फॉलोअर

१८ जानेवारी २०१९

फ्लेक्स बंदी निर्णय न ठरो वांझोटा



एक महिन्यापूर्वी सकाळी मंगळवार पेठेतील एका ब्राम्हण कुटुंबातून फोन आला होता. ‘पत्रकार,आमच्या भागात गुंडांचे खूप सारे फ्ले्नस लागले आहेत. आम्हाला घरात येणाऱ्या रस्त्यावरच हे फ्ले्नस लावले आहेत. कोणाला सांगायचे? नगरपालिकेला कळवायचे तर त्या फ्ले्नसवर एका नगरसेवकाच्या भावाचा फोटो आहे. पोलिसांना कळवायचे तर.. ते ही आमची जबाबदारी नाही, असे सांगून मोकळे होतात. असा या पूर्वीचा अनुभव आहे. त्यामुळे तुम्हीच यावर काहीतरी करा.!’ यानंतर ‘ आम्हाला त्या फ्ले्नस डॉनची आम्हाला भीती वाटते’ या आशयाची बातमी प्रसिद्ध केली होती. फ्नत बातमी प्रसिद्ध करुन आम्ही थांबलो नाही तर कराडचे कारभारी जयवंतराव पाटील आणि राजेंद्रसिंह यादव यांना प्रत्यक्ष भेटून या गोष्टींची दाहकता स्पष्ट केली होती. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनाही भेटून आम्ही याबाबत कराड पालिकेने कडक कारवाई करण्याची गरज आहे. फ्ले्नस लावण्यासाठी त्या गुंडांच्या समर्थकांनी परवानगी घेतली होती हे जरी खरे असले तरी परवानगी घेऊन, पैसे भरून कोणाचेही, कसलेही फ्ले्नस लावायला केवळ उत्पन्नात भर पडते म्हणून पालिका परवनगी देणार असेल तर पालिका दुसरे धंदे का सुरु करीत नाही? असा खडा सवालही केला होता. पालिकेचे कारभारी आणि मुख्याधिकारी या दोघांनीही याबाबत एकमेकांकडे बोटे दाखविली. मात्र कराडमध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे उदात्तीकरण होत राहिले तर यशवंतनगरी ‘गुंडनगरी’ होईल आणि हेच गुंड पुढे जाऊन पालिकेच्या राजकारणात येतील. समाजसेवेचा बुरखा घातलेले शस्त्र बाळगणारे गुंड जर कराडच्या राजकारणात येऊ घातले तर कराडच्या विकासावर याचा फार मोठा परिणाम होईल, अशा प्रकारची विनंती पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना केल्यानंतर राजेंद्रसिंह यादव आणि जयवंतराव पाटील यांनी याबाबत लवकरच पालिकेच्या सभेत गंभीर दखल घेतली जाईल. प्रसंगी कराडात फ्ले्नस बंदीचा ठरावही घेतला जाईल, असे अभिवचन पुढारी प्रतिनिधींना दिले होते.



‘पुढारी’चे कराडच्या समाजकारणाशी गेल्या 30 वर्षांपासून बांधिलकी आहे. 1990 साली  पुढारी कराडात आला. तेव्हापासून कराड शहराच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, वैचारिक, शैक्षणिक आणि राजकीय जडण-घडणीत पुढारीने नेहमीच वाटा उचलला आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांची कर्मभूमी, पी.डी. पाटीलसाहेबांचे गाव आणि पुढे आता माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे गाव म्हणून कराडचा देशभर नावलौकिक आहे. तो यशवंतराव चव्हाण, पी. डी. पाटील, यशवंतराव मोहिते, जयवंतराव भोसलेे, विलासकाका उंडाळकर, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या विकास महापुरुषांमुळेच! कराडचा नावलौकिक टिकविण्याची आणि वाढविण्याची जबाबदारी नागरिकांवर, राज्यकर्त्यांवर जितकी आहे तितकीच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून दैनिकांवरही आहे आणि याच भूमिकेतून आणि आम्हाला मिळालेल्या अधिकारातून ‘पुढारी’ने कराडच्या कारभाऱ्यांसमोर जी भूमिका मांडली, ती त्यांनी ऐकली, त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन! आता यापुढे जबाबदारी आहे, केलेला ठराव, घेतलेला निर्णय प्रत्यक्षात उतरवण्याचा! 



स्वच्छ सर्व्हेक्षण या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत कराड पालिकेने नावलौकीक मिळवला आहे. दोन वर्षांपूर्वीचे कराड शहर आणि आताचे कराड शहर यात फार मोठा फरक झाला आहे. कराड शहरात कुठेही कचराकुंडी नाही हे सांगताना कराडकरांचा ऊर भरुन येतो. परवा मिडियामधील दिल्लीचे एक वरिष्ठ कराडात आले होते. कोल्हापूर ना्नयावर आल्यानंतर त्यांनी मला कराडची माहिती विचारायला सुरुवात केली. कराडची भौगोलिक व राजकीय माहिती सांगून झाल्यानंतर आमच्या शहरात कुठेही कचरा कुंडी नाही, हे मी त्यांना सांगितले. मात्र त्यांना ते पटलेच नाही. शेवटी मी त्यांना चॅलेंज केले. त्यांनी संपूर्ण शहराला फेरफटका मारला आणि कचरा कुंडी नसल्याचे पाहून ‘मैंने जिंदगी में पहली बार ऐसा सिटी देखा है’ असे कौतुक केले. 



स्वच्छता अभियानात कराडने केलेली कामगिरी, त्या माध्यमातून वाढविलेला लौकिक आणखी वाढविण्याची गरज आहे. या स्पर्धेत अजून खूप काही करायचे आहे. कराडला देशात नं.1 वर न्यायचे आहे. कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या सोबतीने विजय वाटेगांवकर, प्रियांका यादव यांच्यासारख्या स्वच्छतेसाठी वाहून घेतलेल्या पदाधिकाऱ्यांमुळे आणि नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली कराड नंबर 1 होईल याची खात्री आहे. याचाच एक भाग म्हणून पालिकेने शहर प्लास्टिक मु्नत करण्याचा निर्णय घेतला. रस्त्यावर कुठेही कचरा पडणार नाही यासाठी पालिकेचे आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस झटत असतात. (या स्वच्छतेच्या शिलेदारांचा ‘पुढारी’ने वर्धापनदिनी सत्कारही केला होता.) सायंकाळी 6 वाजता बाजारपेठेत पडलेला कागद, उच्चभू्र लोकांनी रस्त्यावर टाकलेले वेफर्सचे रॅपर, चॉकलेट कॅडबरीचे कागद उचलताना या स्वच्छताकर्मींना पाहिले की, हेच कराडचे खरे ‘गाडगेबाबा’ आहेत, अशी खात्री पटते. कराड शहर आणखी सुंदर दिसण्यासाठी पालिकेने घेतलेला फ्ले्नस बंदीचा ठराव याचाच एक भाग आहे.  



मिसरुडही न फुटलेले आणि कर्तृत्व दीड फूटही नसलेले काही युवक  शहरात कुठेही दहा फुटी फ्ले्नस लावतात. त्याखाली डॉन, बादशाह, किंगमेकर, राडा, साहेब, भावड्या, नाद नाय करायचा.., आमचा कराल नाद.. तर व्हाल बाद, आमच्याशी वाकडं... त्याची नदीवर लाकडं.. , अशी वा्नये टाकून काय साध्य करतात, हे त्यांचं त्यांनाच माहित! हे फ्ले्नस बघून शाळेतली पोरं आणखी बिघडायला लागली आहेत. आईचे बोट धरुन चालणारा मुलगा भले मोठ्ठे फ्ले्नस बघून ‘आई, हा कोण आहे?’ असा प्रश्न विचारतो तेव्हा कोणत्या तोंडाने आणि काय याचे वर्णन करु असा प्रश्न आईला पडतो.  


विशी-तिशीतले हे युवक बिघडले खरे. मात्र त्यांना बिघडवणारे आणि त्यांना पाठींबा देऊन लाव फ्ले्नस.. तुला कोण काय करतंय? असे म्हणणारे, त्यांना पाठिंबा देणारे कराडचे काही मेहेरबानच आहेत. आता या मेहेरबानांनीच फ्ले्नस बंदीचा ठराव घेतला आहे. धन्यवाद! कोणत्याही परिस्थितीत कराडमध्ये यापुढे कुठेही फ्ले्नस यापुढे लागता कामा नये. कायदेशीर बाबींचा विचार करुन, परवानगी घेऊन खासगी ठिकाणी किंवा नगरपालिकेच्या मालकीच्या जागेत काही मुख्य चौकात फ्ले्नस किंवा बोर्ड लावण्याचे स्पॉट डेव्हलप करण्याची गरज आहे. मात्र याठिकाणी लावावयाचे बोर्ड फ्नत प्रेरणादायी असले पाहिजेत. मात्र कसल्याही परिस्थिती शहरात कुठेही, कसेही फ्ले्नस लागता कामा नयेत. मागे विनायक औंधकर यांनी याबाबतचा प्रयोग केला होता. मात्र फ्ले्नस बहाद्दर मेहेरबानांनी त्यांना पळवून लावले. आता डांगे यांनी सत्ताधाऱ्यांना फ्ले्नस बंदीचा ठराव केल्यामुळे कराड पालिकेचा कसा फायदा होणार आहे आणि स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये कराडचे नाव कसे उंचावणार आहे हे पटवून देण्याची गरज आहे. पालिकेत बसलेले कारभारी कुणाही गुंडाचा किंवा कोपऱ्यावरील युवा नेत्याचा बोर्ड लावण्यासाठी दबाव टाकत असतील तर त्यांची नावे मुख्याधिकाऱ्यांनी मिडियाकडे जाहीर करावीत. कायदेशीर फ्ले्नस, होर्डिंग्जला परवानगी देताना त्यातील मजकूर, फोटो तपासून घ्यावे लागतील. पालिकेच्या परवानगीबरोबरच पोलिसांच्या परवानगीशिवाय फ्ले्नस लावता येणार नाही, असा दंडक करण्याची गरज आहे. 


सुदैवाने कराडचे पोलिस याबाबत सकारात्मक आहेत. कराडातील गुंड आणि गुंडगिरी संपविण्यासाठी पोलिसांनी गेल्या चार वर्षांत ठोक कारवाई केली आहे. पालिकेने सहकार्य केले तर फ्ले्नसद्वारे गुंडाचे होणारे उदात्तीकरण संपविण्यासाठी पोलिसही चार पावले पुढे टाकतील यात शंकाच नाही. शेवटचा एकच सल्ला... घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. निर्णय घेणे सोपे असते. मात्र त्याची कार्यवाही करणे फार अवघड असते. पालिकेच्या पाठिशी कराडकर आहेतच! त्यामुळे निर्णय प्रभावीपणे राबवा. ‘पुढारी’ तुमच्यासोबत आहेच!


http://www.pudhari.news/news/Satara/Flexbandi-decision-does-not-end-up-in-Wanjhota/m/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...