फॉलोअर

past gone लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
past gone लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२७ ऑक्टोबर २०२३

तुम अतीत़ हों...


तुम अतीत़ हों...

गेलेला काळ, बीता हुआ कल किंवा अतीत म्हणा.. एक सुखद किंवा दुःखद आठवणीने भरलेला असतो. या काळात आपल्याला अनेक सुखद आठवणीने भरून ठेवलेलं असतं. जुन्या आठवणी आपल्याला ताज्यातव्याना करतात, आनंद देतात.. तर कधी कधी दुःखही देतात. 

लहानपणीचा काळ सुखाचा असं म्हणतात,पण 'बिता हुआ कल' म्हणजे फक्त लहानपणीचा काळ नव्हे तर तुमच्या गत आयुष्यात घडलेल्या सुखद घटना किंवा तुमच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट देणाऱ्या काही प्रेरणादायी घटना तसेच तुम्हाला उध्वस्त करणाऱ्या काही दुःखद घटनाही असतील. या घटना तुम्ही आयुष्यभर कधी विसरत नाही, तो क्षण देणारी ती व्यक्तीही कधी विसरू शकत नाही.

हा 'अती़त'' आपल्याला काही गोष्टी शिकवून जात असतो, परिणाम देत असतो. 'त्या' सोबत राहायला माणसाला खूप आवडतं. असं म्हणतात आयुष्यात घडून गेलेल्या गोष्टीचा विचार करायचा नसतो,सतत पुढे जायचं असतं. 'सिलसिला' मध्ये संजीव कुमार पत्नी रेखाला एक गोष्ट बोलून जातो, 'अती़त को एक मिठी याद समझ़कर भूल जाना चाहिए'... पण हा 'अती़त' विसरणं अशक्य असतं जर तो अती़त एखादी व्यक्ती असेल तर. कारण त्या व्यक्ती सोबतच्या आठवणी तसेच घडलेल्या काही गोष्टी आपल्या मनावर अतिशय खोलवर बिंबलेल्या,कोरलेल्या असतात. त्या गोष्टी किंवा ती व्यक्ती आपण कधीच विसरू शकत नाही. 

'बिता हुआ कल' प्रेरणादायी असतो, वेदनादायी असतो, सतत जवळ असतो त्रासदायक पण असतो. मात्र अनेकदा आपल्याला जेव्हा पुन्हा वाईट प्रसंग येतात तेव्हा तो जुना काळ आठवला की तो कल, ती आठवण 'औषध' म्हणूनही काम करत असतो. अशा या 'अतीत' विषयी सहज चार ओळी बाहेर पडल्या...

तुम अतीत़ हो...
पर सबसे करीब हों !

तुम अतीत़ हों...
पर सबसे खुब़सुरत हों !

तुम अतीत़ हों...
पर तकलिफें खुब़ देते़ हों !

तुम अतीत़ हों...
पर दवा़ भी तुम ही़ हों !

सतीश मोरे सतिताभ
२७.१०.२०२३

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...