण्यासाठी मला वाट पहावी लागली. परवा वेळ घेऊन त्यांना भेटायला गेलो. दुपारी बारा वाजताची वेळ ठरलेली होती. साडे अकरा वाजताच त्यांच्या कार्यालयातून मला फोन आला 'कुठे पोहोचला आहात' त्यावेळी मी विहे घाटात होतो. पुढच्या पंधरा-वीस मिनिटात मी माझे मित्र धवल जाधव यांच्या समवेत त्यांच्या कार्यालयात अर्थात लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यावर मरळी येथे पोहोचलो. 

मी मगापासून बोलतोय तो युवा लेखक दुसरे कोणी नसून लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई आहेत. त्यांचे वडील सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री आहेत. 'लिविंग द ग्रेटर लाइफ' या इंग्रजी पुस्तकाचे लेखक यशराज शंभुराज देसाई... राजकारण्यांच्या घरात जन्माला आलेला एक प्रतिभाशाली लेखक. 27 व्या वर्षी तत्त्वज्ञान विषयक पुस्तक लिहीणं हे काय वय नाही. मात्र लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा वारसा, लहानपणापासून आई-वडिलांचे संस्कार आणि तितक्याच कडक शिस्तीत  वाढलेल्या आणि शिक्षणालाच महत्त्व देणाऱ्या देसाई कुटुंबाने महाविद्यालयाने शिक्षण पूर्ण होईपर्यंत यशराज देसाई यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सांगितले, राजकारणापासून त्यांना थोडं लांब ठेवले होते. यशराज देसाई यांनी सातारा येथील मोना स्कूल येथे शालेय शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT), पुणे येथून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. 

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांच्या मनात काही विचार घोळत होते, सकारात्मक विचारातून आयुष्यात कसं पुढे जायचं ? आयुष्यात काय केले पाहिजे, कसे राहिले पाहिजे लाइफ म्हणजे काय आहे यावर त्यांनी केलेल्या सखोल चिंतनातून जगण्याची प्रेरणा कागदावर उतरवली.   Living The Greater Life: It is what you and I do हे इंग्रजी पुस्तक जन्माला आलं. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झालं. 

"Living the Greater Life" हे पुस्तक आपल्या जीवनातील न बोलल्या जाणाऱ्या सत्यावर भाष्य करतं. प्रौढ वयात आपण स्वतःपेक्षा मोठ्या जबाबदाऱ्या घेतो – समाज, संस्था, आणि इतरांच्या भल्यासाठी. यामुळे आपल्याला नेहमीच "आपण काय करायला हवं आहे" यानुसार जगावं लागतं, जे "आपण कोण आहोत" यापेक्षा वेगळं असतं. डिजिटल जग, विशेषतः सोशल मीडिया, आपल्याला सतत प्रभावित करतं. या प्रभावामुळे आपले विचार, निर्णय, आणि जीवनशैलीही बदलते – जे कधी कधी आपल्याला खऱ्या आयुष्यातून दूर नेतं.

हे उच्च जीवन जगताना आपल्याला अनेकदा दोन व्यक्तिमत्त्वे बाळगावी लागतात – एक बाह्य जगासाठी आणि दुसरं आपल्यासाठी. याचा मानसिक ताण, गमावलेले क्षण आणि पश्चात्ताप यांचं ओझं वाटू लागतं. शेवटी एक प्रश्न सतत मनात राहतो. ही मोठी ('Greater') जीवनशैली खरंच जगण्यासारखी आहे का? आणि जर आपण ती जगलो नाही, तर काय? 

यावर यशराज देसाई यांनी यावर आपल्या साध्या आणि सोप्या लेखणीतून  पुस्तकातून प्रकाश टाकला आहे, आपली मतं व्यक्त केली आहेत, उपाययोजना सुचवल्या आहेत.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू असणारे यशराज देसाई सध्या राजकारणात ऍक्टिव्ह आहेत. सध्या ते लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून काम पाहत आहेत. फलटण येथील निंबाळकर घराण्यातील उच्चशिक्षित युवती सोबत त्याचा नुकताच विवाह झाला आहे. इंग्रजी पुस्तकाचे लेखक म्हणून त्यांनी साहित्य क्षेत्रात पाऊल ठेवले आहे  आणि याच एका कारणामुळे यशराज देसाई यांना भेटावे अशी माझी इच्छा होती. या भेटीत आम्ही दोघांनी त्यांचं पुस्तक आणि साहित्य याशिवाय  कोणतीही चर्चा केली नाही. पुस्तक निर्मितीचा प्रवास मांडताना महाविद्यालयीन जीवनातील काही आठवणी सांगितल्या. 

यशराज देसाई यांना भेटल्यानंतर  एका युवा साहित्यकाला भेटून आनंद झाला. भविष्यात त्यांनी उद्योग क्षेत्रातील करिअर आणि आव्हाने यावर लिखाण करावे. वडील शंभूराज देसाई यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी कमी वयात साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. साखर कारखान्यातील बदलती परिस्थिती,भविष्यात कारखान्यासमोरील आव्हाने आणि उपाय यावर त्यांचा हळूहळू अभ्यास होईल आणि या अभ्यासातून त्यांनी उद्योजकांना मार्गदर्शक पुस्तकाचे लेखन करावे अशा मी त्यांना शुभेच्छा दिल्या. लेखक यशराज देसाई यांना भेटून वेगळी प्रेरणा मिळाली.

...सतीश मोरे सतिताभ
9881191302

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...