फॉलोअर

०५ एप्रिल २०१६

नो बाॅल म्हणजे चुकीचे पाऊल


              

सोशल प्रीतिसंगम पुढारी सातारा पान 11

भारताने बॅटींग,फिल्डींग खुपच चांगली केली. बाॅलरांचे प्रयत्नांना यश कमी मिळाले, टिम इंडीयाला नशिबाने साथ नाही दिली. तरीपण जाऊ दे. खेळ म्हणजे हार जित चालायचीच. आपणाला फक्त एक हवं असते पाकिस्तानला हरवा, बांगलादेशला ठेचा. आपल्या टीमने ते केले आहे, पाकड्याला हरवलं म्हणजे वल्ड कप जिंकला.
मित्रानो, मँच हरलो म्हनून वाईट वाटून घेऊ नका. बांग्लादेश विरुद्ध हरता हरता जिकलो. आस्ट्रेलिया विरूद्ध पन तेच झाले.जो चांगला खेळ करेल तो जिंकेल..म्हनूण मित्रानो कोणी सुध्दा टिम वर अथवा खेळाडूवर कमेंट करू नका . उलट टिमचे अभिनंदनच करा चांगले खेळाल्याबदल .

धोनी आणि टिम इंडीयाबद्दल वाईट पोस्ट Market मध्ये आणताल तर याद राखा.आज हारलो या पेक्षा या मॅच पर्यंत कसे लढलो ते अभिमानाने सांगा.

या आणि अशा प्रकारचे अनेक चांगले मेसेजेस यावेळी टी 20 विश्वचषक सेमीफायनल मध्ये भारत हारल्या नंतर येऊ लागले आहेत. याअगोदर अशा क्रिकेट स्पर्धेत भारत हरल्यावर येणारे मेसेज, उमटणार्‍या प्रतिक्रिया आणि गेल्या दोन दिवसांत  सोशल मीडिया वर व्यक्त झालेल्या भावना यात फार फरक आहे. क्रिकेट प्रेमीची मानसिकता बदलत आहे. पराभव पचवायची क्षमता वाढण्याबरोबरच खेळाचा विजय लोक स्वीकारू लागले आहेत . आला मनात राग की व्यक्त केला टिव्ही वर, व्हाॅट्स अपवर, फेसबुक वर,  हे यावेळी दिसले नाही. पराभव सुद्धा विनोद बुद्धीने कसा पचवायचा असतो, हे पहायला मिळाले. खरंच दाद द्यावी लागेल सोशल मीडिया प्रेमीना, वेड्यांना, नेटीझनना आणि ऑनलाइन खुळ्यांना !

वेस्ट इंडिज आणि भारतीय क्रिकेट संघात झालेली परवाची सेमीफानल खरंच अप्रतिम होती. आपण ही मॅच जिंकू शकलो असतो जर आपल्याला 'सिमन्स' आडवा आला.  त्याला दोन वेळा  मिळालेल्या नो बाॅलचे जीवदानाने भारतीय संघाला पराभवाकडे खेचत नेले. या 'नो बाॅल' वर खुप छान पोस्ट येत आहेत. ही पोस्ट पहा.

हमे तो नो बाॅलने लुटा, उनमें कहाॅ दम था
मेरा पाॅव वहा पडा, जहाॅ चुना कम था

अश्विन आणि पंड्याच्या गोलंदाजीवर दोन वेळा विकेट मिळाली पण रेषेच्या जवळ पुढे गेल्यामुळे नो बाॅल दिला गेला, विकेट राहीली बाजुला फ्री हिट मुळे रन्स वाढल्या. या गोलंदाजांनी बाॅल टाकताना पाऊल पुढे टाकले म्हणून आलेली ही पोस्ट वाचून आपण हसू आवरू शकणार नाही.

'अश्विन आणि पंड्याला झी चोवीस तास चॅनेलवर
निवेदकाची नोकरी मिळणार
कारण हे दोघे नेहमी एक पाऊल पुढे '
याच्या पुढे जाऊन एकाने म्हटले आहे,
'संपुर्ण रामायण रेषेच्या पुढेपाय टाकल्याने घडले.
T20 चे काय घेऊन बसलाय राव...?'



काही विनोदबुद्धीच्या WhatsApp तज्ञांनी सध्या मार्केटमध्ये आघाडीवर पतंजली उत्पादने 'टाचेच्या मागे चार फुट लांब बुटाची  उत्पादन सुरू करणार आहे ',  असा शोध लावला आहे.

अंधश्रदेवर जोक करत एकाने टाकले आहे,
कालची मॅच हारल्यानंतर धोनी, विराट आणि रोहित शर्मा गुरवांकडे गेले, जाब विचारायला . धोनी गुरवाला विचारतो, तुम्ही अंगारा दिला तरीपण आम्ही मॅच कशी हारलो ? कोकणातील गुरव म्हणतो, मी तुमका सांगलय होतय मी मारलेली रेश कोणी अोलंडता कामा नये, तरी पण आश्विन आणि पांड्यान ती कशाक अोलंडल्यानी,म्हणान तुम्ही मॅच हारलास.
याच आशयाच्या याही पोस्ट गंमतीशीर आहेत. 

' CBI ने मालवणात केली गुरवाला अटक. जादुटोण्यासाठी सुपारी घेतल्याची कबुली '
'चेंडू टाकताना मागून देवचाराने ढकलल्याची आश्विन, पंड्याची तक्रार'
'झेल घेताना कोणीतरी ढकलल्यासारखे वाटल्याचे जडेजाचे प्रतिपादन'

विराट कोहली आणि त्याची मैत्रीण अनुष्का शर्मा यांचे अफेअर, स्टेडियमवर येऊन अनुष्काने विराटला दिलेला फ्लाईंग किस सर्व क्रिकेट प्रेमीना माहीत आहे. पण अनुष्का शर्मा मॅच बघायला आली की भारत मॅच हरतो, अशी (अंध )श्रद्धा क्रिकेट चाहत्यांची आहे. ऑस्ट्रेलिया भारत मॅच दिवशी यावर मिडीयावर खुप जोक पडत होते. सारी ऑस्ट्रेलिया टीम अनुष्का शर्माच्या घरी जाऊन आली आणि तिला विनवणी केली,  ' वहिनी,  काही पण करा मॅच बघायला स्टेडियम वर या ', अशा शब्दांत क्रिकेट प्रेमीनी उडवलेली टर विराटला पण  आवडली नव्हती. मॅचच्या दुसर्‍या दिवशी विराटने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. हाच धागा पकडून वेस्ट इंडीज जिंकल्यावर ही पोस्ट आली.

जब जब इस धरती पर
नारी का अपमान हुआ है
तब तब बुरा हुआ है !
और बना लो सालों
अनुष्का पर चुटकुले.

खरंच दाद द्यायला हवी या WhatsApp प्रेमींच्या बुद्धीला.


खा. शरद पवार हे बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. थोर राजकारणी, किंगमेकर आणि गेम चेंजर आहेत. पवार स्वःत सेमीफायनल पहायला मुंबईत होते. त्यांची उपस्थिती पाहून लगेच त्यांच्या फोटो सहीत ' काही काळजी करू नका, फटाके तयार ठेवा,' असे मेसेज फिरू लागले होते. मॅच हरल्यावर पुन्हा  शरद पवार यांच्या नावाने  आणखी एक मेसेज पडला. ' मॅच हारल्यानंतर पवारांचे जबाबदारी झटकणारे वक्तव्य. मला काय माहीत बाकीचे पण खेळतील, मी फक्त एक गेलशी बोललो होतो '
काही पण होऊ दे कसलीही परिस्थिती निर्माण झाली की ऑनलाइन मंडळीच्या डोक्यात सर्व तयार असते.आता हेच बघा,
'अभ्यास केला गेलचा, पेपर आला सिमन्सचा !
असा युक्तिवाद करणार्‍या नेटीझनचं काय डोकं चालतं!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल नेटवर्किंग मार्केटिंगला उत्तर म्हणून काँग्रेस प्रेमीनी टाकलेली जावईशोध लावणारी पोस्ट वाचून हसावे की रडावे हा प्रश्न पडतो ,
1983 वर्ल्ड कप जीता देश में कांग्रेस
2007 T20 वर्ल्ड कप जीता देश में कांग्रेस
2011 वर्ल्ड कप जीता देश में कांग्रेस
और देश में एक पनोती आई
2016 में इंडिया सेमीफानल से बाहर हो गए


सर्वात शेवटी आलेली ही पोस्ट मात्र मन सुन्न करून गेली.
भारत क्रिकेट टीमने जर विश्वकप जिंकला असता तर सरकारचे करोडो रुपये  त्यांच्या बक्षिसांवर खर्च झाले असते. भारत सरकारने तो पैसा गारपीटग्रस्त शेतकर्याना द्यावा ! बरं झाल हे जिंकले नाहीत.  हरले म्हणून एकही खेळाडू आत्महत्या करनार नाही. कारण मॅच चालू असतांना गारपीट झाली नाही. लोकांना क्रिकेट साठी एवढं दुःख झालय. ज्या शेतकर्यांमुळे दोन वेळची भाकर मिळते त्यांच्या साठी कधीच एवढे दुःख नाहीं करणार ! भारत सेमीफायनल हरला. सर्वांना खुप दुःख झाले. पण माझा शेतकरी राजा दर वर्षी फायनल हरतो याच कुणालाच दुःख नाही !

लास्ट बट नाॅट लिस्ट
' मॅच बघुन खुप शिकायला भेटले.
 जीवनात कधीच NO BALL (चुकीचे पाऊल) पडू देऊ नका. 
कारण लोक तुमच्या त्याच चुकीचा फायदा घेतात '


मॅच हरली म्हणजे सर्व संपले असे नाही. चुकीचे पाऊल आणि नो बाॅलचा सुद्धा संबंध असतो, हे आपल्याला सांगणारी आजची पिढी खुप खुप हुशार आहे. तरूणांच्या 'हिडन टॅलेंट'ला वाव आणि दाद मिळतेय इथं. सोशल मीडिया आणि नेटवर्किंग साइट्स वर येणार्‍या या पोस्ट, प्रतिक्रिया तरूणाईच्या उस्फूर्त भावना आहेत.


                                           .......सतीश मोरे



०२ एप्रिल २०१६

दोस्तों का दोस्ताना



मैत्री हे आयुष्याला पडलेले एक सुखद स्वप्न आहे.
दोस्त, यार, जोडीदार, मैतर, खासकिल, सखा, फ्रेन्ड, सोबती
किती तरी सुंदर शब्द आहेत या नात्यासाठी !

जरा चार पाच वर्षाचा झाल्यावर,  मैदानावर खेळायला गेले की, शाळेत जायला लागल्यावर आपल्या विचारांशी सहमत,  सम आवडीचा , सवयीच्या सहकारी शोध सुरू होतो. तुला काय खायला आवडते? तुझी पेन्सिल, माझी पेन्सिल सेम टू सेम यातून जवळ येतात. डबा शेअर करतात,  एकत्र खेळतात,  एकाच बेंचवर बसतात. .. आणि मैत्री सुरू होते.
ज्याचे मित्र जास्त तो सर्वात श्रीमंत असे म्हणतात. मनासारखे करू देणारा,
मनात नसलं तरीही बरोबर येणारा,  चुकीचे असले तर सांगणारा, 
वाट्टेल तेव्हा वाट्टेल तेथे येणारा मित्र  मिळणे खरंच भाग्याचे आहे.



 निम्र भरलेयां उणे |ते पाणी ढलो चि नेणें ||
 तेवि अनतोखौनि जाणे | सामोरेयां ||

अर्थात  मार्गात खड्डा आला तर वाहते पाणी त्याला वळसा घालून पुढे जात नाही,
तो  खड्डा पुरा भरूनच पुढे  वाहते. त्याच प्रमाणे दयाशील माणुस दु:खिताचे दुःख पुर्ण नाहीसे करूनच पुढे पाऊल  टाकतो.मला वाटते हा दयाशील माणुस म्हणजे माझे मित्र.
एखादी अडचण आली आहे ,
कशाची तरी गरज आहे , कुठेतरी जायचं आहे, काय पण करायचे आहे. 
अशा परिस्थितीत माझे मित्र मला कधीही डावलून गेले नाहीत. 
या मित्रामुळेच माझ्या आयुष्यातील अडथळेरूपी खड्डे भरले गेले.



मला आयुष्यात खूप छान मित्र मिळाले.
शाळेत, कॉलेजात, व्यवसायात, नोकरीत चांगले मित्र, सहकारी मिळाले
म्हणून खुप काही करू शकलो, करणार आहे.
व्यक्ती विशेष या सदरात भविष्यात मी मला भावलेले मित्र, व्यक्ती आणि मार्गदर्शक
यावर लिहणार आहेच. परवा मैत्रीवर सहज बाहेर पडलेले हे शब्द तुम्हालाही आवडतील.




        दोस्तो का दोस्ताना

   सारी दुनिया एका बाजूला,
   दोस्त सोबतीला
   माझ्या सारखा पाॅवरफुल मीच !

   सगळे काही संपलं,
   तरीही फ्रेन्ड जोडीला
   माझ्या सारखा भाग्यवान मीच !

   सारे फक्त सोबतीला,
   मित्र सारं सावरायला
   माझ्या सारखा स्ट्राँगेस्ट मीच !

   सर्व कामात मदतीला,
   मैतर अडचणीत जोडीला
   माझ्या सारखा भारदस्त मीच !

   ए टू झेड मताशी सहमत,
   चुकल्यावर कानफाड ढोस
   माझ्या सारखा नशीबवान मीच !

   सरणार जाईपर्यंत नाही
   आमच्या दोस्तीचा अंत
   माझ्या सारखा भाग्यवंत मीच !

   म्हणूणच म्हणतो
   दुनियेची नाही पर्वा आम्हाला
   सलामत रहे दोस्ताना हमारा !



                           ...........सतीश मोरे .


०१ एप्रिल २०१६

विचारांच्या सुक्ष्म लहरी

विचारांच्या सुक्ष्म लहरी

सदगुरू वामनराव पै म्हणतात,
विचार म्हणजे बह्रीमन आणि  अंतर्मन यांना जोडणारा दुवा.
आयुष्यात प्रत्येक वेळी, क्षणी मनुष्य विचार करत असतो.
जीवन म्हणजे विचार . Life is only thinking .
माणुस हा विचार करणारा प्राणी हे खरे नसून विचार करतो तोच माणूस ,
चैतन्य शक्तीचा अविष्कार म्हणजे विचार.
विचार मनातून नव्हे बाहेरून येतात, बहीर्मनात पोहचतात,
घोळतात मग अंतर्मनात पोहचतात.
नशीब विचारातून घडते, माणसाचे जीवन त्याचे विचार आहेत तसे घडत असते.
सतत एक विषय घोळणे म्हणजे चिंतन.  आपण  शुभ चिंतन व अशुभ दोन्ही प्रकारचे चिंतन करतो. जीवनाचे वाळवंट किंवा नंदनवन करणे सामर्थ्य चिंतनात आहे.
उद्याची चिंता करणे म्हणजे न घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरणे.
चिंता करून दुख कमी होत नाही.
  सुविचार प्रात्यक्षिक करा,पहायला शिका. मनातल्या विचाराची संख्या कमी होते.
विचार ओळखायला शिका. वाईट विचार  झटकून कामाला लागा.
शरीराला लागलेला रोग बरा होण्यासाठी दवाखान्यात उपचार घेतो.
आजार, रोग काढायची जेवढी काळजी घेता तितकी विचार करत असताना करा. विचार वळवायला शिका. त्यासाठी संगत महत्वपूर्ण भूमिका निभावते. 
प्रयत्न पुर्वक चांगल्या विचारांच्या लोकांची सोबत करा.

  To get rid of poverty is to think prosperity
  You should become master of your thoughts.
शुभ विचारांची प्रतिष्ठापणा करा,शुभ विचार दिव्य विचार करण्याची सवय लावा.
सुंदर विचाराची जोपासना हीच खरी उपासना.
आत्मलिंगावर शुभ विचाराचा अभिषेक करा.
विचाराचे स्पंदन vibrations एकमेकांपर्यत पोहचतात.
विचार लहरी किती महत्वाच्या आहेत हे समजण्यासाठी
सदगुरू राजा आणि वखारवाला दुकानदार गोष्ट सांगायचे.
ती गोष्ट ऐकलीच पाहिजे.

🎈🎈राजा आणि वखार दुकानदार   🎈🎈
एक न्यायी, जनप्रिय राजा होता. त्याच्या राज्यात जनता सुखी समाधानी होती. राजाला नगरीत फिरायची खुप आवड होती. महीन्यातून एकदा राजा राजधानीत फेरफटका मारायला जात असे. राजाकडे पाहून लोक नमस्कार करत,राजा त्यांची चौकशी करत. लोकाचे समाधानी चेहरे पाहून राजाला आनंद होत असे.
हमरस्त्याच्या कोपर्‍यावर एक लाकडाची वखार  होती. या दुकानाजवळ आले की त्या दुकानदाराकडे पाहून राजाला नेहमी खुप राग येत होता. राजाने खुप विचार केला, असे का होतय पण त्याला रागाचे कारण कळत नव्हते. इतर कोणाकडेही पाहीले तर राग येत नाही, फक्त त्या दुकानदाराकडे पाहून संताप का येतो ?
त्याला थोबाड मारावी अशी इच्छा का होती? याचे कारण काय राजाला उमगत नव्हते.
अखेर राजाने न राहून प्रधानजीच्या कानावर ही गोष्ट घातली.  प्रधानजीने हा शोध लावण्यासाठी वेषांतर करून त्या दुकानाशेजारी दुकान थाटले. काही दिवसांत ते दोघे मित्र बनले. एके दिवशी नेहमी प्रमाणे राजाची स्वारी तेथे आली. राजाला पाहताच त्या दुकानदाराची चलबिचल सुरू झाली. प्रधानजीच्या ते लक्षात आले. त्यांनी दुकानदाराकडे राजाचा विषय काढून बोलणे सुरू केले.
त्रागा करून दुकानदार म्हणाला,
'राजा कधी मरणार कुणास ठाऊक ? जेव्हा हा राजा मरेल तेव्हा त्याला जाळायला अंत्यविधीसाठी राजवाड्यातील लोक माझ्या दुकानातील चंदनाची लाकडे नेतील. माझा चांगला धंदा होईल, बक्कळ फायदा होऊन मी श्रीमंत होईन '
दुकानदाराचे हे उत्तर ऐकून प्रधानजीना राजाच्या संतापाचे कारण उमगले.  दुकानदार राजाच्या मृत्यूची वाट पहात होता, राजाविषयी वाईट चिंतन करत होता. त्या वाईट विचाराच्या लहरी राजापर्यत पोहचत होत्या आणि त्यामुळेच राजाला
त्या दुकानदाराकडे पाहून राग येत होता.
गोष्ट  इथे संपली. या मधून एक लक्षात घ्यायला हवे ,
आपण जे इतराविषयी शुभ अशुभ चिंतन, विचार करतो,
ते विचार सुक्ष्म लहरीच्या माध्यमातून त्या व्यक्तीपर्यत पोहचतात
आणि त्यांच्या चांगल्या किंवा वाईट प्रतिक्रिया उमटतात.
गोष्टीचा दुसरा भाग. ....
ही गोष्ट गुरूजींनी वर्गातील मुलांना ऐकवली आणि उद्या येताना हीच गोष्ट  सकारात्मक करून आणायला त्यांनी सांगितले.
लहान मुलांच्या मनात नेहमीच चांगले विचार  असतात. 
एका हुशार मुलाने अशी छान गोष्ट करून आणली.
जेव्हा जेव्हा तो राजा समोर आला तेव्हा दुकानदाराने एकच विचार केला,
राजा खुप मोठ्ठा होऊ दे. किर्तीवंत होऊ दे . राजाने अनेक वाडे बांधु दे.
राजाने चंदनाचा राजमहाल बांधु दे.
त्यासाठी माझ्या कडून लाकडे विकत घेऊन जाऊ दे,
मग मी खुप श्रीमंत होईन.
बघा, किती छान विचार केला त्या मुलाने.
उगीच  नाही आपण म्हणत.
लहान मुले ही देवाघरची फुले असतात.
                           ........सतीश मोरे
महत्वाचे....
उद्या शनिवार कविता डे.
रविवार सुट्टी.

सोमवार सोशल प्रितिसंगम.
मंगळवारी वाचा.... विचारांची क्रांती, माझ्या जीवनातील .

३१ मार्च २०१६

तु तिथं मी, तु आणि मी

ज्याचे लग्न झाले नाही त्याला लग्न कधी होणार याची काळजी, उत्सुकता लागलेली असते, तर लग्न झालेले कशाला यात पडलो, लग्न झाले नव्हते तेव्हा सुखी होतो असा विचार करतात.


खरं तर लग्न हे हवंहवंस बंधन असते. एक क्षण भाळण्याचा, बाकीचे क्षण सांभाळण्यासाठी असतात. एकमेकांची मने राखणे म्हणजे प्रेम, ही प्रेमाची खुप वेगळी आणि वस्तुनिष्ठ व्याख्या मला जीवनविद्या ज्ञानपीठामध्ये ऐकायला मिळाली.
सदगुरू वामनराव पै यांनी स्त्री हा कुटुंबातील महत्वाचा कणा असून नवरा बायकोनी घर घर टाकून एकमेकांच्या मनात घर करणे म्हणजे संसार, हा दिव्य विचार दिला आहे. पती आणि पत्नी हे जगातील सर्वात पवित्र असे नाते आहे.
दोघे परस्पर पुरक आहेत, दोघेही एकमेकांसाठी  बनलेले आहेत .
संसार सुखाचा करायचा असेल तर दोघांनीही बदललं पाहिजे.असं म्हणतात,
If you want to change the world, start from yourselves.
पतीला पत्नीकडून खुप अपेक्षा असतात .पत्नीलाही पतीकडून भल्या मोठ्या  अपेक्षा असतात. दोघेही बरोबर आहेत. पण यासाठी दोघांनीही बदलले पाहिजे.
Everybody is number 1 @ his own place,
But he should know his place.

संसाराचे प्रश्न विचारायला, अडचणी सोडवायला लोक
संसार न केलेल्या किंवा संसार सोडून पळून आलेल्या
संन्यास्याकडे जातात, हा एक विनोद आहे.
सदगुरू आणि माई यांनी अतिशय सुंदर असा संसार केला. स्वःत शिकत राहीले,
शिकवत राहीले,  मुलांना उच्च शिक्षण दिले, स्वःत सुखी संसार केला, लाखो लोकांचा संसार फुलवला, त्यामुळेच सदगुरू हे आत्मविश्वासाने हे सगळे सांगू शकतात.

संसारातील आपल्या समस्या आपणच निर्माण केलेल्या असतात त्यामुळे आपणच 
त्या सोडवू शकतो, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. 
संसारात प्राधान्य कशाला द्यायचे हे ठरवायला हवे. समाधान हे फार मोठे धन आहे. 
जगायला पैसे फार कमी लागतात, मजा करायला जास्त लागतात .
कठीण प्रसंगात, एखाद्या विषयावर वादविवाद करून कटुता निर्माण होत असेल तर माघार घ्यायला हवी.
माघार घेण्यात कमीपणा नसतो,
एखाद्याला कमीपणा करण्यात, कमी लेखण्यात दुःख असते.

अपेक्षा, उपेक्षा आणि आग्रह ही अहंकाराची रूपे आहेत.
आपण इतराबद्दल अपेक्षा करतो,
इतरांना सुद्धा आपल्या कडून तशाच अपेक्षा असतात, याचा सहज विसर पडतो.
Attitude of gratitude हवा. नवर्‍याला जसे वाटते मी घरी आल्यावर बायकोने पाणी आणून दिले पाहिजे तसे नोकरी करून आलेल्या, मंडईमधून दोन हातात पिशव्या घेऊन आलेल्या बायकोला पण वाटत असेल ना !

एक अतिशय सुंदर उखाणा ऐकला
मी या कौटुंबिक सौख्य कोर्स मध्ये

           विद्याचा आणि माझा संसार होईल सुंदर
           जेव्हा मी चिरेन भाजी अन् ती लावेल कुकर!

जर तुम्हाला आपल्या बायकोमध्ये, नवर्‍यात जे चांगले गुण आहेत ,
ते लिहून काढायला सांगितले तर एक चिटोरी कागद पण पुरेल.
याउलट तिच्यातील- त्याच्यातील अवगुण लिहायचे तर वही पुरणार नाही !

आपण पार्टनरचे गुण पहा, स्वःतचे अवगुण शोधा .
पार्टनरच्या गुणाचे कौतुक करा, स्वःतमधील अवगुण हळूहळू कमी करा.


पती पत्नीनी एखादा विषय किती ताणावा याला मर्यादा असावी.
दुराव्याला expiry date असावी.डोक्यावर बर्फ, तोंडात बर्फी हे सुत्र हवे.
शब्दाने शब्द वाढतो,बोलण्याने समस्या वाढतात,बोलण्यानेच संपतात.
काही वेळा गप्प बसणे महत्वाचे, त्यामुळेही प्रश्न सुटतात .
रागात धार असते ती नाती कापते. प्रेमात आधार असतो, तो नाती जोडतो.
जीभेने केलेली जखम कधी बरी होत नाही, झाली तरी व्रण राहतो.
म्हणून पती पत्नीनी एकमेकांशी बोलताना, वागताना शब्द जपून वापरावेत. 


  नात्यांमधे विश्वास हवा !
आपल्या जोडीदाराबाबत,  कोणत्याही नात्याबाबत
काहीही बरेवाईट  ऐकायला मिळाले की ....

SOCRETIS चा हा RULE  पहावा , आचरणात आणावा.

समोरच्याला विचारा,
तुम्ही जे मला जे सागणार आहे ते तुम्ही स्वःत ऐकले आहे का?
जे मला सांगणार आहे ते चांगले आहे का ?
यात माझे काय हित आहे का ?
या प्रश्नाची उत्तरे नाही अशीच मिळणार आहेत,
मग कशाला नात्यात अविश्वास, दुरावा, संशय निर्माण होईल , होय ना?

तु तिथं मी,
तु आणि मी
तुझं माझं नाही
आपल्या दोघांचं
आपल्या सगळ्यांचं
घरटं विश्वासाचं

नाती जपत, प्रेम वाढवंत
सर्वाना आनंद देत
आम्ही फुलवणार
घर आणि संसार
जय सदगुरू, जय जीवनविद्या!



             (उत्तरार्ध)

३० मार्च २०१६

सासु सुनेचे सुख


परवा म्हणजे रविवारी 27 मार्च रोजी विश्वसंत सदगुरू वामनराव पै यांनी निर्माण केलेल्या कर्जत येथील जीवनविद्या ज्ञानपीठामध्ये दुसर्‍यादा जाण्याचा योग आला. दोन महिन्यांपुर्वी बेसिक कोर्स केला. परवा कौटुंबिक सौख्य हा कोर्स पत्नी सोबत केला. खुप छान ठिकाण आहे हे.

ज्ञान , ज्ञान आणि केवळ ज्ञानच हा हेतू डोळ्यासमोर ठेवून ही संस्था साठ वर्षे झटत आहे. अंधश्रद्धेवर प्रहार करून तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे सतत हॅमरिंग करत ही संस्था लोकांना शहाणे करत आहे. तुम्ही ज्ञानी व्हा,  हुशार व्हा, बुद्धीमान व्हा, असे सांगून केवळ तत्वज्ञान नव्हे तर जीवनविद्या शिकवणारे सदगुरू हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या विचारवंतापैकी एक आहेत.


अतिशय सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी हे ज्ञानपीठ आहे. मला मठ निर्माण करायचा नाही, मठात अहंकार वाढून सारेच मठ्ठ होतात,  असे सदगुरू म्हणायचे. त्यामुळे त्यांच्या इच्छेनुसार हे ज्ञानपीठ उभे राहिले आहे. एक वेळ तरी भेट दिली पाहिजे असे हे ज्ञानपीठ आहे.

स्त्री आणि पुरूष  एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, रथाची दोन चाके आहेत, ऐवढेच नव्हे तर स्त्रीयांना फक्त समानता नव्हे सन्मानाची वागणुक द्या. ज्या घरात स्रीयांचा छळ होतो तेथे दुःख, दैन्य वास करते, असा दिव्य संदेश सदगुरूनी दिला आहे. कौटुंबिक सौख्य हा कोर्स करताना मला पुन्हा एकदा सदगुरूच्या सहवासाची जाणीव झाली.

अस्मिता सामंत, अनघा देशपांडे आणि चंद्रकांत निंबाळकर यांनी कुटुंबाचे कल्याण कशात हे सौदाहर्णासहीत उपस्थिताच्या मनात, ह्दयात उतरवले. माझ्या  ज्ञानात भर पडली.

कुटुंब म्हणजे फक्त नवरा बायको आणि मुलं नव्हे तर सासू सासरे, नणंद, भावजय, दिर सारे आहेत.  कुटुंब सुखी व्हायचे असेल तर या सर्व नात्यांमधे संवाद हवा,  गोडवा हवा, एकमेकांना समजून घ्यायला हवे, हा दिव्य विचार मी अनेकदा ऐकला आहे.  रविवारी हाच विचार वेगळ्याच अॅगलने ऐकला,भावला,  नवं खुप  काही कानावर पडलं.  एक दोन नव्हे सात तास न कंटाळता बसण्याची उर्जा येथे मिळाली.

इतरांना समजून घेण्याची कला Art of understanding other people नावाचा एक सुंदर धडा मी बारावीत शिकलो होतो. त्यामधील  एक सुंदर वाक्य मला आठवते.
 
तुम्ही इतरांविषयी कोणत्याही प्रकारची
वाईट प्रतिक्रिया व्यक्त करताना थोडं थांबा
आणि हा विचार करा की
मी त्याच्या जागी असतो तर काय केले असते.

सासू सून या नात्यात गोडवा का नसतो, याचे उत्तर वरिल वाक्यात आहे. कोर्स मध्ये मला हेच ऐकायला मिळाल.  सासु सुनेविषयी किंवा सुनेने सासू विषयी बोलताना, वागताना याचा विचार करायला हवा. सास भी कभी बहू थी या नावाची एक सिरीयल होती, बहू कभी तो सास होनेवाली है या नावाची सिरियल सुरू केली पाहिजे.

सासुबाई तिला झालेल्या त्रास, छळ याचा बदला घेण्यासाठी सुनेला पहिल्या दिवसापासून कात्रीत पकडते, टोचून बोलते,  मुलाचे कान भरते, पुढे जाऊन आणखी बरेच काही करते.
दुसरीकडे सासू नेहमी वाईटच असते, असे माहेरहून ( आईकडून ) शिकून आलेली सुन पहिल्यापासून  माझा पती म्हणजे माझा संसार , बाकी नाती नगण्य ऐवढेच डोक्यात ठेवून वाटचाल सुरू करते. तिला सासू व्हिलन वाटते. अशा परिस्थितीत कोण कोणाला समजून घेत नाही आणि सारे कुटुंब दुःखी होते.


सासू सुनेच्या नात्यात गोडवा येण्यासाठी जीवनविद्येचे ज्ञान आवश्यक आहे.
सदगुरू माऊलींचा मला एक विचार खुप खुप भावला.

सुनेच्या सुखातच मुलाचे सुख दडले आहे
                   आणि
सासुच्या सुखातच नवर्‍याचे सुख लपलेले आहे.

प्रत्येक सासुने, सुनेने हा विचार मनावर सतत बिंबवला तर काही समस्या उद्भवणार नाहीत.

सासुने सुनेची काळजी घ्यायलाच हवी. सुन म्हणून आलेली ती वीस बाबीस वर्षाची मुलगी आई वडील ही सर्व नाती सोडून फक्त माझ्या मुलासाठी आली आहे, तिला आनंद दिला, सुखी ठेवले तर तर आपलाच मुलगा सुखी होईल, हे प्रत्येक सासूआईने ध्यानात ठेवले पाहिजे.

दुसरीकडे सुनेने सासुमध्ये आई पहायला पाहिजे. आपला देखणा, कतृत्ववान नवरा आपल्या सासुमुळेच मिळाला आहे. तो काय  आभाळातून पडलेला नाही.  त्याच्या आईने पण त्याला पंचवीस वर्षे लहानाचा मोठ्ठा केला आहे. नवर्‍याचे आईवर प्रेम आहे, असतेच. त्याची आई म्हणजे आपली सासू सुखी तर आपला नवरा सुखी हे प्रत्येक सुनेने ध्यानात ठेवले पाहिजे.  

सासु सुनेने एकमेकींना समजून घेण्यातच दोघींचे आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचे सुख समाधान सामावले आहे.

                                                                   (  पुर्वार्ध )
                                       ...........सतीश मोरे

२९ मार्च २०१६

पत्रकारांबद्दल खडे फोडणारांना पत्र


आज ब्लॉग पोस्ट forwarded आहे.



        कुणी लिहिले आहे माहीत नाही,
       पण पत्रकाराच्या मनातलं आहे.
       हे विचार माझे नाहीत पण
       माझ्या सारख्या फिल्ड वर काम करणाऱ्या
       बातमीदारांचे,वार्ताहर,फोटोग्राफर, स्ट्रीजर ,
       संपादक, कार्यकारी संपादक ,न्युज ब्युरो चिफ,
       मेडीया मित्रांची खदखद आहे.


      पत्रकारांबद्दल हजारो शंका, कुत्सीक प्रतिक्रिया
      घेऊन जगणार्‍या तथाकथित मंडळींना एक खुले पत्र....

महोदय,

पत्रकार, म्हटले की अंगावर झुरळ पडल्यागत
कपडे झटकणार्‍यांची जमात आपली.
‘पत्रकार म्हणजे साले एकजात सारे सारखेच’,
‘त्याने निवडणूकीत गब्बर पैसा कमावला असणार’,
’पत्रकार नसते तर फार बरे झाले असते’,
‘किती फीडबॅक घेतात हे पत्रकार? यांना फक्त पैसा पाहिजे’
अशा कितीतरी प्रतिक्रिया पत्रकार म्हटल्यावर उमटतात.

चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि पुण्यापासून ठाण्यापर्यंत या सार्‍या प्रतिक्रिया सारख्याच. मात्र खरेच पत्रकार असा आहे का? पत्रकार किंवा आजची माध्यमं नसती तर खरेच आपले जीवन आजच्यापेक्षा अधिक सुसह्य झाले असते का? 

जरा शांतपणे आपल्या मनाला हा प्रश्‍न विचारून बघा, जरा आपली आतली गाठ सैल करून पत्रकारांकडे बघा. आपण त्याच्या तोंडावर त्याला ‘या प्रतापराव’ असे म्हणता आणि त्याच्यामागे त्यालाच शिव्या हसडतात, तेव्हा त्याला त्या कळत नाही असे वाटते का तुम्हाला? 

अरे ज्याचा प्रांतच इन्व्हेस्टिगेशनचा आहे, त्याच्याबद्दल तुमच्या मनात काय आकस आहे हे त्याला कळणार नाही का? तरीही तो शांत असतो. तुमच्याबरोबरची लाख दुष्मनी असू देत तरीही वर्तमानपत्रात तुमच्याबद्दल कौतूकाचे शब्द लिहितांना त्याचा हात कचरत नाही. सांगा मग मनाचा मोठेपणा तुम्ही दाखवता का तो?

तुमच्या एका प्रतिक्रियेसाठी तो तुम्हाला १० वेळा फोन करतो हा त्याचा गुन्हा आहे का? आणि या बदल्यात काय देता तुम्ही त्याला पाच-दहा हजारांची एक जाहिरात? त्या जाहिरातीपोटी मिळणार्‍या हजार रुपड्यांच्या कमिशनसाठी तो तुमच्याशी संबंध ठेवतोय असे म्हणायचेय का तुम्हाला? 

एखाद्या ठिकाणी अपघात झाला, आग लागली, दुर्दैवी घटना घडली तर तो कोणताही विचार न करता असेल त्या अवस्थेत घटनास्थळी पोहोचतो, पोलिसांना इन्फॉर्म करतो, मदत करू लागतो, त्याची बातमी करतो, आवृत्ती थांबवायला लावतो हा त्याचा गुन्हा आहे का?

तुमच्या नळाला पाणी येत नाही, शेजारी पाजारी कचरा साचलाय, तेव्हा प्रशासनाला जाग आणन्यासाठी त्याची लेखणी सज्ज होते, हा नेमका कोणता गुन्हा आहे? खरेतर तो तुमच्या बुडाजवळ आग लावतोंना म्हणून त्याचे अस्तित्व तुम्हाला सहन होत नाही. हे सारे करण्यासाठी वर्तमानपत्राकडून काय मिळते हे एकदा विचारा त्याला? 

आयुष्याचं अर्धशतक पत्रकारीतेत घातल्यानंतर अवघे दोन-पाच हजार मानधन मिळवणारे हजारो पत्रकार आज ग्रामीण महाराष्ट्रात आहे. चौदाशे-पंधराशे मानधनात आजही ग्रामीण महाराष्ट्रातली तरुण पत्रकारांची पिढी काम करते. 
अनेकांना तर मानधनही मिळत नाही, शहरात राहणारा पूर्णवेळ पत्रकार दहा-पंधरा हजार पगाराच्या वर कमवत नाही, हे वास्तव एकदा जाणून घ्या. मग त्याच्याबाबतीत पैशांच्या गप्पा मारा, त्याच्यावर टीकेची झोड उठवा.

डेस्कवर काम करणार्‍या लाखो पत्रकारांच्या नशिबी ती रम्य संध्याकाळ आणि नितांत सुंदर पहाट नसते याचा अंदाज तुम्ही कधी केलाय का? एका सुटीसाठी किती भांडावे लागते, दिवाळीत त्याला एखादी सुटी मिळते तेव्हा कुठे जाते तुम्हा सोफेस्टिकेटेड मंडळींचे शहाणपण, स्वत:च्याच लग्नाला दोन दिवसांची कशीबशी रजा मंजूर होते तेव्हा का नाही वाटत तुम्हाला त्याच्याबद्दल कळकळ. जगण्यासाठी काय संघर्ष करावा लागतो ते एकदा त्याला विचारा, बायको-मुलांची हेळसांड या एका शब्दाचा अर्थ तो तुमच्यापेक्षा अधिक जाणतो.


वर्तमानपत्र, मिडिया हाऊस यांच्या मुख्य कार्यालयात काम करणार्‍या पत्रकारांना एकदा विचारून बघा त्यांची व्यथा? दररोज डेडलाईनची टांगती तलवार घेऊन काम करतांना मन कधी कठोर झालं हे ते देखील विसरलेले असतात.

स्वतंत्र केबीनमध्ये बसणार्‍या संपादकांबद्दल का कोण जाणे मात्र आपल्या मनात प्रचंड आकस घेऊन आपण जगतो. संपादक होण्याचा अर्थ ठाऊक आहे का आपल्याला? चिरीमिरी देऊन तो संपादक झालेला नाही, कोणाच्या तरी चिठ्ठीवरनं त्याला संपादक पदी बसविलेलं नाही, आयुष्याची कितीतरी वर्षे त्यांने लेखनी प्रज्वलीत ठेवली आहे. दिवस-रात्र तो लिहिता राहिला, ज्या वयात आपला अभ्यास संपतो त्या वयात त्यांने पुस्तकांशी मैत्री केली. तळहातावर शीर घेऊन तो भिडला, लढला, रांगडेपणा दाखवत अनेकांना वठणीवर आणले, मला नाही वाटत हा त्यांचा गुन्हा आहे. 

हो कालौघात संपादकीय केबीनमध्ये व्यवसाय घुसला, टार्गेट्‌स आले. मात्र १० रुपये छपाई खर्च असलेला अंक तुम्हाला दोन रुपयात द्यायचा असेल तर त्यांना ते करणे भाग आहे.
असो, बोलता आम्हालाही येतं, लोकांच्या व्यथा मांडतांना आम्हीही आमची व्यथा तुमच्या डोळ्यात पाणी येऊस्तोवर मांडू शकतो, पण खरे सांगतो ‘कि घेतले न व्रत हे आम्ही अंधतेंने’, ठरवून पत्रकार झालोय, ठरवून आम्ही आमची बांधिलकी निभावतो. हो, आणि महत्वाचं म्हणजे ठरवून आम्ही समाजाच्या भल्यासाठी एखाद्याचा गेमही करतो.


तुम्ही पत्रकारांना पुरस्कार नाही दिले तरी चालतील, हार तुरे देऊन त्यांचे सत्कार नाही केले तरी चालतील, मात्र मनाचा सच्चेपणा दाखवत त्यांचा सन्मान करा, त्यांना प्रतिष्ठा द्या. 

कारण एक सत्य डोळे आणि कान उघडे ठेऊन ऐका, ज्या समाजात पत्रकाराला सन्मानाची वागणूक मिळते त्याच समाजाला सन्मानाने जगता येते. 

तो लिहितो म्हणून तुमचे जगणे सुरक्षित आहे, 
त्याच्या लेखनीवर निर्बंध आणण्याचा प्रयत्न करू नका, 
त्याच्यावर हल्ले करून त्याला रोखण्याचा प्रयत्न करू नका, 
पत्रकारांवर हल्ला करणार्‍यांना पाठीशी घालू नका 
नाहीतर, समाज म्हणून आपल्या जगण्याची राख-रांगोळी व्हायला वेळ लागणार नाही.

          -तुमचाच एक पत्रकार

२८ मार्च २०१६

जलधारा जपून वापरा

सोशल प्रितिसंगम
आज पुढारी 28 मार्च  पान 11

पाणी वाचवा ब्लॉगचा काही भाग पुनःप्रकाशित

जलधारा जपून वापरा !

पाणी किती महत्वाचे आहे हे आम्हाला कुणी सांगायची गरज नाही. आम्ही पाणस्थळ खोर्‍यात जन्माला आलो आहे. आमच्या कराड तालुक्यातून कृष्णा कोयना नद्या वाहतात. आमच्या येथे भरपूर पाणी आहे.  आम्ही पाणी कसे पण वापरणार, आम्हाला काय करायचे आहे दुसर्‍याचे ? आम्हाला पाणी मिळतेय ना पाहीजे तेव्हा, पाहिजे तेवढे ! अहो पाणी आमच्या उशाला आहे. आम्ही  कृष्णा काठावरील गावात जन्माला आलो, हे आपले भाग्य आहे. रोज सकाळी कृष्णा घाटावर, पुलावर जातो , कृष्णाबाई नदीचं दर्शन घेतो आम्ही. पाणीच पाणी.  कराड पालिका रोज दोन वेळा पाणी सोडते. शुद्ध करून, कशाला आमची तहान भागवायला नव्हे सकाळी भरलेलं पाणी संध्याकाळी  ओतून टाकायला. आम्ही खूप बुद्धीवान आहोत. आम्ही शुद्ध पाणी गटारात ओतणार, शुद्ध पाण्याचा वापर वाहने धुण्यासाठी करणार, पाणी रस्त्यावर मारणार .आम्ही कराडकर, आम्हाला काय कुणाची भिती !

पुण्यवान कराड शहरवासिय आणि  महापुण्यवंत कृष्णा काठावरील ग्रामस्थ हो. आहेना तुम्ही याच धुंदीत, याच अविर्भावात . तुम्हाला हेच वाटतंय ना? पाणी पुरवठा योजना कृष्णा काठावरील गावागावात आहेत  कराडात रोज दोन टाईम पाणी येते. पाणी भरपूर आहे,  आपल्याला काळजीचं कामच नाही, असे अनेकांना वाटत आहे.  आणि हो मला काय करायच  आहे दुसऱ्याच,  मला मिळतंय ना बस झालं. मी एकटा पाणी बचत करून काय साध्य होणार आहे? माझ्या नशिबात आहे म्हणून मी कृष्णा काठी जन्माला आलोय.
 
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले
म्हणोणी करहाटक नगरी जन्मलो

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...