फॉलोअर

silsila movie लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
silsila movie लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२४ मार्च २०१६

सिलसिला. ...रंग बरसे


सिलसिला,  ग्रेट मुव्ही
 इन  इंडियन सिनेमा.


भारतीय चित्रपट सृष्टीने सुरूवाती पासून तत्वे जपली आहेत. विवाह बाह्य संबंध भारतीय संस्कृतीला कधीच मान्य नाहीत. प्रेमभंग झाला म्हणून,  प्रियकर, प्रेयसीने दुसर्‍या सोबत लग्न केले म्हणून कोणी लग्न झालेल्या प्रेमिकेला परत आणणे,तिच्या सोबत  लग्न करणे, हे भारतीय संस्कृतीत कधीच मान्य नव्हते. विवाहाअगोदर असणारे नाते किंवा  प्रेम एकदा एखाद्या बरोबर लग्न झाले की संपते. पती आणि पत्नीचे नाते सर्वाधिक घट्ट असते. ते नाते कोणत्याही परिस्थितीत तुटत नाही, विवाहबाह्य संबंध जास्त काळ टिकत नाहीत. हा आज अखेरचा इतिहास आहे. हे सबंध किती ग्रेट असतात, हेच या चित्रपटात दाखवले होते. यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला यांनी चित्रपटाचा शेवट सुचवला होता.

अमिताभ आणि रेखा पळून जातात, सरदार मित्राकडे रहायला येतात. तेव्हा त्याचा मित्र सुद्धा हे मान्य करत नाही. गुरूवाणी सुरू असताना रेखा आणि अमिताभ यांना सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात. चुकीची जाणीव होते. दरम्यान अपघात घडला अशी बातमी येते. विमान अपघातातून प्रेयसीच्या पतीला अमित वाचवतो. जया त्यावेळी पोटात असणाऱ्या बाळाची शपथ घालतात आणि तो क्षण चित्रपट वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. 
अमिताभ आणि रेखा यांचे प्रेम प्रकरण खुप गाजले होते. अशा वेळी या सत्य घटनेवर कथेचा चित्रपट स्वीकारणे जया बच्चन यांच्या मुळे अमिताभ बच्चन यांना शक्य झाले. जया बच्चनजी, सलाम तुम्हाला!
चित्रपट संपतो तेव्हा
Love is faith, faith is forever
असा संदेश दिला आहे.
म्हणूनच सिलसिला is Great.
Hats up to यश चोप्रा,  अमिताभ बच्चन आणि जयाजी, रेखाजी.
रंगपंचमी सुरू झाली आहे. 
होळी सणाच्या निमित्ताने  सध्या सिलसिला मधील
रंग बरसे भिगी चुनरवाली रंग बरसे गाणे वाजत आहे.
मला परवा खालील पोस्ट आली, ती शेअर करायला हवीच.

एक काळ होता जेंव्हा बच्चन रेखाच्या तथाकथीत प्रेमप्रकरणाच्या कथांनी मासिके, पेपर्सचे रकानेच्या रकाने भरून जात असत. पर्पल पैच मध्ये होते अस म्हंटल तरी हरकत नाही आणि त्याच दरम्यान यश चोप्रा साहेबांनी सिलसिला नावाचा चित्रपट काढला. त्या काळात गाजलेला आणि आजची फ्रेश वाटणारा हा अफाट सिनेमा. प्रदर्शीत झाला तेंव्हा अनेकांना ह्या चित्रपटाबद्दल एक वेगळीक हुरहूर होती. नेमके काय दाखवणार, बायोपिक असेल का, शेवट काय होणार, जया कशी रीअक्ट झाली असेल, बच्चन आपल्या भावना लपवू शकेल का असे अनेक प्रश्न लोकांच्या डोक्यात भुंगा करत होते. बच्चन रेखात काय होते हे कदाचित फक्त बच्चन रेखाच सांगू शकतील पण सिनेमा म्हणून हा मास्टरपीस आहे.

अमिताभ बच्चन, रेखा, संजीवकुमार, शशीकपूर, कुलभूषण खरबंदा, देवेन आणि दि ग्रेट  जया अशी अफाट स्टारकास्ट आणि काश्मीरच बेफाट लोकेशन. एकाहून एक सरस अशी जवळपास दहा गाणी आणि त्या काळात रिबेल वाटावी अशी कथा. बच्चन रेखा एकत्र येतात असा शेवट केला असता तर अजूनच अफाट झाला असता तर वादळ उठले असते.

एका पाठोपाठ येणारी अप्रतिम गाणी या चित्रपटाची जान पण हा चित्रपट आहे
फक्त  रेखा बच्चनचाच. बाकी सगळे कसे या दोघांभोवती फिरत असतात. शशी कपूरजींनी छोट्याश्या रोल मध्ये जीव ओतला आहे. भाई मै साबुन नही उठाउंगा असो किंवा नीचे पान की दुकान  उपर गोरी का मकान असो.
प्रेम करावे आणि खुलवावे तर पहिल्या पार्ट मध्ये बच्चन रेखा सारखे. शोला है शोला, शोलो से डरना गाण्यात रेखुडी काय अफाट दिसाली आहे. सलवार कमीज मध्ये संपूर्ण कपड्यात टोटल मादक. देवेन आणि सुषमाच्या मार्फत आपले प्रेम रेखापर्यंत पोहोचवणारा बच्चन पण खास. टेप वर बच्चन रेखाला हाल ए दिल सांगत असतो आणि त्यावर रेखा जी लाजली आहे त्याला तोड नाही. देखा एक ख्वाब हे गाणे म्हणजे समस्त प्रेमवीरांची आरतीच कि हो देवा. गाणे आणि लोकेशन अफाट आणि त्यात रेखा बच्चनचा जिवंत अभिनय . सुभान अल्लाह !!!
सगळ सुरळीत सुरु असते आणि बच्चनला टिवी फोडावा लागतो. शशीने केलेल्या पराक्रमाची किंमत चुकवण्याची वेळ बच्चनवर येते आणि इथून हा चित्रपट अजूनच वेगळी उंची गाठतो. बच्चनच्या आवाजाला इथून खरा न्याय मिळतो आणि रेखाच्या अभिनय क्षमतेला.
नीला आसमां सो गया
आसूओं में चाँद डूबा, रात मुरझाई
जिन्दगी में दूर तक, फ़ैली है तनहाई
जो गुजरे हम पे वो कम है, तुम्हारे ग़म का मौसम है

याद की वादी में गूंजे बीते अफसाने
हमसफ़र जो कल थे, अब ठहरे वो बेगाने 
मोहब्बत आज प्यासी है, बड़ी गहरी उदासी है

हे गाणे लताबाई गायल्या आहेत पण रेखा अक्षरशः हे गाणे जगली आहे. खरच आयुष्यात असाच क्षण आला असावा इतका खरा वाटणारा अभिनय.
मग बारी येते बच्चनच्या मनातले वादळ दाखवण्याची.
ते दोघे परत भेटतात चुकून आणि एका जगाला नको असलेल्या कथेचा पुनर्जन्म होतो. दोघांचेही लग्न झालेले पण दोघांचाही जीव एकमेकात अडकलेला. "ये कहां आ गये हम" हे अजून एक सुंदर गाण आहे. लताच्या आवाजात असलेल्या या गाण्यात बच्चननी आपला पार्ट अक्षरशः जीव तोडून गायला आहे.




मजबूर ये हालात, इधर भी है, उधर भी
तनहाई की एक रात, इधर भी है, उधर भी
कहने को बहोत कुछ हैं मगर किस से कहे हम
कब तक यूँ ही खामोश रहे हम और सहे हम
दिल कहता है दुनिया की हर एक रस्म उठा दे
दीवार जो हम दोनों में है, आज गिरा दे
क्यों दिल में सुलगते रहे, लोगों को बता दे
हां हम को मोहब्बत है, मोहब्बत है, मोहब्बत
अब दिल में यही बात, इधर भी है, उधर भी

' दिल कहता है दुनिया की हर एक रस्म उठा दे '
हे ऐकले कि आजही छातीत कुठे तरी चमक उठते.

जावेदनी पण हे गाणे लिहितांना कुठे तरी दोन प्रेमी लपून बघितले असावे.
पण या चित्रपटाच उत्तुंग शिखर आहे होळीचे गाणे. गाणेआहे रेखा बच्चनचे
पण संजीव जयानी जी जीवाची घालमेल दाखवली आहे त्याला तोड नाही. 

सोने की थारी में जोना परोसा
सोने की थारी में जोना परोसा
अरे सोने की थाली में 

हाँ सोने की थारी में जोना परोसा

अरे खाए गोरी का यार
बलम तरसे रंग बरसे

अरे लौंगा इलाची का बीड़ा लगाया

लौंगा इलाची का बीड़ा लगाया

अरे लौंगा इलाची का ,हाँ लौंगा इलाची का बीड़ा लगाया
अरे चाबे गोरी का यार बलम तरसे रंग बरसे

अरे बेला चमेली का.. सेज बिछाया

अरे बेला चमेली का.. सेज बिछाया

बेला चमेली का.. सेज बिछाया
बेला चमेली का.. सेज बिछाया
अरे बेला चमेली का
हाँ बेला चमेली का.. सेज बिछाया
सोए गोरी का, सोए गोरी का यार, 
बलम तरसे रंग बरसे
होली है...

हरिवंशराय साहेबांनी लिहिलेल्या ह्या अफाट गाण्याला आपल्या खास आवाजांनी आणि अभिनयानी बच्चननी अजरामर केले. १९८१ नंतर किती धुळवडी आल्या आणि गेल्या पण हे गाणे वाजले नाही असे होतच नाही. बच्चन आणि रेखा या चित्रपटात अफाट दिसले आहेत. दोघांचेही तारुण्य पिकवर होते आणि त्याला साज चढवला तो चोप्रा साहेबांनी. उगाच नाही सिलसिला लागला आणि रेखुडी दिसली कि बापू हिटलर बनून रिमोट आपल्या ताब्यात घेत.
आज हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे सकाळपासून समोरच्या मैदानावर वाजत असलेली होळीची गाणी. पण डीजेनी सुरुवात केली ती " रंग बरसे " पासूनच. 
आजही अनेक लोकांना प्रश्न असेल कि खरंच काही सिलसिला होता का ?
ही कहाणी सफल झाली असती तर काय झाले असते. पण जे होते ते चांगलेच होते असे आपण म्हणतो तेच खरे. जयानी बच्चन नावाच्या वादळाला नुसते सांभाळलेच नाही तर दिशा हि दिली !!!
अशी ही सिलसिला बाबतची वरील सविस्तर पोस्ट मला खुप आवडली. लेखक कोण आहे माहित नाही. पण त्यांनी सुद्धा सिलसिला  अनुभवला आहे, असे दिसतंय. हॅट्स ऑफ टू  हिम.



मी हा चित्रपट किमान पन्नास वेळा पाहीला आहे. आजही पाहतो. मी अमिताभ बच्चन यांचा खुळा फॅन आहे. बच्चन प्रेम यावर लिहायला आवडेल. त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी कुठे कुठे गेलो, कसा गेलो,  बच्चन का आवडतो, त्यांना पाहण्यासाठी पुण्याला कसा गेलो हे मी सांगणार आहेच. आज होळी स्पेशल ऐवढेच.





                 
                                          ...........................सतीश मोरे

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...