रोज काहीतरी लिहीत जा असे माझे बाबा नेहमी सांगत. 1986 साली वाचकांची पत्रे सदरात पुणे तरूणभारत मध्ये पहिलं पत्र प्रसिद्ध झालं.1998 साली लोकमत ओगलेवाडी वार्ताहर म्हणून लेखनासाठी मार्ग खुला झाला. 2001मध्ये पुढारीत वार्ताहर म्हणून रूजू झालो.आजपर्यंत थोडंफार लिहीलं,अजून खुप लिहायचं आहे. करवडी,कराडची शाळा,काॅलेज पुढे ओगलेवाडी बनवडी भागात क्लासेसच्या निमित्ताने तसेच मिडियामध्ये सुंदर लोकांची साथ,सोबत लाभली.करवडी-कराड व्हाया ओगलेवाडी प्रवासात आलेले अनुभव लेखन हौस पुर्ण करण्यासाठी हा ब्लॉग प्रपंच!
फॉलोअर
०९ मार्च २०१७
आजचा नाष्टा आमदार साहेबांसोबत
०८ मार्च २०१७
पुनर्नवा
वादळ म्हणू की वादळवेल म्हणू
नारी म्हणू की दिव्यनारी म्हणू
वैदेही म्हणू की रामदुलारी म्हणू
राधा म्हणू की मीरा म्हणू
तुला मी कोणत्या नावाने हाक मारू?
सखी म्हणू की हरिप्रिया म्हणू
अबला म्हणू की सहस्रबला म्हणू
स्रीशक्ती म्हणू की सहनशक्ती म्हणू
प्रज्योती म्हणू की आरती म्हणू
तुला मी कोणत्या नावाने हाक मारू?
नदी म्हणू की प्रेमसागर म्हणू
साधना म्हणू की प्रेरणा म्हणू
देवी म्हणू की दिव्यशक्ती म्हणू
शांताई म्हणू की चंद्राई म्हणू
तुला मी कोणत्या नावाने हाक मारू?
राधिका म्हणू की सेविका म्हणू
श्वास म्हणू की प्राणवायू म्हणू
गीत म्हणू की संगीत म्हणू
साद म्हणू की सुसंवाद म्हणू
तुला मी कोणत्या नावाने हाक मारू?
विद्या म्हणू की सुधारणा म्हणू
साथी म्हणू की अस्मिता म्हणू
अर्पिता म्हणू की समर्पिता म्हणू
देवयानी म्हणू की शर्मिष्ठा म्हणू
तुला मी कोणत्या नावाने हाक मारू?
ही आणि खूप काही नावे
घेऊनही तुझं वर्णन करता येईल.
रोज नव्याने जन्म घेणारी पुनर्नवा तू !
तुझा जन्म फक्त
देण्यासाठी,
इतरांसाठी ,
झगडण्यासाठी
वात्सल्यासाठी,
करूणेसाठी
त्यागासाठी,
शिकण्यासाठी ,रोज नवनवीन शिकवण्यासाठी !
आई, ताई, अर्धांगिनी, कन्याकुमारी
तुला लाख लाख सलाम 🙏🙏
..........सतीश मोरे
Dedicated to all women
who know only to give, strive and love.
My wife, sister, daughter and mother.
०५ मार्च २०१७
नवीन उशी का घेतली पाहीजे?
➖➖➖➖➖➖➖➖➖
जर तुम्हाला अशी निवांत झोप येत नसेल तर ही चिंतेची बाब असू शकते.शांत व गाढ झोप न येण्यामागे अनेक कारणे असतात.निवांत झोप न लागण्याचे एक प्रमुख कारण तुमची खराब झालेली उशी देखील असू शकते.लक्षात ठेवा पिलो चेंज न केल्यास झोप न लागण्यासोबत तुम्हाला आरोग्याच्या समस्या देखील होऊ शकतात.
🔲🔲🔲
_*🔺आरामदायी झोपेसाठी कशी कराल उशीची निवड ? योग्य वेळी उशी न बदलल्यास काय होते-*_
*▪जुन्या उशीमध्ये धुळीचे कण व जिवाणू असतातात-*
तुम्हाला हे ऐकून कदाचित धक्का बसेल की तुमच्या जुन्या उशीमध्ये धुळ व जंतू अाहेत.पण हे खरे आहे की अस्वच्छता,प्रदूषण,घरातील धूळ,स्वयंपाकघरातील काजळी,घरातील पाळीव प्राणांचा वावर या अशा अनेक गोष्टींमुळे तुमची जुनी उशी खराब होऊ शकते.जर तुम्हाला तुमच्या जुन्या उशीमुळे नीट झोप येत नसेल तर प्रथम तुमच्या उशी कव्हरला कोमट पाण्यामध्ये स्वच्छ धुवा.या पिलोच्या कव्हरमध्ये असलेल्या धुळीमुळे तुम्हाला अॅलर्जी होऊ शकते.अश्या उशी कव्हरमधील धुळ श्वासावाटे नाकात गेल्यामुळे तुम्हाला अस्थमाचा देखील त्रास होऊ शकतो.
*▪तुम्हांंला मानदुखी अथवा पाठीचे दुखणे होण्याची शक्यता असते-*
सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जर तुम्ही तुमच्या मळक्या व आकार बदलेल्या जुन्या उशीवर झोपलात तर तुम्हाला पाठदुखी, मानदुखीसारख्या वेदनेला सामोरे जावे लागू शकते. अशा अस्वस्थ झोपेमुळे दैनंदिन जीवनात तुम्हाला अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. झोपताना तुमच्या मानेला आधाराची गरज असते पण जर तुमच्या जुन्या उशीमुळे मानेला व्यवस्थित आधार मिळाला नाही तर तुमच्या मानेच्या दुखण्यात अधिक वाढ होते.जुनी पिलो तशीच वापरल्यामुळे पुढे मणका व मानेमध्ये मुंग्या येणे किंवा हे अवयव बधीर होण्याची समस्या निर्माण होते. हे नक्की वाचा डाव्या कुशीवर झोपणे का ठरते फायद्याचे ?
*▪जुनी उशी नेमकी कधी बदलावी?*
🔺१.तुम्ही विकत घेतली तशी ती उशी आता दिसते का?
🔺२.उशी मळली अथवा त्याच्यावर धुळ जमा झाली आहे का?
🔺३.उशी डोक्याखाली घेतल्यानंतर अस्वस्थ वाटते का?
🔺४.सकाळी उठल्यावर मान ,पाठ व गुडघे हे अवयव जखडतात का?
🔺५.उशीवरील धुळीमुळे कुबट वास येतो का?
या प्रश्नांची उत्तरे जर होय अशी असतील तर तुमची जुनी उशी बदण्याची वेळ झाली आहे असे समजा.
*▪योग्य उशी कशी निवडाल?*
तुमच्यासाठी योग्य उशी कोणती हे सांगणे तसे कठीण आहे.यासाठी निरानिराळ्या उशीचा वापर करा ज्यामुळे तुमच्या आवडीची व आरामदायक उशी तुम्हाला नक्कीच मिळेल.
यासाठी पहा हे काही उशीचे प्रकार-
*🔺पॉलिस्टर पिलो-*
बाजारात मायक्रोफायबर आणि क्लस्टरफील असलेल्या या पॉलिस्टर पिलो सहज उपलब्ध असतात.या पिलो स्वस्त असल्यानेे सर्वसामान्यांच्या खिशाला परवतात.या पिलो तुम्ही मशीनवॉश करु शकता.त्याचप्रमाणे या पिलो वर्षातून अथवा दोन वर्षातून एकदा बदलणे गरजेचे असते.
*🔺लेटेक्स पिलो-*
फोम कोर आणि ग्रॅन्युलेट फोम या दोन प्रकारात या पिलो उपलब्द असतात.या पिलो खुप आरामदायक असल्यामुळे त्यांच्या वापरामुळे झोप चांगली मिळते.त्याचप्रमाणे लेटेक्स पिलो किमान पंधरा ते वीस वर्ष टिकतात.या पिलो थोड्या महाग असतात मात्र त्यांच्या वापरामुळे डोके व मानेला चांगला आधार मिळू शकतो.
*🔺मेमरी फोम-*
या पिलो वर डोके ठेवल्यास डोके व मानेच्या आकारानुसार त्या पिलोचा आकार बदलतो.तीव्र मानदुुखी अथवा पाठदुखी असणा-या लोकांना या पिलो वापण्याचा सल्ला देण्यात येतो.गर्भवती महिलांनी या पिलोचा वापर करणे योग्य असते.या पिलो देखील पंधरा ते वीस वर्ष टिकतात.
*🔺फेदर पिलो-*
या पिलो महाग असतात.या पॉलिस्टर पिलोपेक्षा अधिक काळ टिकतात.मात्र या पिलोमुळे मानेला योग्य आधार मिळणे कठीण असते.
*🔺वॉटरफ्लो पिलो-*
वॉटरफ्लो पिलो हा पिलोचा एक आधुनिक प्रकार अाहे.या पिलो हायपोअॅलर्जीक असून त्या मऊ असतात.या पिलो मधील वॉटरपाऊचमुळे मानेला योग्य आधार व आराम मिळतो.
*🔺प्रतिबंधनात्मक उपाय-*
जर तुम्हाला तुमची पिलो त्वरीत बदलायची नसेल तर हे जरुर करा.
▪१.दर आठवड्याला उशी हॉट ड्रायर मध्ये ठेवा त्यामुळे त्यांच्यातील जीवजंतूचा नाश होईल
▪२.केस ओले घेऊन उशीवर झोपू नका.
▪३. शक्य असल्यास बेडरुमसाठी dehumidifier खरेदी करा.
▪४.चांगली स्वच्छ उशी निवडा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
😴😴😴😴😴😴😴😴😴
०४ मार्च २०१७
लष्कर / सेना नसलेले देश
_*🔺जगाच्या पाठीवर.....*_
*☑असे देश ज्यांच्याकडे....*
*स्वतःचे लष्कर/सेना नाही.......*
➖➖➖➖➖➖➖➖➖
जगाच्या अर्थकारणात आज प्रत्येक देशाचे रक्षा म्हणजे संरक्षण बजेट हा चर्चेचा विषय असतो. कोणत्या देशाने किती बजेट संरक्षणासाठी ठेवले आहे यावरही कांही आडाखे बांधले जात असतात. अमेरिकेचे रक्षा बजेट सर्वाधिक म्हणजे ६१० अब्ज डॉलर्सचे आहे. त्या खालोखाल चीनचे बजेट आहे तर भारताचे संरक्षणासाठीचे बजेट आहे ४१ अब्ज डॉलर्स. मात्र जगाच्या पाठीवर असेही कांही देश आहेत, जेथे लष्कर हा प्रकार नाही. गरज भासली तर हे देश भाड्याने दुसर्या देशांचे सैनिक बोलावतात. अशा देशांची संख्या २२ च्या वर आहे. त्यातील कांही देशांची ही माहिती
*🔺१) कोस्टा रिका....*
मध्य अमेरिकेतील या देशात १९४८ साली राष्ट्रपती निवडणूकीत गडबड होऊन बडखोरांनी हा देश ताब्यात घेतला व १९५३ साली सत्ता स्थापन केली. त्यानंतर येथे १४ वेळा राष्ट्रपती निवडणुका झाल्या मात्र त्या अतिशय शांततेत पार पडल्या. या देशात लष्कर नाही.1948 ला झालेल्या गृह-युद्धानंतर इथून सेना हटवली आहे.
*🔺२)लिंचेनस्टाईन....*
मध्य युरोपातील हा छोटासा देश. त्यानी १९६८ साली स्वतःची सेना भंग केली कारण लष्कराचा खर्च भागविण्याइतकी त्यांची आर्थिक परिस्थिती सबळ नव्हती. तेव्हापासून युद्ध होईल अशी शंका आली तर पुन्हा लष्कराची स्थापना करायची असा निर्णय त्यांनी घेतला मात्र अजून तरी तशी वेळ त्यांच्यावर आलेली नाही. हा देश काळ्या पैशांबाबतच्या चर्चेने नेहमीच प्रसिद्धीत असतो.
*🔺३) सामोआ.....*
१९६२ साली न्यूझीलंडच्या गुलामीतून मुक्त झालेल्या या देशाला स्वतःचे सैन्य नाही. मात्र स्वातंत्र्य देतेवेळी न्यूझीलंडने त्यांना गरज असेल तेव्हा सैन्य पुरविण्याचे आश्वासन दिले आहे. पश्चिम सामोआ द्विपसमुह पोलेनेशियाचा भाग मानला जातो.
*🔺४)अंडोरा......*
युरोपतील या देशाची स्थापना १२७८ साली झाली आहे. ४६८ चौरस किलोमीटरचा परिसर असलेला हा देश स्की रिसॉर्ट आणि ड्यूटीफ्री दुकानांसाठी प्रसिद्ध आहे. हे करचुकवेगिरी करणार्यांचे नंदनवन म्हटले जाते. स्पेन व फ्रान्सने या देशाला गरज असेल तेव्हा सैनिक पुरविण्याचे आश्वासन दिलेले आहे.
*🔺५)तुवालू.......*
भारत प्रशांत द्विप सहयोग संघटनेतील हा देश २०१४ साली स्थापन झाला आहे.२०१५ मध्ये जयपूर परिषदेत १४ देशांचे संमेलन झाले त्यात या देशाचा समावेश होता. अवघा २६ चौरस किलोमीटरचा हा चिमुकला देश. त्याची लोकसंख्या आहे १० हजार. या देशाला स्वतःचे लष्कर नाही. हा देश कॉमनवेल्थचा सदस्य आहे आणि ब्रिटन प्रमाणे त्यांचे संसदीय राजतंत्र आहे.
*🔺६)व्हेटिकन सिटी.....*
इटलीची राजधानी रोमच्या पोटातच असलेल्या हा स्वतंत्र देश. जगातील सर्वात छोटा देश असून त्याचे क्षेत्रफळ अवघे ०.४४ चौरस किलोमीटर आहे. याची लोकसंख्या आहे केवळ ८४०. कॅथॉलिक चर्चचे मुख्यालय असलेल्या व्हेटीकन सिटीमध्ये पोप आणि चर्चचे अन्य अधिकारी राहतात. येथे स्वतंत्र सेना नाही.
*🔺७)ग्रेनेडा.....*
मोठे बेट अन्य छोटी बेटे असा ३४४ किमीचा परिसर असलेला व १ लाख ५ हजार लोकसंख्येचा हा देश कॅरेबियन व अटलांटिक समुद्राच्या मध्यात आहे. मसाल्यांसाठी जगभर प्रसिद्धी असलेल्या या देशात १९८३ साली सैनिकांची बंडाळी झाली ती अमेरिकेच्या हस्तक्षेपाने विरली. मात्र तेव्हापासून या देशात नेहमीचे सैन्य नाही.
*🔺८) नाऊस.....*
पॅसिफिक महासागरातील एक बेट म्हणजे हा देश. त्याचे क्षेत्रफळ आहे २१.१० किमी व लोकसंख्या आहे १० हजार. हा देश मायक्रोनेशिया बेटाचा भाग असून करारानुसार या बेटाच्या सुरक्षेची जबाबदारी ऑस्ट्रेलियाकडे आहे.
*🔺९) मॉरिशस....*
भारताला जवळचा असलेला हा देश १९६८ पासून नो स्टँडींग आर्मी असलेला देश आहे. सर्व लष्करी, पोलिसी आणि सुरक्षा संबंधी जबाबदार्या पार पाडण्यासाठी १० हजार ड्यूटी पर्सनल येथे नेमले गेले आहेत. त्यातील ८ हजार नॅशनल पोलिस फोर्स मधले असून ते अंतर्गत सुरक्षा व कायदा सुव्यवस्था सांभाळतात. १५०० चा स्पेशल मोबाईल फोर्स व नॅशनल कोस्ट गार्डचे ५०० सदस्य अशी ही सुरक्षा व्यवस्था असून या दलांना अगदी छोटी शस्त्रेच दिली जातात.
*🔺१०) किरीबाटी.......*
या देशाच्या घटनेने फकत पोलिस दलासाठी परवानगी दिली आहे. हे पोलिस दल मेरीटाईम सर्वेलन्स वर लक्ष ठेवून असते. त्यांच्याकडे छोटी शस्त्रे व १ पेट्रोलिंग बोट इतकीच सामग्री आहे. देशाला सैन्य नाही मात्र गरजेनुसार ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड देशांकडून भाड्याने सैनिक पुरविण्याचा करार केला गेला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔲◼🔲◼🔲◼🔲◼🔲
०३ मार्च २०१७
मी आणि माझं, माझ्यासाठी
मी ,माझं, माझ्यासाठी!
नाऊ अफ्टर अॅन्ड देन
सारं पाहिजे फक्त मला
माझं ते मला आणि तुझं बी मला
आहे कुठं वेळ इथं इतरांचा विचार करायला ?
वाढत जाईल माझी संपत्ती
जमीन झुमला घरदार आणि इस्टेट
प्राॅपर्टी वाढविण्यातच मला इंट्रेस्ट
आहे कुठं वेळ इथं इतरांचा विचार करायला ?
सोने शेअर्स इमले गाडी न् स्टेटस
रोज वाढवत जाऊया फक्त असेटस
इंटरेस्ट मिळत जाईल मला कॅशलेस
आहे कुठं वेळ इथं इतरांचा विचार करायला ?
.......सतीश मोरे
०१ मार्च २०१७
प्रेम हे
उगाचच्या रुसव्यांना
एकमेकांना मनवण्याला,
प्रेम म्हणायचं असत.
एकमेकाना आठवायला
आणि आठवणी जपण्याला
प्रेम म्हणायचं असत.
एकमेकांना समजून घ्यायला
प्रेम म्हणायचं असतं
तो चुकतोय
माहित असूनही सावरायला
प्रेम म्हणायचं असतं
सख्या सजणाला
आहे तसा स्वीकारयला
प्रेम म्हणायचं असतं
अव्यक्त व्यक्त
न करताही समजायला
प्रेम म्हणायचं असतं
सोबत द्यायला
सोबतीला असायला
प्रेम म्हणायचं असतं
मला माझाही आधार लागत नाही
तू फक्त सोबत रहा
मी दुसरं काही मागत नाही...
Featured Post
ना बोलना जरूरी है
*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...
-
*अंतरंग* *परिसे गे सुनेबाई |* *नको वेचू दूध दही ||१* *आवा चालीली पंढरपुरा |* *वेसींपासुन आली घरा ||२* *ऐके गोष्टी सादर बाळे |* *करि जत...
-
प्रतिभाशाली युवा लेखक.....यशराज देसाई राजकारणी लोकांच्या घरी राजकारणी, डॉक्टरांच्या घरी डॉक्टर, शिक्षकाच्या घरी शिक्षक,आयपीएस अ...
-
डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष 2 जानेवारी 1940 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर कराडात आले होते. कराड मुन्सिपाल्टीने त्यांना या...





