फॉलोअर

१२ जून २०१८

कोयना नदीवरील १० पुल

कोयना नदीवरील १० पुल

कराड ते कोयनानगर ५६ किलोमीटर अंतर .महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून समजले जाणारे कोयना धरण सर्वासाठी संजीवनी आहे.

कोयनानगर ते कराड 55 किलोमीटरच्या अंतरात एकूण दहा पूल कोयना नदीवर आहेत. यापैकी कराडजवळचा एक पुल इंग्रज सरकारने बांधला आहे. तर उर्वरित ९ पुल स्वातंत्रोत्तर काळातील आहेत. हे पूल म्हणजे कृष्णा कोयना तीरावरील शेकडो गावे आणि खोऱ्यांना जोडणार्या रक्तवाहिन्या आहेत.

१. कोयनानगरमध्ये कोयना धरणाच्या पायथ्याशी वीजनिर्मिती करून किंवा थेट पाणी सोडल्यानंतर  धरणाच्या खालील बाजूस असणारा पहिला कोयना पुल.

२.धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर पहिल्यांदा पाण्याखाली जाणारा संगमनगर धक्का फुल सर्वांनाच माहित आहे. या पुलाशेजारी आता मोठा उंचीचा नवीन पूल बांधण्यात आला आहे. याप्रसंगी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी सातत्याने प्रयत्न केला होता

३.
तिथूनच पुढे सहा किलोमीटर अंतरावर मणेरी पुल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून नुकताच बांधून पुर्ण झाला आहे.

४.
पुढे नवारस्ता मरळी कारखाना दरम्यान कोयना नदीवर सांगवडचा जुना पूल आहे.

५.
खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सेंट्रल रिलीफ फंड मधून बांधलेला कोयनेवरील पाचवा निसरे पुल आहे.

६.
कराड तालुक्यात कोयना नदीने प्रवेश केल्यानंतर तांबवे येथे कोयना नदीवर नवीन पूल बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

७. 
तेथूनच पुढे चार किलोमीटर अंतरावर सुपने आणि किरपे या गावांना जोडणारा नवीन एक पूल माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या प्रयत्नातून गतवर्षी बांधून झालेला आहे.

८ आणि ९.

कराड शहराजवळच कोयनेवर नवा आणि जुना कोयना पुल   आहे.असे नऊ पुल कोयना नदीवर आहेत.

१०.
ब्रिटिश सरकारने बांधलेला आणि आता नुतनीकरण सुरु असलेला दहावा कोयना पुल आहे.

सतिताभ
@
karawadikarad.blogspot.com

१० जून २०१८

लाखात एक हाँटेल फौजी

*लाखात एक हाँटेल फौजी*

गेल्या 35 वर्षांत जम्मू, वैष्णव देवी पासून कुलु मनाली दिल्ली, आग्रा, भोपाळ, गंंगटोक, मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई, बेंगळुरू, तिरुपती, मदुराई ,कन्याकुमारी ते पाँन्डेचरी फिरलो. अनेक ठिकाणी लहान मोठ्या हाँटेलात जेवलो.

पण कुठेही पहायला मिळाला नाही असा एक बोर्ड सातारा लोणंद दरम्यान असलेल्या वाठार स्टेशन हद्दीत असलेल्या हाँटेल फौजी धाबा मध्ये पहायला मिळाला.

*तुमचा चांगला/वाईट अनुभव आम्हाला सांगा.*
*जेवणाच्या क्वालिटी संदर्भात काहीही तक्रार असल्यास काऊंटरवर संपर्क साधा.*

अशा आशयाचा बोर्ड सर्वाना दिसेल अशा ठिकाणी लावला आहे.

एरव्ही हाँटेलात आलेल्या गिर्हाईकाला  जेवू घालणे,  गळ्यात मोठे बिल टाकणेआणि पैसे वसूल करणे एवढेच काम हॉटेलमालक करत असतो. आपल्या हॉटेलमध्ये आलेला ग्राहक समाधानी आहे की नाही याचं त्याला काहीही देणेघेणे नसते

प्रत्येक हॉटेलमध्ये शुद्ध पाणी देणे कायद्याने बंधनकारक आहे तरीही साधे पाणी घेणार का बिसलरी पाणी घेणार असा बळजबरीने आग्रह करून आठ रुपये ची बॉटल 20 रुपये ला गळ्यात मारण्याचे काम हॉटेल व्यवसाय करत असतात.  हॉटेलमधील पदार्थ लोकांना आवडले की नाही त्यात काही कमी-जास्त होते,  लोकांना ते आवडले का?  कॉलिटी प्रमाणे त्याचे पैसे घेतलेत का याचा विचार कोणीही  करत नाही .

अशी एकीकडे परिस्थिती असताना वाठार स्टेशन वरील फौजी धाब्यावर आज मला एक वेगळाच अनुभव आला. चहापाणी घेण्याच्या निमित्ताने आम्ही सर्व नातेवाईक धाब्यावर गेलो .  आजवर कुठेही मिळाला नसेल इतका दर्जेदार चहा मिळाला.  झाडूवाले, स्वयंपाकी, कुक,आचारी, वेटर यामध्ये एक प्रकारची नम्रता पाहायला मिळाली . या हॉटेलमध्ये मिळालेले पदार्थ चांगले आहेत की वाईट आहेत याबाबत हॉटेल मालक जातीने येणाऱ्या कस्टमरला विचारत होता.  खरेतर मी चहा पीत नाही तरीही बिनसाखरेचा चहा पिण्याचा मोह आवरता आला नाही. या हॉटेलमध्ये आला एकदम कडक आणि लाजबाब चहा  प्यायला मिळाला. क्वालिटी सुंदर होतीच मात्र हॉटेलच्या काउंटरवर लावलेला आदरपूर्वक बोर्ड मला खूप आवडला .  हॉटेलमध्ये खाऊन झाल्यानंतर अन्नपदार्थ बाबत तुम्हाला चांगली वाईट कसलाही अनुभव असला तर हॉटेल मालकांना तो शेर करावा अशा आशयाची पाटी मला पहिल्यांदाच एका हॉटेलमध्ये पाहिली खरच अतिशय सुखद असा अनुभव होता.

शाकाहारी मांसाहारी जेवणाबरोबरच स्नॅक्स नाष्टा चहा  फौजी धाब्यावर उपलब्ध आहे. बारा तास या धाब्यावर फार गर्दी असते, मात्र अतिशय सुंदर सेवा मिळते. मात्र कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक गुरुवारी  मांसाहारी जेवण मिळत नाही असा या धाग्याचा नियम आहे.

सतिताभ
@
karawadikarad.blogspot.com

9881191302, 9765566202

०८ जून २०१८

13 आकडा

_*🌀🙇🏻‍♂मनातील प्रश्न..*_

❓1⃣3⃣❓1⃣3⃣❓
➖➖➖➖➖➖➖
*🔴🌀 केवळ एका (अंध?) श्रद्धेपोटी ......*

*◾मुंबईसह जगभरातील मोठमोठ्या शहरात मधील अनेक गगनचुंबी इमारतींमध्ये तुम्हाला 13 वा मजला सापडणार नाही.....*

*◾काही विमानांमध्ये तुम्हाला 13 नंबरची Row दिसणार नाही आणि अगदी अनेक मोठ्या हॉटेल्स आणि हॉस्पिटल्स मध्ये १३ नंबरची रुम तुम्हाला सापडणार नाही....*

*🤔 काय कारण असावं बरं..??*
➖➖➖➖➖➖➖
तुम्ही कधी एखाद्या हॉटेलमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये गेलात तर सहज १३ नंबरच्या रुमची चौकशी करुन पाहा. सहसा अशा नंबरची रुम तुम्हाला हॉटेल किंवा हॉस्पिटलमध्ये आढळणार नाही. जुन्या इमारतींमध्ये या नंबरच्या रुम आढळतील किंवा १३ ऐवजी १२अ अशा रुम आढळतील. यामागे नक्की काय कारण आहे याची पडताळणी केल्यास काही गोष्टी समोर येतात…
🔲🔲🔲
जगातील इतर शहरांसारखं मुंबई देखील खास प्रसिद्ध आहे ते गगनचुंबी आणि भल्यामोठ्या ईमारतींसाठी! पण या दिमाखदार इमारतींपैकी अनेकांमध्ये १३ वा मजला तुम्हाला सापडणारच नाही…!!! कधी मुंबईमधल्या प्रसिद्ध हॉटेल्स किंवा इमारतींमध्ये गेलात ज्यांना १३ पेक्षा जास्त मजले आहेत, तर लिफ्ट मध्ये गेल्यावर १३ नंबरचा आकडा शोधा. ९०% इमारतींमध्ये तुम्हाला १३ नंबरचे बटन सापडणारचं नाही.  तर काही विमानांमध्ये तुम्हाला १३ नंबरची Row सापडणार नाही... काय दचकलात ना हे ऐकून? चला तर मग जाणून घेऊया या मागचं कारण आहे तरी काय!
🔲🔲🔲
_*संकलन - सचिन मणियार...✍🏼*_

*☑ सगळ्यात पहिलं हे समजून घ्या की ही लोकांची श्रद्धा (अंधश्रद्धा?) आहे....*

१३ नंबर भारतासह अनेक राष्ट्रांमध्ये अशूभ मानला जातो. १३ नंबरच्या रुममध्ये किंवा १३ नंबरच्या मजल्यावर राहणं धोक्याचं मानलं जातं. इमारत बनवणारे बिल्डर्स सुद्धा १३ क्रमांकाचा आकडा हा अशुभ मानतात. त्यांच्या मते शुक्रवारी जर १३ तारीख आली तर ती अजून अशुभ असतें, कारण या वेळेस दुष्ट शक्ती जाग्या होतात. आणि या गोष्टीचे पुरावे म्हणून हे लोक शुक्रवारी १३ तारीख आलेल्या दिवशी जगभरात आजवर घडलेल्या अनेक वाईट घटनांचे दाखले देतात.
🔲🔲🔲
बिल्डर्स १३ वा मजला न बांधता स्वत:च्या मनाला अशी खात्री करून देतात की आता आपली बिल्डींग सुरक्षित आहे. त्यावर कोणत्याही वाईट शक्तींचे सावट नाही. एखादी इमारत ३० मजल्याची असेल तर १३ व्या मजल्याला १३ क्रमांक न देता त्याला १४ क्रमांक दिला जातो.
🔲🔲🔲
नरीमन पॉइंट वरच हॉटेल ट्रायडंट तर सर्वांनाच माहित असेल. मुंबईमध्ये केवळ या हॉटेलच्या इमारतीमध्ये १३ वा मजला आहे. पण या मजल्याला टाळा लावून ठेवला आहे. येथे येण्याची परवानगी कोणालाही दिली जात नाही. हॉटेल ट्रायडंटच्या व्यवस्थापनाकडून असे सांगण्यात येते की, पूर्वी हा मजला सुरु होता. अनेक ग्राहक आणि कर्मचाऱ्यांचा येथे राबता असायचा, परंतु कालांतराने या १३ व्या मजल्यावर अनेक विचित्र गोष्टी अनेक जणांनी पहिल्या आहेत. तसेच या मजल्यावरून बऱ्याचदा भयानक आवाज येत असतात. म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने हा मजला बंद ठेवण्यात आला आहे.
🔲🔲🔲
नरीमन पॉइंट वर अजून एक होईचस्ट हाउस म्हणून इमारत आहे. या इमारतीमध्ये १३ व्या मजल्यावर राहून गेलेल्या रहिवाश्यांनी अशी तक्रार केली की, बाथरुममधून सारखा नळातून पाणी टपकण्याचा आवाज येतो, पण जेव्हा आम्ही जाऊन बघितले तर नळ पूर्णपणे बंद होता. आणि कुठेही पाणी दिसत नव्हते.
🔲🔲🔲
मुंबईमध्ये मेकर चेम्बर्स IV नावाचे अजून एक हॉटेल आहे. या हॉटेलच्या इमारतीमधील १३ व्या मजल्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अशी तक्रार केली की, मजल्यावरच्या लाईट्स बंद असल्या तरी त्या सारख्या चालू-बंद होत असतात. अनेकवेळा त्यांची दुरुस्ती देखील केली, पण हा प्रकार सतत सुरु होता.
🔲🔲🔲
बरं हे १३ क्रमांकाचं प्रकरण केवळ मुंबईमध्ये आहे असं काही नाही. भारतातील इतर शहरांमध्ये देखील १३ आकडा टाळला जातो. अहो अमेरिका देखील या गोष्टीवर विश्वास ठेवते. अमेरिकेमधील ८५% इमारतींमध्ये तुम्हाला १३ वा मजला सापडणार नाही.

__
➖➖➖➖➖➖➖
❓1⃣3⃣❓1⃣3⃣❓

जागतिक समुद्र दिन

💦🌊💦🌊💦🌊💦
➖➖➖➖➖➖➖
*☑८ जून आज 🌐जागतिक समुद्र दिन... World Oceans Day...*
*_🌀 समुद्राची स्वच्छता राखली तरच पृथ्वीचे आरोग्य उत्तम_*
➖➖➖➖➖➖➖
पृथ्वीचे हृदय म्हणजे समुद्र. आपल्या शरीरात ज्याप्रमाणे हृदयाचे कार्य अविरत आणि आपल्याही नकळत सुरू असते व त्यावर आपले जीवन अवलंबून असते, त्याचप्रमाणे संपूर्ण पृथ्वीचे आरोग्य समुद्रावर अवलंबून आहे. वातावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी आणि जगातील लाखो लोकांकरिता पाण्याचा प्रमुख स्रोत असलेला समुद्र पृथ्वीवर प्राणवायूची निर्मिती करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो.
🔲🔲🔲
या पार्श्‍वभूमीवरच यंदा हेल्थी ओशन, हेल्थी प्लॅनेट अर्थात स्वच्छ समुद्र, स्वच्छ पृथ्वी अशी संकल्पना संयुक्त राष्ट्रांतर्फे राबविण्यात येणार आहे. प्लास्टिकचे प्रदूषण ही समस्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला भेडसावत आहे. विशेषत: समुद्राच्या पाण्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर मिसळल्या जाणार्‍या प्लास्टिकमुळे सागरी जीवांचे, समुद्री प्राण्यांचे जीवनच धोक्यात आले आहे. त्यामुळेच समुद्र दिनाच्या निमित्ताने संपूर्ण जगाचे या अत्यंत महत्त्वाच्या मुद्याकडे आणि पर्यायाने सागरी आरोग्याकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिन साजरा करण्याचे संयुक्त राष्ट्रांकडून जाहीर करण्यात आले आहे.
🔲🔲🔲

*🔺का साजरा केला जातो जागतिक समुद्र दिन.....*

▪- प्रत्येकाच्याच दैनंदिन जीवनात समुद्राची महत्त्वाची भूमिका आहे.
▪- मोठ्या प्रमाणावर प्राणवायू देण्याचे काम समुद्र करतो.
▪- यानिमित्ताने समुद्र बचावाची जगभरात एक चळवळ उभारली जावी.
▪- समुद्रांचा शाश्‍वत विकास साधण्यासाठी जगातील लोकांना उद्युक्त करणे.
▪- औषधी, अन्न, पाणी व प्राणवायू यासाठी समुद्र हा एकमेव मोठा स्रोत आहे, हे जाणून त्याकडे लक्ष पुरविणे.
▪- समुद्री संपत्तीचे जतन व संवर्धन करणे हा हेतू.
🔲🔲🔲
*‘‘समुद्रांच्या क्षमतेपेक्षा अनेक पटींनी अधिक भार आपण समुद्रांवर लादतो आहोत. समुद्रात मोठ्या प्रमाणावर मिसळले जाणारे अशुद्ध पाणी, प्लास्टिकचा प्रचंड मोठा कचरा यामुळे सागरी जीवन व समुद्रच धोक्यात आले आहेत. भविष्यात समुद्राचे जीवन वाचविण्यासाठी आजच समुद्रांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.’’*

_*- बान की मून, सरचिटणीस युनो*_
🔲🔲🔲

_*संकलन -सचिन मणियार..✍🏼*_

१९९२ साली रिओ दी जानेरिओ येथे झालेल्या पहिल्या पृथ्वीविषयक परिषदेत हा दिन साजरा करण्याबाबत विचारमंथन झाले. *त्यानंतर ५ डिसेंबर २००८ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसामान्य सभेत ८ जून हा दिवस जागतिक समुद्र दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव झाला.* यानिमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सागरीव्यवहार आणि समुद्री कायदेविषयक विभागातर्फे जगभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. युनेस्कोच्या आंतरसरकारी समुद्र विज्ञान आयोगातर्फे जागतिक समुद्र नेटवर्कला प्रायोजकत्व देण्यात आले आहे.
🔲🔲🔲

*🔺समुद्रच बेपत्ता....*

पर्यावरणाच्या मोठ्या प्रमाणावर होणार्‍या हानीमुळे आणि प्रचंड प्रदूषणामुळे पृथ्वीवरील एक अख्खा समुद्रच बेपत्ता झाला आहे. मध्य आशियातील कझाकिस्तान आणि उझबेकिस्तान दरम्यान असलेला अरल समुद्र आता वाळवंटातच रुपांतरित झाला आहे, ही धक्कादायक बाब नुकतीच एका वृत्तवाहिनीने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने उघड केली होती.
काही तथ्य आणि आकडेवारी ...
🔲🔲🔲

▪- पृथ्वीवरील ९७ टक्के जलसाठा समुद्रात आहे.
▪- समुद्रावर तब्बल ३ अब्ज लोक अवलंबून आहेत
▪- जगभरात, समुद्र व सागरी संसाधने आणि त्यावर अवलंबून असलेल्या बाजारपेठांचे मूल्य प्रतिवर्षी तीन ट्रिलियन डॉलर अर्थात जागतिक सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ५ टक्के आहे.
▪- सुमारे ३० टक्के कार्बन डायऑक्साईड समुद्र शोषून घेतो यामुळे प्रदूषणाचा परिणाम कमी करण्यास अप्रत्यक्षपणे थेट मदत होते.
▪- सागरी मासेमारीवर जगभरात तब्बल २०० दशलक्ष लोक अवलंबून आहेत.
_
➖➖➖➖➖➖➖
💦🌊💦🌊💦🌊💦

२४ मे २०१८

वेडा

तु वेडी आहेस !
तु वेड लावतेस !
तुझं वेड लागलं !
तुझं हसणं वेडं लावतंय !
तुझ्यासाठी वेडा झालोय !
तुझा वेडेपणा सतावतोय !
तुझं माझं प्रेमही वेडं आहे !
तुझ्यावर वेड्यासारखा मरतोय !
तुझ्या माझ्या प्रेमाची वेडी कहानी !
तुझा वेडसरपणा प्रेमाचा एक भाग आहे !

तुझा वेडा दिवाना !

Rail Terminal , Junction

*_🔺🙇🏻‍♂मनातील प्रश्न.._*

🚂🚋🚋🚋🚋🚋🚋
➖➖➖➖➖➖➖
*☑ भारतीय रेल्वेच्या टर्मिनस, सेंट्रल, जंक्शन आणि स्टेशन मधला फरक..!!!*
➖➖➖➖➖➖➖
भारतीय रेल्वे म्हणजे जगातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क होय. आपल्या भारत सरकारचे रेल्वे मंत्रिमंडळ अतिशय प्रभावीपणे हे अवाढव्य काम सांभाळते असून देशातील रेल्वेच्या वाहतुकीसाठी ते जबाबदार आहे. भारतीय रेल्वे अंतर्गत ९२०८१ किलोमीटर रेल्वे रूळ असून ते ६६६८७ किलोमीटरचे अंतर व्यापतात. आपल्या भारतीय रेल्वेने जवळपास २२ दक्षलक्ष प्रवासी दरोरोज प्रवास करतात. तर असा हा प्रवास सुखकर करण्यासाठी भारतीय रेल्वेने ७२१६ स्थानके भारताच्या वेगवेगळ्या भागात तयार केली आहेत. त्यांची नावेही वेगवेगळी आहेत. काहींचे नाव जंक्शन, काहींचे टर्मिनस तर काहींचे सेंट्रल. पण तुम्हाला माहीत आहे.?? जंक्शन, टर्मिनस आणि सेंट्रल या तिन्ही प्रकारच्या रेल्वे स्थानकांमध्ये काय फरक आहे.??
🔲🔲🔲

*🌀 टर्मिनस...*
ज्या स्थानकाला टर्मिनस/टर्मिनल म्हटले जाते, त्या स्थानकात रेल्वे ज्या बाजूने आत येते त्याच बाजूने बाहेर जाते. कारण ह्या स्थानकातील रूळ एका बाजूला संपतात, म्हणून रेल्वे एकाच बाजूने जाते आणि येते.
*▪उदारणार्थ:*
➡छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई
➡छत्रपती शाहुजी महाराज टर्मिनस कोल्हापूर
🔲🔲🔲

*🌀 सेंट्रल...*
सेंट्रल स्थानक हे शहरातील खूप व्यस्त आणि महत्त्वाचे स्थानक असते, या स्थानकावर खूप साऱ्या ट्रेन येत असतात आणि जात असतात. ही स्थानके बहुतांश करून जुनी असतात. भारतात केवळ पाच सेंट्रल स्थानके आहेत.
*▪उदाहरणार्थ :*
➡मुंबई सेंट्रल (BCT)
➡चेन्नई सेंट्रल (MAS)
➡त्रिवेंद्रम सेंट्रल (TVC)
➡मंगलोर सेंट्रल (MQC)
➡कानपूर सेंट्रल (CNB)
🔲🔲🔲

*🌀जंक्शन...*
ज्या स्थानकात कमीत कमी ३ रेल्वे मार्ग आत येतात आणि बाहेर जातात, अश्या स्थानकाला जंक्शन म्हणतात. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एक रेल्वे जाण्यासाठी-येण्यासाठी कमीतकमी २ मार्गांचा वापर करते.
*▪उदाहरणार्थ:*
मथुरा जंक्शन (७ मार्ग)
सालेम जंक्शन (६ मार्ग)
विजयवाडा जंक्शन (५ मार्ग)
बरेअली जंक्शन (५ मार्ग)
मिरज जंक्शन
🔲🔲🔲

*🌀 स्थानक...*
स्थानक म्हणजे एक असे ठिकाण जेथे रेल्वे प्रवाश्यांना आणि वस्तूंना चढवण्यासाठी आणि उतरवण्यासाठी येते, काहीवेळ थांबते आणि निघून जाते.

*🔺नोट :*
_चेन्नई सेंट्रलला ही टर्मिनस म्हटले जाते पण हे ही भारतामधील एक जुने स्थानक आहे, त्यामुळे याला सेंट्रल असे नाव पुढे चालू ठेवण्यात आले._
➖➖➖➖➖➖➖
🚂🚋🚋🚋🚋🚋🚋

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...