फॉलोअर

३१ डिसेंबर २०२०

साध्यं साध्य करूया

 माझेअंतरंग@करवडीकराड.ब्लाॅगस्पाॅट.काॅम





*चला साध्यं साध्य करूया*


मंदिरात जाण्यासाठी फार मोठी लाईन असते. या लाईनमधून जाताना आपल्याला खूप त्रास होतो, काही वेळ थांबावे लागते, उभे राहावे लागते. मात्र हे सर्व कष्ट घेतल्यानंतर त्या ईश्वराचे दर्शन होते आणि आपणास खुप समाधान लाभते. ईश्वराचे दर्शन होईपर्यंत लागणारा कालावधी कष्टाचा असतो मात्र एकदा दर्शन झाल्यानंतर जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्या पुढचा कालावधी प्रेरणादायी आणि सुखदायक असतो तसेच आपल्या आयुष्याचे पण असते.


एखादे काम पूर्ण होईपर्यंत, ध्येयापर्यंत पोहोचण्यापर्यंत खुप अडचणी येतात. तोपर्यंत थांबावं लागतं, संयम ठेवावा लागतो, कष्ट करावं लागतं, अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं,12 ते 18 तास कष्ट करावे लागतात, अविरत कामं करावे लागतं,अनेकांना तोंड द्यावं लागतं, कधी कोणाच्या पाया पडावं लागतं तर कधी कुणाच्या विनवण्या कराव्या लागतात. मात्र हे सगळं केल्यानंतर आपल्याला यश मिळतं, आपले टारगेट पूर्ण होतं. साध्यं साध्य झाल्यानंतर आपण सिद्ध होतो.आपल्याला यशाची गोडी चाखता येते.आपल्या ध्येयापर्यंत पोहोचल्यानंतर त्यापुढील प्रवास सुखद असतो. चला तर मग आजपासून यशाचा आनंद घेण्यासाठी अजून प्रयत्न करूया.



*सतीश वसंतराव मोरे*

Karawadikarad.blogspot.com


३१.१२.२०२०

३० ऑक्टोबर २०२०

मेरा चांद

 



ओं, 

बदली में छिपे हुए चांद

आप बहोत खुबसुरत हो

लेकिन 

मेरे पास मेरा चांद है,

जो आपसे भी खूबसूरत है !


आप कभी कभी 

बदली में छुप जाते हो !

वद्य पक्ष में तो

गायब ही हो जाते हो !


 लेकिन,

मेरा चांद हमेशा 

मुझे साथ देता है !

हर हाल मे ऊर्जा देता है !


मेरा हसीन चांद 

मेरा हाथ थाम कर 

मेरे साथ रहता है !

मुझे जीने की 

राह दिखाता है !

हरघडी मेरा चांद 

मेरे धडकन मे  रहता है !


ओं, 

बदली वाले चांद,

फिर एक बार

कहता हुं  

मेरा चांद आपसे भी 

बहुत खूबसूरत है !


ओं,

बदली वाले चांद 

जलो मत, रुठो मत  !

मेरा चांद आपसे भी 

बहुत खूबसूरत है ! 😌


*सती*

कोजागिरी पौर्णिमा

३०.१०.२०२०

आज आप कुछ अलग थी

 



आज आप कुछ अलग थी


आज आप कुछ अलग थी,  

लेकिन मेरे सबसे करीब थी !

आजका दिन आप अलग थी,

लेकिन मेरे बहोत करीब थी !



थोडी शर्माई थी,

थोडी घबराई हुई थी!

हमारेही बारेंमें सोच रही थी, 

बैचेनीमे तनहाईमै,

बार बार आॅखे छुपा रही थी!

आजका दिन आप अलग थी, 

लेकिन मेरे बहोत करीब थी !

 



सोच कुछ रही थी, 

कर कुछ रही थी!

सुनने के लिये मुझे, 

बेकरार भी बहोत थी ! 

लेकिन मुझे टालनेकी भी,

कोशिश कर रही थी !

आजका दिन आप अलग थी, 

लेकिन मेरे बहोत करीब थी !


देख कुछ रही थी, 

सोच कुछ रही थी !

नाते को हमारे,  

बार बार याद कर रही थी !

यादोमें मेरी बेकरार थी, 

बस मेरा ही नाम ले रही थी ! 

आजका दिन आप अलग थी,

लेकिन मेरे बहोत करीब थी !


आपका अलगपन, 

आपका अपनापन, 

आपके लिये बेकरारी, 

यही है जिंदगी हमारी !

आप भी जानते है, 

दुनिया हो आप हमारी !

लेकिन...... 


आजका दिन आप अलग थी, 

लेकिन मेरे बहोत करीब थी !



सती

आपका इंतजार


Positive vibes 

आपके आनेका 

हमे इंतजार रहता है, 

आपकी राहो पर 

हमारी नजर रहती है, 


नजर मिलनेके बाद आपसे, 

मेरी नजरें थम सी जाती है!

आपकी आॅखो का नुर 

हमे जीनेकी राह दिखा देता है !


प्यारपें हमे अपने 

इतना गुरूर है हमे,

आपको देखे बिना, 

चैन कहा होता था !




२९ ऑक्टोबर २०२०

दुलारी

तु सखी, 

तुच साथी!



तु दिपस्तंभ,

तु स्नेहबंध,

तु प्राणप्रिय

तु वंदनीय!


तु  सतीदुलारी,

तु उर्जालहरी,

तु अपनी,

तु सजनी !


तु सौख्यकारी,

तु दुःखहारी,

तु स्नेहलोका,

तु प्रेमलोका !


तु माझी 

मी तुझा

बंध हे जाणून

घे सजना. ! 




शब्द नव्हेत हे,

या तर ह्दय भावना

समजून घे

सखी सजना !


2

सुबह

०८ सप्टेंबर २०२०

आठवणीतले स्वच्छता अभियाना

 मुख्यमंत्री देशमुखांचे हिंदी आणि आर.आर.पाटील यांची ऑटोग्राफ आणि डोरलं गहाण ठेवल्याच्या बातमीची कहाणी 


2005-2006 सालचा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत२००५-२००६ चा यशवंतराव चव्हाण सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मला मिळाला होता. हा कार्यक्रम पुणे येथे पार पडला. त्यावेळचे केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री रघुवंश प्रसाद यांच्या हस्ते तसेच तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री ना.अजित पवार, ग्राम विकास मंत्री विजयसिंह मोहिते पाटील तसेच ना.आर आर पाटील यांच्या हस्ते मला हा पुरस्कार मिळाला होता. 


हा पुरस्कार प्रदान करताना केंद्रीय मंत्र्यांनी पत्रकारांना हा पुरस्कार का दिला जातो याबाबत बिहारी हिंदीमध्ये मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना विचारले. विलासराव देशमुख यांचा अचूकपणा आणि टाईम फेक आपणा सर्वांनाच माहीत आहे रघुवंश प्रसाद सिंग यांच्या या प्रश्नावर विलासराव देशमुख यांनी माझ्या समोर दिलेले मोडक्यातोडक्या मराठीहिंदीत दिलेले उत्तर आज हि माझ्या कानावर आहे.गाव स्वच्छता अभियान कि बातमी अलग अलग पेपरमे छपकर आती है,जो पत्रकार अच्छी अच्छी बातमी छापता है उसको ये पुरस्कार दिया जाता है. विलासरावांचे हे हिंदी मराठी ऐकून अजित पवार यांच्यासह सर्वांनीच जोरदार हसून दाद दिली होती.


हा कार्यक्रम झाल्यानंतर दोन महिन्यानंतर निर्मल ग्राम अभियान पुरस्कार सोहळा उंडाळे परिसरात झाला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी पुन्हा माझा सपत्नीक सत्कार केला होता.त्यावेळी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील होते. तत्कालीन गटविकास अधिकारी नितीन माने यांनी ना. विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 


मी स्वच्छता अभियान अंतर्गत फाईल तयार केली होती. या कार्यक्रमात त्या फाइलवर मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सही (ऑटोग्राफ) केली होती.विलासराव देशमुख यांनी सही करताना आमदार उल्हास पवार यांना ही फाईल पाहून त्यावर टिप्पणी द्यायला सांगितले होते. ही टिप्पणी उल्हास पवार यांनी दिल्यानंतर त्या खाली मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सही केली होती. माझ्यासमोर होत असलेला हा माझ्या आयुष्यातील सुखद क्षण होता.


माझ्या ग्रामस्वच्छता अभियानाच्या फाईलवर तत्कालीन ग्रामविकास मंत्री आर आर पाटील यांनी सुद्धा ऑटोग्राफ दिला होता. मुंबईमध्ये पुरस्कार वितरण सोहळा झाल्यानंतर आर आर पाटील यांना भेटण्यासाठी मी आणि अमोल चव्हाण अंजनी गावी गेलो होतो. त्यांनी आमची आपुलकीने चौकशी केली होती. माझी संपूर्ण फाईल वाचून त्यांनी त्यावर सही केली होती. यादरम्यान चर्चा करताना 'ज्याच्या घरी शौचालय नसेल त्याला निवडणुकीला उभा राहायला परवानगी देऊ नका',असे मी त्यावेळी आर आर पाटील यांना सुचवले होते.आर आर पाटील यांनी ही सूचना अतिशय सिरीयसली घेतली होती आणि या सूचनेवरून माझे त्यांनी कौतुक केले होते. पुढच्या वर्षभरात महाराष्ट्र शासनाने तसा कायदा केला. आर आर पाटील यांनी माझ्यासारख्या छोट्या पत्रकाराने केलेल्या एका सूचनेचे एवढे गांभीर्याने घेतलं,हे सुद्धा माझ्यासाठी एक आनंदाची अशीच बाब होती.


7 नोव्हेंबर 2005 रोजी पुढारीच्या पहिल्या पानावर 'डोरलं गहाण ठेवलं आणि शौचालय बांधायला पैसे दिले' अशा आशयाची एक बातमी वेगळी मी दिली होती. तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी टि आर गारळे यांनी मला ही बातमी (source) दिली होती. ही बातमी केवळ सातारा जिल्ह्याचाच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात खूप गाजली होती. संजय नगर येथील एका गोपाळ समाजाच्या महिलेने शौचालय बांधण्यासाठी स्वतःचे मंगळसूत्र गहाण ठेवले, ही कराड तालुका साठी एक वेगळी कौतुकास्पद बाब होती. सदर बातमी तत्कालीन ग्रामविकास मंत्री आर आर पाटील यांच्या पर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी सुद्धा माझे कौतुक केले होते. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या बातमीची कात्रणे, प्रसिद्धी पत्रके, हँडवेल तयार करून जिल्हा परिषदेने गावभर वाटली होती.या बातमीचे मोठे होल्डिंग तयार करून सातारा जिल्हा परिषदेच्या बाहेर अनेक दिवस लावण्यात आले होते.राज्यभर अनेक जिल्हा परिषद पर्यंत हा मेसेज, ही बातमी माननीय आर आर पाटील यांच्या सूचनेनुसार पाठवण्यात आली होती. एखादी बातमी एवढी मोठी बदल, क्रांती करू शकते, एखाद्या बातमीचा काय परिणाम घडू शकते हे एक उदाहरण होतं.


*सतीश वसंतराव मोरे*

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...