फॉलोअर

amitabh deewar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
amitabh deewar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१८ जून २०२३

आज खुश तो बहोत होंगे तुम ? देवाशी भांडण नव्हे... स्वतःची स्वतः केलेलं बंड अन् संवाद !

आज खुश तो बहोत होंगे तुम ?

देवाशी भांडण नव्हे... 
स्वतःची स्वतः केलेलं बंड अन् संवाद !


आयुष्यात कधीतरी अशी वेळ येते जेव्हा सारं काही संपल्यासारखं वाटतं. कोणीही मदतीला येत नाही किंवा आलं तरी त्यांचे प्रयत्न, मदत तोकडी असते. मनुष्य हतबल होऊन जातो. काय करावं सुचत नाही. सर्व पर्याय संपतात. सर्व वाटा बंद होतात. कुणाकडं जावं हेच कळतं नाही. ज्यांना आपण जवळचं मानलेलं असतं त्यांनीच आपल्याला संकटात आणून आपल्याकडं तोंड फिरवलेलं असतं. अशा वेळी एकच पर्याय उरतो तो म्हणजे देव, देव्हारा, देऊळ !

देव कुठं असतो, तो तर आपल्यातंच असतो. पण तो दिसत नाही. आपल्यात असलेल्या देवाशी भांडायच तर मग आपणच स्वतः आरशासमोर उभे राहून बोलत बसलं पाहिजे किंवा देवळात तरी जायला पाहिजे. आरशासमोर उभे राहून बोलत बसलो तर पाहणारे लोक वेडं म्हणतील. असा विचार करून मग तो देवळात जातो. खरं तर देवळाबाहेर असणाऱ्या काही मनुष्यरूपी देवानींच त्याला फसवलेलं असतं, तोंड फिरवलेलं असतं. मग देवळातील देवाशी तो संवाद साधण्यासाठी, आपलं मन मोकळं करण्यासाठी गाभाऱ्यात प्रवेश करतो . खरं तर देवाशी त्याचं भांडण असतं, देवानं कुठे माझं चांगलं केलं आहे असा विचार करून म्हणून तो याअगोदर कधीच तिकडं फिरकलेला नसतो. देवाशिवाय सारं काही शक्य होईल, असा त्यांचा भ्रम झालेला असतो. पण वेळंच अशी येते त्याला देवळात जावं लागतं.

देवळात गेल्यावर इतक्या दिवस त्याच्या मनात साचलेलं सारं काही बाहेर पडतं. सगळं काही चांगलं करूनही देवांनं माझ्याशी असं का केलं? माझ्या भावनांशी खेळ का केला? असं का केलं, असा प्रश्न त्याच्या मनात आल्यामुळे तो देवाशी थेट भांडायला सुरुवात करतो. 

देवाला अरं तुरं करतो, जणू काही देव त्याचा जवळचा खास मित्र आहे, घरगडीच आहे. खरं तर त्या देवाला त्यांनं कधी मानलेलं नसतं. मात्र यावेळी तो लाडाने नव्हे रागाने देवाशी भांडतो आणि सुरुवात होतो देवाशी संवाद, 'आज खुश तो बहुत होगे तुम ?' माझ्या आयुष्यात एवढ्या सगळ्या काही गोष्टी झाल्या तरीही मी तुझ्या मंदिरात आलो नाही, तुझी पायरी चढलो नाही. पण आज तू तशी वेळ आणलीस. मला तुझ्या मंदिरात यावं लागलं. तुला बरं वाटत असेल ना ? तुला उकळ्या फुटत असतील ना? कसं झुकवलं याला!कसा नांगा जिरवला यांचा, कशी खोडी मोडली यांची ! अशा द्वेषपूर्ण शब्दांत तो भांडायला सुरुवात करतो.

देवाशी एकेरी बोलण्यात त्याला काही वाटत नाही. अनेक संतांनी देवाशी अशाच प्रकारे एकेरी भाषेत संवाद साधला आहे. देव ही गोष्ट अशी आहे जी आपल्यातंच असते, त्यामुळे तो आपल्या जवळचाच असतो. त्यामुळे त्याच्याशी आपण आपल्या जवळची व्यक्ती म्हणून,आपला धाकटा भाऊ, आपला मित्र म्हणून आपला सखा म्हणून भांडू शकतो आणि तोही हेच करतो. आयुष्यात घडलेल्या सगळ्या घटना देवासमोर मांडतो. खरंतर देवाला हे सारं माहीत असतं. मात्र तरीही तो रागाने, मोठ्या आवाजात देवाला सगळं सांगत राहतो, सांगत राहतो, सांगत राहतो! हे देवाशी भांडण नव्हे स्वतःची स्वतः केलेलं बंड अन् एक संवाद आहे !

'दीवार' चित्रपटातील हा प्रसंग आपल्या सर्वांच्या आयुष्यात कधी ना कधी आला असेल, येत राहील. असा प्रसंग आल्यानंतर आपण स्वतःची भांडतो म्हणजेच देवाची भांडतो. आपण केलेल्या चुका आपल्याला कळू लागतात. आपल्या जवळच्या लोकांनी आपल्याला फसवलेलं आपल्याला उमगायला लागतं. आपण हे असं करायला पाहिजे होतं, तसं नको करायला पाहिजे होतं, याचीही आपणाला जाणीव होती. स्वतःने, स्वतःशी, स्वइच्छेने देवासमोर साधलेला संवाद 'दीवार' चित्रपटामध्ये दाखवलेला आहे. तो संवाद होण्याची गरज आहे. 

खरंच स्वतःशी बोलल्यानंतर अनेक प्रश्नांना उत्तर मिळतात. आपलं अंतर्मन हाच आपल्यात वसलेला देव असतो. तो कधीही आपल्याला वाईट करू देत नाही. तो देव आपल्याला चांगल्या वाटा दाखवत असतो. फक्त आपल्याला त्या देवाशी, अंतर्मनाशी संवाद साधायला हवा. देवळात जाऊन जाऊन देवाची भांडण करणं, त्याला आपल्या तक्रारी सांगणे, त्याला नवस करून लाच देणे कधीही चांगलं, मात्र कधीतरी आपण आपल्या स्वतःची भांडलो तरीसुद्धा आपल्याला आपल्या अनेक प्रश्नांची उत्तर मिळू शकतात.. उत्तर मिळू शकतात.. !

जय बच्चन..जय बच्चन !

#Deewar  
#amitabhbachchanpremi 

Amitabh Bachchan 
Amitabh Bachchan Fans Club India 
AMITABH BACHCHAN FAN$ CLUB 
Bachchanvede Kolhapuri 
Amitabh Bachchan = The Great

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...