फॉलोअर

२८ जानेवारी २०२३

साद देत नाही

मी सर्वांच्या मदतीला धावून जातो, 
मात्र माझ्या कामाला कोणी येत नाही,
अशी भावना अनेकदा प्रत्येकाच्या मनात निर्माण होते. 
मग आपण त्रागा करून घेतो. 
मी त्यांच्याकडे अपेक्षाच का धरली असं वाटू लागतं.
पश्चात्ताप करण्याची वेळ आपल्यावर येते. 
आणि मग सहज जी प्रतिक्रिया उमटते ती अशी असते... ..सतिताभ 

११ जानेवारी २०२३

यात भिती कसली?


यात भिती कसली* ?

आयुष्यात अनेक चुका होतात, काही चुका सहज होतात तर काही चुका जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याने होतात. काही चुका नकळत होतात तर काही कळत. कधीकधी पुढे काय होणार आहे याची जाणीव असूनही चुक केली जाते. ती चुक होत नसते तर केलेली असते. अशा चुकांमुळे शेवट निराशाजनक किंवा दुर्दैवी होतो. अशा वेळी निराश नाही व्हायचं कारण आपण स्वतः ते संकट ओढवून घेतलेलं असतं, आपण स्वतःच खड्डा खोदलेला असतो. मग स्वतःच खोदलेल्या खड्डयात पडायची कसली भिती? पडलो आहे तर पडलो, ते स्वीकारुया आणि यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग पण आपणच शोधू असा विचार करता करता आणि मग हे सुचलं. ⬆️⬇️

 *सतीश मोरे सतिताभ* 
    ११.०१.२०२२

०४ जानेवारी २०२३

आवडते त्याच ट्रेनमध्ये बसा !



तुम्हाला एखादं काम आवडतं नसेल तर ते तुम्ही करता कामा नये. ज्या विषयात रस आहे तेच काम केलं तर ते मनापासून होतं. तुम्ही नशीबवान असाल तर तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची, नोकरी करण्याची संधी मिळाली. 

आपले इंटरेस्ट कशात आहेत ते तुमचं तुम्ही ओळखा. नोकरी करायची इच्छा असलेला माणुस व्यवसाय करू लागला तर तो आठ तासच करतो. याउलट व्यवसायात रस असलेला व्यक्ती चुकून नोकरीत पडला तर तो तिथेही व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून काम करतो, सर्वांची मने जिंकतो मात्र तो तिथे फार काळ रमत नाही. 

सदगुरु वामनराव पै म्हणतात, तुम्हाला पुण्याला जायचं आहे आणि तुम्ही कोल्हापूरला जाणाऱ्या गाडीत बसला तर तुम्ही पुण्याला पोहोचू शकणार नाही किंवा लांब मार्गाने खूप उशिरा पोहोचणार. त्यासाठी पुण्याला जायचं असेल तर पुण्याला जाणाऱ्या एसटीतच बसले पाहिजे, ती एसटी तुम्हाला थेट पुण्याला नेऊ शकते. तुम्हाला हवं त्या मार्गाला जायचं असेल तर त्यादिशेकडेच पाहिलं पाहिजे आणि त्यावरच आपल्या लक्ष केंद्रित केले पाहिजे

म्हणून शक्यतो आवडीचे काम निवडा, शाखा निवडा. त्यातच करीयर करा. ज्या गावाला जायचं नाही त्या गाडीत बसायचं नाही या आशयाचं मेरीमी विलिंमसन यांचं एक इंग्रजी सुवचन आहे, If a train doesn't stop at your station, it is not your train. त्यामुळे तुम्हाला आवडते त्याच ट्रेनमध्ये बसा. 

सतीश मोरे सतिताभ
०४.०१.२०२३

०३ जानेवारी २०२३

व्यक्त व्हा पण कुठेही नको !


आपल्या अडचणी किंवा दुःख व्यक्त करण्यासाठी कोणीतरी एक हवा असतो, त्याचा आपण शोधही घेत असतो. आजच्या काळात आपलं मन मोकळं करण्यासाठी असा एखादा व्यक्ती शोधताना मात्र काळजी घ्यायला हवी. 

जो कोणी आपल्या अडचणी सोडवू शकतो, ज्याला आपल्या समस्यांवर उपाय माहित आहे किंवा जो कोणी आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकतो आणि आपण त्याला शेअर केलेलं त्यांच्या पुरतेच ठेवेल, अशाच व्यक्ती समोर व्यक्त व्हा. अन्यथा कुठेही मन मोकळं करू नका. कारण अनेक जण तुमच्या दुःखाचा बाजार करायला बसले आहेत. 

दुःख आणि समस्या व्यक्त करण्यासाठी एक तात्पुरता पण रामबाण उपाय आहे, तो म्हणजे स्वतःला छंदाच्या 'वेडा'त बांधून ठेवणं. मस्त पैकी गाणी ऐकणं, गाणी म्हणणं,सिनेमा पाहणं किंवा निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन एकटं राहणं. दोन तीन तासांच्या चित्रपटात तुम्ही जग पाहून तर येताच, दुःखही विसरता, काही क्षण हसताही. चित्रपटातील 'जब तक जिंदगी है, तब तक मरना नहीं ' या सारखा एखादा संवाद तुम्हाला मार्गही दाखवेल. निसर्ग तर तुम्हाला खुप काही शिकवतो. फुले हसायला शिकवतील, झाडं द्यायला, नद्या सतत प्रवाही रहायला तर डोंगर उंच स्वप्न पहायला. प्राणी पुन्हा पुन्हा प्रयत्न करायला. तर मग करा एकदा प्रयत्न ! 

सतीश वसंतराव मोरे
०३.०१.२०२३

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...