फॉलोअर

१७ जानेवारी २०१९

ना बोलना जरूरी है

*अंतरंग*

*'ना बोलना बहुत जरुरी है'*

अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच्यासमोर बसलेत. कमिशनर गायतोंडे विजयला सांगतात, ज्याच्यासाठी तू काम करतोस त्यांना नाही.ऐकायला आवडत नाही आणि तु तर त्यांना नाही म्हणतो आहेस . यावर अमिताभ बच्चन (विजय)म्हणतो,

*'इस दुनिया मे तरक्की करने के लिए ना बोलना बहुत जरुरी है कमिशनर'*

खरंच बरच काही सांगून जातो हा संवाद ! आपल्या आयुष्यात अनेकदा आपल्याला 'नाही' म्हणण्याचे प्रसंग येतात. अगदी समोरच्या व्यक्तीने चहा घ्या म्हटल्यानंतर 'नाही' कसा म्हणू तिथंपासून एखाद्या व्यक्तीसोबत दिवसभर फिरायला जाऊन आपला चार पाच तास त्याच्या सोबत वाया घालवण्यास 'नाही' म्हणण्यापर्यंत!

आपण अयोग्य गोष्टीला 'नाही' म्हणू शकत नाही तेव्हा आपला वेळ,श्रम आणि शक्ती वाया जाते. काही गोष्टीना 'नाही' न म्हणल्यामुळे आजारपण ओढावते, संकटे येतात,मनस्ताप होतो. हे टाळायला शिकवणारा आणि या सर्वावर मात करायला शिकवणारा अमिताभ बच्चन यांचा 'ना बोलना बहोत जरूरी है' हा डायलॉग मला खूप आवडतो .

खरंच योग्य ठिकाणी जर आपण नाही म्हणायला शिकलो तर पुढील अनेक अनर्थ टळतात. एकदा नाही म्हणलं तर समोरच्या व्यक्तीला एक वेळ राग येईल, दोनदा नाही म्हणले तर आणखीन राग येईल आणि तिसऱ्यांदा तो तुम्हाला त्या गोष्टीसाठी फोर्स करणार नाही.

कोणत्या कोणत्या गोष्टीला नाही म्हणालं शिकले पाहिजे? जी गोष्ट केल्यामुळे आपल्या शरीराचे नुकसान होणार आहे ,जी गोष्ट केल्यामुळे आपला कोणताही फायदा होणार नाही,आपला वेळ वाया जाणार आहे,आपल्याला ती गोष्ट घडल्यानंतर मनस्ताप करावा लागणार आहे, आपल्याला त्या गोष्टीतून फक्त वेदनाच होणार आहेत, ज्या गोष्टी केल्याची आपणास, आपल्या कुटुंबाला लाज वाटेल,अशा कोणत्याही गोष्टीला आपण 'नाही' म्हणायला पाहिजे.

   *नाही कशी म्हणू तुला*
 
खूप वेळा असं होत की "नाही" कसं म्हणावं या संकोचामुळे आपण बळजबरीने आपल्याच मनाला मारत "हो" म्हणतो. मग नंतर पश्चाताप होतो. या प्रश्नांवर एकचं उत्तर म्हणजे 'नाही' म्हणा पण अतिशय नम्रपणे.

"नाही" म्हणायच्या काही खास पद्धती आहेत. ज्या तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील...

# *मी नाही म्हणण्याने माझ्या पेक्षा तुमचाच फायदा होणार आहे*

# *-"मला मदत करायला खुपच आवडले असते. पण मी बांधील असलेल्या इतर काही कामांमुळे तुमचे काम मला योग्य वेळेत पूर्ण करणे शक्य होणार नाही..."*-

# *"क्षमा करा पण सध्या मी ज़रा व्यस्त असल्याने मला तुमच्या कामासाठी ही वेळ योग्य वाटत नाही. पुढील महिन्यात केले तर नाही का चालणार? "*

# *"तुमची योजना खरंच चांगली आहे. पण तरीही मला विचार करायला काही अवधी लागेल. मी तुम्हाला अमुक एक दिवसांनंतर संपर्क केला तर चालेल का?"*

# *" 'अमुक अमुक' कारणामुळे मला ताबडतोब निर्णय देणे शक्य नाही. तरीही कृपया मला विचार करायला ज़रा वेळ दयाल का?"*

# *"मला असे वाटते की 'अमुक अमुक' कारणामुळे मी यासाठी योग्य व्यक्ती नाही. तुम्ही 'अमुक अमुक' व्यक्तिशी का नाही बोलत?"*

# *माफ़ करा पण मला यावेळी खर्च करणे शक्य नाही.मी तुम्हाला मदत करू शकत नाही*

# *हे माझ्या तत्त्वात बसत नाही मी हे केले तर माझं मन मला माफ करणार नाही*

एवढं करूनही समोरची व्यक्ती फारच आग्रही असल्यास कोणतेही कारण देण्याच्या फंदात न पड़ता त्या व्यक्तिला  स्पष्ट 'नाही' म्हणा. शेवटी *एखादया कामाला 'हो' किंवा 'नाही' म्हणणे हे पूर्णतः वैयक्तिक इच्छेवर अवलंबून असते*. त्यामुळे कोणाला काय वाटेल याचा फारसा विचार न करता अत्यंत नम्रपणे आणि आत्मविश्वासाने स्पष्ट बोलणे अधिक योग्य !

©@ सतीश वसंतराव मोरे
*सतिताभ*

१७.०१.२०१९

karawadikarad.blogspot.com

1 टिप्पणी:

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...