घरातील लाईट चालू ठेवू नयेत, झोपताना सर्व बटणे बंद करावीत, घर स्वच्छ ठेवावं, जेवल्यानंतर ताट बेसिनमध्ये ठेवताना त्यातील उरलेले अन्न आधी बाजूला काढावं, वस्तू जागच्या जागी ठेवाव्यात… अशा छोट्या-छोट्या सवयी घराला संस्कार देतात. पण अलीकडच्या पिढीत या गोष्टींकडे दुर्लक्ष होताना दिसतं आणि ते पाहून मन नकळत खिन्न होतं.
किती वेळा सांगायचं, किती वेळा समजवायचं हा प्रश्न पडतो. आपण केवळ नियम शिकवत नसतो, तर आयुष्य जगण्याची शिस्त आणि संवेदनशीलता शिकवत असतो.
कधी कधी मनात निराशा येते, आपले शब्द वाया जात आहेत असं वाटतं. पण तरीही एक विश्वास कायम असतो — आपले विचार प्रामाणिक आणि सकारात्मक असतील, तर त्याचा परिणाम कधीतरी नक्की होतो.
ही “Gen Z” पिढी आहे… त्यांना आदेश नको असतात, संवाद हवा असतो. त्यांना फक्त सांगून चालत नाही, तर समजून घेत जवळ करावं लागतं. काळ बदलला आहे, पद्धती बदलल्या आहेत; पण संस्कारांची किंमत आजही तितकीच मोठी आहे.
@पप्पा🥹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा