फॉलोअर

१३ जानेवारी २०१८

कविता करता येईल




तुझ्या स्मित हास्यावर
एक कविता करता येईल
तुझ्या गोड गालावर
एक कविता करता येईल

तुझ्या अल्लडपणावर
एक कविता करता येईल
तुझ्या समंजसपणावर
एक कविता करता येईल

आपल्या जीवन संगीतावर
एक कविता करता येईल
आपल्या सुंदर नात्यावर
एक कविता करता येईल

तुझ्या सहवासावर
एक कविता करता येईल
तुझ्या विरहावर
एक कविता करता येईल

तुझ्या प्रेमळ आवाजावर
एक कविता करता येईल
तुझ्या सहज खुलण्यावर
एक कविता करता येईल

तुझ्या माझ्या प्रीतीवर
एक कविता करता येईल
तुझ्या माझ्या भेटीवर
एक कविता करता येईल

तुझ्या मोहक सौंदर्यावर
एक कविता करता येईल
तुझ्या मोकळ्या केसांवर
एक कविता करता येईल

तुझ्या लाजण्यावर
एक कविता करता येईल
तुझ्या मुरडण्यावर
एक कविता करता येईल

११ जानेवारी २०१८

मराठी माणसाचा दावणगिरी डोसा

दावणगिरी A1 डोसा : कराडचे टेस्ट पाॅईंट

साउथ इंडियन उडपी मॅनेजमेंट चा बाऊ करत गेली अनेक वर्षे आपण ठराविक हाॅटेलमध्येच चांगले खायला मिळते असे म्हणत आलो आहे. कराड, सातारा येथे काही साऊथ इंडियन हाॅटेलमध्ये खायला मिळणाऱ्या डिशेस आता खाऊन खाऊन कंटाळा आला आहे.

हे सांगताना आता नवीन काय पर्याय आहे का असा प्रश्न पडला असेल ना? हो आहे.  गेली सात वर्षे कन्या शाळेच्या शेजारी A1 दावणगिरी डोसा नावाचे एक रेस्टॉरंट कम गाडा सुरू आहे.  मी अनेकवेळा तिथे डोसा खाल्ला आहे.  अतिशय सुंदर आणि टेस्टी असा दावणगिरी लोणी खाऊन मन तर तृप्त होतेच पण जाताना हा डोसा कसा करता हे विचारण्याची इच्छा होते .

आता प्रश्न पडला असेल मी हे का सांगतोय?  मी का त्यांची जाहिरात करतोय?  त्याचा माझा संबंध काय? होय संबंध आहे.  कारण नावाप्रमाणेच A1 डोसा करणारा एक मराठी माणूस आहे. पटणार नाही पण हे खरं आहे. मराठी माणसाला बळ देण्यासाठी मी ही पोस्ट मुद्दाम इथे टाकत आहे,  होय मराठी माणूस हेही करू शकतो हे सांगण्यासाठी मी ही पोस्ट टाकली आहे.  मराठी माणसाला असला धंदा जमणार नाही,  हे करू जाणे उडपी लोकांनीच असे म्हणणारांना ही चपराक आहे. 

या युवकाचे नाव आहे सुरेश केशव जगताप. यांचे गाव आहे कराड तालुक्यातील कोडोली.  आठ वर्षांपुर्वी सुरेशच्या कोल्हापूर येथील नातेवाईकानी त्याला हा व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला.  या नातेवाईकाची रंकाळा तलाव जवळपास मोठ्ठी पिठाची गिरण आहे , या गिरणीत  अनेक  उडपी लोक लोणी डोसा पीठ दळायला येत. या लोकांच्या संपर्कातून सुरेशला त्यांनी दावणगिरी येथील  कुक गाठून दिला, कराडात गाडा सुरू झाला. पण हा कुक फक्त 25 दिवसच टिकला, काम सोडून पळून गेला. सुरेशने मग स्वतः हा व्यवसाय पुढे न्यायचा निर्णय घेतला आणि काम सुरू केले.

हळूहळू धंद्याचे बस्तान बसले, दावणगिरी डोसा म्हणजे काय या उस्तुकतेपोटी आलेले लोक  ही टेस्ट चाखून पुन्हा पुन्हा येऊ लागले. आज कन्या शाळेजवळचा दावणगिरी डोसा कराडकरांसाठी टेस्ट पाॅईंट झाला आहे.  आपण या मराठी युवकाला बळ द्यायला हवे , एकदा तरी टेस्ट घेऊन.

सतीश मोरे @ karawadikarad.blogspot.com

सिक्किम राज्यपाल पत्रकार दिनानिमित्त

पत्रकारितेला फार मोठी परंपरा
पत्रकारांनी काळानुरुप बदलण्याची आवश्यकता
   - सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी  :- पत्रकारितेला फार मोठी परंपरा आणि इतिहास लाभला आहे. दिवसेंदिवस पत्रकारितेत बदल, सुधारणा आणि परिवर्तन होत असून पत्रकारांनी बदलत्या परिस्थितीला सामोरे जात काळानुरुप बदलण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी आज येथे बोलतांना केले.
कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने मराठी पत्रकार दिन पुरस्कार वितरण सोहळा सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाटयगृहात संपन्न झाला, त्यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धनंजय महाडीक, महापौर स्वाती यवलुजे, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमीका महाडीक आदि मान्यवर उपस्थित होते. आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करुन दिपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण सुरु करुन मराठी पत्रकारितेची खरी सुरुवात  केली. त्यानंतर लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, शि.म. परांजपे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले अशा थोर विभुतींनी पत्रकारितेच्या माध्यमातून प्रबोधन आणि समाजजागृती केली. आज पत्रकारितेत काळानुरुप फार मोठे बदल आणि सुधारणा होत आहे. वृत्तपत्राबरोबरच इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे आणि सोशल मिडिया अशा गतीमान बदलांना वृत्तपत्रकारांनी सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी काळानुरुप बदलण्याची गरज असून त्यानुसार पत्रकारिता क्षेत्रात होत असलेले  बदलही समाधानकारक असल्याचेही सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी कोल्हापूर पत्रकारितेचाही मुक्त कंठाने गौरव केला.
सामाजिक परिवर्तनाचे फार मोठे सामर्थ पत्रकारितेत असून पत्रकारिता हा समाजाचा आरसा असल्याचे सांगून सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले की, सामान्य माणसांची सुख-दु:खे बातमीव्दारे समाजासमोर मांडून सामान्याला पत्रकार आपलासा वाटावा, अशी पत्रकारिता करण्यातही पत्रकारांचे योगदान आहे, पत्रकारांनी सदैव निर्भिडता जोपासून वस्तुनिष्ठ बातम्याव्दारे समाजाची विश्वासार्हता जोपासणे महत्वाचे आहे. यावेळी त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात काळानुरुप होत असलेल्या बदल आणि परिवर्तनावर सविस्तर विवेचन केले. फार मोठी परंपरा आणि इतिहास असलेली पत्रकारिता यापुढेही दर्जेदारपणे वाढावी, बहरावी, यासाठी प्रत्येकाने आपले सकारात्मक योगदान देणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
समारंभाचे अध्यक्ष श्रीमंत शाहू छत्रपती महाराज याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, पत्रकारितेला फार मोठा वसा आणि वारसा लाभला आहे. पत्रकारांवर मोठी सामाजिक जबाबदारी असून समाजात शांतता आणि सलोखा निर्माण करण्यातही त्यांचे फार मोठे योगदान आहे. समाज जागृतीव्दारे पत्रकारांनी समाजाला योग्य दिशा देण्यातही सक्रीय व्हावे, आचार्य बाळ शास्त्री जांभेकरांपासून सुरु झालेल्या पत्रकारितेतील अनेक मान्यवर संपादकाच्या योगदानाचाही त्यांनी आपल्या भाषणात गौरव केला.
खासदार धनंजय महाडिक याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, वृत्तपत्रांच्या माध्यमातून सामाजिक समतोल राखण्याचे महत्वपूर्ण काम होत असून आजच्या स्पर्धेच्या युगातही पत्रकारांकडून वस्तुनिष्ठ  चित्रण समाजासमोर आणलं जात आहे,ही समाधानाची बाब आहे. पत्रकार हा समाजजीवनाचा एक महत्वाचा घटक असल्याचेही ते म्हणाले.
महापौर स्वाती यवलुजे याप्रसंगी बोलतांना म्हणाल्या, वृत्तपत्राच्या माध्यमातून समाज जागृतीचं आणि समाज प्रबोधनाचे महत्वाचे कार्य होत आहे. आजच्या स्पर्धेच्या युगातही माहिती, ज्ञान आणि प्रबोधनाचे महान काम वृत्तपत्रकारितेव्दारे होत आहे. कोल्हापूर प्रेस क्लबचे कार्य समाजहिताचे असून कोलहापूरच्या जडणघडणीत फार मोठे योगदान आहे.
प्रारंभी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष लुमाकांत नलवडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष तानाजी पोवार यांनी आभार मानले. याप्रसंगी समीर देशपांडे (लोकमत), राहुल गायकवाड (टाईम्स ऑफ इंडिया), प्रताप नाईक (झी 24 तास), प्रमोद सौंदाळे (न्यूज 18 लोकमत) आणि अमरदिप पाटील (ॲड फाईन) यांना राज्यपाल श्रीनिवास पाटील‍ यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
समारंभास पोलीस अधिक्षक संजय मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, करवीरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, माहिती उपसंचालक सतीश लळीत यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, विविध वृत्तपत्रांचे संपादक,पत्रकार, प्रेसक्लबचे पदाधिकारी आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
000000

१० जानेवारी २०१८

तु बोलणंच सोडलं?



मी तुझ्यावर प्रेम करतो
हे काय मी गैर केलं?
असं काय झालं गं सखे ?
तु माझ्याशी बोलणंच सोडलं !


माझे सारं काही तुझ्यासाठी
तु म्हणशील तसं नात्यासाठी
आपल्या पवित्र नात्यात
काय नेमकं वेगळं घडलं ?
तु माझ्याशी बोलणंच सोडलं !


का कळत नाही तुला
माझंही एक मन आहे
जे तुझीच वाट पाहत आहे
माझं नेमकं काय चुकलं ?
तु माझ्याशी बोलणंच सोडलं !

०७ जानेवारी २०१८

का

तुझं माझं नाते हलकं फुलकं
यात नाही आपलं तुपलं !
देणे नाही घेणेही नाही
फक्त सामाऊन आनंद लुटणं !

तु डिसेंबर, मी जानेवारी !
नातं आपलं जवळचं ,
पण वियोग वर्षभराचा !

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...