*सतीश मोरे*
karawadikarad.blogspot.com
राम कृष्ण हरी,
जेजुरी मध्ये मुक्कामाची चांगली सोय झाली
होती, रात्री झोप चांगली मिळाली मात्र सकाळी सहा वाजता पालखीतळावर या असा निरोप रामभाऊ
चोपदार यांनी दिला होता. पहाटे पाच वाजता जेजुरीच्या गडावरून करून भोंगा वाजल्याचा
आवाज आला आणि जाग आली, उठलो. पटकन तयार झालो. सहा वाजता जेजुरी पालखी तळावर पोहोचलो.
नियोजित वेळेप्रमाणे बरोबर सहा वाजता माऊली साठी खास तयार केलेल्या मोठ्या या गडद हिरव्या
रंगाच्या तंबूमध्ये पालखीत ठेवलेल्या माऊलींच्या पादुका भावपूर्ण वातावरणात माऊली नामाचा
जयघोष करत उचलण्यात आल्या. या पादुका रथामध्ये ठेवल्यानंतर लगेच नगारा वाजला आणि पालखी
सोहळा वाल्हेच्या दिशेने रवाना होण्यास सज्ज झाला.
पालखीतळावर काय शिस्त असते, पालखीचा मुक्काम
आटोपून दुसर्या गावाकडे जाताना त्या ठिकाणी काय वातावरण असते काय नियम असतात,असते
हे सकाळी सहा वाजता पहावयास मिळाले. इतक्या लवकर पालखी निघणार असल्यामुळे सर्व सुमारे
400 दिंड्यांचे विणेकरी, झेंडेकरी तळावर येऊन थांबले होते. राजाभाऊ चोपदार यांनी विणेकरांची
हजेरी घेण्यास सुरुवात केली होती. सोहळ्यात सहभागी असणाऱ्या दिंड्याच्या मालकांना रोज
हजेरी देणे गरजेचे असते .दिंडी मालकांच्या वतीने त्या दिंडीचा विणेकरी हजेरी देण्यासाठी
येतो. पालखी तळाच्या परिसरात दोन ते तीन किलोमीटर अंतरावर किंवा अगदी जवळपास कोठेही
त्या दिंडीला मुक्कामाची जागा मिळालेली असते. त्याठिकाणाहून संबंधित दिंड्याचे विणेकरी
आणि झेंडेकरी सोहळा सुरू होण्याच्या वेळेअगोदर तळावर येऊन थांबतात, ओळीने दिलेल्या
क्रमानुसार उभे राहतात. विणेकरी हजेरी देतात, रथा समोरील 27 दिंड्यांची हजेरी अगोदर
होते. रथाच्या पाठीमागे असणाऱ्या नोंदणीकृत 251 दिंड्या आणि त्याचे विणेकरी हजेरी देताना
माऊलींचा पालखी पादुका मध्ये ठेवल्यानंतर त्या तंबूमध्ये असलेल्या कट्टाचे दर्शन घेतात,
आणि बाहेर बाहेर उभे असलेल्या चोपदारांच्या कडे हजेरी देतात अशी पद्धत आहे. ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही वारकरी या मासिकाचे संपादक सचिन पवार यांना भेटावयास गेलो
आम्ही वारकरी संस्थेतर्फे तरुणांसाठी वेगळा उपक्रम वारी विथ विसडम
पवार यांनी यावर्षी राबवण्याचा निर्णय घेतला होता
पंढरीची वारी काय आहे याचा अप्रुव सगळ्यांनाच
आहे.वारी विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सगळ्यांनाच उत्सुकता असते अशाच उत्सुकता
असणाऱ्या राज्यभरातील आस्तिक-नास्तिक 100 विद्यार्थ्यांना यावर्षी वारीमध्ये *वारी
विथ विसडम* या उपक्रमाच्या माध्यमातून वारीची माहिती सांगितले जाणार आहे. आम्ही वारकरीचे संपादक सचिन पवार माऊली
हे वारकऱ्यांना विद्यार्थ्यांना वारी कशी चालते, वारी मध्ये काय उपक्रम असतात आणि वारी
कोणी सुरू केल्यापासून दिवसभरात वारीत उपक्रम
काय असतात याची माहिती विद्यार्थ्यांना देत होते.
तळावरील हा दोन उपक्रमाची माहिती घेतल्यानंतर
बाहेर पडलो. अचानक ओ मोरे माऊली असा आवाज आला. पाठीमागे पाहतो तर एक विणेकरी मला बोलावत
होते. या विणकरी माऊरलीकडे पाहून मी इतका आनंदित झालो की माझा आनंद सांगू शकत नाही.माझे
चुलते पण जी मोरे यांची मुलगी, माझी चुलत बहीण वैशाली रहिमतपूर येथे आत्याच्या मुलाला
दिली आहे. आत्याचा मुलगा संजय म्हणजे आमचे दाजी. या लग्ना अगोदर पासून संजय दाजी यांचे
करवडी मध्ये सतत येणे-जाणे होते, मी ही अनेक वेळा रहीमतपुरला त्यांच्या घरी राहून आलो
आहे. हे दाजी एका दिंडीचे विणेकरी होते.
संजय दाजी यांची माझी भेट जवळजवळ पाच सहा वर्षानंतर
झाली असेल. गेली काही वर्षे संजय दाजी यांनी पूर्ण परमार्थाचा मार्ग स्वीकारून एक वेगळ्या
पद्धतीचे जीवन ते जगत आहेत. मध्यंतरी त्यांच्या घरातील काही कार्यक्रमाला मला जाणे
जमले नव्हते. संपूर्ण भारत भ्रमण करून आलेल्या पारमार्थिक विचारांचा वसा घेतलेल्या
संजय पवार दाजी यांना भेटण्याची इच्छा मला खूप दिवसापासून होती. ती भेट माऊलींच्या
पालखी सोहळ्यात झाली. मला खूप आनंद झाला. आम्ही दोघांनी एकमेकाच्या पायाचे दर्शन घेतले
, कडकडून मिठी मारली. संजय दाजींना यांना विणकरीच्या रुपात पाहून खूप खूप आनंद झाला.इकडच्या
तिकडच्या गप्पा मारल्या, त्यांच्यासोबतच पालखी मधून पुढे चालत आलो. जेजुरी लोणंद रस्त्यावर
पालखी येताच मी त्यांचा निरोप घेतला आणि जेजुरी गडावर जायला निघालो.
*जेजुरीच्या गडावर जाऊन खंडेरायाचे दर्शन
घेतले. जेजुरीमध्ये मल्हारराव होळकर यांच्या
वंशजांनी बांधलेले छत्री मंदिर हे अतिशय प्राचीन मंदिर आहे .या मंदिराविषयी यापूर्वी
ऐकले होते या मंदिराला भेट दिली. या मंदिरातील नंदी 6 फुटी आहे. एक वेगळे मंदिर पाहिल्याचा
आनंद झाला.या मंदिराचा व्हिडिओ आणि माहिती आपणास पाठवून देत आहे अवश्य ऐका*.
9 वाजता पुन्हा वाल्ह्यांच्या दिशेने चालायला सुरुवात
सुरुवात केली. वाल्हेचा घाट आणि घाटांमधील अरुंद रस्ते आणि नागमोडी वळणे यामुळे वारकऱ्यांना
चालणे कठीण होते त्यातच पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला.
मात्र या कशाचीही तमा न बाळगता वारकरी
चालत होते चिखलातून दगडातून पाण्यातून आपली वाट पार पाडत भरपावसात साडेबाराच्या सुमारास
माऊलींची पालखी वाल्हे गावाजवळ पोहोचली. दुपारी एक वाजता पालखी तळावर पोहचली, समाज
आरती झाली. पाऊस उघडल्यावर दुपारच्या पंगती पडल्या. त्यानंतळ थकलेल्या माऊलींनी आराम
केला. काही जण कपडे धुवायला गेले, काहीजण वाल्या कोळीच्या डोंगरावर वाल्मिक ऋषीच्या
दर्शनासाठी गेले काही जण निवांत तंबूमध्ये पडून राहिले. कराडकर यांच्या बारा नंबर दिंडीमध्ये
जेवण झाल्यानंतर ह. भ .प. बंडातात्या कराडकर यांची एक मुलाखत घेतली .दुपारचे दोन वाजले
होते, वाल्यामध्ये न राहता पुढचा प्रवास सुरु करावा,असा निर्णय घेतला आणि चालायला सुरुवात
केली.
साडेपाच वाजता नीरा नदी जवळ पोहोचलो
,नदीच्या पलीकडे गेल्यानंतर सातारा जिल्हा लागणार होता.आपल्या जिल्ह्यात प्रवेश करण्याची
उत्सुकता होती.दरम्यान निरेत कुठे राहायचे या बाबत अगोदरच फोनाफोनी झाली होती.माझे
लहानपणीचे जुने मित्र श्रीधर नलवडे यांची एक बहीण नीरा येथे शिक्षिका होते ते अनेक
वर्षे निरेत राहत होते, त्यांना फोन करून निळ्या मध्ये कुठे राहायची व्यवस्था होती
का अशी विनंती केल्यानंतर आमच्या बहिणीने लगेच घर मालक तुषार आगवणे यांच्या घरी राहायला जावा सांगितले. सधन शेतकरी
आणि तितकेच मनाने श्रीमंत असलेल्या या आगवणे कुटुंबाने आमचे अतिशय मनोभावे स्वागत केले, पाहुणचार केला.नीरा
मध्ये चांगल्या ठिकाणी राहायला मिळाल्यामुळे खूप आनंद झाला,
एकंदरीत आजचा दिवस खुप छान गेला. माऊली
माऊली.
Also available at
👇karawadikarad.blogspot.com
🚩🚩🚩माझी वारी 🚩🚩🚩



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा