फॉलोअर

१४ जुलै २०१६


महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा 
माऊलीभक्तांचा पालखी सोहळा


वाखरी : सतीश मोरे
पंढरीचा पाडुरंग अवघ्या विश्वात  आहे. जो नसानसा मध्ये ठासून भरलेला तो विठ्ठल. विठ्ठल नामाचा महिमा फार मोठा आहे आणि विठ्ठल भक्त जगभर  आहेत.  शेकडो वषार्र्ं पासून पंढरीचा वारकरी, वारी चूको ने दी हरी, हे लक्षात घेऊन वारीला जात आहे. वारीत सारे जण सहभागी झाले आहेत.  गरिब- श्रीमंत, काळा -गोरा, सवर्ण- कनिष्ठ,  लहान- मोठ्ठा  असा कोणताही भेदभाव  इथे नाही.  प्रांत, देश, विदेश, जात पात या सर्व  सीमा  इथं नसतात, असतो फक्त माऊली. अवघ्या महाराष्ट्रातून आलेले, कर्नाटक,  तेलंगणा आणि महाराष्ट्र  येथून आलेल्या वारकरी माऊलींची दिंडी सामाजिक ऐक्याचे प्रतिक आहे.
महाराष्ट्राबाहेर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यात सुद्धा विठ्ठलाची जादू आहे.  या प्रांतातून अनेक वारकरी माऊली सोहळ्यात सहभागी झाले आहेत. धोंडोपंत दादा पंढरपूर यांच्या दिंडीला अनेक वर्षाची परंपरा आहे. माऊली रथाचे मागे 20 नंबरवर असणाऱ्या या दिंडीत सुमारे 3000  वारकरी  आहेत.  यामध्ये महाराष्ट्र,  कर्नाटक व तेलंगणा राज्यातील वारकऱ्यांचा संगम पहायला मिळाला.
आंध्र प्रदेश राज्यातून वेगळे झालेल्या तेलंगणा राज्यातील महाराष्ट्र सीमारेषेवर असणारा निजामाबाद या जिल्ह्यात वारकरी संप्रदायाचे अनेक लोक आहेत. अनेक वर्षे पंढरीची वारी करणारे वारकरी  आहेत.  यंदा पाऊस आला नव्हता,  गेल्या वर्षी पण कोरडे पडले होते,  तरीही पंढरीच्या वारीला या भागातील अनेक वारकरी आले आहेत.  निंभोरे ओढा येथे अनेक जण भेटले. या दिंडीत पहिली पंगत बसताना शर्ट काढून बसावे लागते.  जेवणाची पंगत  उठल्यानंतर कन्नड स्टाईल मराठीत बोलू लागले. आमच्याकडे श्रीमंत देव आहे,  पैसा  आहे. पण विठ्ठलासारखा देव नाही.  या देवाचे दर्शन घेतले की वर्षभर उर्जा मिळते. वारी सारखा आनंद जगात कोठेही नाही.  आमच्याकडे भजन, कीर्तन नित्य नेमाने होतात. अनेक गावात विठ्ठल रूक्मिणी मंदीर आहे, असे त्यांनी सांगितले. कर्नाटक राज्यातून आलेल्या लोकांची संख्या पण फार  आहे. गंगाधर महाराज पाटील चंडेगावकर मदनूर यांच्या पुढाकाराने आलेले वारकरी याच दिंडीत पहायला मिळाले. या माऊलींचे पाठांतर खूप आहे. तुकोबा गाथा मधील अनेक अभंग पाठ  आहेत. अनेक गावांमध्ये भजनी मंडळे आहेत.  पंढरीची वारी  कधी चुकवत नाहीत. सुमारे  1000 किलोमीटर प्रवास होतो. सारे जण पंढरपूर  मध्ये धोंडोपंत दादाच्या मठात एकत्र येऊन आळंदीला जातात. वारीमध्ये  पालखी सोहळ्यात सहभागी होतात, असे त्यांनी सांगितले.

वाखरी: उडीच्या खेळात टाळ-मृदुंगाच्या ठेक्यावर विठुनामाच्या गजरात तल्लीन होऊन नाचणारे वारकरी.



रिंगण  आणि  उडीचे खेळ
वारकरी  अखंड चालत असतात. दमतात,  थकतात पण थांबत नाहीत. त्यांना आनंद,  विरंगुळा देणारा क्षण म्हणजे उभे आणि  आडवे रिंगण. शाळेत जसा पीटीचा तास तसेच हे वारकरी खेळ.  या खेळात सात्विकता आणि  आनंद असतो. माऊली ज्यावर सवार  असतात  असा माऊली अश्व, दुसरा शितोळे सरकार यांचा मानाचा अश्व. माऊलीचा अश्व मोकळा  असतो, तो पुढे पळत राहतो. त्यामागे स्वार  असलेला अश्व धावतो.  माऊली अश्व रिंगणात  एक दोन वेढे काढतो,  आणि थांबतो. मग स्वार  अश्व त्यापुढे जातो आणि रिंगण पुर्ण होते. माऊली माऊलीचा घोष होताना दोन्ही  अश्व माऊली पालखी जवळ जातात आणि रिंगण संपते. त्यानंतर चोपदार सर्व दिंड्यांना उडीचे खेळासाठी निमंत्रण देतात. माऊली पालखी आणि घड्याळाचा काट्याप्रमाणे ओळी करून टाळकरी उभे राहतात. बाहेर गोलाकार सर्व  मृदंगधारक, विणेकरी आणि झेंडेकरी असतात. टाळ मृदंगाची जुगलबंदी सुरू होते. चोपदार बंधू चार ठिकाणी उभे राहून सूचना देतात, त्यावर टाळकरी ठेका धरतात. झोपून, गुडघे टेकून,  मागे, पुढे तोंड करून टाळकरी  बेफाम  होऊन नाचतात.अर्धा तास खेळ रंगतो. तुका म्हणे वृद्ध होती तरूण, अशी परिस्थिती  असते.  शेवटी चोपदार चोप वर करून उडी मारतात, उडीचे खेळ संपतात. सारेजण लोटांगण घालून नमस्कार करतात. यामागे  संताची धुळ शरिराला लागावी हा उद्देश  असतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...