फॉलोअर

२३ एप्रिल २०१६

जागतिक पुस्तक दिन विशेष

आठ दिवसांत लातूर दौरा आणि किरकोळ आजारपण यामुळे लिहता आले नाही.
आज जागतिक पुस्तक दिनी पुन्हा एकदा नव्याने सुरू करत आहे.

लोभ आहेच तो यापुढेही कायम रहावा. 




☑२३ एप्रिल जागतिक पुस्तक दिन

〰〰〰〰〰〰〰〰〰
२३ या अंकाला अंकशास्रामध्ये सगळ्यात जास्त महत्व आहे....
२३ अंक हा बुद्धिमत्ता कारक मानला जातो....
आज शेक्सपियर चा जन्म दिवस आणि मृत्यू दिवस हि.....

🔲🔲🔲

🔺मरगळलेल्या, अस्वस्थ मनाला शांत करण्याचे उत्तम ठिकाण म्हणजे पुस्तकांनी भरलेली जागा “वाचनालय”. चाफ्याच्या फुलांनी मन जसं प्रफुल्लित होतं अगदी तसंच नवीन कोऱ्या पुस्तकाचं असतं. नवीन पुस्तकं हातात आलं की त्याचं नाव न पाहता त्याची किंमत न पाहता पहिला त्या पुस्तकाचा गंध मनात भरून घ्यावा हीच खऱ्या वाचकाची सवय. आज असं पुस्तकं आणि त्याचा सुगंध आठवण्याचा खास दिवस म्हणजे आजचा ‘जागतिक पुस्तक दिन’.
#२३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो.

🔲🔲🔲

जगप्रसिद्ध साहित्यिक शेक्सपिअरचा जन्मदिन आणि मृत्यूदिनही! विल्यम शेक्सपियरचा जन्म २३ एप्रिल, इ.स.१५६४ आणि मृत्यू देखील २३ एप्रिल, इ.स. १६१६. शेक्सपिअर हा इंग्रजी भाषेतला प्रसिद्ध कवी, नाटककार आहे. याने लिहिलेली नाटके व काव्ये इंग्लिश साहित्यात अजरामर आहेत. शेक्सपियरच्या शोकांतिका विशेष नावाजलेल्या आहेत. जगातील सर्व श्रेष्ठ लेखक, नाटककार म्हणून विल्यम शेक्सपियर यांचे नाव घेतले जाते. जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये शेक्सपियर यांच्या नाटकांची भाषांतरे झाली आहेत. गेली चार शतके शेक्सपियर यांच्या नाटकांचे असंख्य प्रयोग जगभर होत असतात.

वाचकांना प्रेरित करून त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या साहित्यिकांचा आणि पुस्तकांचा सन्मान करण्यासाठी व वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी १९९५ साली पॅरिस येथे झालेल्या परिषदेत युनेस्कोने २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक आणि कॉपिराईट दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. आज जवळपास १०० पेक्षा जास्त देशांमध्ये हा दिवस उत्साहात साजरा केला जातो.

🔲🔲🔲

भरपूर आर्थिक संपत्ती नसताना देखील या जगातील एक व्यक्ती खूप श्रीमंत असते असे म्हटले जाते, आणि ती व्यक्ती म्हणजे ‘पुस्तक प्रेमी’. ज्याच्याकडे पुस्तकांचा खजिना असतो, त्याच्याकडे ज्ञानाचे भंडार असते.

🔲🔲🔲

चांगल्या पुस्तकांमुळे आपल्या संपूर्ण जिवनाला एक वेगळे वळण मिळते. कधीकधी न वाचलेल्या गोष्टी आपण एखाद्या पुस्तकात वाचतो आणि आपल्या विचारांमध्ये क्रांतिकारक बदल घडतो. विविध विषयांची चांगली पुस्तके आपल्याला जगण्याची नवी दिशा दाखवतात. पुस्तकांमधील समृद्ध विचारांचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो आणि आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन कायमचा बदलून जातो.

🔲🔲🔲

कुणाला वाचनालयात जायला वेळ नाही लायब्ररीमध्ये उपलब्ध होणारी पुस्तकं फिरत्या वाचनालयातून घरपोच फिरू लागली.आता या वाचनालयांबरोबरच इंटरनेट आणि ‘ई-बुक’ देखील आहेत. ऑनलाईन साईट्समुळे विविध विषयांमधील पुस्तके मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत. लहानांपासून मोठय़ांपर्यंत पुस्तके हा अनेकांच्या जिव्हाळयाचा विषय असतो. पूर्वी केवळ ‘वाचनालय’ हे पुस्तके वाचण्याचे आणि मिळण्याचे एकमेव ठिकाण होते. लोक आवडीने वाचनालयास भेट द्यायचे. आज पुस्तके वाचण्याचे आणि खरेदी करण्याचे मोठो स्त्रोत निर्माण झाले आहे. तंत्रज्ञानामुळे चांगल्या पुस्तांचा आणि लेखकांचा प्रसार मोठया प्रमाणात होत आहे.


📚📖📚📖🌎📖📚📖📚



आज शनिवार कविता डे

विल्यम शेक्सपिअर यांच्या प्रेम कविता अजरामर आहेत .

प्रेम वेड्या
त्या दोघांच्या भेटीचा हळुवार संवाद ,

माझ्या नजरेतून तुमच्या साठी !



तो आणि ती 

1

ती

कालची संध्याकाळ वेगळी होती
तुझ्या आठवणींची त्यात गर्दी होती

शोधत होते त्यामध्ये मीच मला
त्या गर्दीत मला दिसत होते
अफाट वाळवंट आणि बेफाम वारा!

त्याक्षणी
माझ्यासाठी आला एक ढग
तो आला एका क्षणासाठी पण

मी तृप्त झाले मणभर
ज्याची मी वाट बघत होते जीवनभर!


2

तो

मी माझा कधीकधी असतो
अनेकदा तुझ्याच विचारात असतो
मणभर आणि काकणंनर
जीवनभर आणि क्षणभर
नातं आपलं जपुया हर पल


3

ती

कधी कातरवेळी तुझी आठवण
मनी माझ्या दाटून येते
दूरवर पसरलेल्या क्षितिजाकडे
मग मन उगाच पहात राहते
तुझ्या स्पर्शाची जादू
मनाला हळूच हलवून जाते
तु नसतानाही असे का होते
माझे मलाच उमजत नाही
जवळ नसतानाही तुझा भास होतो
तुझ्या आठवणींत चिंब भिजवून जातो

4

तो

तुझी आठवण मला कधीच येत नाही
तुझी काळजी मात्र सतत लागून राहते
कुठेही रहा, सुखी रहा,
स्वच्छंद , सुमधूर, सुमंगल
पण
तुझ्यावरचा माझा अधिकार मात्र राखीव ठेव

तुझ्या सुखातच माझा आनंद आहे
तु उभी राहण्यातचं माझा स्वर्ग आहे.


5

ती

मी कुठेही असेन
तुझ्यासाठी तुझ्यातच असेन
साद दे कधीपण जीवलगा
येईन परतुन सख्या साजना

आठवतोय तुला तो पाऊस
नाही? असं का करतोस

काल पुन्हा पाऊस आला 
पाऊस पडून गेला अन
तुझ्या आठवणीने पुन्हा गर्दी केली

हुरहुर लावतात तुझ्या या आठवणी
पण सुखद स्पर्शाचा थंडावाही देतात

जायचं असतं परतून तर येतोसच का? 
वेड या जीवा लावतोस का ?    
                            
यायच्या आगोदर तुला परतुनी जायचं असत
मला मात्र सतत तुझ्याजवळ राहायचं असतं


6

तो

मला परत जायचंच नसतं
तुझ्या जवळ रहायचे असतं..

मी आल्यावर तुझ्याजवळ असतो
गेल्यानंतर तर तुझ्यामध्येच असतो


                   ..........सतीश मोरे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...