फॉलोअर

३१ जानेवारी २०२४

पहिली परदेशवारी @ बाकू अझरबैझान 1

परदेश सहल करण्याचं स्वप्न सर्वांचच असतं, माझंही होत.पण ते कधी पूर्ण होणार याची गेल्या अनेक वर्षापासून वाट पाहत होतो. परदेशात जायचं म्हणून पासपोर्ट काढला खरा मात्र पासपोर्टची मुदत संपली. पाच वर्षे होऊन गेली तरी कुठेही जाता आलं नाही. पुन्हा पासपोर्ट नुतनीकरण केला आणि आता ठरवलं जायचं, नक्की जायचं. पासपोर्ट रिन्यू करून पुन्हा सहा महिने गेले तरी योग येत नव्हता. ऑफिसचं काम, घरच्या अडचणी, कन्येची दहावी या सर्व जबाबदारी मध्ये परदेशात कधी जायचं राहूनच गेलं. 

फेसबुकवर ट्रॅव्हल्स कंपनीच्या अनेक जाहिरात येतात. त्यापैकी एका कंपनीला संपर्क साधला. तत्पूर्वी कराड मधील जे ट्रॅव्हल कंपन्या आहेत त्या सर्वांना फोन केले, त्यांनी काही कल्पना दिल्या सुचवल्या. मात्र मी फेसबुक वर आलेल्या दिल्ली येथील डुक कंपनीकडून परदेश दौऱ्याचे नियोजन केले. एरवी कुठेही जाताना मला बोलवा असे सांगणारे अनेक जण असतात मात्र आपल्या वेळेला कोणी तयार होत नाही. माझ्यासोबत लहानपणापासून असलेला माझा करवडी येथील शेजारी, लहानपणीचा सवंगडी अनिल चव्हाण याला मी ती आयडिया सांगितल्यानंतर तो लगेच तयार झाला.आम्ही पैसे भरले देश निवडला, अजरबैंंजान ! जशी दुबई ही संयुक्त अमिराची राजधानी आहे मात्र संयुक्त अमीरातला फार जास्त पण ओळखत नाही. दुबई म्हटले की लोकांना सर्व आठवत तसंच अझरबैझान हा देश हा कमी लोकप्रिय आहे मात्र त्याची राजधानी बाकू ही अतिशय प्रसिद्ध आहे. त्या बाकूला जाण्याचा दिवस उजाडला. 26 जानेवारी रोजी दिल्ली येथून बाकूसाठी फ्लाईट रवाना झालं. 27 जानेवारी रोजी पहाटे 3  वाजता बाकूमध्ये पाय ठेवला. 



कुठल्याही परदेशी भुमीवर माझं हे पहिले पाऊल होतं. परदेश किती मोठा असो, लहान असो, प्रगत असो वा गरीब असो  आपल्यापेक्षा दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथली संस्कृती जाणायला, तिथले लोक पहायला, त्याचा अभ्यास करायला मला पहिल्यापासूनच आवडतं अझरबैझान देशाविषयी खूप ऐकलं होतं, वाचलं आहे. आता बाकूमध्ये आम्ही पोहोचलो आहे. पुढील पाच दिवसात तिथं राहणार आहोत. त्याविषयी सविस्तर ब्लॉक लिहीणारच आहे.

भारतात कुठेही गेलो तर पत्रकारिता विषय कधी विसरत नाही. ज्या ठिकाणी नवीन काही दिसेल ते मी पाहतो आणि त्याविषयी लिहितो. दिल्ली, आग्रा, गोवा इथून मी लेखन केलेलेच आहे. परदेशात गेल्यावर लिहिणं कसं थांबवता येईल ? अझरबैझान मध्ये खुप  ठिकाणी भेटी दिल्या. याबाबत पुढील चार पाच दिवस लिहिणारच आहे. Be connected.

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...