*_🤔 🔺DO YOU KNOW_*
⚔🗡⚔🗡⚔🗡⚔
➖➖➖➖➖➖➖
*☑ शिवरायांच्या गनिमी काव्याचा वापर करून व्हिएतनामने केली होती अमेरिकेवर मात..!!!*
*◾युद्धानंतर व्हिएतनामच्या राष्ट्रध्याक्षांनी शिवाजी महाराजांच्या गनीमी काव्याचा या युद्धात आम्ही वापर केल्याची कबुली दिली होती....*
➖➖➖➖➖➖➖
_शिवाजी महाराज हे मराठी माणसांसाठी दैवतच आहेत. महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप युद्धं जिंकली. त्यांचे नाव ऐकून शत्रू थरथर कापत असे. त्यांनी बळाने नाहीतर बुद्धीने प्रत्येकवेळी शत्रूवर मात केली. त्यामुळे त्यांच्यापेक्षा दहा पटीने बलाढ्य असलेल्या शत्रूला देखील त्यांनी युद्धाच्या रणांगणावर मात दिली होती. शिवाजी महाराजांची ख्याती काही वेगळीच आहे. फक्त भारतातच नाही, तर जगभरातील लोकांच्या मनात त्यांच्यासाठी आदराची भावना आहे._
🔲🔲🔲
आपल्या राजाला सर्व जगात एवढा मान दिला जातो, हे पाहून छाती अभिमानाने आणखी फुगते. शिवाजी महाराजांनी शत्रूला त्यांच्या गनिमी कावा ही पद्धत वापरून खूप वेळा शह दिली. आता तुम्ही विचार करत असाल की, आम्ही शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याबद्दल का सांगत आहोत. ते तर आम्हाला माहित आहे…! हो ते सर्वांनाच माहित असेल, कारण शिवाजी महाराज आपल्या मनामनात घर करून आहेत. पण आज आम्ही तुम्हाला त्यांच्याच या रणनीतीबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर करत व्हिएतनामने बलाढ्य अश्या अमेरिकेचा पराभव केला होता. चला तर मग जाणून घेऊया की, व्हिएतनामने अमेरिकेला कश्याप्रकारे त्याचा अहंकार मोडीत काढत हरवले होते.
🔲🔲🔲
व्हिएतनाम युद्ध अगदी काही तासांत जिंकता येईल असे अमेरिकेला वाटत होते. त्यासाठी तशा स्वरुपाची तयारी देखील करण्यात आली होती. एकाबाजूला सुपरपावर अमेरिकेचे बलाढ्य लष्कर तर दुसरीकडे कमकुवत व्हिएतनामचे मोजकेच सैनिक होते. पण व्हिएतनामी लोकांची लढवय्यी वृत्ती आणि शिवाजी महाराजांच्या गनीमी काव्याचा पुरेपूर वापर यांच्या बळावर जोरदार संघर्ष तेथे उभा राहिला. अमेरिकेला या युद्धामधून अखेर माघार घ्यावी लागली. व्हिएतनामी जनतेचा, तेथील सरकारचा रोमहर्षक विजय झाला.
🔲🔲🔲
*अमेरिकेच्या बलाढ्य लष्कराचा थेट सामना करणे व्हिएतनामच्या सैन्याला काही शक्य नव्हते. त्यामुळे व्हिएतनामी लष्कराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनीमी काव्याचा सखोल अभ्यास केला होता. त्यानंतर युद्धनितीत सकारात्मक बदल केले. व्हिएतनामची भूमी गनीमी कावा करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे अमेरिकेच्या लष्कराला जागोजागी मोठी हानी सहन करावी लागली. अमेरिकेला व्हिएतनामवर पूर्णपणे विजय मिळवता आला नाही. अखेर दररोज होणारी प्रचंड लष्करी नुकसान बघून अमेरिकेने माघार घेण्याचा निर्णय घेतला. युद्धानंतर व्हिएतनामच्या राष्ट्रध्याक्षांनी शिवाजी महाराजांच्या गनीमी काव्याचा या युद्धात आम्ही वापर केल्याची कबुली दिली होती.*
🔲🔲🔲
व्हिएतनाम, लाओ आणि कंबोडियाच्या भूमिवर सुमारे २० वर्ष हे युद्ध लढले गेले. सुरवातील उत्तरेकडील व्हिएतनाम आणि दक्षिणेकडील व्हिएतनाममध्ये युद्ध झाले. उत्तर व्हिएतनामच्या बाजूला कम्युनिस्ट समर्थक देश होते तर दक्षिण व्हिएतनामला अमेरिकेसारख्या कम्युनिस्ट विरोधी देश होते. डिसेंबर १९५६ पासून एप्रिल १९७५ पर्यंत हे युद्ध चालले.
या युद्धात अमेरिका खऱ्या अर्थाने ९ फेब्रुवारी १९६५ रोजी उतरली. उत्तर व्हिएतनामचे नेतृत्व हो ची मिन्ह करीत होते. १९६९ मध्ये या युद्धाने गंभीर स्वरुप प्राप्त केले होते. अमेरिकेने चक्क पाच लाखांचे लष्कर या युद्धात उतरवले होते. परंतु, नित्याच्याच हिंसाचाराने त्रस्त झालेल्या अमेरिकी जनतेने सरकारवर दबाव निर्माण केला. शिवाय व्हिएतनाम झुकण्यास तयार नव्हता. अखेर अमेरिकेने परत जाण्याचा निर्णय घेतला.
🔲🔲🔲
या युद्धात उत्तर व्हिएतनाम आणि अमेरिकेच्या लष्कराचे मोठे नुकसान झाले. अमेरिकेला व्हिएतनामी लष्कराचा गनीमी कावा मोडून काढता आला नाही. अखेर माघार घ्यावी लागली. एखादे युद्ध न जिंकता तेथून माघार घेण्याची अमेरिकेची ही पहिलीच वेळ होती. या युद्धात व्हिएतनामच्या जनतेची अपरिमीत नुकसान झाले. कोट्यवधी लोक मृत्युमुखी पडले. ठिकठिकाणी मृतदेहांचे ढीग लागलेले होते. सगळीकडे आक्रोश नजरेस पडत होता. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांवर गोळीबार करण्यात आला. लहान मुले बेवारसपणे रस्त्यांवर फिरताना दिसत होते. जिवलगांच्या मृत्यूवर लोक शोक करत होते.
🔲🔲🔲
हे युद्ध जिंकून व्हिएतनामने जगाला दाखवून दिले की, कधीही स्वतःला कमी समजून कोणापुढेही लगेच हार न मानता, शेवटपर्यंत लढा देत शत्रूवर युक्तीने मात करावी आणि हा आदर्श सर्वांनी घेणे गरजेचे आहे.
➖➖➖➖➖➖➖
⚔🗡⚔🗡⚔🗡⚔
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा