फॉलोअर

१८ जून २०१८

X , Y and Z security

_*🌀🙇🏻‍♂मनातील प्रश्न..*_

🇮🇳🧙🏻‍♂🇮🇳🧙🏻‍♂🇮🇳🧙🏻‍♂🇮🇳
➖➖➖➖➖➖➖
*☑ VIP Security कोणाला मिळते ..??*

*◾X-सुरक्षा.. Y-सुरक्षा.. आणि Z-सुरक्षा श्रेणी कवच.. मधील फरक काय..?? त्याचे महत्त्व काय?...*
➖➖➖➖➖➖➖
_

_तुम्ही मोठमोठे नेते, राजकारणी, प्रसिद्ध व्यक्ति यांच्या भोवती उभे असलेले सुरक्षारक्षक पाहिले असतील. या सर्व व्यक्तींना सरकारकडून सुरक्षा कवच प्रदान केले जाते, त्याला VIP Security म्हणतात. प्रसिद्धीच्या झोतात असणाऱ्या या व्यक्तींच्या जीवाला कोणताही धोका होऊ नये, तसेच त्या जेथे जातील तेथे त्यांचे संरक्षण केले जावे या हेतूने त्यांना ही VIP Security उपलब्ध करून दिली जाते._
🔲🔲🔲

*🌀 Security कोणाला मिळू शकते आणि Security द्यायची की नाही ते कोण ठरवतं..??*

राष्ट्रपती, उप-राष्ट्रपती, पंतप्रधान, सुप्रीम आणि हाय कोर्टाचे न्यायाधीश, सर्व राज्यांचे राज्यपाल, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री यांना ते सरकारी सेवेत असल्याकारणाने आपोआपच, न मागता VIP Security मिळते.
🔲🔲🔲
VVIP Security अर्थात अतिशय खास असणाऱ्या व्यक्तीला मिळणारे सुरक्षा कवच कोणाला द्यायचे हे एक समिती ठरवते. या समितीमध्ये इंटलेजींट ब्युरोचे (IB) अधिकारी, गृहसचिव आणि गृहमंत्री यांचा समावेश असतो. तसेच राज्य सरकारने शिफारस केली तर एखाद्या व्यक्तीला VIP किंवा VVIP Security मिळू शकते.
🔲🔲🔲

*🌀 सुरक्षा कवचाच्या श्रेण्या कोणत्या..?? :*

व्यक्तीच्या जीवाला असणाऱ्या धोक्याच्या अनुसार Security चार प्रमुख श्रेण्यांमध्ये विभागण्यात आली आहे.
*X Security, Y Security, Z Security आणि Z+Security !*

▪ *X Security* श्रेणीमध्ये साध्या प्रकारची सुरक्षा प्रदान केली जाते. X Security मध्ये २ सुरक्षा अधिकारी आणि १ वैयक्तिक सुरक्षा अधिकारी सेवेत असतात.
▪ *Y Security* श्रेणीमध्ये ११ सुरक्षा अधिकारी आणि ३ वैयक्तिक सुरक्षा अधिकारी संरक्षण प्रदान करतात.
▪वरील दोन्ही श्रेण्यांच्या मानाने Z Security बरीच मोठी असते. एक प्रकारचा सुरक्षा ताफाच असतो म्हणा ना ! *Z Security* श्रेणीमध्ये २२ सुरक्षा अधिकारी, एक एस्कोर्ट कार आणि दिल्ली पोलीस किंवा सीआरपीएफ कडून प्रदान केलेली अतिरिक्त सुरक्षा यांचा समावेश असतो.
▪ *Z+Security* सर्वात उच्च दर्जाची आणि सर्वात सुरक्षित Security मानली जाते. Z+ Security श्रेणीमध्ये व्यक्तीला SPG अर्थात स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे (विशेष सुरक्षा गट) संरक्षण उपलब्ध करून दिले जाते. देशाचे विद्यमान पंतप्रधान आणि देशाचे माजी पंतप्रधान आणि त्यांचे कुटुंबीय, तसेच देशातील अतिशय महत्त्वाच्या व्यक्तींनाचं Z+Security आणि SPG संरक्षण दिले जाते. Z+ Security श्रेणीमध्ये ३६ सुरक्षा अधिकाऱ्यांसह अत्याधुनिक उपकरणे आणि अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेले अधिकारी देखील तैनात असतात._
🔲🔲🔲

या श्रेणीचे सेवा कवच ज्या व्यक्तीला मिळते तिला २४ तास वैयक्तिक सुरक्षा मिळते. सुरक्षा अधिकारी एक सेकंदही या व्यक्तीला नजरेआड होऊन देत नाहीत. या सुरक्षारक्षकांमध्ये २८ नॅशनल सिक्युरिटी गार्ड कमांडो, एक एस्कोर्ट, एक पायलट, कोब्रा कमांडो आणि १२ होम गार्डसचा समावेश असतो.
🔲🔲🔲
१९८४ मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच एका सुरक्षा रक्षकाने गोळी झाडून हत्या केल्यानंतर पंतप्रधानांच्या वैयक्तिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. त्यावर उपाय म्हणून SPG अर्थात स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची (विशेष सुरक्षा गट) स्थापना करण्यात आली. एका अहवालानुसार SPG मध्ये सध्या ४००० पेक्षा जास्त अधिकारी सेवेत आहेत. आणि त्यांचा वार्षिक खर्च जवळपास ३०० करोडच्या वर असतो. मनुष्यबळानुसार खर्च केल्या जाणाऱ्या इतर सिक्युरिटी फोर्सचा विचार करता SPG ही अतिशय महागडी VIP guarding security force आहे.
🔲🔲🔲
*_Z+Security श्रेणीमध्ये माजी पंतप्रधानांसाठी एक अट आहे ती म्हणजे- Z+Security सोबत मिळणारे SPG सुरक्षा कवच हे पंतप्रधानांनी पद सोडल्यापासून पुढील एक वर्षचं त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सेवेत राहील. परंतु जर त्यांच्या जीवाला काही धोका असेल आणि तश्या धमक्या येत असतील तर मात्र SPG सुरक्षा कवच त्यांना वर्षभरानंतरही प्रदान करण्यात येईल._*
🔲🔲🔲
सध्या भारतात केवळ सहाच व्यक्तींना SPG संरक्षण दिले जाते. त्या व्यक्ती आहेत- पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी वद्रा..!!!

_forwarded_
➖➖➖➖➖➖➖
🇮🇳🧙🏻‍♂🇮🇳🧙🏻‍♂🇮🇳🧙🏻‍♂🇮🇳

१७ जून २०१८

बाप बापच असतो

👦🏻👧🏻➡👨🏻⬅👦🏻👧🏻
➖➖➖➖➖➖➖
*☑जागतिक पितृदिन*
*Happy Father's day*
➖➖➖➖➖➖➖
_दरवर्षी मे महिन्याच्या दुसरा रविवार मातृदिन Mother's day म्हणून साजरा करतात तर....._

*तसेच प्रत्येक वर्षी जून चा तिसरा रविवार हा पितृदिन Father's day म्हणून साजरा केला जातो....*

🔲🔲🔲
*_घट्ट कौटुंबिक जडणघडणीत पिता, वडील, दादा, भाऊ, बाबा अशी प्रांतानुसार अनेक नावे चिकटलेल्या 'बापा'ची कर्मकहाणी. मृदू, प्रेमळ, सोशिक, कैवल्यमूतीर् आईच्या तुलनेत मानवी व पशू-पक्ष्यांच्या सर्वच संस्कृतींमध्ये मागच्या रांगेत स्थान मिळालेला बाप खरोखरच कठोर असतो का? मुलांच्या संगोपनात त्याचे स्थान नेहमीच दुय्यम असते का? आपल्या पिल्लांची काळजी वाहण्यात त्यांचे पाऊल एक घर मागे असते का?... समाजातील-कळपातील-थव्यातील काही डोक्यांचा अभ्यास करून या मुद्द्यावर निष्कर्षाची शाई उमटवायची असेल तर, त्यावरील शेरा कदाचित विरोधात जाऊ शकेल. पण जीव साकारण्यापूवीर्च त्या निजीर्व आकाराला सजीवतेचे कोंदण देण्यासाठी झगडणाऱ्या बापाची कथा जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी सारखीच आहे._*
🔲🔲🔲
*_भावभावना असलेल्या मानवाच्या मानसिकतेचा अभ्यास केल्यास, पंख पसरवून आभाळी बिंदू होण्याची क्षमता असलेल्या पक्ष्यांच्या जीवनरहाटाकडे पाहिल्यास किंवा अथांग समुदात संकट आणणाऱ्यांना चकवण्यासाठी क्षणार्धात रेतीचा कण होण्याची क्षमता असलेल्या जलजिवांच्या जीवनमानात डोकवल्यास बाप हा आपल्या पिल्लांसाठी मातेइतकाच मृदू, प्रेमळ, सोशिक, कैवल्यमूर्ती असतो हे सिद्ध झाले आहे._*
🔲🔲🔲
आईबद्दल अनेकांनी लिहिलं, देवादिकांपासून ते साहित्यिकांपर्यंत सर्वानीच आईची महती गायिली आहे. ‘आई’हा शब्द असेल तर त्या शब्दाचा अर्थ म्हणजे बाप आहे. तसे पाहिले तर बापच आईला अर्थ देतो. घरातल्या अर्थार्जनापासून ते घराला अर्थ म्हणजे महत्त्व इथपर्यंत अर्थ देण्याचं काम बाप करतो. आई आणि वडिलांची माया आपल्यावर किती असते, त्याला मोजमाप नाही. मुलाला लहानाचे मोठे करताना तळहाताचा पाळणा आणि नेत्राचा दिवा करून लहानाचं मोठं केलेलं असतं. आपली मुलं उच्चपदस्थ व्हावीत. थोडक्यात टॉपला जावीत म्हणून रात्र न् दिवस बापच झुरत असतो. बाप म्हणजे आदरयुक्त भीती, बाप म्हणजे तटबंदी, समाज उन्हाचे चटके सहन करून, घरी आल्यानंतर बाप नावाच्या वटवृक्षाखाली ज्यांना बसण्याचं भाग्य लाभते त्यांना हे तोपर्यंत पटत नाही.
🔲🔲🔲
जोपर्यंत तो स्वत: बाप होत नाही. मुलाचे अपराध पोटात घालून त्याच्यावर जीवापाड प्रेम करतो तचं नाव बाप. या जगातल्या प्रवेशापासून ते या अवस्थेपर्यंत बापाने घेतलेल्या त्रासाचा विचार करता बापाला परमेश्वर समजून आदर करावा. एवढं जरी नाही जमलं तरी चालेल कमीत कमी त्यांना वृद्धाश्रमात तरी पाठवू नये. यासाठी बापानेही मुलं मोठी झाल्यावर आपण लहान व्हावं लागतं तेव्हाच मेळ बसतो.
🔲🔲🔲

*◾तो बाप असतो...*

…………… तो बाप असतो
बाळंतपण झाल्यावर ,धावपळ करतो
औषध घेतो ,चहा,कॉफ्फी आणतो
पैश्याची जुळवाजुळव करतो
………………..तो बाप असतो

सगळ्यांना ने आण करतो
स्वयंपाक हि करतो
सिजरीन नंतर बायकोला त्रास नको ,
म्हणून बाळ रडलं तर रात्र भर जागतो
…………………………….तो बाप असतो

चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो
डोनेशन साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो
…………………………..तो बाप असतो

कॉलेज मध्ये सोबत जातो,होस्टेल शोधतो
स्वतः फाट्क बनियन घालून
तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो
……………………………..तो बाप असतो

स्वतः टपरा मोबाईल वापरून,तुम्हाला stylish मोबाईल घेऊन देतो
तुमच्या प्रीपेड चे पैसे स्वतःच भरतो
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो
………………………………तो बाप असतो

love marriage करायला कोणी निघाल तर खूप चिडतो
“सगळ नीट पाहिलं का?” म्हणून खूप ओरडतो
“बाबा तुम्हाला काही समजत का? “अस ऐकल्यावर खूप रडतो
………………………………तो बाप असतो

जाताना पोरगी सासरी,धायमोकळून रडतो
माझ्या चिऊला नीट ठेवा
असे हात जोडून सांगतो
…………….तो बाप असतो
🔲🔲🔲

बाबा, पिता, वडील...
एकमेव व्यक्ती जी तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते... बापाच्या सर्व लेकरांना जागतिक पितृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा...!!!

_
➖➖➖➖➖➖➖
👦🏻👧🏻➡👨🏻⬅👦🏻👧🏻

१२ जून २०१८

कोयना नदीवरील १० पुल

कोयना नदीवरील १० पुल

कराड ते कोयनानगर ५६ किलोमीटर अंतर .महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून समजले जाणारे कोयना धरण सर्वासाठी संजीवनी आहे.

कोयनानगर ते कराड 55 किलोमीटरच्या अंतरात एकूण दहा पूल कोयना नदीवर आहेत. यापैकी कराडजवळचा एक पुल इंग्रज सरकारने बांधला आहे. तर उर्वरित ९ पुल स्वातंत्रोत्तर काळातील आहेत. हे पूल म्हणजे कृष्णा कोयना तीरावरील शेकडो गावे आणि खोऱ्यांना जोडणार्या रक्तवाहिन्या आहेत.

१. कोयनानगरमध्ये कोयना धरणाच्या पायथ्याशी वीजनिर्मिती करून किंवा थेट पाणी सोडल्यानंतर  धरणाच्या खालील बाजूस असणारा पहिला कोयना पुल.

२.धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर पहिल्यांदा पाण्याखाली जाणारा संगमनगर धक्का फुल सर्वांनाच माहित आहे. या पुलाशेजारी आता मोठा उंचीचा नवीन पूल बांधण्यात आला आहे. याप्रसंगी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी सातत्याने प्रयत्न केला होता

३.
तिथूनच पुढे सहा किलोमीटर अंतरावर मणेरी पुल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून नुकताच बांधून पुर्ण झाला आहे.

४.
पुढे नवारस्ता मरळी कारखाना दरम्यान कोयना नदीवर सांगवडचा जुना पूल आहे.

५.
खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सेंट्रल रिलीफ फंड मधून बांधलेला कोयनेवरील पाचवा निसरे पुल आहे.

६.
कराड तालुक्यात कोयना नदीने प्रवेश केल्यानंतर तांबवे येथे कोयना नदीवर नवीन पूल बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

७. 
तेथूनच पुढे चार किलोमीटर अंतरावर सुपने आणि किरपे या गावांना जोडणारा नवीन एक पूल माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या प्रयत्नातून गतवर्षी बांधून झालेला आहे.

८ आणि ९.

कराड शहराजवळच कोयनेवर नवा आणि जुना कोयना पुल   आहे.असे नऊ पुल कोयना नदीवर आहेत.

१०.
ब्रिटिश सरकारने बांधलेला आणि आता नुतनीकरण सुरु असलेला दहावा कोयना पुल आहे.

सतिताभ
@
karawadikarad.blogspot.com

१० जून २०१८

लाखात एक हाँटेल फौजी

*लाखात एक हाँटेल फौजी*

गेल्या 35 वर्षांत जम्मू, वैष्णव देवी पासून कुलु मनाली दिल्ली, आग्रा, भोपाळ, गंंगटोक, मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई, बेंगळुरू, तिरुपती, मदुराई ,कन्याकुमारी ते पाँन्डेचरी फिरलो. अनेक ठिकाणी लहान मोठ्या हाँटेलात जेवलो.

पण कुठेही पहायला मिळाला नाही असा एक बोर्ड सातारा लोणंद दरम्यान असलेल्या वाठार स्टेशन हद्दीत असलेल्या हाँटेल फौजी धाबा मध्ये पहायला मिळाला.

*तुमचा चांगला/वाईट अनुभव आम्हाला सांगा.*
*जेवणाच्या क्वालिटी संदर्भात काहीही तक्रार असल्यास काऊंटरवर संपर्क साधा.*

अशा आशयाचा बोर्ड सर्वाना दिसेल अशा ठिकाणी लावला आहे.

एरव्ही हाँटेलात आलेल्या गिर्हाईकाला  जेवू घालणे,  गळ्यात मोठे बिल टाकणेआणि पैसे वसूल करणे एवढेच काम हॉटेलमालक करत असतो. आपल्या हॉटेलमध्ये आलेला ग्राहक समाधानी आहे की नाही याचं त्याला काहीही देणेघेणे नसते

प्रत्येक हॉटेलमध्ये शुद्ध पाणी देणे कायद्याने बंधनकारक आहे तरीही साधे पाणी घेणार का बिसलरी पाणी घेणार असा बळजबरीने आग्रह करून आठ रुपये ची बॉटल 20 रुपये ला गळ्यात मारण्याचे काम हॉटेल व्यवसाय करत असतात.  हॉटेलमधील पदार्थ लोकांना आवडले की नाही त्यात काही कमी-जास्त होते,  लोकांना ते आवडले का?  कॉलिटी प्रमाणे त्याचे पैसे घेतलेत का याचा विचार कोणीही  करत नाही .

अशी एकीकडे परिस्थिती असताना वाठार स्टेशन वरील फौजी धाब्यावर आज मला एक वेगळाच अनुभव आला. चहापाणी घेण्याच्या निमित्ताने आम्ही सर्व नातेवाईक धाब्यावर गेलो .  आजवर कुठेही मिळाला नसेल इतका दर्जेदार चहा मिळाला.  झाडूवाले, स्वयंपाकी, कुक,आचारी, वेटर यामध्ये एक प्रकारची नम्रता पाहायला मिळाली . या हॉटेलमध्ये मिळालेले पदार्थ चांगले आहेत की वाईट आहेत याबाबत हॉटेल मालक जातीने येणाऱ्या कस्टमरला विचारत होता.  खरेतर मी चहा पीत नाही तरीही बिनसाखरेचा चहा पिण्याचा मोह आवरता आला नाही. या हॉटेलमध्ये आला एकदम कडक आणि लाजबाब चहा  प्यायला मिळाला. क्वालिटी सुंदर होतीच मात्र हॉटेलच्या काउंटरवर लावलेला आदरपूर्वक बोर्ड मला खूप आवडला .  हॉटेलमध्ये खाऊन झाल्यानंतर अन्नपदार्थ बाबत तुम्हाला चांगली वाईट कसलाही अनुभव असला तर हॉटेल मालकांना तो शेर करावा अशा आशयाची पाटी मला पहिल्यांदाच एका हॉटेलमध्ये पाहिली खरच अतिशय सुखद असा अनुभव होता.

शाकाहारी मांसाहारी जेवणाबरोबरच स्नॅक्स नाष्टा चहा  फौजी धाब्यावर उपलब्ध आहे. बारा तास या धाब्यावर फार गर्दी असते, मात्र अतिशय सुंदर सेवा मिळते. मात्र कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक गुरुवारी  मांसाहारी जेवण मिळत नाही असा या धाग्याचा नियम आहे.

सतिताभ
@
karawadikarad.blogspot.com

9881191302, 9765566202

०८ जून २०१८

13 आकडा

_*🌀🙇🏻‍♂मनातील प्रश्न..*_

❓1⃣3⃣❓1⃣3⃣❓
➖➖➖➖➖➖➖
*🔴🌀 केवळ एका (अंध?) श्रद्धेपोटी ......*

*◾मुंबईसह जगभरातील मोठमोठ्या शहरात मधील अनेक गगनचुंबी इमारतींमध्ये तुम्हाला 13 वा मजला सापडणार नाही.....*

*◾काही विमानांमध्ये तुम्हाला 13 नंबरची Row दिसणार नाही आणि अगदी अनेक मोठ्या हॉटेल्स आणि हॉस्पिटल्स मध्ये १३ नंबरची रुम तुम्हाला सापडणार नाही....*

*🤔 काय कारण असावं बरं..??*
➖➖➖➖➖➖➖
तुम्ही कधी एखाद्या हॉटेलमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये गेलात तर सहज १३ नंबरच्या रुमची चौकशी करुन पाहा. सहसा अशा नंबरची रुम तुम्हाला हॉटेल किंवा हॉस्पिटलमध्ये आढळणार नाही. जुन्या इमारतींमध्ये या नंबरच्या रुम आढळतील किंवा १३ ऐवजी १२अ अशा रुम आढळतील. यामागे नक्की काय कारण आहे याची पडताळणी केल्यास काही गोष्टी समोर येतात…
🔲🔲🔲
जगातील इतर शहरांसारखं मुंबई देखील खास प्रसिद्ध आहे ते गगनचुंबी आणि भल्यामोठ्या ईमारतींसाठी! पण या दिमाखदार इमारतींपैकी अनेकांमध्ये १३ वा मजला तुम्हाला सापडणारच नाही…!!! कधी मुंबईमधल्या प्रसिद्ध हॉटेल्स किंवा इमारतींमध्ये गेलात ज्यांना १३ पेक्षा जास्त मजले आहेत, तर लिफ्ट मध्ये गेल्यावर १३ नंबरचा आकडा शोधा. ९०% इमारतींमध्ये तुम्हाला १३ नंबरचे बटन सापडणारचं नाही.  तर काही विमानांमध्ये तुम्हाला १३ नंबरची Row सापडणार नाही... काय दचकलात ना हे ऐकून? चला तर मग जाणून घेऊया या मागचं कारण आहे तरी काय!
🔲🔲🔲
_*संकलन - सचिन मणियार...✍🏼*_

*☑ सगळ्यात पहिलं हे समजून घ्या की ही लोकांची श्रद्धा (अंधश्रद्धा?) आहे....*

१३ नंबर भारतासह अनेक राष्ट्रांमध्ये अशूभ मानला जातो. १३ नंबरच्या रुममध्ये किंवा १३ नंबरच्या मजल्यावर राहणं धोक्याचं मानलं जातं. इमारत बनवणारे बिल्डर्स सुद्धा १३ क्रमांकाचा आकडा हा अशुभ मानतात. त्यांच्या मते शुक्रवारी जर १३ तारीख आली तर ती अजून अशुभ असतें, कारण या वेळेस दुष्ट शक्ती जाग्या होतात. आणि या गोष्टीचे पुरावे म्हणून हे लोक शुक्रवारी १३ तारीख आलेल्या दिवशी जगभरात आजवर घडलेल्या अनेक वाईट घटनांचे दाखले देतात.
🔲🔲🔲
बिल्डर्स १३ वा मजला न बांधता स्वत:च्या मनाला अशी खात्री करून देतात की आता आपली बिल्डींग सुरक्षित आहे. त्यावर कोणत्याही वाईट शक्तींचे सावट नाही. एखादी इमारत ३० मजल्याची असेल तर १३ व्या मजल्याला १३ क्रमांक न देता त्याला १४ क्रमांक दिला जातो.
🔲🔲🔲
नरीमन पॉइंट वरच हॉटेल ट्रायडंट तर सर्वांनाच माहित असेल. मुंबईमध्ये केवळ या हॉटेलच्या इमारतीमध्ये १३ वा मजला आहे. पण या मजल्याला टाळा लावून ठेवला आहे. येथे येण्याची परवानगी कोणालाही दिली जात नाही. हॉटेल ट्रायडंटच्या व्यवस्थापनाकडून असे सांगण्यात येते की, पूर्वी हा मजला सुरु होता. अनेक ग्राहक आणि कर्मचाऱ्यांचा येथे राबता असायचा, परंतु कालांतराने या १३ व्या मजल्यावर अनेक विचित्र गोष्टी अनेक जणांनी पहिल्या आहेत. तसेच या मजल्यावरून बऱ्याचदा भयानक आवाज येत असतात. म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने हा मजला बंद ठेवण्यात आला आहे.
🔲🔲🔲
नरीमन पॉइंट वर अजून एक होईचस्ट हाउस म्हणून इमारत आहे. या इमारतीमध्ये १३ व्या मजल्यावर राहून गेलेल्या रहिवाश्यांनी अशी तक्रार केली की, बाथरुममधून सारखा नळातून पाणी टपकण्याचा आवाज येतो, पण जेव्हा आम्ही जाऊन बघितले तर नळ पूर्णपणे बंद होता. आणि कुठेही पाणी दिसत नव्हते.
🔲🔲🔲
मुंबईमध्ये मेकर चेम्बर्स IV नावाचे अजून एक हॉटेल आहे. या हॉटेलच्या इमारतीमधील १३ व्या मजल्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अशी तक्रार केली की, मजल्यावरच्या लाईट्स बंद असल्या तरी त्या सारख्या चालू-बंद होत असतात. अनेकवेळा त्यांची दुरुस्ती देखील केली, पण हा प्रकार सतत सुरु होता.
🔲🔲🔲
बरं हे १३ क्रमांकाचं प्रकरण केवळ मुंबईमध्ये आहे असं काही नाही. भारतातील इतर शहरांमध्ये देखील १३ आकडा टाळला जातो. अहो अमेरिका देखील या गोष्टीवर विश्वास ठेवते. अमेरिकेमधील ८५% इमारतींमध्ये तुम्हाला १३ वा मजला सापडणार नाही.

__
➖➖➖➖➖➖➖
❓1⃣3⃣❓1⃣3⃣❓

जागतिक समुद्र दिन

💦🌊💦🌊💦🌊💦
➖➖➖➖➖➖➖
*☑८ जून आज 🌐जागतिक समुद्र दिन... World Oceans Day...*
*_🌀 समुद्राची स्वच्छता राखली तरच पृथ्वीचे आरोग्य उत्तम_*
➖➖➖➖➖➖➖
पृथ्वीचे हृदय म्हणजे समुद्र. आपल्या शरीरात ज्याप्रमाणे हृदयाचे कार्य अविरत आणि आपल्याही नकळत सुरू असते व त्यावर आपले जीवन अवलंबून असते, त्याचप्रमाणे संपूर्ण पृथ्वीचे आरोग्य समुद्रावर अवलंबून आहे. वातावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी आणि जगातील लाखो लोकांकरिता पाण्याचा प्रमुख स्रोत असलेला समुद्र पृथ्वीवर प्राणवायूची निर्मिती करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो.
🔲🔲🔲
या पार्श्‍वभूमीवरच यंदा हेल्थी ओशन, हेल्थी प्लॅनेट अर्थात स्वच्छ समुद्र, स्वच्छ पृथ्वी अशी संकल्पना संयुक्त राष्ट्रांतर्फे राबविण्यात येणार आहे. प्लास्टिकचे प्रदूषण ही समस्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला भेडसावत आहे. विशेषत: समुद्राच्या पाण्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर मिसळल्या जाणार्‍या प्लास्टिकमुळे सागरी जीवांचे, समुद्री प्राण्यांचे जीवनच धोक्यात आले आहे. त्यामुळेच समुद्र दिनाच्या निमित्ताने संपूर्ण जगाचे या अत्यंत महत्त्वाच्या मुद्याकडे आणि पर्यायाने सागरी आरोग्याकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिन साजरा करण्याचे संयुक्त राष्ट्रांकडून जाहीर करण्यात आले आहे.
🔲🔲🔲

*🔺का साजरा केला जातो जागतिक समुद्र दिन.....*

▪- प्रत्येकाच्याच दैनंदिन जीवनात समुद्राची महत्त्वाची भूमिका आहे.
▪- मोठ्या प्रमाणावर प्राणवायू देण्याचे काम समुद्र करतो.
▪- यानिमित्ताने समुद्र बचावाची जगभरात एक चळवळ उभारली जावी.
▪- समुद्रांचा शाश्‍वत विकास साधण्यासाठी जगातील लोकांना उद्युक्त करणे.
▪- औषधी, अन्न, पाणी व प्राणवायू यासाठी समुद्र हा एकमेव मोठा स्रोत आहे, हे जाणून त्याकडे लक्ष पुरविणे.
▪- समुद्री संपत्तीचे जतन व संवर्धन करणे हा हेतू.
🔲🔲🔲
*‘‘समुद्रांच्या क्षमतेपेक्षा अनेक पटींनी अधिक भार आपण समुद्रांवर लादतो आहोत. समुद्रात मोठ्या प्रमाणावर मिसळले जाणारे अशुद्ध पाणी, प्लास्टिकचा प्रचंड मोठा कचरा यामुळे सागरी जीवन व समुद्रच धोक्यात आले आहेत. भविष्यात समुद्राचे जीवन वाचविण्यासाठी आजच समुद्रांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.’’*

_*- बान की मून, सरचिटणीस युनो*_
🔲🔲🔲

_*संकलन -सचिन मणियार..✍🏼*_

१९९२ साली रिओ दी जानेरिओ येथे झालेल्या पहिल्या पृथ्वीविषयक परिषदेत हा दिन साजरा करण्याबाबत विचारमंथन झाले. *त्यानंतर ५ डिसेंबर २००८ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसामान्य सभेत ८ जून हा दिवस जागतिक समुद्र दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव झाला.* यानिमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सागरीव्यवहार आणि समुद्री कायदेविषयक विभागातर्फे जगभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. युनेस्कोच्या आंतरसरकारी समुद्र विज्ञान आयोगातर्फे जागतिक समुद्र नेटवर्कला प्रायोजकत्व देण्यात आले आहे.
🔲🔲🔲

*🔺समुद्रच बेपत्ता....*

पर्यावरणाच्या मोठ्या प्रमाणावर होणार्‍या हानीमुळे आणि प्रचंड प्रदूषणामुळे पृथ्वीवरील एक अख्खा समुद्रच बेपत्ता झाला आहे. मध्य आशियातील कझाकिस्तान आणि उझबेकिस्तान दरम्यान असलेला अरल समुद्र आता वाळवंटातच रुपांतरित झाला आहे, ही धक्कादायक बाब नुकतीच एका वृत्तवाहिनीने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने उघड केली होती.
काही तथ्य आणि आकडेवारी ...
🔲🔲🔲

▪- पृथ्वीवरील ९७ टक्के जलसाठा समुद्रात आहे.
▪- समुद्रावर तब्बल ३ अब्ज लोक अवलंबून आहेत
▪- जगभरात, समुद्र व सागरी संसाधने आणि त्यावर अवलंबून असलेल्या बाजारपेठांचे मूल्य प्रतिवर्षी तीन ट्रिलियन डॉलर अर्थात जागतिक सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ५ टक्के आहे.
▪- सुमारे ३० टक्के कार्बन डायऑक्साईड समुद्र शोषून घेतो यामुळे प्रदूषणाचा परिणाम कमी करण्यास अप्रत्यक्षपणे थेट मदत होते.
▪- सागरी मासेमारीवर जगभरात तब्बल २०० दशलक्ष लोक अवलंबून आहेत.
_
➖➖➖➖➖➖➖
💦🌊💦🌊💦🌊💦

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...