फॉलोअर

१९ डिसेंबर २०२१

एकाला जायची घाई झाली होती...


एकाला जायची घाई झाली होती, एकाला यायची !
@ मराठी बाणा शामगाव घाट

'पुढारी' वर्धापन दिनानिमित्त कराड पाटण तालुक्यातील गावागावांत,मान्यवरांच्या संस्थेत दौरे सुरू आहेत.काल शनिवारी सायंकाळी शामगावच्या घाटात नव्याने सुरू झालेल्या हाँटेल 'मराठी बाणा'मध्ये जाण्याचा योग आला. मुंबई महापालिकामध्ये सहायक अभियंता म्हणून काम पाहणारे अंतवडी गावचे सुपुत्र कृष्णा शिंदे आणि सौ.सुजाता शिंदे यांनी हे हाँटेल सुरू केले आहे. अजून बरंच काम बाकी आहे.सध्या फक्त चहा-नाश्ता तसेच शाकाहारी आणि मांसाहारी जेवण विभाग सुरू केला आहे.निसर्गरम्य ठिकाणी सुरू झालेल्या या हाँटेलला एकदा भेट द्यायला हवी. सुमारे साडे चार एकर क्षेत्रावर विकसित होत असलेल्या 'मराठी बाणा' मध्ये भविष्यात कृषी पर्यटन, रेसार्ट,जलतरण, वाॅटर बोटींग आणि बरंच काही करण्याचा शिंदे सरांचा मानस आहे.


मी,दिलीप माने सरांच्या सोबत सायंकाळी सहाच्या सुमारास 'मराठी बाणा' येथे पोहचलो. अतिशय दुर्मिळ, अविस्मरणीय आणि सुंदर असं दृश्य आणि निसर्गाचा आविष्कार आज एकाच वेळी मला याठिकाणी अनुभवायला आला,पाहता आला. 

एकीकडे पश्चिमेला 'सुर्यनारायण' मावळतीला निघाले होते तर दुसरीकडे 'चंद्रदेव' शामगावच्या डोंगरातून डोकावत होते. एकाला जायची घाई होती, एकाला यायची! दोघेही निसर्गाचे अखंड,अढळ, अटल,अनिवार्य,अविभाज्य,अनुपम,अतुट,अविरत कार्यरत घटक. योग्य वेळीच यायचे,योग्य वेळीच जायचं. कधीही वेळ चुकवायची नाही. आपलं काम चोख बजवायचे ! जाताना सर्वांना प्रकाशित करत जायचं,देत रहायचं. देत असताना परत काही मिळेल याचा हिशोब नाही ठेवायचा. एक प्रखर दुसरा शितल. दोघांशिवाय जग चालूच शकत नाही. जीवनात काही वेळी आक्रमकता हवी तर कधी संयम हवा, हेच तर हे दोघं सांगत आहेत. 

निसर्ग आपल्याला खुप काही शिकवून जातो. निसर्गाचा हा आविष्कार पाहताना आज मी पुन्हा एकदा 'चंद्रमा'च्या प्रेमात पडलो होतो, 'दिनकरां'च्या रंग उधळणीवर भाळलो होतो.

@सतीताभ
१९.१२.२०




२५ नोव्हेंबर २०२१

बाळासाहेबांनी करून दाखवलं !


बाळासाहेबांनी करुन दाखवलं...

फक्त कराड उत्तरचे पालकमंत्री, कराड तालुक्यात बाळासाहेब पाटलांचा दबदबाच नाही, बाळासाहेब अपघाताने मंत्री झाले आहेत, त्यांना साखर कारखान्या शिवाय काही कळत नाही, या आणि अशा अनेक टीकाटिप्पणी आणि टोमण्यांना सामोरे गेलेले सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मिळवलेला विजय मी पण काय कमी नाही, पन्नास वर्षे कराड तालुक्याचे राजकारण आणि सलग 42 वर्षे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या पी.डी.पाटील यांचा पुत्र आहे, असे जणू काही दाखवून दिले आहे. बाळासाहेब पाटील कराड सोसायटी गटातूनच का उभे राहिले आणि ते का जिंकले याची अनेक कारणे आहेत. मात्र, यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण त्यांना कराड तालुक्याचा प्रमुख नेता व्हायचं होतं आणि त्यांनी ते या निकालातून सिद्ध करुन दाखवलं आहे !

--------------



सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला या वर्षी फार महत्त्व आले. या अगोदर गेल्या अनेक निवडणुका दरम्यान पालकमंत्री एक तर अजित पवार राहिले होते किंवा रामराजे नाईक निंबाळकर किंवा आणखी कोणी. या सर्व नेत्यांनी त्या काळात विलासराव उंडाळकर यांना हाताशी धरून जिल्हा बँकेच्या निवडणुका लढवल्या होत्या, जिंकल्या होत्या. मात्र, ही पहिली निवडणूक होती ज्या निवडणुकीत विलासराव पाटील-उंडाळकर नव्हते. सलग नऊ टर्म जिल्हा मध्यवर्ती बँकेत निवडून जाण्याचा विक्रम विलासराव पाटील यांच्या नावावर आहे. हा विक्रम फक्त उपस्थिती पुरता नाही तर या कालावधीत त्यांनी सातारा जिल्हा बँक टॉपला नेऊन ठेवली. जानेवारी 2021 मध्ये काकांचे निधन झाले. दरम्यान दोन वर्षांपूर्वी ठाकरे सरकार आल्यानंतर बाळासाहेब पाटील सहकार मंत्री झाले, पुढे पालकमंत्री झाले. या अगोदरच्या दोन निवडणुकांमध्ये जिल्हा बँकेत जाण्यासाठी बाळासाहेब पाटलांना संघर्ष करावा लागला होता. एकदा पक्षाच्या खातिर पराभव समोर दिसत असून सुद्धा उदयनराजेंच्या विरोधात लढावे लागले होते. तर गेल्या निवडणुकीत गप्प बसवून नंतर स्वीकृत संचालक म्हणून त्यांची बोळवण करण्यात आली होती. हे करताना त्यांना पद्धतशीर पद्धतीने राष्ट्रवादीने बाजूला ठेवले होते. मात्र यावेळी बाळासाहेब पाटील स्वतः पालकमंत्री असल्यामुळे निर्णय  प्रक्रियेमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. ना. रामराजे नाईक निंबाळकर, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. मकरंद आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेचा कारभार गेल्या पाच वर्षात चांगला झाला. तिघेही सुरुवातीपासून एकत्र आहेत आणि होते. बाळासाहेब पाटील पालकमंत्री झाले म्हणून त्यांना जिल्हा  बँकेच्या उमेदवार निवड प्रक्रियेत फारसे महत्त्व येणार नाही असं पद्धतशीर पूर्वक नियोजन करून डाव आखला गेला. विलासराव पाटील -उंडाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचे संबंध चांगले होते. खरतरं मनात आणलं असतं तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि खासदार शरद पवार यांच्याशी ‘मनापासून’ दुबार चर्चा करून ना. निंबाळकर हे उदयसिंह पाटील यांचे मन वळवू शकले असते किंवा बाळासाहेब पाटील यांना पर्यायी जागा देऊ शकले असते.
 सातारा जिल्ह्याच्या राजकारणात कराडचे सुरुवातीपासूनच असणारे मोठे स्थान कमी करण्यासाठी गेल्या दहा-पंधरा वर्षात फार मोठा प्रयत्न झाला. मात्र, नियतीने 2010 साली पृथ्वीराज चव्हाण यांच्या रूपाने कराडला मुख्यमंत्रीपद दिले. त्यानंतर भाजप सरकार आल्यानंतर डॉ. अतुल भोसले, शेखर चरेगावकर यांच्या माध्यमातून सत्ताकेंद्रे कराडलाच राहिली. दोन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपमध्ये गेलेले शिवेंद्रराजे निवडून आले, मात्र शरद पवार यांचे जवळचे शशिकांत शिंदे पराभूत झाले. मकरंद पाटील हे निवडून आले मात्र त्यांचा अनुभव बाळासाहेब पाटील यांच्यापेक्षा कमी असल्यामुळे बाळासाहेब पाटील यांना मंत्रिपद मिळाले आणि पुन्हा एकदा सत्ता केंद्र कराडला आले. मात्र असे असूनही राष्ट्रवादीच्या या जिल्हा टीमने कधीही बाळासाहेब पाटील यांना स्वतंत्रपणे काम करू दिले नाही. ना. बाळासाहेब पाटील यांची छाप पडू लागली तर आपली इमेज कमी होईल यासाठी भरपूर प्रयत्न झाले. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत बाळासाहेब पाटील हे सोसायटी मतदार संघातूनच कशी निवडणूक लढतील, त्यांच्यासमोर उदयसिंह पाटील कसे उभे राहतील याचं नियोजन राष्ट्रवादी मधील दिग्गजांनी केलं. कराडचा वाद मिटवण्या ऐवजी पेटवण्याचा प्रयत्न झाला. परंपरा आणि वारसा या जिद्दीला पेटलेल्या उदयसिंह पाटील यांनी सोसायटी मतदारसंघातून पहिल्यांदा अर्ज भरला आणि बाळासाहेब पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब पाटील यांनीही या दबावाला न झुकता याच गटातून उभे राहण्याचा निर्णय जाहीर केला.
गेली नऊ टर्म कराड तालुका सोसायटी मधून प्रतिनिधित्व करणार्‍या विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या चिरंजीवांच्या विरोधात निवडणूक लढवताना बाळासाहेब पाटील यांनी सुरुवातीपासूनच केलेला अभ्यास आणि त्यांचे बंधू जयंत पाटील यांच्यासहित एकनिष्ठ कार्यकर्त्यांची साथ महत्त्वाची होती. याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे निश्चित केले असल्यामुळे त्यांनी निवडणुकी अगोदरच तीन महिने सर्व मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. कोणता मतदार कोणाचा आहे? कुठे विकू, झुकू शकतो? कुठे स्ट्राँग होऊ शकतो? या मतदाराचा वीक पॉईंट कोणता? हा कुणाचे नेतृत्व मानतो इथपासून तो कुणाचा पाहुणा आहे ? त्याचा कोणी नातेवाईक कुठल्या ठिकाणी नोकरीला आहे? त्याच्यावर कोणत्या पद्धतीने दबाव टाकता येईल किंवा मदत करता येईल? याचा ‘कराड उत्तर पॅटर्न’ नुसार अभ्यास बाळासाहेब पाटील गटाने केला होता. बाळासाहेब पाटील यांचे समर्थक हे त्यांच्या सोबतच राहणार होतेच. आ. पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारे मतदार उघडपणे उदयसिंह पाटील यांना मदत करणार नव्हते. पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंह पाटील यांच्यातील मनोमिलन किती मनापासून झालेले आहे याचा अभ्यास बाळासाहेब पाटील यांना होता. कराड तालुक्यातील गावागावात गेल्या दोन वर्षात नेटवर्क अधिक मजबूत करून उत्तर मतदार संघाप्रमाणे बाळासाहेब पाटील यांनी दक्षिणेत आपला एक माणूस गावागावात तयार केला होता.


बाळासाहेब पालकमंत्री आहेत, सहकार मंत्री आहेत ते निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतात म्हणजे काहीतरी त्यांच्याकडे ‘स्ट्राँग पॉइंट’ असणार, असा प्रचार कराड तालुक्यात सुरुवातीपासूनच झाला. छत्रपती उदयनराजें विरोधात जिल्हा बँकेत पक्षाने त्यांच्यावर लादलेल्या उमेदवारीमुळे झालेला पराभव वगळता बाळासाहेब कधीही पराभुत झालेले नाहीत. गेली अनेक वर्षे त्यांनी कराड दक्षिणच्या राजकारणात फारसा रस घेतला नव्हता. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीतही त्यांचा फारसा सहभाग नसतो. कुणालाही न दुखावण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे सहसा त्यांचा नवीन राजकीय विरोधक तयार होत नाही. त्यांचे परंपरागत काही विरोधक आता त्यांच्यासोबत काम करत आहेत. मात्र बाळासाहेब पाटील यावेळी दक्षिण मधील सर्व घटकांचा अभ्यास करून या निवडणुकीला सामोरे गेले.
ज्येष्ठ नेते पी.डी.पाटील यांच्या घराचे एक फारमोठे शल्य आहे. एवढे मोठं राजकीय आणि विकासात्मक काम करूनही यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बरोबर असून सुद्धा विलासराव पाटील यांच्या राजकीय प्रभावामुळे त्यांना कराड तालुक्याचे नेते होते आले नव्हते. किंबहुना ज्येष्ठ नेते पी.डी.पाटील यांनी कराड शहर आणि  उत्तर या पलीकडे जाऊन जास्त पाहिले नव्हते. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्री कारखाना कार्यक्षेत्र असलेल्या सातारा, कोरेगाव आणि खटाव तालुक्यात विधानसभा निवडणुकीपुरते लक्ष घातले. पुढे त्यांचा तिथे गट निर्माण झाला. मात्र या तालुक्यातील राजकारणात त्यांनी कधीही ढवळाढवळ केली नाही.  उंडाळकर आणि पी.डी.पाटील गटाचे अनेक वर्षे अनेक निवडणुकीमध्ये सख्य राहिले. मात्र ते मनापासून नव्हते. परिस्थितीनुसार निर्णय घेऊन ज्येष्ठ नेते पी.डी. पाटील आणि विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाने त्या -त्या वेळी पंचायत समिती, बाजार समिती या सत्ता ताब्यात घेतल्या होत्या. काकांनी दक्षिणेतील आपले पाय मजबूत करताना मोहिते- भोसले यांच्यामध्ये भांडणे लावत सतत मोठा विरोधक तयार होऊ दिला नव्हता. त्यामुळे ते सलग विधानसभेत जाऊ शकले. राज्यात असणारा दरारा कायम ठेवत बँकेच्या माध्यमातून काका नेहमी जिल्ह्याचे नेते म्हणून कार्यरत राहिले. सह्याद्री कारखाना आणि माझे शहर एवढाच विचार तसेच सोयीचे आणि तडजोडीचे राजकारण करत असल्यामुळे पी.डी. साहेब यांना कधीही जिल्ह्याच्या राजकारणात जावसं वाटलं नाही. मात्र त्यांच्या निधनानंतर बाळासाहेब पाटील यांनी कराड तालुक्याच्या राजकारणात आपली पावले भक्कम करण्यास सुरुवात केली. कृष्णा कारखानाच्या निवडणुकीत बाळासाहेब पाटील तटस्थ राहत अप्रत्यक्षरित्या त्यांनी अतुल भोसले यांना पाठिंबा दिला. अतुल भोसले यांचा तीन वेळा झालेला पराभव कुणामुळे झाला हे सर्व जिल्ह्याला माहित आहे. पहिला पराभव थेट बाळासाहेब पाटलांनी केला. दुसर्‍या दोन पराभवाला बाळासाहेब पाटील थेट जबाबदार नसतील पण कराड दक्षिणमधील बाळासाहेब पाटील यांचा गट अतुल भोसले यांच्या सोबत राहिला असता तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते. या जरी जर-तरच्या गोष्टी असल्या तरी कराड दक्षिण राजकारणात जिकडे बाळासाहेब पाटील तिकडे विजय
नक्की होऊ शकतो अशी सध्याची परिस्थिती आहे.
दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांच्या घराण्यासोबतही बाळासाहेब पाटील यांचे फारसे सख्य राहिलेले नाही. गेल्या दहा वर्षात बदलत्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब पाटील जरी एकत्र दिसले असले तरीही या गटातील दुरावा वेळोवेळी दिसला आहे. कराड नगरपालिकेच्या गत निवडणुकीवेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी सुभाषराव पाटील यांच्या विरोधात केलेला प्रचार आणि लोकशाही आघाडीचा झालेला मानहानीकारक पराभव बाळासाहेब पाटील गट अजूनही विसरलेला नाही. पृथ्वीराज चव्हाण गट आणि उदयसिंह पाटील यांचा गट एकत्र आलेला असला तरी कार्यकर्त्यांमधील कुजबुज काय आहे याची माहिती घेत बाळासाहेब पाटील यांनी कराड तालुक्यातील राजकारणाचा चांगला अभ्यास केला. या अभ्यासाच्या जोरावरच ते जिल्हा बँकेच्या निवडणुकीला सामोरे गेले.
जिल्हा बँकेची निवडणूक सोपी नसते. सोसायटी मतदारसंघातून निवडून जायचं असेल तर तेवढी ताकद आपल्याकडे आहे का? गेल्या दोन निवडणुकीमध्ये आपल्याला किती मते मिळाली होती? याचा अंदाज घेतानाच उदयसिंह पाटील यांच्या विरोधातील सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यात ते यशस्वी झाले. उदयसिंह पाटील हे काँग्रेसचे उमेदवार आहेत असा प्रचार सुरुवातीपासूनच करण्यात आला. मात्र काँग्रेसचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सहित कोणीही नेता  उदयसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी कराड तालुक्यात कुठेही फिरताना दिसला नाही. पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारी जी काही मते मते होती ती मते सुद्धा आपल्याकडे खेचून घेण्यात बाळासाहेब पाटील यांचे बंधू यशस्वी झाले. उदयसिंह पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाकडे मदत मागितली नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांचे कार्यकर्ते आता बोलून दाखवत आहेत. हे जरी खरे असले तरी काँग्रेस प्रेमी अनेक व्हाट्सअप ग्रुप वरती बाळासाहेब पाटील यांच्यावर खालच्या शब्दात जोरदार टीका झाली. फक्त या ग्रुपवरच हे दोन गट एकत्र असल्याचे दिसले. प्रत्यक्षात उंडाळकर गट आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा गट जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून कुठेही एकत्र काम करताना कोणालाही दिसला नाही. याची कारणेही
वेगळी आहेत.
पृथ्वीराज चव्हाण यांना कराड तालुक्याच्या राजकारणात तसा फारसा इंटरेस्ट नाही. त्यांना दक्षिण सोडून दुसरीकडे जायचे नाही. दक्षिणमध्ये ‘सध्या तरी’ ते सेफ आहेत. दक्षिणमध्ये निवडून यायचे असेल तर बाळासाहेब पाटील गटाची मदत लागणार आहे किंबहुना बाळासाहेब पाटील यांच्या गटाच्या मदतीमुळेच ते 2019 च्या निवडणुकीत निवडून आलेले आहेत. त्यामुळे उघड प्रचार करून मने दुखावण्यापेक्षा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील मला काही कळत नाही असे बोलून ते या निवडणुकीपासून लांब राहिले. त्यांना या निवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी सुद्धा बाळासाहेब पाटील गटाने चांगलेच लॉबिंग केल्याची चर्चा आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारी काही मते जर पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले असते तर कदाचित उदयसिंह पाटील यांना मिळू शकली असती. मात्र उदयसिंह पाटील यांनी तशी मदतच मागितली नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांचे कार्यकर्ते खासगित बोलून दाखवत आहेत. मात्र, हे सगळं घडूच नये यासाठी बाळासाहेब पाटील यांच्या सहीत यांच्या बंधूनी खेळलेल्या खेळी यशस्वी झाल्याचे निकालावरून लक्षात येते. खरेतर उदयसिंह पाटील सोसायटी मतदारसंघातून उभे राहिले नसते तर बाळासाहेब पाटील दक्षिणेतल्या गावा-गावात पोहोचू शकले नसते. ही झाली एक बाजू.  मात्र उदयसिंह पाटील हे एकाकी लढले.त्यांना मिळालेली मते पहिली तर त्यांची मते त्यांच्या सोबत आहेतच हे स्पष्ट होते. पराभवानंतर ते स्वतः यावर आत्मचिंतन करतीलच!
बाळासाहेब पाटील यांनी त्यांचे कट्टर विरोधक अतुल भोसले यांच्या गटाची जुळवून घेतले, ही या निवडणुकीला सुरुवातीला मिळालेली एक वेगळी कलाटणी होती. अतुल भोसले यांच्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक, बाजार समिती किंवा नगरपालिका फारसे महत्त्वाचे नाही. त्यांना काही करुन फक्त विधानसभेत जायचं आहे आणि विधानसभेत जाण्याचा मार्ग ‘मंगळवार पेठे’तून जातो याची त्यांना चांगली जाणीव आहे. उदयसिंह पाटील किंवा पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिणचे येणार्‍या निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार असू शकतात. या दोन्ही उमेदवारां विरोधात उभे राहताना बाळासाहेब पाटील यांना आत्ता मदत केली तर भविष्यात फायदा होऊ शकतो, या दूरदृष्टीतून अतुल भोसले यांनी बाळासाहेब पाटील यांच्याकडे मदतीचा हात पुढे केला. बाळासाहेब पाटील यांना मिळालेली मते पाहिली तर अतुल भोसले यांची मदत त्यांना किती फायद्याची ठरली आहे हे स्पष्ट होते.
या निकालामुळे बाळासाहेब पाटील यांचा कराड तालुक्यातील दरारा वाढला आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी जिल्हा बँकेत येण्यासाठी वेगळे पर्याय देऊ केले होते, मात्र थेट सोसायटीतूनच लढायचे आहे असा आग्रह बाळासाहेबांनी करण्याचे कारण त्यांना  जिंकून  कराड तालुक्यावर आपला होल्ड आहे हे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना दाखवायचे होते. बाळासाहेब पाटील ठासून या निवडणुकीत जिंकले. या निकालामुळे भविष्यात अनेक राजकीय स्थितंतरे  होणार आहेत. काँग्रेसचं काय होणार, काँग्रेस काय करणार ? कराड तालुक्यात भविष्यात निवडणुका कशा होणार?  हे पाहण्यासाठी येणार्‍या काळाची वाट पहावी लागेल.

२० नोव्हेंबर २०२१

२४ तास तुझ्यात


२४ तास तुझ्यात!

दुलारी,

दिस सुरू होतो,
तुझ्या स्मरणाने..

सकाळ होती प्रसन्न,
सुप्रभात सतीराजानं..

वेध लागतात मध्यान्ही,
तुझ्या गोड दर्शनाचे..

सांज करते आतुर,
संवाद तुझसी साधण्याशी..

होता रात मग,
मन होतं व्याकुळ..
तुझ्या आठवणीत !
तुझ्या आठवणीत !

दुलारीचासती 
२०.११.२०२१


24 hours in you !

Dulari,

The day begins,
In your memory !

The morning is pleasant,
With Good morning Sati !

In the noon dreams,
For your sweet glimpse !

Evening makes crazy,
To communicate with you !

Then  night comes,
Mind becomes restless, 
In your memory
In your memory !


Dulari'Sati
20:11:2021

१६ नोव्हेंबर २०२१

तेरी हसी कि किमत क्या है बता दे तु


तेरी हसी़ंकी 
किमत क्या है ये बता दे तु ! 

कहो तो सारे 
रिश्ते नाते तोड के आऊ !

कहो तो खुदको 
हवाले तेरे कर डालु ! 

कहो तो खुलकर 
नाता इझहा़र कर दुं!

तेरी हसींकीं 
किमत क्या है ये बता दे तु🙏

१४ नोव्हेंबर २०२१

निरागस बालपणीच्या आठवणी




#निरागस बालपणीच्या आठवणी !

बालपण ही निसर्गाने दिलेली अतिशय सुंदर अशी देणगी आहे. कसलीही कामं नसतात, कसलीच चिंता नसते. फक्त हसणं,रडणं,खेळणं, नाचणे, जेवणं,आई-वडिलांच्या कुशीत जाऊन झोपणं,मजा करणं! येवढंच काम असतं.

बालपणात एका गोष्टीचे वेध लागलेले असतात ते म्हणजे मी मोठा कधी होणार ! पण आता (वयाने) मोठ्या झालेल्या लोकांना असं वाटतंय की बालपण परत यायला हवं !

या बालपणात आपण अनेक आनंद लुटले आहेत, खूप मजा केल्या आहेत. आज पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिनी बाल दिन साजरा केला जातो. या दिनी आपण आपल्या लहानपणीच्या काही आठवणीमध्ये का बरं रमून जायचं नाही! 

खोडकर निरागस बालपण!
अल्लड अवखळ बालपण !
सुंदर सहज बालपण!

मला माझ्या बालपणीची एक गोष्ट चांगली आठवते. १९८२-८३ सालची गोष्ट असेल. तेव्हा एक दुजे के लिए चित्रपट पाहायला मी माझा थोरला बंधू हनुमंत अण्णा त्याच्या सोबत कराडला गेलो होतो. सोबत दुसरे एक आमच्या गावचे सतीश पाटील सोबत होते. कराडच्या राजमहल थेटरला आम्ही हा चित्रपट पाहिला. पाचवी सहावीत असेन मी. या वयात हा चित्रपट मला किती कळला, मला हा इतका रोमँटिक चित्रपट लव स्टोरी चित्रपट पहायला आमचा भावाने का नेले असेल कुणास ठाऊक? तरीही हा चित्रपट पाहून आल्यानंतर माझ्या बालमनाने जो प्रश्न विचारलेला होते त्याचे मला आज सुद्धा हसू येते.

कराडला चित्रपट पाहायला जायचं म्हणजे त्यावेळी सायकल हा एकमेव पर्याय होता. भावाच्या सायकलवर नळीवर टॉवेल बांधून त्यावर बसून डबल सीट कराडला जाणे यासारखा आनंद कुठलाच नव्हता. चित्रपट पाहून आल्यानंतर ओगलेवाडी जवळ रेल्वे स्टेशनचा मोठा ब्रीज लागतो. या ब्रिज वर सायकल स्वार खाली उतरतात कारण चढ लागतो. आम्ही बंधू डबलसीट होतो, आम्हीही उतरलो.

चालता चालता मी माझ्या बंधूंना आणि सतीश पाटील काकांना एक प्रश्न विचारला. आपण एक दुजे के लिये चित्रपट पाहून आलो खरं मात्र या चित्रपटातील हिरो हिरोईन शेवटी पाण्यात उडी मारतात, पाण्यात गायब होतात. मग पाण्यात उडी मारलेले ते दोघे कुठे गेले ? माझा हा निरागस प्रश्न ऐकून माझा बंधू त्यावेळेला हसला होता. आज मात्र हा प्रसंग आठवला की मला सुद्धा हसू येते.

आज बालदिनी हा प्रसंग शेअर करताना मला खूप आनंद वाटतोय. माझा पाचवीतला एक फोटो मी आपल्यासोबत शेअर करतोय. ब्लॅक व्हाईट फोटो आहे तो! मी दोन किंवा तीन वर्षाचा असतानाच आहे. तेव्हा माझे केस फार मोठे होते, जावळ चांगले होते. माझी  ताई माझी वेणी घालायलची. वेणी घातलेला फोटो आहे तो . दुसरा फोटो आहे सहावीतला. आमच्या थोरल्या बंधूच्या लग्नातला. तिसरा फोटो आहे येता दहावीतला. बोर्डाचे परीक्षेच्या साठी रिसीटवर लावण्यासाठी काढलेला. उजव्या बाजूचे हे तीन फोटो माझ्या बालपणीचे आहेत तर डाव्या बाजूचा फोटो अलीकडचा आहे. ‌

आपणा सर्वांना बालपणीच्या खूप खूप शुभेच्छा!

*सतीश वसंतराव मोरे*
  १४.११.२०२१
    बालदिन



# Innocent childhood memories  !

Childhood is a beautiful gift from nature. No work, no worries. Just laughing, crying, playing, dancing, eating, sleeping in the arms of parents, having fun! That's all there is to it.

One of the things I have noticed in my childhood is when I will grow up! But now (older) people think that childhood should come back!

In this childhood you have had a lot of fun, a lot of fun. Today, Children's Day is celebrated on the birth anniversary of Pandit Jawaharlal Nehru. Why don't you just go back and reminisce about your childhood? 

Khodkar innocent childhood! 
Allad fiery childhood! 
Beautiful instinctive childhood!

I remember one thing from my childhood. It will be the year 1982-83. Then my elder brother Hanumant Anna and I went to Karad with him to watch a movie. Another one was with Satish Patil from our village. We saw this movie at the Rajmahal Theater in Karad. I will be fifth and sixth. How much did I know about this movie at this age, who knows why my brother took me to see this romantic movie Love Story? Still, I can still laugh at the question my child asked me after watching this movie.

Bicycles were the only option for Karad to go to the movies. There was no such thing as having a towel tied to a tube on a brother's bicycle and sitting on it to get a double seat. After watching the movie, there is a big bridge at the railway station near Oglewadi. Cyclists get down on this bridge because of the ups and downs. We were brothers double seat, we got off too.

While walking, I asked a question to my brothers and uncle Satish Patil. We have seen the movie for a while, but the hero and heroine of this movie finally jumps into the water and disappears into the water. So where did the two jump into the water? My brother was smiling when he heard my innocent question. Today, however, I remember this incident and I can smile too.

I am very happy to share this episode of Children's Day today. I am sharing with you a photo of my fifth. It's a black and white photo! When I was two or three years old. At that time my hair was very long, the hair was good. My mother used to wear my braid. This is a braided photo. The second photo is of the sixth. At our older brother's wedding. The third photo is of the coming tenth. Drawn on the receipt for board examination. The three photos on the right are of my childhood and the photos on the left are recent. 3

Happy childhood to all of you!


१९ ऑक्टोबर २०२१

भुकण्यांचा अर्थ "हेल्प प्लिज आणि थँक यू" असाही असतो !


तिच्या भुकण्यांचा अर्थ "हेल्प प्लिज आणि थँक यू"

रक्षा विसर्जन विधीसाठी करवडी गावी जाण्यासाठी पियुष आणि मी सकाळी नऊ वाजता घरातून बाहेर पडलो. नित्यनियमाप्रमाणे कराड स्मशानभुमी लगत असणाऱ्या चढाजवळील गवळवेस गणपतीच्या दर्शनासाठी थांबलो. गणेश दर्शन घेतल्याशिवाय ऑफिसला जायचे नाही असा माझा गेल्या अनेक महिन्यापासूनचा नित्यनेम आहे. गणेशभक्ती आणि अनुभवाबाबत मी नंतर बोलेन मात्र आज घडलेली एक एका कुत्रीची मातृवात्सल्य कहाणी 'आई तुला सलाम' यांची प्रचिती देऊन गेली. कुत्र्याच्या भुंकण्याच्या अर्थ "हेल्प मी किंवा थँक्यू" असेही असू शकतात, हे अनुभवलं.

गवळवेस गणेश मंदिरासमोर गाडी लावून खाली उतरलो. तेवढ्यात काळा आणि लाल रंगाची दोन कुत्री, दोन पिल्ले जोरजोरात भुंकत माझ्याजवळ आली. मला हे अनपेक्षित होतं. कुत्री माझ्याकडे काय कुणाकडेही बघून नेहमीच  भुंकतात यात काही नवीन नव्हते. मात्र आज अखेर कधीही कुत्र्यांनी मला त्रास दिलेला नाही .आज मात्र समोर आलेली ती दोन कुत्री मला पाहून माझ्याकडे नेहमीच्या पद्धतीप्रमाणे भुंकत नव्हती. 

कुत्र्यांशी संवाद साधण्याची माझी जुनी सवय आहे. कुठलेही कुत्रे दिसले तर मी नेहमी त्याच्याशी बोलतो. आपण जसे मित्र भेटल्यानंतर चौकशी करतो तसेच कुठलेही कुत्रे दिसले तर मी त्याला भाऊ, दादा,आप्पा, काका, मामा,नाना,बाबा,आबा,ताई,काकू या नावाने हाक मारतो. माझ्या मुलीला देवयानीला माझी ही सवय माहिती आहे. रस्त्यात कुत्रे दिसली की माझी मुलगी मला चेष्टेने म्हणते, पप्पा तुमचा भाऊ, मामा आला. तिलाही माझ्या या सवयीचे कौतुक वाटते. 

माझ्याकडे बघत भुंकणाऱ्या त्या दोन कुत्र्यांना पाहून नेहमीप्रमाणे, 'काय झाले तुला, ताई ?'असे मी त्याला सहजपणे विचारलं. तीच्या डोळ्यातील भाव मला  जाणवले. तीला कशाची तरी गरज आहे, हे माझ्या लक्षात आलं. तिचे डोळेच मला सर्व काही सांगत होते. प्रत्येक प्राण्याची बोलण्याची भाषा वेगळी असते. कुत्र्याची भाषा भुंकण्यातून असते. पण त्या भुंकण्यामध्ये सुद्धा एक वेगळेपणा असतो. ही कुत्री माझ्याकडे भुंकत आहे, मात्र तीला मदत हवी आहे हे लक्षात आल्यानंतर माझी नजर आजूबाजूला गेली.

स्मशानभूमीच्या कोपऱ्यावर गवळवेस गणपती समोर वीज कंपनीचा डीपी आहे. डीपीला तारेचे कंपाउंड आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी लागणारी लाकडे,ओंडके तिथे टाकलेली आहेत. या डीपीच्या लगतच छोटी झाडे, वेली वाढलेली आहेत, तारा पडलेल्या आहेत. या वेलीमध्ये कुत्र्याचे एक पिल्लू अडकले होते,ते मला दिसले.. त्याला बाहेर पडता येत नव्हते. हे पिल्लू व्याकुळतेने ओरडत होते. अडकलेल्या पिल्लाला बाहेर काढण्यासाठी आणखीन एक पिल्लू त्या ठिकाणी प्रयत्न करत होते. कुत्र्याची दोन्ही पिल्ले मदतीसाठी ओरडत होती,आक्रोश करत होती. काटेरी कंपाऊंड निमुळते असल्यामुळे त्यांची आई त्या कंपाऊंड मधून आत मदतीला जाऊ शकत नव्हती. 

छोट्याशा जागेतून आत जाऊन ही दोन्ही पिल्ले अडकलेली होती.आपल्या पिल्लांना वाचवू शकत नाही, त्यांच्या मदतीला जाऊ शकत नाही याची जाणीव झाल्यामुळे कुत्र्याची आई सैरभर झाली होती. मदतीसाठी ती माता सर्वांना बोलावत होती,भुंकत होती.त्या मदतीसाठी त्या माऊलीने माझ्या सहीत अनेकांना याचना केली होती. याच दरम्यान ही दोन कुत्री रस्त्यावरील इतर लोकांनाही भुंकुन मदत मागत होती. मात्र चावण्यासाठी, हल्ला करण्यासाठी ही कुत्री आपल्याकडे भुंकत आहेत असा समज करून दोन तीन माणसे माझ्या समोरूनच हाड हाड करत तिथून निघून गेली. 

याच दरम्यान नाना खामकर त्याठिकाणी आले. त्यांच्याकडे सुद्धा पाहून ही कुत्री भुंकायला लागली. एका कुत्र्याने नानांची पॅन्ट पकडून फाडली. नानांनी मला विचारल्यानंतर मी सर्व प्रकार सांगितला. तारेच्या कंपाऊंड बाहेरून थोड्या अंतरावरून झाडे-झुडपे हलवण्याचा मी प्रयत्न केला. कुत्र्याचे एक पिल्लू उलटे पडले होते, ते पाहून विजेचा धक्का लागून ते मेले असावं असा मला संशय आला. मात्र त्याचवेळी दुसरे पिल्लू तिथेच जिवंत असल्यामुळे भुंकत असल्यामुळे मी धाडसाने त्या ठिकाणी त्यांना हलवण्याचा प्रयत्न केला. 'उठ बाळा उठ, तुला काही झाले नाही,' असे म्हणत धीर दिला. छोटासा दगड एका बाजूला मारला. हा सर्व प्रकार ती माऊली व्याकुळ होऊन पाहत होती. तारेमध्ये, झुडपांमध्ये अडकलेली कुत्र्याची पिल्ले आता प्रयत्न करू लागली, हातपाय हालवू लागली आणि वेलीतून निसटली, हळूच लंगडत बाहेर आली. प्रेमाने हाक मारल्यानंतर माझ्याजवळ आली, पुढे आईला बिलगली. दोन्ही पिल्लांना पाहून त्या आईच्या डोळ्यातील अश्रू पाहून आमच्याही डोळ्यात पाणी आले. आईने बाळाला घट्ट मिठीत घेतले आणि सुटकेचा निःश्वास टाकला.

जगात आई का श्रेष्ठ आहे आणि आईला महत्व का दिले जाते, हे मी आज डोळ्याने पाहिले होते.आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी रस्त्याकडेला सर्वांना ती बोलवत होती आणि जेव्हा तिची पिल्ले सुखरूप बाहेर पडली तेव्हा त्या आईच्या डोळ्यातून आलेले अश्रू आणि पिल्लांना पाहून झालेला आनंद खरंच जगातील सर्वात सुंदर आनंदाचा क्षण होता. 

मी आज खूप दिवसानंतर मातृत्व पाहिलं, प्रत्यक्ष अनुभवलं. कोण म्हणतं प्राण्यांना प्रेम करता येत नाही? कोण म्हणलं प्राण्यांना बोलता येत नाही? प्राणी खुप काही बोलतात,फक्त ते समजले पाहिजे ! कंपाउंड मधून बाहेर आलेल्या दोन्ही पिल्लांना कुरवाळत त्या आईने पुन्हा एकदा माझ्याकडे पाहून भुंकायला सुरूवात केली. आता मात्र या भुंकण्याचा अर्थ 'थँक यू मोरे माऊली ' असा होता. 

सोबत असलेले नाना खामकर आणि माझा मुलगा पियुष यांनी हा सर्व प्रकार डोळ्यांनी पाहिला. माझे पप्पा रस्त्यावरच्या कुत्र्यांना का घाबरत नाहीत आणि कुत्र्यांशी आपण बोलले पाहिजे असं का म्हणतात, हे त्यांनं आज स्वतः पाहिले आणि मला पप्पा तुम्ही खूप छान काम केलेत असे कौतुकाचे शब्द मला सुखावून गेले. 




सतीश वसंतराव मोरे
सतीताभ
१९.१०.२०२१
कोजागिरी पौर्णिमा

१४ ऑक्टोबर २०२१

उत्तुंग अमिताभ बच्चन प्रेमी पत्रकार सन्मान सोहळा


 कोरोना काळात पत्रकारांचे काम कौतुकास्पद

जिल्हाधिकारी शेखर सिंह; अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपच्या वतीने 53 पत्रकारांचा सन्मान

कराड 13 आक्टटोबर

कोरोना संकटाला संपूर्ण जगाला तोंड द्यावे लागले. या काळात माध्यमांनी सकारात्मक आणि संयत भूमीका बजावली. कोरोनाची व्याप्ती, त्याचे परिणाम, घ्यावयाची काळजी, नियम, हॉस्पिटलची उपलब्धी याची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यात शासन व प्रशासनाला पत्रकारांनी मोलाचे सहकार्य केले. विशेष करून या कठीण काळात सातारा जिल्ह्यातील माध्यमांनी खूप चांगले काम केले याचे विशेष कौतुक आहे, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काढले.
अमिताभ बच्चन प्रेमी गु्प कराड- साताराच्या वतीने महानायक अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘कोरोना योद्धा पत्रकार सन्मान सोहळा’ येथील हॉटेल अलंकार येथे बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडला. 
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.


 यावेळी प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, अमिताभ बच्चन प्रेमी गु्पचे अध्यक्ष सतीश मोरे, उपाध्यक्ष संजय बदियाणी, जॉन्टी थोरात, सचिव जगन पुरोहित, कोषाध्यक्ष  सतीश भोंगाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी शेखर सिंह यांच्या हस्ते 53 पत्रकारांना मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. दरम्यान कोरोना काळात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल ग्रुपच्या वतीने  ज्येष्ठ सदस्य डॉ. सुभाष एरम, ज्ञानेश्वर राजापुरे यांच्या हस्ते शेखर सिंह यांना मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

सामाजिक बदल होत असले तरी माध्यमांचे स्वातंत्र अबाधित असल्याचे सांगून शेखर सिंह म्हणाले,  आज माध्यमांची परिभाषा बदलत आहे. प्रिंट मीडियासुध्दा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये उतरत आहे. बातम्यांचे स्वातंत्र्य आहे. प्रशासनाच्या विरोधात बातम्या येतात, यामध्ये काही चुकीचे नाही. प्रशासनातील चुका दाखवून देणे हे माध्यमांचे कामच आहे. सातारा जिल्हयात काम करत असताना प्रशासनाविरोधात आलेल्या बातम्या मी नेहमी सकारात्मक अंगानेच घेऊन चुका सुधारत असतो.  

कोरोनाच्या जागतिक महामारीत माध्यमांनी खूप महत्वाची भूमिका बजावली आहे. विशेष करून सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी खूप चांगले काम केले आहे. कोरोनाबाबत डॉक्टरांची मते, शासनाची भूमिका, उपचारांची सुविधा, दैनंदिन परिस्थिती याची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम माध्यमांनी केले आहे.  
सातारा जिल्ह्यात दुसरी लाट ओसरली असली तरी प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात 650 आयसीयू बेड, 300 व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. पूर्वीपेक्षा क्षमता वाढविण्यात आली आहे. लसीकरण टक्केवारीत सातारा जिल्हा राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. प्रादुर्भाव कमी असला तरी लोकांनी गाफील राहू नये. तिसरा बुस्टर डोस देण्याबाबत शासन पातळीवर विचार सुरू आहे. तो किती दिवसांनी द्यायचा, कोणाला द्यायचा याबाबत अद्याप गाईडलाईन प्राप्त झालेल्या नाहीत. तिसर्‍या लाटेेची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तविली आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन प्रत्येकाने काळजीपूर्वक करावे, असे आवाहन शेखर सिंह यांनी केले. 

 

सतीश मोरे म्हणाले, अमिताभ बच्चन यांचे जीवन, त्यांचे विचार, कार्य यावर प्रभावीत होवून अमिताभ बच्चन प्रेमी गु्रपची स्थापना करण्यात आली आहे. समाजातील विविध क्षेत्रातील लोक ग्रुपमध्ये आहेत. या वर्षीपासून राज्यस्तरीय ‘महानायक’ पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
दरम्यान यावेळी उद्योजक सलिम मुजावर, दीपक अरबुणे यांचा पाहुण्यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.

प्रास्ताविक राजेश शहा यांनी केले. स्वागत प्रमोद गरगटे, डॉ. नितीन जाधव, विनायक पाटील यांनी केले. सन्मानपत्र वाचन सुधीर एकांडे व सागर बर्गे यांनी केले. सूत्रसंचालन प्रबोध पुरोहित, मिलिंद रैनाक, संभाजी शेवाळे, अशोक मोहने यांनी केले. आभार दीपक रैनाक यांनी मानले.  

कार्यक्रमाची सुरूवात विजय पाटील यांनी गायलेल्या अग्निपथ स्तवनाने झाली. अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.



अमिताभ बच्चन यांचे जीवन प्रेरणादायी..
महानायक अमिताभ बच्चन यांचे जीवन प्रेरणादायी आहे. आकाशवाणीवर मुलाखत देण्यासाठी गेले असता त्यांना तुमचा आवाज निवेदकासाठी योग्य नाही, असे म्हणून त्यांना नाकारले होते. पण तोच आवाज त्यांचा लोकप्रियतेच्या अतिउच्च शिखरावर घेऊन गेला. सुपरस्टार म्हणून सर्वाधिक कारकिर्द गाजविणारे अमिताभ बच्चन हे एकमेव उदाहरण असेल. त्यांचा आदर्श समोर ठेवून त्यांच्या नावे फॅन क्लब हे आजपर्यंत बातम्यांमध्येच वाचत होतो, पण कराडमध्ये त्यांच्या नावे प्रेमी गु्रप कार्यरत आहे हे पहिल्यांदाच पाहतोय. या गु्रपच्या वतीने वृक्षारोपणासह सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचे कौतुक आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अमिताभ बच्चन प्रेमी गु्प कामाचे कौतुक केले.

११ ऑक्टोबर २०२१

Amitabh Bachchan...my five meetings


*Amitabhji Bachchan* 
*Five times i meet with him, five sweet experiences* !

Satish more _Satitabh_ 
9881191302



Amitabh Bachchan! 
Amitabh Bachchan!
And Amitabh Bachchan!

How many times did you want to take this name and how many times did you remember them, how many times did you talk about them! In fact, no matter how many times we speak, the personality of this person cannot be expressed.
 

To date I have met Amitabh Bachchan five times. 26 October 2018, 4 September 2019, 16 August 2021, 27 August 2021 and 29 September 2021. All these five times met, seen Amitabh Bachchan was very different. He was high, he was amazing, he was polite, he was humorous, he was loving, he was studious, he was kind, he was kind, he respected others, he understood others as his own.


The acting in the film is different and the personal life is different. The feeling was coming to me from every one of their visits. Today is Amitabh Bachchan's 79th birthday. I wanted to write a little more for you.



The magic of the word Amitabh Bachchan, magic has been on me for 40 years. I have written many times about this magic. It was out of this love that I formed a group called Amitabh Bachchan Premi in 2010. The group was joined by many people who love Amitabh Bachchan. The group has reached a very high level in the last six years. 

I always say, we love Amitabh Bachchan's thoughts, manners, his behavior, his speech, his songs, his style, his voice, his literature, his poetry, his dialect, his life struggles. Writing a blog every day, being active on Facebook at this age, sharing poems on Instagram, interacting with his fans through Twitter, expressing himself after any incident, the mild-mannered poet Amitabh and the actor will rarely be in our country. 


This man has been ruling everyone's heart for 79 years. For 53 of the 79 years, he has devoted himself to acting. Amitabh Bachchan's film Saat Hindustani was released on November 7, 1969. (Three years before I was born, my birthday is November 7) His 53-year career since then has been a mystery to everyone. Amitabh Bachchan is a great gift to India. I do not know where this man came from. 


My first interview with Amitabh Bachchan on 26 October 2018. Like meeting a sweetheart for the first time and the joy we get after meeting a sweetheart, we just keep looking at her, not saying anything. Yes, that's what happened to me that day. About my Bachchan first visit I have written two separate blogs satitabh meets amitabh, you read. In a nutshell, this interview overwhelmed me. During this interview we took autographs from Amitabh Bachchan, interacted with him, shook his hand. I learned a lot from them.

My second interview with Amitabh Bachchan on 4th September 2019. The interview lasted ten hours in a row. The heavy rains in Mumbai, the situation that followed made us somehow reach the set. In fact, we had a bus so we could get there because it was not possible to get there. We had participated in 50 consecutive shows of KBC with 50 Amitabh Bachchan lovers from Karad Satar. 

At twelve we went to the set. Amitabh Bachchan was in front of us for ten hours in a row from twelve to ten at night and we were just looking at Amitabh Bachchan in the cinemascope. Only Amitabh Bachchan Only Amitabh Bachchan. This was because no one was able to reach the audience for the second and third shows of the day due to flooding. Mumbai was devastated by the rains. After the first show, we were asked if you could wait for the second show. We were happily prepared. After the second show ended at six in the evening we were again asked if you would stop for the third show? 

The blind man asks for one eye and God gives three eyes. We watched Amitabh Bachchan for ten hours straight. They won us over. Only Amitabh Amitabh and Amitabh. At ten o'clock at night, we went out in a daze, taking a heartfelt darshan. Photographed very closely with Amitabh Bachchan. Amitabh put his hand on my thigh, informed the group. This one moment was unforgettable for me. This was my second meeting with Amitabh Bachchan!

 
When I went to Mumbai for the third time to meet Amitabh Bachchan on 16 August 2021, the curiosity was the same as when I first met him. In the mean time, Amitabh Bachchan was very sleepy due to a technical glitch on the set of Kaun Banega Crorepati. During this period, he warmly welcomed and entertained all the Amitabh Bachchan lovers on the set. They chatted with us for about an hour. I also interviewed Amitabh Bachchan in this chat. We Amitabh Bachchan loving members liked the mask with ABP logo very much. He asked for the mask.


He took photos with everyone when the KBC shooting was over. "I am alive because I have my fans, my lovers," he said emotionally. I have published this interview of Amitabh Bachchan in Pudhari. The fact that I got the opportunity to interview Amitabh Bachchan for the first time on the set is the most unforgettable event of my life. To this day as a journalist I have interviewed many, covered many great events. But the interview with Amitabh Bachchan is the highest moment of my life.
 
I had covered the grand meeting of Congress President Sonia Gandhi at Chhatrapati Shivaji Stadium in 2002. Since then, I have interviewed many Chief Ministers, former Prime Minister PV Narasimha Rao's speeches at the Sahitya Sammelan, various events such as Sahitya and Natya Sammelan, and interviews with great leaders. But this interview of Amitabh Bachchan on the set will be remembered for the rest of my life.

On 27th August of the same year, I got the chance to take our Bachchan lovers from our city of Karad on the set of KBC once again. This was my fourth interview with Amitabh Bachchan. One of the virtues of Amitabh Bachchan in this interview is that he does not want to compliment himself. 
 
As you all know, after the contestant answers all the questions in the script on the set of KBC, the details of that question appear on the screen in front of Amitabh Bachchan. Amitabh Bachchan reads it. Questions keep coming up and the oppressor's pressure grows. Things that are different from the script are really different and Amitabhji Bachchan has the ability to handle them, the timeliness.


He has been doing the show Kaun Banega Crorepati on television for 21 consecutive years. So they have a lot of skills. Amitabh Bachchan immediately knows how to release a contestant after stumbling or getting a little tense, what to chat with him. A teacher from Assam who was also working as rector in a residential school as a contestant in front of Amitabh Bachchan in the August 27 show. The discussion started on the love of these teachers and the love of Amitabh Bachchan. He started talking about what life is like in a hostel. These teachers shared this information. 

But while listening to this, Amitabh Bachchan also got lost in his hostel life. He also shared some memories of his hostel. Suddenly they realized that we were talking too much about ourselves. Then he immediately stopped there and said sorry I started talking too much about myself!

I really liked this sentence of Amitabh Bachchan
 In fact, no one likes self-appreciation. Everyone loves it. But only those who know where to stop, how to change it and go back to the original subject, where to stop can grow up once your appreciation starts. Amitabhji turned the subject around with a loving advice, "Don't compliment me, rather than listen to your own compliments. Wait." I really like this quality.

It is a great pleasure to see Amitabh Bachchan on the set of Kaun Banega Crorepati. Shooting on this set lasts about three hours. Over the last month and today, we have taken 5200 Bachchan lovers from Karad to this set. The information and activities of Amitabh Bachchan Premi Group have reached Amitabh Bachchan. Many on the set are now known as Amitabh Bachchan lover group Karad. 

I was well aware of this when I went on the set of KBC on September 29 for the third time this year and finally for the fifth time today. When I got to see Amitabh Bachchan that day, I was overjoyed. Because it was a big thing for me to have the name of my group in Amitabhji's mouth. I will never forget the greetings that Amitabh gave me when he came on the set and the greetings that I gave to him. KBC, which was shot on the 29th, will be telecast on October 12 tomorrow. This is exactly what we want you to see.

 
I interacted with Amitabh Bachchan during the shooting break. "Amitabhji, your birthday is on October 11, I wish you all the best for that birthday from our Bachchan group, but what are you going to do on October 11, where are you going? What is your birthday plan?" After this, Amitabh Bachchan looked at me and smiled, "Oh, nothing, I won't do anything, I will stay with my family!" They will sit at home and have fun, he replied with a smile.

 
I was very happy to hear this answer. Many are curious about how the superhero celebrates his birthday, I was too. It was out of curiosity that I asked that question. It is a great pleasure for such a great artist to celebrate his birthday with his family. We should follow this example. 

Amitabh Bachchan injured his toe a few days ago. Amitabh Bachchan is seen wearing a traditional dress instead of a blazer suit.

If you wear a blazer, you will have to wear shoes underneath and it is not possible to wear shoes as the toes are bandaged. In the 21st season of Kaun Banega Crorepati, Amitabh Bachchan has never worn such slippers before. In the next few episodes, Amitabh Bachchan is wearing a blazer and the colors are a bit different. Strange on this by Amitabh Bachchan on Facebook * FB 3084 - green, brown boots below; And some matching suits * have been posted above.

 
The day we were on the set of KBC on September 29, we saw Amitabh Bachchan in traditional attire. As it was part of Durga Utsav Special, we reached the set at 8 am that day. Between eight and ten we got to see the shooting of Durga hymns and traditional Bengali songs. In front of us we heard the hymn 'Trumbake Gauri' in Amitabhji's voice being shot on Amitabh. Because the show must go on. The leg injury was hurting but still lame Amitabh came on the set. Complete shooting completed. In four hours I didn’t get to see them tired anywhere. On the contrary, we got to see a lot of enthusiasm in them coming and going on the set. During the show, 120 spectators were on the set, out of which fifty were from Karad. We had a lot of riots and chatted with Amitabh Bachchan. This moment of joy is never to be forgotten.

Today is Amitabh Bachchan's birthday. On this occasion, various activities will be organized on behalf of our Bachchan Premi Group. A very important event is going to take place on 13th October. Satara Collector Shekhar Singh will be present at the event. On this birthday, I salute Bachchan's 79-year career.

 * Satish Vasantrao More * 
 * _सतिताभ_ *

मी आणि अमिताभ पाच भेटी @ पाच अनुभव


अमिताभजी बच्चन 
पाच भेटी, पाच अनुभव!


अमिताभ बच्चन! 
अमिताभ बच्चन !
आणि अमिताभ बच्चन !

किती वेळा हे नाव घ्यायचं आणि किती वेळा त्यांची आठवण काढायची,अनेक एक किती वेळा त्यांच्या विषयी काय काय बोलायचं! खरंच कितीही वेळा बोललं तरी या व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्त करता येणार नाही, इतकी उंच, आभाळापेक्षाही उत्तुंग याव्यक्तीची कारकिर्द आहे.
आजपर्यंत अमिताभ बच्चन यांना पाच वेळा भेटलो.26 ऑक्टोबर 2018, 4 सप्टेंबर 2019, 16 ऑगस्ट 2021, 27 ऑगस्ट 2021आणि 29 सप्टेंबर 2021. या पाचही वेळा भेटलेले, पाहिलेले अमिताभ बच्चन फार वेगळे होते. उच्च होते, अप्रतिम होते, विनम्र होते, विनोदी होते, प्रेमळ होते, अभ्यासू होते,दिलखुलास होते, दिलदार होते, सन्मान देत होते , इतरांना आपलं समजत होते, एवढा मोठा अनुभव पाठीशी असूनही स्वतःविषयी न सांगता दुसऱ्याकडून जास्त माहिती घेणारे अमिताभ होते!

चित्रपटातील अभिनय वेगळा आणि वैयक्तिक लाईफ वेगळं. याची अनुभूती मला त्यांच्या प्रत्येक भेटीतून येत होती, जाणवत होती. माझे आयडॉल, माझे गुरु माझे प्रेरणास्थान, माझ्या संकटाच्या काळी मला आधार देणारे, मला प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिका असा संदेश देणारे अमिताभ बच्चन यांचा आज 79 वा वाढदिवस.  त्यानिमित्त थोडसं आणखी काही लिहावसं वाटलं म्हणून आपल्यासाठी.



अमिताभ बच्चन या शब्दाची जादू ,प्रेममोहिनी माझ्यावर 40 वर्षापासून आहे. या जादूविषयी मी अनेकवेळा लिहीलेलं आहे. या प्रेमातूनच मी अमिताभ बच्चन प्रेमी नावाचा एक ग्रुप 2010 साली स्थापन केला. या ग्रुपमध्ये अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम करणारे अनेक जण सहभागी झाले. गेल्या सहा वर्षात हा ग्रुप अतिशय उच्च पातळीवर  पोहचलेला आहे. 

मी नेहमी म्हणतो, आम्ही अमिताभ बच्चन यांच्या विचारावर, आचारावर, त्यांच्या वागण्यावर, त्यांच्या बोलण्यावर, त्यांच्या गाण्यावर, त्यांच्या स्टाईलवर, त्यांच्या आवाजावर,त्यांच्या साहित्यावर, त्यांच्या कवितेवर, त्यांच्या चाली बोलीवर, त्यांच्या जीवन संघर्षावर प्रेम करतो. रोज ब्लॉग लिहिणारा, या वयात फेसबुक वरती एक्टिव असणारा, इंस्टाग्राम वरती कविता शेअर करणारा, ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधणारा,कोणतीही घटना घडल्यानंतर व्यक्त होणारा हळव्या मनाचा कवी अमिताभ आणि अभिनेता आपल्या देशात क्वचितच असेल. 


79 वर्षे हा माणूस सर्वांच्या हृदयावर राज्य करत आहे. 79 वर्षापैकी 53 वर्षे त्यांनी अभिनयासाठी स्वतःला झोकून दिले आहे. सात हिंदुस्तानी हा अमिताभ बच्चन यांचा चित्रपट सात नोव्हेंबर 1969 साली रिलीज झाला. (माझ्या जन्माच्या अगोदर तीन वर्षे, माझा वाढदिवस सात नोव्हेंबर आहे) त्यापासून आजपर्यंतची त्यांची 53 वर्षाची कारकीर्द एक सर्वांना पडलेलं कोडं आहे. अमिताभ बच्चन ही भारताला मिळालेली फार मोठी देणगी आहे. या माणसाकडे एवढा मोठा उत्साह कोठून येतो हे खरच कळतं नाही. 


अमिताभ बच्चन यांची माझी पहिली मुलाखत 26 ऑक्टोबर 2018 ची. जसे प्रेयसीला पहिल्यांदा भेटतो आणि प्रेयसीला भेटल्यानंतर आपल्याला जो आनंद होतो, आपण फक्त तिच्याकडे फक्त पहात राहतो, काहीच बोलत नाही. होय तशीच माझी अवस्था त्या दिवशी झालेली होती. माझ्या बच्चन पहिल्या भेटी विषयी मी स्वतंत्र दोन ब्लॉग satitabh meets amitabh लिहीलेले आहेत, आपण वाचा. थोडक्यात एकच सांगतो ही मुलाखत मला खूप भारावून गेली. या मुलाखतीदरम्यान आम्ही अमिताभ बच्चन यांच्याकडून मी ऑटोग्राफ घेतला, त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या हातात हात दिला. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले.


अमिताभ बच्चन यांची माझी दुसरी मुलाखत 4 सप्टेंबर 2019 रोजीची. ही मुलाखत सलग दहा तासाची होती. मुंबईमध्ये असणारा मोठा पाऊस, त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती त्यामुळे कसेबसे आम्ही सेटवर पोहोचलो. खरंतर आमची बस होती म्हणून चालेल तर पोहोचू शकलो कारण तिथं जाणं शक्यच नव्हतं. केबीसीचे सलग तीन शोमध्ये आम्ही कराड सातारचे 50 अमिताभ बच्चन प्रेमी सहभागी झालो होतो. 

बारा वाजता आम्ही सेटवर गेलो. बारा ते रात्री दहा असे सलग दहा तास अमिताभ बच्चन आमच्यासमोर होते आणि आम्ही फक्त सिनेमास्कोप अमिताभ बच्चन पाहत होतो. फक्त अमिताभ बच्चन फक्त अमिताभ बच्चन. याचे कारण त्या दिवशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या शोसाठी पुरामुळे कोणीही दर्शक पोहचू शकले नव्हते. पावसामुळे मुंबई बेहाल झाली होती. पहिला शो संपल्यानंतर आम्हाला विचारण्यात आले की तुम्ही दुसऱ्या शोसाठी थांबू शकता का ? आम्ही आनंदाने तयार झालो. दुसरा शो संपल्यानंतर  सायंकाळी सहा वाजता पुन्हा आम्हाला विचारण्यात आले की तिसऱ्या शोसाठी तुम्ही थांबणार का? 


आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो तीन डोळे अशी आमची अवस्था झाली. सलग दहा तास आम्ही अमिताभ बच्चन यांना पाहिलं. त्यांनी आम्हाला जिंकलं. फक्त अमिताभ अमिताभ आणि अमिताभ. रात्री दहा वाजता आम्ही धुंद होऊन, मनसोक्त मनमुराद दर्शन घेऊन बाहेर पडलो. अमिताभ बच्चन यांच्यासोबत अतिशय जवळून फोटो काढले. अमिताभ यांनी माझ्या मांडीवर हात ठेवला, ग्रुपची माहिती घेतली. हा एक क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता. अशी होती माझी अमिताभ बच्चन यांच्यासोबतची दुसरी भेट!


16 ऑगस्ट 2021ला अमिताभ बच्चन यांना तिसऱ्यांदा भेटीसाठी मी जेव्हा मुंबईला गेलो होतो तेव्हा पहिल्या भेटीच्या वेळी जी उत्सुकता होती तीच होती. कौन बनेगा करोडपतीच्या सेटवरील तांत्रिक बिघाडामुळे मधल्या काळात अमिताभ बच्चन खूप निवांत होते. या कालावधीमध्ये त्यांनी सेटवर असणाऱ्या सर्व अमिताभ बच्चन प्रेमींचं अतिशय प्रेमाने स्वागत केलं, मनोरंजन केलं. सुमारे एक तास त्यांनी आमच्याशी गप्पा मारल्या. या गप्पात अमिताभ बच्चन यांची मी एक मुलाखतही घेतली. आम्ही अमिताभ बच्चन प्रेमी सदस्यांनी एबीपीचा लोगो असलेला मास्क त्यांना खूप आवडला. त्यांनी तो मास्क मागून घेतला.


जेव्हा केबीसी शूटिंग संपले तेव्हा सर्वांसोबत त्यांनी फोटो काढले. मी फोटो काढताना माझे चाहते, माझे प्रेमी आहेत म्हणून मी जिवंत आहेत, असे भावनाप्रधान उद्गार त्यांनी काढले होते. अमिताभ बच्चन यांची ही मुलाखत मी पुढारीमध्ये प्रसिद्ध केलेली आहे. सेटवर लांबून का होईना अमिताभ बच्चन यांची पहिली मुलाखत घेण्याचा मला जो योग आला, ती घटना माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय आहे. पत्रकार म्हणून आजपर्यंत मी अनेकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, अनेक मोठ मोठे कार्यक्रम कव्हर केलेले आहेत. मात्र अमिताभ बच्चन यांची मुलाखत हा माझ्या आयुष्यातील सर्वात उच्च क्षण आहे.

2002 साली काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची छत्रपती शिवाजी स्टेडियमवर झालेली भव्य सभा मी कव्हर केली होती. त्यानंतर अनेक मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांचे साहित्य संमेलनातील भाषण बातमी, साहित्य व नाट्य संमेलन असे विविध कार्यक्रम, मोठे मोठे नेते यांच्या मुलाखती मी घेतलेल्या आहेत. मात्र सेटवरील अमिताभ बच्चन यांची ही मुलाखत माझ्या आयुष्यभर लक्षात राहील.

याच वर्षी 27 ऑगस्टला पुन्हा एकदा आमच्या आपल्या कराड शहरातील बच्चन प्रेमींना केबीसीच्या सेटवर घेऊन जाण्याचा मला योग आला. ही माझी अमिताभ बच्चन यांच्यासोबतची चौथी मुलाखत होती. या मुलाखतीमध्ये अमिताभ बच्चन यांचा एक गुण पाहायला मिळाला तो म्हणजे स्वतःचे कौतुक करुन घ्यायचे नाही. 

आपणा सर्वाना माहिती असेल केबीसीच्या सेटवर स्क्रिप्ट मध्ये असणारे सर्व काही प्रश्नांची उत्तरे स्पर्धकाने दिल्यानंतर  त्या प्रश्नाची इत्यंभूत माहिती अमिताभ बच्चन यांना समोर असणाऱ्या स्क्रीनवर दिसते. अमिताभ बच्चन ती वाचून दाखवतात. पुढे प्रश्न येत राहतात आणि स्पर्धकाचे दडपण वाढत जाते. स्क्रिप्ट सोडून ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी खरंच वेगळ्या असतात आणि त्या हॅन्डल करण्याचे सामर्थ्य , समयसुचकता अमिताभजी बच्चन यांच्याकडे आहे.


सलग एकवीस वर्षे ते  दूरचित्रवाहिनीवरील कौन बनेगा करोडपती हा शो करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे  फार मोठे कौशल्य प्राप्त झाले आहे. एखादा स्पर्धक अडखळल्यानंतर किंवा थोडा टेंशनमधे आल्यानंतर त्याला रिलीज कसे करायचे, त्याच्याशी काय गप्पा मारायच्या हे सर्व अमिताभ बच्चन लगेच ओळखतात. 27 ऑगस्टच्या शोमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासमोर स्पर्धक म्हणून आसाम मधील एक शिक्षक जे  एका निवासी शाळेत रेक्टर म्हणूनही काम करत होते. या शिक्षकांची आवड आवड आणि अमिताभ बच्चन यांची आवड यावर चर्चा सुरू झाली. हॉस्टेलमधील लाईफ कसे असते याबाबत माहिती सांगायला सुरुवात झाली. या शिक्षकांनी ही माहिती सांगितली. 

मात्र हे ऐकत असताना आमिताभ बच्चन सुद्धा आपल्या हॉस्टेल लाइफ मध्ये हरवून गेले. त्यांनीही आपल्या हॉस्टेलमधील काही आठवणी सांगितल्या. अचानक त्यांच्या असे लक्षात आले की आपण आपल्या स्वतःविषयी जास्त बोलत आहोत. मग  ते तिथे लगेच थांबले आणि म्हणाले माफ कीजिए मे अपने खुद के बारेमेंही जादा बोलने लगा हू !

अमिताभ बच्चन यांचे हे वाक्य मला खूप आवडले
 खरं तर स्वतःचे कौतुक कुणाला आवडत नाही. सर्वांनाच आवडते. मात्र आपले कौतुक सुरू झाल्यानंतर कुठे थांबायचे, कसा तो  विशेष बदलायचा आणि मूळ विषयावर जायचे, कुठे थांबायचे हे ज्याला कळते हे फक्त तोच मोठा होऊ शकतो. अमिताभजी यांनी स्वतःचे कौतुक ऐकण्यापेक्षा माझे कौतुक करू नका, थांबा असा प्रेमळ सल्ला देऊन तो विषय वळवला. मला हा गुण खूप आवडला.

कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर अमिताभ बच्चन यांना पाहणे हे फार मोठा आनंद असतो. सुमारे तीन तास या सेटवर शुटींग चालते. या सेटवर गेल्या महिनाभरात व आज अखेर कराड शहरातील पावणेदोनशे बच्चन प्रेमींना आम्ही घेऊन गेलो आहोत. अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपची माहिती आणि उपक्रम अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. या सेटवरील अनेक जण आता अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप कराड यांना नावाने ओळखू लागले आहेत. 



29 सप्टेंबर ला मी यावर्षी तिसऱ्यांदा आणि आज अखेर पाचव्यांदा जेव्हा केबीसीच्या सेटवर गेलो तेव्हा मला याची चांगलीच जाणीव झाली. अमिताभ बच्चन मला त्या दिवशी पाहायला मिळाले, तेव्हा माझा आनंद गगनात मावत नव्हता. कारण अमिताभजी यांच्या तोंडात माझे ग्रुपचे नाव येणे ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती.  सेटवर आल्यानंतर अमिताभ यांनी माझ्याकडे पाहून केलेला नमस्कार आणि मी पण त्यांना केलेला नमस्कार मी कधीही विसरू शकणार नाही. 29 तारखेला शूटिंग झालेल्या केबीसीचे प्रसारण उद्या 12 ऑक्‍टोबर रोजी होणार आहे. हे आपण नक्की पहावे, ही आपणास विनंती.


अमिताभ बच्चन यांच्याशी शूटिंग ब्रेक दरम्यान मी त्यांच्या सोबत संवाद साधला. "अमिताभजी आपका 11 ऑक्टोबरको बर्थडे है, आपको उस बर्थडे के लिए हमारे बच्चन ग्रुप की तरफ से बहुत शुभकामनाये देता हु , लेकिन 11 ऑक्टोबर को आप क्या करनेवाले हो, कहा जानेवाले हो? आपका बर्थडे का प्लान क्या है?" यानंतर अमिताभ बच्चन यांनी माझ्याकडे बघून हसत 'अरे कुछ नही,कुछ नही करेंगे फॅमिली के साथ रहेंगे! घर में बैठेंगे मज्जा करेंगे, असे त्यांनी हसत हसत उत्तर दिलं.


हे उत्तर ऐकून मला खूप आनंद झाला. महानायक आपला बर्थडे कसा साजरा करतो याबाबत अनेकांना उत्सुकता असते, मलाही ती होती. या उत्सुकतेने मी तो प्रश्न विचारला होता. एवढा मोठा कलाकार कुटुंबासोबत वाढदिवस साजरा करतो, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. याचाही आपण आदर्श घेतला पाहिजे. 

अमिताभ बच्चन यांच्या पायाला बोटाला काही दिवसांपूर्वी जखम झाली आहे. त्यामुळे 25 सप्टेंबर पासून पुढे काही दिवस केबीसीचे भाग शूट झाले आहेत त्या भागामध्ये पायाच्या बोटाला बँडेज बांधल्याचे दिसत आहे.अमिताभ बच्चन यांनी ब्लेझर सूट ऐवजी पारंपारिक पोशाख परिधान केलेला आहेत.पायाला पोटाला झालेली जखम यादरम्यान शूटिंगमध्ये स्पष्ट दिसत आहे.

ब्लेझर घातला तर खाली शूज घालावे लागतील आणि पायाच्या बोटाला बॅंडेज केलेले असल्यामुळे शुज घालणे शक्य नाही.त्यामुळे पारंपारिक पोशाख घालून अमिताभ बच्चन यांनी पायामध्ये चपला घातलेल्या दिसत आहेत. कौन बनेगा करोडपती च्या 21 सिझनमध्ये यापूर्वी कधीही अशा प्रकारच्या चपला अमिताभ बच्चन यांनी घातलेल्या नाहीत. पुढील काही भागात अमिताभ बच्चन यांनी ब्लेझर घालून सुद्धा रंग बेरंगी रंगाचे घातलेले आहेत या हे थोडे वेगळे दिसत आहे. विचित्र यावर अमिताभ बच्चन यांनी फेसबुक वर *FB  3084 -  नीचे हरे, भूरे बूट ; और ऊपर कुछ matching वाले सूट* अशी पोस्ट केली आहे.


आम्ही जेव्हा 29 सप्टेंबरला केबीसीच्या सेटवर होतो त्या दिवशी अमिताभ बच्चन यांना पारंपारिक पोशाखमध्ये आम्ही पाहिले. दुर्गा उत्सव स्पेशल हा भाग असल्यामुळे आम्ही त्या दिवशी सकाळी आठ वाजताच सेटवर पोहोचलो होतो. आठ ते दहा या दरम्यान दुर्गा स्तवन आणि बंगाली पारंपरिक गाण्याचे शूटिंग आम्हाला पाहायला मिळाले. अमिताभजी यांच्या आवाजातील शरण्ये त्रंबके गौरी हे स्तवन अमिताभ यांच्या वर शुट होताना प्रत्यक्ष समोर आम्हाला ऐकायला मिळाले.पायात पायाच्या बोटाला जखम असूनही हा योद्धा थकलेला नव्हता. कारण शो मस्ट गो ऑन.पायाची जखम दुखत होती मात्र तरीही लंगडत लंगडत अमिताब सेटवर आले. संपूर्ण शूटिंग पूर्ण केले. चार तासांमध्ये ते कुठेही थकलेले मला पाहायला मिळाले नाहीत. उलट सेटवर येताना आणि जाताना त्यांच्यामध्ये फार मोठा जोश आम्हाला पाहायला मिळाला. या शो दरम्यान 120 दर्शक सेटवर होते त्यापैकी तब्बल पन्नास जण कराडचे होते. आम्ही खूप दंगामस्ती केली अमिताभ बच्चन यांच्या समवेत गप्पा मारल्या. हा आनंदाचा क्षण कधीही विसरण्यासारखा नाही.

अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त आमच्या बच्चन प्रेमी ग्रुपच्या वतीने विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम 13 ऑक्‍टोबरला होणार आहे. या कार्यक्रमाला सातारचे कलेक्टर शेखर सिंह उपस्थित राहणार आहेत. बच्चन यांच्या 79 वर्षांच्या कारकीर्दीला या वाढदिवसाच्या निमित्ताने मी सलाम करतो.

 *सतीश वसंतराव मोरे* 
 *_सतिताभ_*

२५ ऑगस्ट २०२१

केबीसी सेटवर अमिताभ बच्चन यांची मुलाखत

*अमिताभ बच्चन यांची मुलाखत* 
*आयुष्यातील अविस्मरणीय क्षण* 


3 ऑक्टोबर 2018 रोजी अमिताभ बच्चन यांच्या पहिल्या भेटीची जी उत्सुकता होती, तीच उत्सुकता किंबहुना त्याहून अधिक उत्सुकता 4 सप्टेंबर रोजी 2019 रोजी होती. आपल्या आवडत्या हिरोला,आदर्श व्यक्तीला भेटण्याचा,त्याच्या सोबत फोटो काढण्याचं,त्याला जवळून पाहण्याचं स्वप्न या अगोदर दोन वेळा साकार झाले आहे. सोनी टीव्हीवरील 'कौन बनेगा करोडपती' या शोमधील काही मान्यवरांशी, अमिताभ बच्चन यांच्या जवळच्या लोकांशी गेल्या दोन वर्षात झालेली जवळीक तसेच त्यांनी आम्हा 'अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप'चे पाहिलेले उपक्रम आणि आमचे अमिताभ बच्चन यांच्यावर असलेले प्रेम पाहून याही वर्षी त्यांनी पुन्हा एकदा मला 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटवर तिसर्‍यांदा यायची संधी दिली. 


2019 साली आम्ही 50 अमिताभ बच्चन प्रेमी एकाच दिवशी अमिताभ बच्चन यांना भेटायला गेलो होतो, यावर्षी आम्ही पंचवीस अमिताभ बच्चन प्रेमी मुंबईला निघालो.15 ऑगस्ट 2021 रोजी आम्ही मुंबईला अंधेरी येथे पोहोचलो. तेथे मुक्काम करून 16 ऑगस्टला सकाळी सात वाजता 'कौन बनेगा करोडपती'च्या फिल्म सिटी गोरेगाव येथील सोळा नंबर स्टुडिओमध्ये पोहोचलो.

'कौन बनेगा करोडपती' 21 व्या सीजनचे शूटींग 12 ऑगस्टला सुरू झाले होते. 12, 13 आणि 14 ऑगस्ट तीन दिवस शूटिंग झाले. आज 16 तारखेला सोळा शूटिंगचा तिसरा दिवस होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला आम्हा 25 जणांची ऑंटीजन टेस्ट करण्यात आली. सर्व प्रक्रिया पूर्ण करून आम्हाला भरपेट नाश्ता देण्यात आला. मोबाईल,पर्स यासह इतर सर्व साहित्य लॉकरमध्ये जमा करून कडक तपासणी झाल्यानंतर सकाळी नऊच्या सुमारास आम्हाला सेटवर प्रवेश देण्यात आला.सेटवरील भव्यता, लाईट, झगमगाट पाहून आमच्या सर्वांचे डोळे दिपून गेले. 

आम्हा सर्व जणांना एकत्रित जवळजवळ बसवण्यात आले. अमिताभजी ज्या सीटवर बसणार होते त्यांच्या पाठी बाजूस आम्ही बसलो होतो. अमिताभ बच्चन पुढे बसल्यानंतर मला त्यांची पाठ आम्हाला दिसणार होती. पण शूटिंगमध्ये कॅमेरा फ्रेममध्ये आम्ही जास्त येणार आहे, असे आम्हाला सांगण्यात आले. साडेनऊच्या सुमारास सर्वांना जागेवर बसवल्यानंतर लाईट कॅमेरा ॲक्शन 1 2 3 टेस्टिंग करण्यात आले.शुटिंग दरम्यान आम्ही कसे वागायचे, वैद्यकीय अडचण आली तर काय करायचे, याची माहिती आम्हाला देण्यात आली. 

अचानक गडबड सुरू झाली. 'सर आ गये' आणि सेटवर शांतता पसरली. बरोबर पावणे दहा वाजता अचानकपणे सर्वांचे लाडके अमिताभ बच्चन यांची सेटवर इंट्री झाली. ज्यांना पाहण्यासाठी आयुष्यभर वाट पाहीली होती, त्यांना पहिल्यांदाच  प्रत्यक्ष पाहून  अनेकांची हृदयाची धडधड वाढू लागली. सर्वांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडात अमिताभजींना सलामी दिली. अमिताभ यांनी तेवढ्याच नम्रतेने सर्वांना नमस्कार करून विनम्रपणे खाली बसण्याची सूचना केली. पुन्हा अमिताभजी बाहेर गेले, काही वेळाने पुन्हा सेटवर आल्यानंतर सेट वरील सर्वांनी टाळ्यांच्या गजरात  स्वागत केले.

पन्नास वर्षे पडद्यावर पाहणाऱ्या अमिताभला आज प्रत्यक्ष पाहण्याची अनेकांची ही पहिलीच संधी आली होती. माझ्यासाठी ही तिसरी संधी असली तरी अमिताभ माझ्यासाठी आदर्श असल्यामुळे त्यांना कितीही वेळा पाहिले तरी मन भरत नाही. त्यांच्या पहिल्या भेटी वेळची उत्सुकता आणि आज तिसऱ्या भेटीतील उत्सुकता यामध्ये काहीच फरक नव्हता. हृदय धडधडत होतं ,पुढे उभे राहून ते नमस्कार करत होते, आम्ही टाळ्या वाजवत होतो. एक दोनदा त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि मग मी आनंदाने उड्या मारू लागलो. 

पुढील साडेतीन तास सेटवर फक्त अमिताभ आणि अमिताभ आणि अमिताभ यांचीच जादू होती. हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकांना अमिताभ बच्चन प्रश्न विचारत होते, आधार देत होते, त्यांच्यातील कलागुणांची माहिती घेत होते, त्यांना हसवत होते, मधूनच त्यांना गोड धक्का देत होते, पुन्हा त्याला सावरत होते. पुढे बसलेला स्पर्धक आपले सर्व टेंन्शन सोडून अमिताभ बच्चन यांच्या पुढे बसून प्रश्नांची उत्तरे देत होते. खरंतर हॉट सीटवर बसण्याची संधी मिळणे हे फार मोठे नशिब असते, सात करोड रुपये बक्षीस मिळवणे हे स्वप्न जरी असले तरी अनेकांचे स्वप्न हॉट सीटवर बसून अमिताभ बच्चन यांच्याशी गप्पा मारणे हेच असते, हे आजही आम्हाला जाणवले. समोर बसलेला स्पर्धक अमिताभजींना पाहून बेभान होऊन जात होते, प्रश्नाचे उत्तर देत होते, आपल्या आयुष्यात आलेले क्षण अमिताभ यांच्यासमोर उलगडत होते, स्पर्धेचा आनंद घेत होते आणि आपले स्वप्न साकारत होते. 

कौन बनेगा करोडपती च्या 21 व्या सीझनचच्या शूटिंगचा हा चौथा दिवस होता. अजूनही सेटवरील मंडळी सेट झालेली नव्हती,अनेकदा तांत्रिक अडचणी येत होत्या. मात्र अमिताभजी या सर्वांना सांभाळून घेत शांतपणे सेटवर बसून होते. अमिताभ बच्चन यांचा विनोदी स्वभाव सर्वांनाच माहिती आहे. तांत्रिक अडचणी आल्यानंतर जेव्हा सेटवर शांतता पसरत होती तेव्हा अमिताभजी समयसुचक विनोद करून सर्वांना हसवत होते. 

तांत्रिक अडचणीमुळे निर्माण झालेल्या 'ब्रेक'चा आम्हाला फार मोठा फायदा झाला. तांत्रिक अडचण निर्माण झाल्यानंतर आम्ही अमितजीनीं आमच्याकडे पाठीमागे वळून पाहिले. 'क्षमा करे मै आपकी तरफ पीठ करके बैठा हूं' असे म्हणत त्यांनी आमच्याशी संवाद सुरू केला. सागर बर्गे यांनी अमिताभ यांच्याशी बोलताना 'सर  आप हमारे लिए भगवान हो, भगवानका दर्शन किधरसे भी लिया तो कोई प्रॉब्लेम नही' असे म्हणून सिक्सर टाकला. 'अरे मै भगवान नही' असे विनम्रपणे बोलत अमिताभजी यांनी गप्पा सुरू केल्या. एकदा बोलायला सुरुवात केल्यानंतर गप्प बसू ते कराडकर कसले? आलेल्या, मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा  घेत आम्ही आमच्या 'अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपची,कराड शहराची सारी माहिती त्यांना सांगितली. त्यांनीही ती शांतपणे ऐकून घेतली. आमच्या गप्पा फुलल्या.

या अगोदर दोन वेळा मी अमिताभ बच्चन यांना भेटलो तेव्हा मी त्यांच्याशी मोजकेच शब्द बोललो होतो. पहिल्या भेटीत अमिताभजी यांना आमच्या अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपचे माहिती पत्रक देऊन आमच्या ग्रुपची माहिती सांगितली होती. त्या माहिती पत्रकावर अमिताभ बच्चन यांचा ऑटोग्राफ आणला होता. दुसऱ्या भेटीवेळी आमच्या बच्चन ग्रुप सोबत अमिताभजीनी ग्रुप फोटो दिला होता. यावेळी अमिताभ बच्चन यांनी माझ्या हातात हात देऊन माझ्या मांडीवर हात ठेवला होता. या दोन्ही भेटी माझ्या स्मरणात आहेतच. मात्र आजच्या या तिसऱ्या भेटीत अमिताभ बच्चन यांच्यासोबत सेटवर मला खूप बोलता आले. याबाबतची बातमी 'पुढारी'मध्ये 17  आँगस्ट रोजी प्रसिद्ध केली होती. अमिताभ बच्चन यांचा तो एक इंटरव्ह्यू होता. अमिताभ बच्चन यांची मुलाखत घेण्याचा, त्यांच्याशी गप्पा मारण्याचा आलेला योग हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय असा प्रसंग आहे.


दैनिक पुढारीमध्ये प्रसिद्ध झालेली बातमी जशीच्या तशी पुढीलप्रमाणे 


... ......  

 *चाहत्यांचे प्रेम हीच माझी ताकद: अमिताभ बच्चन* 

मुंबई  (विशेष प्रतिनिधी ) 

माझे चाहते हीच माझी ताकद आहे, माझ्या चाहत्यांचं प्रेम आहे म्हणूनच मी जिवंत आहे, असे भावनाविवश उद्गार सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केबीसी सेटवर चाहत्यांशी बोलताना काढले. 

'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय मालिकेच्या 21व्या सिझनचे चित्रीकरण मुंबई येथे सुरू झाले आहे. 23 ऑगस्ट पासून ही मालिका सोनी टीव्हीवर सुरू होणार आहे. या मालिकेत प्रेक्षक म्हणून भाग घेण्यासाठी कराड येथील अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपच्या 25 सदस्यांची निवड झाली होती. या सदस्यांनी अमिताभ बच्चन यांच्या समवेत केबीसी चित्रीकरणामुळे भाग घेतला. शेवटच्या टप्प्यात चित्रीकरण संपल्यानंतर सर्व उपस्थित प्रेक्षकांनी 'सर आमच्या सोबत फोटो काढा' अशी विनंती केल्यावर नंतर  'मुझे इतके साथ मुझे फोटो लेना है, उसके प्यार के कारण ही तो मै जिंदा हू' असे म्हणून काही अंतरावरून अमिताभ बच्चन यांनी चाहत्या सोबत फोटो काढले. 

चित्रीकरणादरम्यान मधल्या काळात अमिताभ बच्चन यांनी अतिशय नम्रपणे  चौकशी करत मीपण तुमच्यातलाच एक आहे असे नम्र पूर्वक सांगितले.

 या दरम्यान या एबीपी सदस्यांशी संवाद साधताना अमिताभ बच्चन यांनी सातारा जिल्हा आणि कराड शहराची माहिती जाणून घेतली. सातारा जिल्हा स्वातंत्र्यसैनिकांचा जिल्हा आहे तर कराड शहर देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांचे गाव आहे. या गावात ज्येष्ठ नेते पी डी पाटील हे गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेले 41 वर्षे नगराध्यक्ष असणारे नगराध्यक्ष होऊन गेले. त्यांच्या सुनबाई सुवर्णा पाटील आज या चित्रीकरणात सहभागी आहेत. कराडात कृष्णा कोयना प्रितिसंगंम आहे. भारत सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण या स्पर्धेत सलग दोन वर्षे कराड शहराने देशात पहिल्या क्रमांक मिळवला आहे अशी माहिती देत आपण एकदा कराड शहराला यावे असे निमंत्रण ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सतीश मोरे यांनी यावेळी अमिताभ बच्चन यांना दिले.


बच्चन प्रेमी ग्रुप सदस्य या चित्रीकरणासाठी अमिताभ बच्चन यांचा लोगो असणारे मास्क तोंडावर बांधून सहभागी झाले होते.अक्षरगुरु जगन पुरोहित यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा मास्क तोंडावर लावला होता. सर्व सदस्यांनी एकाच प्रकारचे बांधलेले हे मास्क पाहून अमिताभ बच्चन यांनीही या ग्रुपची माहिती घेतली.माझा फेस मास्क लोक बनवून आणतात. तुम्ही माऊथ मास्क मास्क बनवला आहे, तो कुठे बनवला याबाबत माहिती घेऊन हा मास्क आवडला, माझ्यासाठी एक ठेऊन जा,असे गोड मागणी त्यांनी यावेळी केली. चित्रिकरण झाल्यानंतर एबीपी ग्रुपच्या वतीने अमिताभ बच्चन यांचे सोबत दोन वर्षांपूर्वी केबीसी सेटवर काढलेला फोटो भेट देण्यात आला. या चित्रीकरणात दीपक अरबुणे, डॉ. नितीन जाधव, सागर बर्गे, विनायक उर्फ बंडा पाटील,सुधाकर बेडके, संजय शिंदे, दिपक रैनाक,राजेश शहा, प्रकाश सोनवणे,गौरव परदेशी मिलिंद रैनाक, डॉ.डी जे जोशी आदी सहकुटुंब सहभागी झाले होते.

.....     .....   

साडेतीन तास केबीसीच्या सेटवर अमिताभ बच्चन यांना आम्ही पाहत होतो, त्यांना डोळ्यात सामावून घेत होतो. 79 वर्षाच्या या तरुणाचा उत्साह खरंच आम्हाला प्रेरणा देणारा होता. न थांबता अखंड हा माणूस कसा काम करत राहतो,हे एक न उलगडणारं कोडं आहे. सलग एकवीस वर्षे टीव्हीवर एखादा शो करणे आणि त्या शो ची लोकप्रियता टिकवून ठेवणे, हे काम फक्त अमिताभ बच्चन हे एकटेच करू शकतात. अमिताभनां उगाच महानायक म्हणत नाहीत. 'ना तू रुकेगा कभी, ना तू थमेगा कभी' हे अग्निपथ या कवितेतील वाक्य अमिताभ बच्चन यांना तंतोतंत लागू पडते. 


अमिताभ बच्चन यांची ही तिसरी भेट खरंच हृदयात साठवून ठेवण्यासारखी आहे. बच्चन प्रेमी पत्रकार म्हणून अमिताभ बच्चन यांची सेटवर हसत-खेळत घेतलेली मुलाखत आणि त्यांच्याशी साधलेला संवाद मला आणि कराडच्या अवधूत कुलबर्गी फोटो लॅबमध्ये  तयार केलेला, अमिताभ बच्चन यांना भेट दिलेला ABP मास्क  लक्षात राहील.


आज 9 वाजता प्रक्षेपण 

 *26 तारखेला म्हणजे आज या भागाचे प्रक्षेपण सोनी चैनल वरती होणार आहे. आज आपण आम्हाला या शो मध्ये अवश पहा.*

१४ ऑगस्ट २०२१

कायम...

सखी सख्याची !

परवा सखी अचानक आली.
थोडीशी घाबरलेली,
थोडीशी विस्कळीत,
थोडीशी हरवलेली !
डोळ्यात अश्रू दाटलेले !

जवळ आली अन बिलगली.
आज तिच्या डोळ्यात
वेगळाच भाव होता !
मनात विचाराचे काहूर होते ,
खूप काही सांगायचे होते ,
स्वतःला सावरायचे होते.

बिलगलेल्या सखीला
मी सावरायचा प्रयत्न केला.
बिलगलेल्या सखीला,
मी सावरायचा प्रयत्न केला.
मग ती अधिकच बिलगली.

अन् म्हणाली ,
आजपासून आपण थांबू या,
एकमेकापासून थोडे दूर राहु या ,
फार जवळ यायचं नाही ,
थोडंसं अंतर ठेऊ या !

सखीचं हे अजब रूप 
मी पहिल्यांदाच पहात होतो.
तिच्या मनात खोल काहूर होतं,
ज्यानं मला निशब्ध केलं होतं !

डबडबलेले ते डोळे
मला प्रश्नावत होते !
माझ्या डोळ्यात
तिला शोधत होतो !

मग मीही सावरलो,
मग मीही सावरलो.
तिलाही सावरलं .
अन् मग तिला सुनावलं.

सखी आपलं नातं वेगळ आहे ,
सखी आपलं नातं वेगळ आहे !
तुझ्यासाठी मला सर्वमान्य आहे,
तुझ्यासाठी मला सर्वमान्य आहे !

कुठेही राहिलीस
तरी तु माझी आहे,
माझ्या जवळ नसली
तरीही तु माझी सावली आहे !

तुझ्या सुखात मी अद्ष्य आहे,
दुःखात तर मी हाजीर आहे !
तू सुखी राहा,
यापेक्षा मला काही नको आहे.

जिथे जाशील,
तिथे तू माझ्यातच आहे !
मी तर तुझ्या
रोमारोमात आहे !

आपण दोघे कधी वेगळे नव्हतो,
आपण दोघे कधी वेगळे नव्हतो,
चार हात दूर राहिलो,
म्हणून वेगळे होणारच नव्हतो !

तुझ्या प्रत्येक श्वासात
मी असणार आहे.
माझा श्वास तर
तर तुझ्याविना गुदमरला आहे!

तू जिथे असशील
तिथे मी आहे .
तू जिथे स्मरशील
तिथे मी उमटणार आहे.

फक्त भेटणं म्हणजे
प्रेम आहे का?
भेटलो नाही म्हणून,
तुझे स्मरण होणार नाही का ?

माझ्या अखेरच्या
क्षणापर्यंत तू असणार आहेस !
तुझ्या रोमारोमात
मीच वास करणार आहे !

तू आणि मी एकच आहोत,
एकच राहणार आहोत !
पुढच्या जन्मात तर आपण,
एकच होऊन येणार आहोत !

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...