फॉलोअर

०७ जानेवारी २०१९

फक्त हसुया तरी

*अंतरंग*

भारतीय वंशाचे तत्ववेत्ते रॉबिन सिंग यांचे एक पुस्तक खूप लोकप्रिय आहे. *'तुम्ही मेल्यावर कोण रडणार आहे ? Who will cry when you due? '* हे पुस्तक मी दोनदा वाचून काढले आहे. त्यात ते म्हणतात, मनुष्य जन्माला येतो तो किती दिवस जगतो यापेक्षा त्याने त्याला मिळालेल्या आयुष्यात जगासाठी काय केलं हे महत्त्वाचे असते. त्याने स्वतःसाठी काय केलं , कुटुंबासाठी काय केलं , किती संपत्ती मागे ठेवली याचा हिशोब नातेवाईक करतात. मात्र जग आठवणीत ठेवतं फक्त त्या व्यक्तीने समाजासाठी काय केले तेच !

पाठीमागे ठेवलेली संपत्ती त्याची मुले,मुलगी व नातेवाईक त्यांच्या पश्चात वापरतात ,काही जण त्यात भर घालतात ,काही जण विकून टाकतात मग काय माग राहतं?

एखाद्या व्यक्तीने केलेलं वेगळं काम हेच पाठीमाग राहतं. आपण केलेल्या काम चांगलं असेल तर पुढच्या अनेक पिढ्या त्या कामावर समाजात ताठ मानेने जगतात,आपल्या पूर्वजांनी केलेल्या कामात आपण काहीतरी भर घातली पाहिजे.आपला जन्म हा पूर्वजांनी मिळवलेली संपत्ती विकण्यासाठी नव्हे तर ती टिकवून ठेवत आणि सामाजिक कार्यात भर घालत समाजासाठी काहीतरी वेगळे करून दाखवण्यासाठी आहे.

समाजाचा आपल्यावर फार मोठा उपकार असतो. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत समाजातला प्रत्येक घटक आपल्यासाठी काहीतरी करत असतो.  प्रत्येक व्यक्ती मोलाची आणि महत्त्वाची आहे. या व्यक्तीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण समाजाला काय दिले पाहिजे .

आपण समाजासाठी काय देऊ शकतो याचा विचार अनेकांना पडेल. मात्र आपल्या परीने जे काही देता येईल तेही आपण करू शकतो.

तत्त्ववेत्ते राँबिनसिंग असे म्हणतात, *तुम्हाला जर काही देता आलं नाही तर किमान रोज दिवसभरात पाच अनोळखी व्यक्तींच्या कडे बघून हसा, त्या व्यक्तीला आनंद द्या.* हसणे ही अशी वस्तू आहे की जी देण्यासाठी पैसे खर्च करावे लागत नाहीत .आपल्या समोर आलेल्या अनोळखी व्यक्तींकडे बघून हसल्यावर तोही आपल्याकडे बघून हसेल आणि आनंदाची देवाणघेवाण होईल.

*जगात आपण जन्माला आलोय आहे, आनंद लुटण्यासाठी ,आनंद वाटण्यासाठी !*

© @ *सतिताभ*

७.०१.२०१९

karawadikarad.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...