फॉलोअर

०३ डिसेंबर २०१७

संवाद नात्याचा




ती
तु माझ्यात असण्याचा फार फरक पडतो, 
तुझ्या असणंच मला माझं असणं देवून जातं !

तो
दूर असूनही मज तु जवळ भासतेस,
माझ्या असण्यावर तुच राज्य करतेस !

ती
चिमणी आणि चिमणा भेटीस आतुरलेले,
शब्दात काय वर्णु मन बेधुंद झाहले !

तो
वाट पाहतोय चिमणा चिमणीची रातदिनी,
लावून डोळे वाटेकडे चिमणीही आसुसलेली !

ती
तुझ्या भावना मला कळतात,
भावनेतच मी भावून जाते, भाऊक होते !
 
तो
मला सखी हवी होती म्हणून
तुला सखा हवा होता म्हणून
अव्यक्त व्यक्त  करायला हवं होतं कोणीतरी म्हणून !

ती
आपल्या दोघांच्या नात्याला काय नाव देवू
नात्या मधील भावना पाहू की नाव शोधू ?

तो
नाव महत्वाचे नाय तर भाव अन् साव खरा आहे
राधाकृष्णाच्या नात्यातील गहराई जगाला ठावूक आहे !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...