फॉलोअर

०१ जुलै २०१६


गतवर्षी पेक्षा आळंदीत यंदा कमी भाविक 


पुणे
धन्य पुंडलिका बहु बरे केले ।
निदान  आणले पंढरिये ।।
धन्य ते पंढरी, धन्य भीमा तीर ।
आणियेले सार पुंडलिक ।।
नित्यनेमाने वारी करणारे हजारो वारकरी मंगळवारी आळंदीत दाखल झाले होते. प्रस्थान सोहळ्यात माऊली भक्तांचा अमाप उत्साह पहायला मिळाला. बुधवारी पालखीने पुण्याकडे मार्ग क्रमण केले. या दरम्यान गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी वारीमध्ये कमी वारकरी सहभागी झाले आहेत  . मागील वर्षे पडलेला मोठ्ठा दुष्काळ,  त्यामुळे झालेले स्थलांतर व भीषण परिस्थिती आणि याही वर्षी जुन संपत आला तरी पावसाने मारलेली दडी याचा परिणाम वारीवर झाला आहे. गेल्या वर्षी आळंदीत आलेले सुमारे साडेपाच सहा  लाख भाविकांच्या तुलनेत यावर्षी पाच लाख भाविक आणि  वारकरी आले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही संख्या आहे  याला काही दिंडी मालकांनीही दुजोरा दिला आहे .
गेल्या काही वर्षांत वारीमध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या भागांतून येणाऱ्या दिंड्या आणि वारकरी यांची संख्या वाढत आहे. 1990 नंबर झानेश्वर माऊली पालखी सोहळा आणि जगतगुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकरी  आणि दिंड्या वाढू लागल्या आहेत.  माऊली सोहळ्यात सहभागी पुर्व परपरागत दिंड्या मध्ये 1990 -1993 दरम्यान 10 ते 15  हजार वारकरी सहभागी होत  असत.  या दरम्यान पालखी सोहळ्याकडे प्रशासनाचे जास्त लक्ष नसायचे. पालखी गावातून यायच्या, जायच्या त्याकडे त्या गावातील लोक  आणि निवडक वारकरी यांच्या व्यतिरिक्त कोणाला घेणेदेणे नसायचे. 1990 च्या दशकात  ज्ञानेश्वरी सप्तशताब्धि जयंतीच्या निमित्ताने राज्यभर अनेक गावांमध्ये पारायण सोहळे पार पडले.  माऊलींच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला.  त्यानंतर माऊली पालखी सोहळ्यात सहभागी होणारे वारकरी संख्या वाढली. हळूहळू ही संख्या लाखावर गेली.  पुढे दोन लाख झाहली तर गेल्या सहा वर्षांत ही संख्या पाच सहा  लाखावर पोहचली आहे.


आळंदीत माऊली सोहळ्यास प्रारंभ होतो तेव्हा राज्य भरातील शेकडो दिंड्या येथे दाखल होतात.  अनेक वर्षे सलग या सोहळ्यात सहभागी होणार्‌या दिड्यांना संस्थान ट्रस्ट वतीने नंबर दिला जातो. फार  पुर्वी पालखी खांद्यावर घेतली जायची, पुढे रथ आला. त्यामुळे रथासमोरील दिंड्या  आणि रथामागे असणाऱ्या दिंड्या  असे क्रमांक देण्यात आले.  माऊली पालखी रथाचे पुढे पहिला क्रमांक दिंडी आळंदीची असते व पुढे यासहीत 27 दिंड्या  असतात.  रथामागे किंवा पालखीमागे नोंदणीकृत  201 दिंड्या असतात. तर त्या मागोमाग तितक्याच म्हणजे 200 दिंड्या आहेत. या 200  दिंड्याचे सातत्य, सक्रिय   सहभाग पाहून त्यांना नंबर दिले जातात.  गेल्या काही वर्षांत या दिंड्या मध्ये सहभागी वारकर्याची संख्या वाढली आहे.
गत वर्षी माऊली सोहळ्यात आळंदी पासूनच वारकर्याचा फार मोठा सहभाग होता.  साधारण पाऊसपाणी व्यवस्थित झाले असेल तर सोहळ्यात वारकरी स्वयंप्रेरणेने,  स्फुर्तीने येतात.  वारीला येणारा सर्वाधिक शेतकरी,  कष्टकरी,  शेतमजूर वर्ग आहे. माऊलीची वारी या वर्गानेच वाढवली, फुलवली आणि टिकवलीही.  वारी सुरू होते ज्येष्ठ वद्य  अष्टमीला.  या दरम्यान  अगोदर पाऊस योग्य वेळेत पडला तर हा वर्ग पेरण्या पुर्ण करून घेतो.  पेरण्या पूर्ण झाल्या , चांगले पीक येईल,  सारं काही चांगले होईल या आशेने शेतकरी सुखावतो.  मोकळा श्वास घेतो  आणि मोकळेपणाने वारीला निघतो.  ज्या वर्षी पाऊसमान चांगले होते, त्यावर्षी वारीत वारकरी जास्त येतात,  हा अनुभव आहे.  दुसरीकडे पंढरीच्या पाडुरंगाकडे जाऊन दर्शन घेऊन  आले की सारे काही आलबेल होईल, या आशावादही त्याचा असतो. गत वर्षी पाऊस बरा होता, त्यामुळे माऊली सोहळ्यात सुमारे साडेचार लाख लोक सहभागी झाले होते, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.
वास्तविक सहभागी वारकरी लोकांची कुठेही नोंदणी नसते,  रस्त्यावरन  जाणारा वारकर्याचा प्रवाह मोजता येत नाही.  दहा ते वीस  किलोमीटर रस्त्यावर फक्त वारकरी आणि दिंड्या दिसत  असतात.  आळंदी मध्ये  आलेली वाहने,  झालेली गर्दी,  किती लांब रांगा लागल्या,  इंद्रायणी नदीच्या काठावर स्नान करण्यासाठी होणारी गर्दी या सर्व बाबींचा विचार करून पोलीस खाते अंदाज बांधते. चालु वर्षी सुमारे  पाच  लाख वारकरी आळंदीत आले असावेत,  हा आकडा गतवर्षी पेक्षा 1 लाखाने कमी आहे. यापैकी सारेच वारकरी माऊली सोहळ्यात सहभागी होत नाहीत.  काही भाविक  माऊली दर्शन घेऊन घराकडे जातात, पुढे पंढरपूर जवळपास पुन्हा सोहळ्यात सहभागी होतात.
यंदा जुन महिन्यात राज्यभरात सरासरी पेक्षा 25% पण पाऊस झाला नाही. काही भागात वळवा पाठोपाठ मान्सून सक्रिय झाला आहे.  तरीही राज्याचा विचार करता पावसाची परिस्थिती गंभीर आहे. पाऊस नसल्याने पेरण्या झाल्या नाहीत, बळीराजा पावसाकडे डोळे लावून बसला आहे.  धरणे, पाझर तलाव आटले आहेत.  या सर्व गोष्टींचा परिणाम वारीवर झाला आहे. यावर्षी शेतकरी वारकरी कमी झाला आहे  पुणे, सासवड मध्ये काही जण सहभागी होतात.  मात्र गतवर्षी तुलनेत यंदा वारकरी कमी आहेत. काही दिंडी मालकाकडे माहिती घेतली असता त्यांनी पण यावर्षी लोक कमी  आले आहेत,  गावाकडे पाऊस नाही, त्यामुळे परिणाम झाला असल्याचे त्यांनी दैनिक 'पुढारी' शी बोलताना सांगितले.


आळंदीत गतवर्षीचा तुलनेत कमी भाविक आले आहेत. गेल्या वर्षी माऊली दर्शनासाठी सुमारे सहा लाख लोक आले होते. यावेळी 5 लाख भाविक सहभागी आले आहेत. कमी पाऊसमान हे याचे कारण असू शकते. हे सर्व वारकरी माऊली सोहळ्यात सहभागी होतात असे नाही. यंदा पावसामुळे वारकरी सहभाग कमी आहे .
- मितेश घट्टे , उपविभागीय पोलीस अधिकारी, राजगुरुनगर, खेड. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...