फॉलोअर

२९ जून २०१९

ना पाऊस थांबला,  ना वारकरी..!
दिवेघाटात मुसळधार पावसात विठुरायाच्या नामघोषात माऊली चिंब

दिवेघाट : सतीश मोरे
पंढरीच्या  वारकऱ्यांना ऊन, वारा, पाऊस या कशाचीही तमा नसते, याचा प्रत्यय शुक्रवारी दिवेघाटात आला. एकिकडे पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी तुकोबा, ज्ञानोबाचे वारकरी  माऊलीचा नामघोष करत होते तर दुसरीकडे याच माऊलींना भेटण्यासाठी अवकाशात नभानेही सुंदर रूप धारण करत माऊलींच्या दर्शनासाठी जलधारा बरसायला सुरुवात केली. ना पावसाचा जोर कमी होता ना वारकऱ्यांचा उत्साह ! सुमारे दोन-अडीच तास वारकरी भर पावसात ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या जयघोषात आणि विठू माऊलीच्या  गजरात न्हाऊन गेले.
संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचा पुण्यातील दोन दिवसांचा मुक्काम आटोपून पालखी सोहळा शुक्रवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास सासवडकडे जायला निघाला. पुण्यात दोन दिवस वारकऱ्यांनी पुणेकरांचा पाहुणचार घेतला होता. पुण्यातील भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आळंदी वरून पुण्याला आलेली पालखी नाना पेठेत विसावल्यानंतर पुणेकरांच्या आनंदाला उधाण आले होते .दोन दिवस पुण्यामध्ये माऊलींचा उत्सव सुरू होता. बहुतांश शाळांना सुट्ट्या होत्या तर अनेक शासकीय , निमशासकीय कार्यालयांमध्ये उपस्थिती कमी होती. दोन दिवस पावसाने अधुनमधुन जोरदार हजेरी लावली होती. पुणेकरांचे दातृत्व पाहून  भारावलेल्या वारकऱ्यांनी आदरातिथ्य स्वीकारून गुरुवारी सकाळी ज्ञानोबा माऊलीचा पालखी सोहळा सासवडकडे रवाना झाला.
बाजारपेठेत दुतर्फा माऊलींच्या स्वागतासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. हडपसर येथे गाडीतळ परिसर चौकात माऊलीच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने भाविक उभे होते. दर्शन घेऊन सुखावलेले भाविक तृप्त होऊन माऊलीना निरोप देत होते. गेल्या काही वर्षात गेल्या पुणेकरांच्या उत्साहात अधिक भर पडली आहे. आळंदी ते पुणे आणि पुणे ते सासवड या दरम्यान अनेक पुणेकर पायी वारी करतात. अनेक महिला मंडळे, आयटी क्षेत्रातील नोकरदार, शिक्षक तसेच उद्योजक यांनी चालण्यासाठी दिंड्या तयार केल्या आहेत. या दिंडीला पुणेकर दिंडी, आयटी दिंडी, पर्यावरण दिंडी ,जलदिंडी अशा प्रकारची नावे असून आळंदी ते सासवड या दरम्यान हजारो पुणेकर वारीमध्ये सहभागी होत असतात.





हडपसर नंतर माऊलीने देवाची उरुळी या गावाकडे प्रस्थान केले. दरम्यान माऊलीच्या पालखीच्या पुढे असणाऱ्या अनेक खुल्या दिंड्या आणि मोकळ्या समाजातील लाखो वारकरी सकाळपासूनच दिवे घाटाकडे चालत होते. दुपारी बारा पर्यंत दिवे घाट भक्तीच्या महासागरात वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला होता. या मार्गावर सासवड बाजूने येणारी वाहतूक पोलिसांनी बंद केली होती. मात्र वारकऱ्यांचे साहित्य घेऊन जाणारे ट्रक, ट्रॅ्नटर,  टँकर हे पुण्यावरून सासवडच्या मार्गाला जात होते. रस्त्याच्या डाव्या बाजूला वारकरी आणि उजव्या बाजूला वारकऱ्यांच्या सेवेसाठी असणारी वाहने अशाप्रकारे वाहतूक बारा वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात सुरू होती.
दिवे घाटातील अवघड वळणे पार पडताना वारकऱ्यांना जराही थकवा येत नव्हता. कारण त्यांच्या मुखी होते माऊलीचे नाव. प्रत्येक वळणावर वारकरी झिम्मा फुगडीचा खेळ खेळत होते. काहीजण भारुड  गात मनोरंजन करत होते. काही वारकऱ्यांनी मृदंगाच्या ठेक्यावर माऊली माऊली असा जयघोष सुरू केला होता. वारकरी चालत होते. त्यांच्यात उत्साह संचारत होता. वारकऱ्यांसाठी खरे तर दुःख आणि संकट हा विषय म्हणजे एक आनंदी आव्हानच असते. घाट रुपी दुःख नामरुपी घोषात कधी संपले हे वारकऱ्यांना कळलेच नाही. वारकरी पुढे चालत होते आणि वारकऱ्यांचा हा उत्साह अधिकच दुणावत होता.
सकाळपासून या परिसरात सूर्य दर्शन नव्हते. वातावरण ढगाळ होते. साडेबाराच्या सुमारास आभाळ आणखीनच भरून आले .वारकऱ्यांचा उत्साह आणि वारकऱ्यांनी मध्ये असलेला आनंदाचा झरा पाहण्यासाठी आणि त्यामध्ये मिसळून जाण्यासाठी पर्जन्य राजाला सुद्धा राहवले नाही. जोरदार पाऊस सुरू झाला आणि वारकऱ्यांचा उत्साह वाढू लागला. पावसाची अडचण वारकऱ्यांसाठी काहीच नसते. दगड, चिखल, ऊन, वारा या सर्वांवर मात करून वारकरी चालत असतात. या कष्टरुपी प्रवासातून सुटकेसाठी पाऊस म्हणजे एक आनंदरूपी भेटच असते. घामामध्ये भिजलेल्या शरीराला पावसाच्या थेंबाच्या सुखद स्पर्शाने आनंद मिळत गेला. पावसात भिजण्याची पर्वा कुणालाच नव्हती. आजारी पडण्याची भीती कुणाला नव्हती. ज्याच्या मुखी माऊलीचे नाव नसते त्याला कसलीच अडचण येत नसते अशी वारकऱ्यांची भावना होती. पाऊस वाढत होता आणि वारकऱ्यांचा उत्साहही वाढत होता. मोकळ्या समाजामधून चालणाऱ्या अनेक वायकऱ्यांनी आता प्लास्टिकची खोळ डोक्यावर घेतली आणि चालायला सुरुवात केली. सुमारे दोन तास जोरदार पाऊस सुरू होता. मात्र वारकरी कुठेही थांबला नव्हता. थांबण्यासाठी एवढ्या लाखो वारकऱ्यांना निवारा थोडाच मिळणार होता !
घाटमाथ्यावर झेंडेवाडी गावात परिसरातील आणि सेवाभावी मंडळांनी तसेच पुणेकर दानशूर लोकांनी फार मोठ्या प्रमाणात सेवा दिली होती. घाटातून वर आलेल्या वारकऱ्यांसाठी चहा, पाणी, खिचडी ,जेवण, केळी, फळे याची रेलचेल होती. सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते वारकऱ्यांना हात जोडून माऊली चहा घ्या असा आग्रह करत होते. अनेक जण हाताला धरून वारकऱ्यांना भोजन कक्षामध्ये नेत होते. काहीजण पाय चेपत होते. वारकऱ्यांप्रती असणारा स्नेहभाव उफाळून वाहत होता. कारण हे वारकरी सतरा दिवस पायी चालत पंढरीला जाणार होते. आपणाला पंढरीला जाता येत नाही, मात्र पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांची जर सेवा केली, त्यांच्या हाताला आपला हात लागला तर तो हात पंढरपूरचा विठोबा पर्यंत पोहोचेल आणि आपले सुद्धा पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन होईल अशी भावना भाविकांची होती. पुणेकरांच्या सेवेची गणना कोणकरी अशी परिस्थिती या ठिकाणी होती.
पावसाच्या दमदार हजेरीनंतर वारकरी पूर्ण भिजलेले होते. साडेचारच्या सुमारास पाऊस थांबला. वारकरी चालत राहिले. चालता चालता अंगावरील कपडे कधी सुकले हे कळलेच नाहीत. माउलींच्या नामाचा आणि विठ्ठल दर्शनाचा ध्यास असलेल्या वारकऱ्यांचा हा उत्साह पाहून
अरे अरे वारकऱ्या। तुला नाही उन, वारा ।।
या मु्नताबाईच्या अभंगाची आठवण झाली.

२८ जून २०१९










🚩🚩🚩माझी वारी  🚩🚩🚩

  *आळंदी पुणे*
  *२५/०६/२०१९*

राम कृष्ण हरी, 

तीन वर्षे पंढरीची वारी पुर्ण केल्यानंतर गत वर्षी झालेली अर्धी वारी याची हुरहूर मनाला लागलेली होती, त्यामुळे चालू वर्षी पूर्ण वारी करण्याचा संकल्प केला होता. सकाळी सहा वाजता उठलो. बुधवारी दुपारी बारा वाजेपर्यंत आळंदीला पोहोचण्याची गरज होती. रणजीत पाटील यांच्या कार मधून नऊ आम्ही सगळे आळंदीला जायला निघालो. यावर्षी प्रथमच वारी काय असते हे पाहण्याची उत्सुकता असलेले आमचे मित्र सह्याद्री इक्विपमेंटचे मालक देशमुख साहेब मुद्दामहून आमच्याबरोबर आलेले होते. पुढील अठरा दिवस घरदार पाहायला मिळणार नाही याचे थोडीस दुःख होतं. कारमध्ये बसून पुण्याला जायला निघालो. सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी वारी निमित्त सर्व वाहनांना घेऊ नये अशी सूचना देऊनही सातारा जिल्ह्यातील टोल नाक्यावर वारीचे ट्रक व इतर वाहनांना टोलसाठी हुज्जत घालण्याची वेळ आल्याचे पाहायला मिळाले. पुणे जिल्ह्यात शिवापुर टोल नाक्यावर मात्र हा अनुभव आला नाही, पुणेकरांना वारीचे महत्त्व किती आहे आणि वारकऱ्यांच्या  किती सन्मान आहे याचा प्रत्यय आला, सातारा जिल्ह्यातील आदिवासी टोल नाक्यावर मात्र वारीतील वाहनचालकांना वाईट अनुभव आले.

दुपारी दिडच्या सुमारास आळंदीत पोचलो,वैष्णवांचा मेळा आळंदीत जमा होऊ लागला होता. इंद्रायणीवर असलेल्या पुलावरून माऊलींच्या मंदिराचे दुरून दर्शन घेतले. यावर्षी प्रथमच जाणवले माऊलींच्या सोहळ्यासाठी वारकऱ्यांची गर्दी गत दोन तीन वर्षाच्या तुलनेत फार कमी होती. या वर्षी पडलेला भीषण दुष्काळ आणि जून महिना उलटत आला तरी महाराष्ट्रातील अनेक भागात न पडलेला पाऊस हे या कमी उपस्थिती कारण असल्याचे विविध भागातील भेटलेल्या व्यापाऱ्यांनी 'पुढारी ऑनलाइनशी बोलताना सांगितले. 

इंद्रायणी पात्रामध्ये गेलो,हात पाय स्वच्छ धुऊन नमस्कार केला आणि पुढे आमच्या कराडकराच्या मठामध्ये पोहोचलो. या मठात दुपारच्या पंगती संपल्या होत्या , बारा नंबर दिंडीतील वारकरी विणेकरी निवांत पहुडले होते. विठ्ठल मंदिरात माऊलींचे आणि वैकुंठवासी मामांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन आम्ही सर्वजण जेवायला बसलो.जेवण झाल्यानंतर लगेच माऊलींच्या मंदिराकडे प्रस्थान सोहळा च्या कार्यक्रमासाठी जायला निघालो.

माऊली सोहळ्यासाठी ज्ञानेश्‍वर मंदिरात एकेक दिंड्या जात होत्या. पूर्ण आळंदी गाव माउलीमय झाले होते वारकरी माऊलींचा उत्साह वाढत होता. मंदिराच्या प्रवेशद्वारा नजीक आमचे मार्गदर्शक सोहळ्याचे प्रमुख चोपदारर माननीय राजाभाऊ माऊली यांची भेट झाली. कडक शिस्तीच्या राजाभाऊ यांनी माऊलीच्या मंदिरात फक्त वारकरीच जावेत, दिंडी मधून कोणीही हौशीगौशी घुसू नयेत यावर चांगलेच लक्ष ठेवले होते. राजाभाऊंना नमस्कार करून पुढे जायला निघालो.

बारामती येथील युवा नेते रोहित पवार यांची योगायोगाने भेट झाली. रोहिदास दादांशी गप्पा मारल्या. कराडहुन आलेल्या आम्हा वारकऱ्यांची, माझी त्यानी वैयक्तिक चौकशी केली. किती वर्षे वारी करता, वाढीचा अनुभव कसा आहे, पुढारी मध्ये किती वर्षे काम करतात याची इत्यंभूत माहिती घेताना रोहित पवार यांच्याकडे एक वेगळा आदरार्थी भाव पाहिला मिळाला.रोहित पवार यांची वारी निमित्त एक छोटीशी मुलाखत घेतली, सोबत फोटो काढले ,कराडला येण्याचे त्यांना निमंत्रण दिले, त्यानीही आम्हाला बारामती मध्ये आल्यानंतर कधी मला फोन करा असा असे आग्रहाचे निमंत्रण दिले. 

त्यानंतर आम्ही माऊलींच्या मंदिरात जाण्यासाठी पुढे निघालो. माऊली मंदिराच्या प्रवेशद्वारावर पोलीस खात्याने अतिशय कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मंदिरात कमीत कमी वारकरी जावेत आणि फार गर्दी होऊन गोंधळ निर्माण होणे दाटीवाटी होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष ठेवले होते. चारच्या सुमारास माऊली मंदिरात प्रवेश केला. मंदिराला केलेली सजावट आणि तेथील भक्तिमय वातावरणात वातावरणात आलेला वेगळा सुगंध पाहून प्रवासाचा सर्व कंटाळा निघून गेला. आता मंदिरांमध्ये येथे एक दिंडी येत होती. वारकऱ्यांचा उत्साह वाढू लागला होता, प्रत्येक दिंडी येऊन माऊलींच्या मंदिरासमोर ज्ञानोबा माऊली तुकाराम चा जयघोष करत होती, कोणी नाचत होता, कुणी गात होता. माऊली माऊली माऊली नावाचा जयघोष सुरू होता. साडेपाचच्या सुमारास बहुतांश दिंड्यांचे आगमन मंदिरामध्ये झाले होते.

आत माऊलींच्या प्रस्थानाची तयारी करण्यात गावकरी आणि विश्वस्त मंडळ व्यस्त होते तर बाहेर शेकडो वारकरी टाळकरी झेंडेकरी विणेकरी मृदंग वादक यांनी माऊली नावाचा ठेका,ताल धरला होता. सहाच्या सुमारासमाऊलींचेमानाचचे अश्व मंदिरा मध्ये दाखल झाले आणि पुन्हा वारकऱ्यांचा उत्साह वाढला. अश्वाला स्पर्श करण्यासाठी अनेकजण पुढे गेले. माऊलींच्या अश्वाने मंदिराला प्रदक्षिणा घालून दोन्ही अश्व पुन्हा मंदिरासमोरून थांबले. एव्हाना साडे सहा वाजले होते .सुमारे अडीच तीन तास टाळ-मृदंगाच्या तालावर नाचून दमलेले ,थकलेले वारकरी आता माऊली केव्हा येणार याची वाट पाहत होते. 

सातच्या सुमारास माऊलींची आरती झाली. पंच मंडळींची आज चर्चा सुरू होती, बाहेर वारकरी माऊलींच्या पालखीच्या आगमनाची वाट पाहत होते. साडेसात वाजले, वारकऱ्यांचा  उत्साह जराही कमी झाला नव्हता, अनेकांचे लक्ष माऊलींच्या कळसाकडे होते. मंदिराचा कळस माऊली मंदिरातून बाहेर पडतात तेव्हा हालतो, मंदिराला सुद्धा माऊली येथून जातात हे दुःख सहन होत नाही, अशी वारकऱ्यांची भावना आहे. अनेकांचे लक्ष त्या कळसाकडे होते.

घामाने चिंब झालेले वारकरी पावसाची प्रतीक्षा करत होते. हवेची थंड झुळूक मधूनच त्यांना गारवा देत होती मात्र पाऊस काही येत नव्हता.  माऊलीच्या नामामध्ये ते तल्लीन होऊन गेल्यामुळे त्यांना माऊलींच्या येण्याची प्रतीक्षा होती, दर्शनाची ओढ होती. सात वाजून 30 मिनिटांच्या सुमारास माऊलींची पालखी मंदिराबाहेर आली आणि वारकऱ्यांनी माऊली माऊली नामाचा जोरदार जल्लोष केला. अवघी आळंदी माऊली नामाने दुमदुमून गेली. पालखी जवळ जाऊन दर्शन घेण्यासाठी वारकरी पुढे सरकले, आळंदी ग्रामस्थ पालखी आपल्या खांद्यावर घेऊन नाचवत होते. मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी मंदिरा बाहेर पडली आणि आळंदी गावात वारकऱ्यांचा उत्साह पुन्हा संचारला.

माऊलींची पालखी नगर प्रदक्षणासाठी बाहेर पडली आणि आम्ही मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. आळंदी गावाबाहेर एक किलोमीटर अंतरावर आमची गाडी उभी केली होती तिथे पोहचलो. तीन-चार तास मोबाईलवर खूप काम झाल्यामुळे बॅटरी डाउन झाली होती मोबाईल चार्जिंग लावले, काही फोटो व बातम्याचे मुद्दे ऑफिसला पाठवले. चहा पाणी घेतले आणि पुन्हा पुण्याच्या दिशेने चालायला लागलो.

या अगोदर तीन वारी करताना मी आळंदी मध्ये मुक्काम केला होता व पहाटे पाच वाजता चालावयास सुरुवात केली होती मात्र यावर्षी थोडा बदल करण्याचे ठरवले .सायंकाळी साडेआठच्या सुमारास माझ्यासोबत असलेले रणजीत पाटील, माणिक पाटील ,प्रकाश पाटील आम्ही चौघांनी पुण्याच्या दिशेने चालावयास सुरुवात केली. आमच्या सोबत आमच्या सारखेच रात्री चालणारे अनेक वारकरी पुण्याच्या दिशेने निघाले होते मात्र ही संख्या फार कमी होती. आळंदी सोडून बाहेर आलो माऊली माऊली माऊली नामजप करत आम्ही मार्गक्रमण करत होतो. रस्त्याकडेला उभारण्यात आलेल्या खाजगी तंबत, फूटपाथवर व अनेकांनी निवारा तयार केला होता. रात्रीचे एक वेगळेच वारी दर्शन मला पहावयास मिळाले.पुलाखाली, रस्त्याकडेला, फुटपाथवर, दुकान गाळ्याखाली,पार्किंग जवळ एटीएम सेंटरच्या शेजारी मिळेल त्या जागेवर ारकर्‍याने निवारा चे स्थान शोधले होते.

तहान लागली होती.थांबण्याचा निर्णय घेतला. चौकात वसंतराव भोसेकर लोंढे प्रतिष्ठानच्यावतीने मंडप उभारण्याचे काम चालू होते. कार्यकर्ते पाण्याच्या बाटल्या त्या ठिकाणी आणून ठेवत होते. पाण्याची बॉटल मागितली, सहज बोलता-बोलता चौकशी केली माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष वसंतराव भोसेकर यांच्या वतीने प्रत्येक वर्षी वारकऱ्यांना एक लिटरच्या   बाराहजार पाणी बाटली आणि दिंडी प्रमुखांना विठ्ठलाची मूर्ती भेट दिली जाते.  वसंतराव भोसेकर  नाना यांच्या विषयी माहिती विचारली, तेवढ्यात नानाच आले, नानांनी आम्हाला सर्व माहिती सांगितले.नानांचे चुलते वैकुंठवासी कीर्तनकार लोंढे माऊली फार मोठी विभूती होती. लोंढे माऊली यांनी पंढरपुरात आपला देह ठेवण्यापूर्वी त्यांनी आपल्या नावावरील 4 एकर जमिन वारकरी संप्रदायाला दान केली होती. वसंतराव नानामाऊली त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत.

वसंतराव भोसेकर यांचा एक विचार मला खूप आवडला. महाराष्ट्रात अनेक संत जन्माला आलेले आहेत आणि बहुतांश देव उत्तर भारतात जन्माला आलेले आहेत. महाराष्ट्रातील संतांनी ही भूमी संतविचाराने आणि बुद्धिमत्तेच्या समृद्ध केली, एकात्मता वाढवली, जातीभेद संपवले आणि महाराष्ट्र पुढे पुढे गेला.याच महाराष्ट्रात उत्तर भारतातील, देवाच्या भूमीतील लोक नोकरी ,कामासाठी येतात. इतका मोठा बदल संतांनी महाराष्ट्रात विचार वैचारीक प्रगल्भतेवर घडवला आहे. मला हा विचार खूप आवडला ना नमस्कार करून पुढे निघालो

सहा किलोमीटर अंतर पार पडल्यानंतर एका ठिकाणी पावणे अकराच्या सुमारास थांबण्याचा निर्णय घेतला. शुद्ध शाकाहारी उमंग हॉटेलमध्ये भोजन केले . इंग्लंड ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅच शेवटच्या चार ओव्हर पाहण्याचा आनंद घेतला. तेथून बाहेर आलो पुणे शिवाजीनगर किती किलोमीटर आहे याचा अंदाज घेतला, पुन्हा चालण्याचा निर्णय घेतला. साडेअकरा वाजता आम्ही पुण्याकडे चालावयास निघालो. 

रस्त्यावर वारकऱ्यांची गर्दी खुप कमी होती. दोन किलोमीटर झाले की आराम करायचा, निवांत चालत राहायचे असे आम्ही ठरवले होते. मिलिटरीच्या एरिया असलेल्या दिघी भागात आम्ही बाराच्या सुमारास पोचलो. एका ठिकाणी रस्त्यावरच बैठक मारली तेवढ्यात ग्राउंड वर असलेला एक फौजी तेथे आला. साहब यहा बैठने का नही, असे आम्हाला सांगू लागला. माऊली पाच मिनिट बसू द्या अशी त्याला विनंती केली. त्यानेही ती विनंती मान्य केली. पाच मिनिटांच्या विश्रांतीनंतर पुन्हा चालायला सुरुवात केली . गेल्या तीन वर्षातील वारीच्या गमती जमती वेगवेगळे अनुभव यावर चर्चा करत रणजीत पाटील आणि मी पुढे होतो तर आमचे दोन सहकारी पाठीमागे होते.

विश्रांतवाडी दोन किलोमीटर अंतरावर होती, एका बाकड्यावर आम्ही बैठक मारली. साडेबारा वाजले होते. रस्त्याकडेला मिठाई आणि चहाची दुकाने सुरू होती. स्थानिक ग्रामस्थ तिथे बसले होते. त्यांच्यासोबत  गप्पा मारल्या आणि आणि पुन्हा चालायला सुरुवात केली. एकच्या सुमारास आळंदी रोड पोलीस पोलीस चौकी चौकातून पुढे आलो. आता शरीर आणि मन दोन्ही साथ देत नव्हते. त्यामुळे थांबायचा निर्णय घेतला. रात्रीचा मुक्काम करण्यासाठी जागा शोधू लागलो. पुणे शहरांमध्ये अनेक नातेवाईक व मित्र आहेत त्यांनी फोन करून मुक्कामाला यावे असे कळवले होते,मात्र रात्रीच्या दिड वाजता कोणाला उठवायला जायचे, वारकऱ्यांच्या बरोबर वारकऱ्यांचे सारखे रहायला जी मजा आहे, ती घरामध्ये नाही असे नानानी बोलून दाखवले, मग मग झोपण्यासाठी स्वच्छ जागा शिरू लागलो. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पुणेकरांनी अनेक ठिकाणी स्वागत कक्ष उभे केले आहेत, मंडप उभे केले आहेत अशा मंडपामध्ये अनेक वारकरी झोपलेले आम्ही पाहिले होते. असाच एक मंडप पाहून त्या स्टेजवर अंथरूण टाकले.आमची गाडी शेजारी उभी केली आणि मध्यरात्री दीडच्या सुमारास अंथरुणावर अंग टाकून गेले.

माऊलींच्या कृपेने सर्व काही ठीक झाले. वारीचा अनुभव आज पासून रोज आपल्याला माझी वारी या माध्यमातून शेअर करणार आहोत

आपणास आवडेल अशी सदिच्छा.

 😌जय माऊली😌

माऊली सतीश मोरे

Also available at


🚩🚩🚩माझी वारी  🚩🚩🚩

२६ जून २०१९

माझी वारी 1 आळंदी

🚩🚩🚩माझी वारी  🚩🚩🚩

सतीश मोरे

karawadikarad.blogspot.com

  *आळंदी पुणे*
  *२५/०६/२०१९*

राम कृष्ण हरी,

तीन वर्षे पंढरीची वारी पुर्ण केल्यानंतर गत वर्षी झालेली अर्धी वारी याची हुरहूर मनाला लागलेली होती, त्यामुळे चालू वर्षी पूर्ण वारी करण्याचा संकल्प केला होता. सकाळी सहा वाजता उठलो. बुधवारी दुपारी बारा वाजेपर्यंत आळंदीला पोहोचण्याची गरज होती. रणजीत पाटील यांच्या कार मधून नऊ आम्ही सगळे आळंदीला जायला निघालो. यावर्षी प्रथमच वारी काय असते हे पाहण्याची उत्सुकता असलेले आमचे मित्र सह्याद्री इक्विपमेंटचे मालक देशमुख साहेब मुद्दामहून आमच्याबरोबर आलेले होते. पुढील अठरा दिवस घरदार पाहायला मिळणार नाही याचे थोडीस दुःख होतं. कारमध्ये बसून पुण्याला जायला निघालो. सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी वारी निमित्त सर्व वाहनांना घेऊ नये अशी सूचना देऊनही सातारा जिल्ह्यातील टोल नाक्यावर वारीचे ट्रक व इतर वाहनांना टोलसाठी हुज्जत घालण्याची वेळ आल्याचे पाहायला मिळाले. पुणे जिल्ह्यात शिवापुर टोल नाक्यावर मात्र हा अनुभव आला नाही, पुणेकरांना वारीचे महत्त्व किती आहे आणि वारकऱ्यांच्या  किती सन्मान आहे याचा प्रत्यय आला, सातारा जिल्ह्यातील आदिवासी टोल नाक्यावर मात्र वारीतील वाहनचालकांना वाईट अनुभव आले.

दुपारी दिडच्या सुमारास आळंदीत पोचलो,वैष्णवांचा मेळा आळंदीत जमा होऊ लागला होता. इंद्रायणीवर असलेल्या पुलावरून माऊलींच्या मंदिराचे दुरून दर्शन घेतले. यावर्षी प्रथमच जाणवले माऊलींच्या सोहळ्यासाठी वारकऱ्यांची गर्दी गत दोन तीन वर्षाच्या तुलनेत फार कमी होती. या वर्षी पडलेला भीषण दुष्काळ आणि जून महिना उलटत आला तरी महाराष्ट्रातील अनेक भागात न पडलेला पाऊस हे या कमी उपस्थिती कारण असल्याचे विविध भागातील भेटलेल्या व्यापाऱ्यांनी 'पुढारी ऑनलाइनशी बोलताना सांगितले.

इंद्रायणी पात्रामध्ये गेलो,हात पाय स्वच्छ धुऊन नमस्कार केला आणि पुढे आमच्या कराडकराच्या मठामध्ये पोहोचलो. या मठात दुपारच्या पंगती संपल्या होत्या , बारा नंबर दिंडीतील वारकरी विणेकरी निवांत पहुडले होते. विठ्ठल मंदिरात माऊलींचे आणि वैकुंठवासी मामांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन आम्ही सर्वजण जेवायला बसलो.जेवण झाल्यानंतर लगेच माऊलींच्या मंदिराकडे प्रस्थान सोहळा च्या कार्यक्रमासाठी जायला निघालो.

माऊली सोहळ्यासाठी ज्ञानेश्‍वर मंदिरात एकेक दिंड्या जात होत्या. पूर्ण आळंदी गाव माउलीमय झाले होते वारकरी माऊलींचा उत्साह वाढत होता. मंदिराच्या प्रवेशद्वारा नजीक आमचे मार्गदर्शक सोहळ्याचे प्रमुख चोपदारर माननीय राजाभाऊ माऊली यांची भेट झाली. कडक शिस्तीच्या राजाभाऊ यांनी माऊलीच्या मंदिरात फक्त वारकरीच जावेत, दिंडी मधून कोणीही हौशीगौशी घुसू नयेत यावर चांगलेच लक्ष ठेवले होते. राजाभाऊंना नमस्कार करून पुढे जायला निघालो.

बारामती येथील युवा नेते रोहित पवार यांची योगायोगाने भेट झाली. रोहिदास दादांशी गप्पा मारल्या. कराडहुन आलेल्या आम्हा वारकऱ्यांची, माझी त्यानी वैयक्तिक चौकशी केली. किती वर्षे वारी करता, वाढीचा अनुभव कसा आहे, पुढारी मध्ये किती वर्षे काम करतात याची इत्यंभूत माहिती घेताना रोहित पवार यांच्याकडे एक वेगळा आदरार्थी भाव पाहिला मिळाला.रोहित पवार यांची वारी निमित्त एक छोटीशी मुलाखत घेतली, सोबत फोटो काढले ,कराडला येण्याचे त्यांना निमंत्रण दिले, त्यानीही आम्हाला बारामती मध्ये आल्यानंतर कधी मला फोन करा असा असे आग्रहाचे निमंत्रण दिले.

त्यानंतर आम्ही माऊलींच्या मंदिरात जाण्यासाठी पुढे निघालो. माऊली मंदिराच्या प्रवेशद्वारावर पोलीस खात्याने अतिशय कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मंदिरात कमीत कमी वारकरी जावेत आणि फार गर्दी होऊन गोंधळ निर्माण होणे दाटीवाटी होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष ठेवले होते. चारच्या सुमारास माऊली मंदिरात प्रवेश केला. मंदिराला केलेली सजावट आणि तेथील भक्तिमय वातावरणात वातावरणात आलेला वेगळा सुगंध पाहून प्रवासाचा सर्व कंटाळा निघून गेला. आता मंदिरांमध्ये येथे एक दिंडी येत होती. वारकऱ्यांचा उत्साह वाढू लागला होता, प्रत्येक दिंडी येऊन माऊलींच्या मंदिरासमोर ज्ञानोबा माऊली तुकाराम चा जयघोष करत होती, कोणी नाचत होता, कुणी गात होता. माऊली माऊली माऊली नावाचा जयघोष सुरू होता. साडेपाचच्या सुमारास बहुतांश दिंड्यांचे आगमन मंदिरामध्ये झाले होते.

आत माऊलींच्या प्रस्थानाची तयारी करण्यात गावकरी आणि विश्वस्त मंडळ व्यस्त होते तर बाहेर शेकडो वारकरी टाळकरी झेंडेकरी विणेकरी मृदंग वादक यांनी माऊली नावाचा ठेका,ताल धरला होता. सहाच्या सुमारासमाऊलींचेमानाचचे अश्व मंदिरा मध्ये दाखल झाले आणि पुन्हा वारकऱ्यांचा उत्साह वाढला. अश्वाला स्पर्श करण्यासाठी अनेकजण पुढे गेले. माऊलींच्या अश्वाने मंदिराला प्रदक्षिणा घालून दोन्ही अश्व पुन्हा मंदिरासमोरून थांबले. एव्हाना साडे सहा वाजले होते .सुमारे अडीच तीन तास टाळ-मृदंगाच्या तालावर नाचून दमलेले ,थकलेले वारकरी आता माऊली केव्हा येणार याची वाट पाहत होते.

सातच्या सुमारास माऊलींची आरती झाली. पंच मंडळींची आज चर्चा सुरू होती, बाहेर वारकरी माऊलींच्या पालखीच्या आगमनाची वाट पाहत होते. साडेसात वाजले, वारकऱ्यांचा  उत्साह जराही कमी झाला नव्हता, अनेकांचे लक्ष माऊलींच्या कळसाकडे होते. मंदिराचा कळस माऊली मंदिरातून बाहेर पडतात तेव्हा हालतो, मंदिराला सुद्धा माऊली येथून जातात हे दुःख सहन होत नाही, अशी वारकऱ्यांची भावना आहे. अनेकांचे लक्ष त्या कळसाकडे होते.

घामाने चिंब झालेले वारकरी पावसाची प्रतीक्षा करत होते. हवेची थंड झुळूक मधूनच त्यांना गारवा देत होती मात्र पाऊस काही येत नव्हता.  माऊलीच्या नामामध्ये ते तल्लीन होऊन गेल्यामुळे त्यांना माऊलींच्या येण्याची प्रतीक्षा होती, दर्शनाची ओढ होती. सात वाजून 30 मिनिटांच्या सुमारास माऊलींची पालखी मंदिराबाहेर आली आणि वारकऱ्यांनी माऊली माऊली नामाचा जोरदार जल्लोष केला. अवघी आळंदी माऊली नामाने दुमदुमून गेली. पालखी जवळ जाऊन दर्शन घेण्यासाठी वारकरी पुढे सरकले, आळंदी ग्रामस्थ पालखी आपल्या खांद्यावर घेऊन नाचवत होते. मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी मंदिरा बाहेर पडली आणि आळंदी गावात वारकऱ्यांचा उत्साह पुन्हा संचारला.

माऊलींची पालखी नगर प्रदक्षणासाठी बाहेर पडली आणि आम्ही मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. आळंदी गावाबाहेर एक किलोमीटर अंतरावर आमची गाडी उभी केली होती तिथे पोहचलो. तीन-चार तास मोबाईलवर खूप काम झाल्यामुळे बॅटरी डाउन झाली होती मोबाईल चार्जिंग लावले, काही फोटो व बातम्याचे मुद्दे ऑफिसला पाठवले. चहा पाणी घेतले आणि पुन्हा पुण्याच्या दिशेने चालायला लागलो.

या अगोदर तीन वारी करताना मी आळंदी मध्ये मुक्काम केला होता व पहाटे पाच वाजता चालावयास सुरुवात केली होती मात्र यावर्षी थोडा बदल करण्याचे ठरवले .सायंकाळी साडेआठच्या सुमारास माझ्यासोबत असलेले रणजीत पाटील, माणिक पाटील ,प्रकाश पाटील आम्ही चौघांनी पुण्याच्या दिशेने चालावयास सुरुवात केली. आमच्या सोबत आमच्या सारखेच रात्री चालणारे अनेक वारकरी पुण्याच्या दिशेने निघाले होते मात्र ही संख्या फार कमी होती. आळंदी सोडून बाहेर आलो माऊली माऊली माऊली नामजप करत आम्ही मार्गक्रमण करत होतो. रस्त्याकडेला उभारण्यात आलेल्या खाजगी तंबत, फूटपाथवर व अनेकांनी निवारा तयार केला होता. रात्रीचे एक वेगळेच वारी दर्शन मला पहावयास मिळाले.पुलाखाली, रस्त्याकडेला, फुटपाथवर, दुकान गाळ्याखाली,पार्किंग जवळ एटीएम सेंटरच्या शेजारी मिळेल त्या जागेवर ारकर्‍याने निवारा चे स्थान शोधले होते.

तहान लागली होती.थांबण्याचा निर्णय घेतला. चौकात वसंतराव भोसेकर लोंढे प्रतिष्ठानच्यावतीने मंडप उभारण्याचे काम चालू होते. कार्यकर्ते पाण्याच्या बाटल्या त्या ठिकाणी आणून ठेवत होते. पाण्याची बॉटल मागितली, सहज बोलता-बोलता चौकशी केली माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष वसंतराव भोसेकर यांच्या वतीने प्रत्येक वर्षी वारकऱ्यांना एक लिटरच्या   बाराहजार पाणी बाटली आणि दिंडी प्रमुखांना विठ्ठलाची मूर्ती भेट दिली जाते.  वसंतराव भोसेकर  नाना यांच्या विषयी माहिती विचारली, तेवढ्यात नानाच आले, नानांनी आम्हाला सर्व माहिती सांगितले.नानांचे चुलते वैकुंठवासी कीर्तनकार लोंढे माऊली फार मोठी विभूती होती. लोंढे माऊली यांनी पंढरपुरात आपला देह ठेवण्यापूर्वी त्यांनी आपल्या नावावरील 4 एकर जमिन वारकरी संप्रदायाला दान केली होती. वसंतराव नानामाऊली त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत.

वसंतराव भोसेकर यांचा एक विचार मला खूप आवडला. महाराष्ट्रात अनेक संत जन्माला आलेले आहेत आणि बहुतांश देव उत्तर भारतात जन्माला आलेले आहेत. महाराष्ट्रातील संतांनी ही भूमी संतविचाराने आणि बुद्धिमत्तेच्या समृद्ध केली, एकात्मता वाढवली, जातीभेद संपवले आणि महाराष्ट्र पुढे पुढे गेला.याच महाराष्ट्रात उत्तर भारतातील, देवाच्या भूमीतील लोक नोकरी ,कामासाठी येतात. इतका मोठा बदल संतांनी महाराष्ट्रात विचार वैचारीक प्रगल्भतेवर घडवला आहे. मला हा विचार खूप आवडला ना नमस्कार करून पुढे निघालो

सहा किलोमीटर अंतर पार पडल्यानंतर एका ठिकाणी पावणे अकराच्या सुमारास थांबण्याचा निर्णय घेतला. शुद्ध शाकाहारी उमंग हॉटेलमध्ये भोजन केले . इंग्लंड ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅच शेवटच्या चार ओव्हर पाहण्याचा आनंद घेतला. तेथून बाहेर आलो पुणे शिवाजीनगर किती किलोमीटर आहे याचा अंदाज घेतला, पुन्हा चालण्याचा निर्णय घेतला. साडेअकरा वाजता आम्ही पुण्याकडे चालावयास निघालो.

रस्त्यावर वारकऱ्यांची गर्दी खुप कमी होती. दोन किलोमीटर झाले की आराम करायचा, निवांत चालत राहायचे असे आम्ही ठरवले होते. मिलिटरीच्या एरिया असलेल्या दिघी भागात आम्ही बाराच्या सुमारास पोचलो. एका ठिकाणी रस्त्यावरच बैठक मारली तेवढ्यात ग्राउंड वर असलेला एक फौजी तेथे आला. साहब यहा बैठने का नही, असे आम्हाला सांगू लागला. माऊली पाच मिनिट बसू द्या अशी त्याला विनंती केली. त्यानेही ती विनंती मान्य केली. पाच मिनिटांच्या विश्रांतीनंतर पुन्हा चालायला सुरुवात केली . गेल्या तीन वर्षातील वारीच्या गमती जमती वेगवेगळे अनुभव यावर चर्चा करत रणजीत पाटील आणि मी पुढे होतो तर आमचे दोन सहकारी पाठीमागे होते.

विश्रांतवाडी दोन किलोमीटर अंतरावर होती, एका बाकड्यावर आम्ही बैठक मारली. साडेबारा वाजले होते. रस्त्याकडेला मिठाई आणि चहाची दुकाने सुरू होती. स्थानिक ग्रामस्थ तिथे बसले होते. त्यांच्यासोबत  गप्पा मारल्या आणि आणि पुन्हा चालायला सुरुवात केली. एकच्या सुमारास आळंदी रोड पोलीस पोलीस चौकी चौकातून पुढे आलो. आता शरीर आणि मन दोन्ही साथ देत नव्हते. त्यामुळे थांबायचा निर्णय घेतला. रात्रीचा मुक्काम करण्यासाठी जागा शोधू लागलो. पुणे शहरांमध्ये अनेक नातेवाईक व मित्र आहेत त्यांनी फोन करून मुक्कामाला यावे असे कळवले होते,मात्र रात्रीच्या दिड वाजता कोणाला उठवायला जायचे, वारकऱ्यांच्या बरोबर वारकऱ्यांचे सारखे रहायला जी मजा आहे, ती घरामध्ये नाही असे नानानी बोलून दाखवले, मग मग झोपण्यासाठी स्वच्छ जागा शिरू लागलो. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पुणेकरांनी अनेक ठिकाणी स्वागत कक्ष उभे केले आहेत, मंडप उभे केले आहेत अशा मंडपामध्ये अनेक वारकरी झोपलेले आम्ही पाहिले होते. असाच एक मंडप पाहून त्या स्टेजवर अंथरूण टाकले.आमची गाडी शेजारी उभी केली आणि मध्यरात्री दीडच्या सुमारास अंथरुणावर अंग टाकून गेले.

माऊलींच्या कृपेने सर्व काही ठीक झाले. वारीचा अनुभव आज पासून रोज आपल्याला माझी वारी या माध्यमातून शेअर करणार आहोत

आपणास आवडेल अशी सदिच्छा.

 😌जय माऊली😌

माऊली सतीश मोरे

Also available at

karawadikarad.blogspot.com

🚩🚩🚩माझी वारी  🚩🚩🚩

२१ जून २०१९

आंतरराष्ट्रीय योग दिन

😔🌎😔🌎😔🌎😔
➖➖➖➖➖➖➖
_*☑ आज २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन... / International Yoga Day....*_

_*📌 २१ जून हाच दिवस योग दिवस म्हणून का निवडला...? जाणून घ्या “योग” बद्दल बरंच काही...*_
➖➖➖➖➖➖➖
_*📚

_योग हा व्यायामाचा एक असा प्रभावशाली प्रकार आहे ज्याच्या माध्यमातून केवळ शरीराच्या विविध अवयवांमधीलच नाही तर मन, शरीर आणि आत्मा यांच्यातील संतुलन राखले जाते. योगाभ्यासामुळे शारीरिक व्याधींबरोबरच मानसिक विकारांवर सुद्धा विजय मिळवता येऊ शकतो. *योग या शब्दाची उत्पत्ती युज या संस्कृत शब्दापासून झाली आहे. याचा अर्थ आत्म्याचा परमात्म्याशी संयोग किंवा आत्म्याचा चराचरात व्यापून उरलेल्या चेतनेशी संयोग.* योग पद्धती जवळपास दहा हजार वर्षांपेक्षा अधिक काळापासून आचरणात आणला जाते आहे. वैदिक संहितांनुसार तपस्वी, ऋषी यांच्या संदर्भात प्राचीन काळापासून योगाभ्यासाचे संदर्भ आढळतात....._
🔲🔲🔲

_📍जागतिक योग दिन या उपक्रमाचे सूतोवाच भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील आपल्या भाषणात या उपक्रमाचे केले होते ज्यात त्यांनी म्हटले होते, “योग ही भारताच्या प्राचीन परंपरेची एक अमूल्य देणगी आहे. योग हे मेंदू आणि शरीराच्या एकतेचं प्रतीक आहे. मनुष्य आणि प्रकृती यांच्यात सामंजस्य आहे; योग हा विचार, संयम आणि पूर्णत्व प्रदान करणारा आहे त्याचप्रमाणे प्रकृतीस्वास्थ्यासाठी आणि विश्वाच्या भल्यासाठी एक समग्र दृष्टिकोण प्रदान करणारा आहे. योगाभ्यासाचा आग्रह हा फक्त व्यायामापुरता नाही तर स्वतःच्या आत एक एकात्मतेची भावना जागवण्यासाठी आहे. आपल्या बदलत्या जीवनशैलीमध्ये योग हा चेतना बनून, आपल्या परिस्थितीतील बदलाशी जुळवून घ्यायला आपल्याला मदत करू शकतो. चला तर, एक आंतरराष्ट्रीय योग दिवस दत्तक घेण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू करूयात”_
🔲🔲🔲

_*📌 यानंतर २१ जून हा दिवस “आंतरराष्ट्रीय योग दिवस” म्हणून घोषित करण्यात आला. ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रातील १७७ सभासदांद्वारे २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता मिळाली. प्रधानमंत्री मोदी यांचा हा प्रस्ताव ९० दिवसांच्या आत पूर्ण बहुमताने पारित करण्यात आला. हा संयुक्त राष्ट्रातील सर्वात कमी काळात पारित झालेला ठराव ठरला. लोकांच्या स्वास्थ्य आणि कल्याणासाठी संपूर्ण विश्वातील लोकांसाठी एक पूर्णतावादी दृष्टिकोण उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आमसभेद्वारे ‘वैश्विक स्वास्थ्य आणि विदेशनीती' अंतर्गत हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला.....*_
🔲🔲🔲
*_आणि अखेर २१ जून २०१५ या दिवशी पहिला जागतिक योग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला... भारतात २१ जून २०१५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला गेला. योग दिवसाचा मुख्य कार्यक्रम दिल्लीच्या राजपथावर झाला ज्यात खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजपथावर जवळजवळ ३६००० लोकांबरोबर योगासने केली._*

_*📚
🔲🔲🔲

_*📌 २१ जून हाच दिवस योग दिवस म्हणुन का निवडला...?????*_

_आंतरराष्ट्रीय योग दिवस हा २१ जूनला साजरा करण्यामागे वैज्ञानिक आणि पारंपरिक अशी दोन्हीही कारणे आहेत. खगोलशास्त्र असे सांगते की सूर्याच्या दोन स्थिती असतात. उत्तरायण आणि दक्षिणायन. जून महिन्याच्या २१ तारखेला सूर्य वआपली स्थिती बदलतो म्हणजेच उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. हा एक नैसर्गिक बदल आहे. जेव्हा सूर्याचे दक्षिणायन सुरू होते तेव्हा सूर्याचा प्रकाश आणि उष्णता कमी होते. यामुळे वातावरणात बदल होऊ लागतो. याने अनेक रोगांचे आणि आजारांचे उगमस्थान असलेले जीवजंतू, सूक्ष्मजीव आपलं काम करायला सुरुवात करतात आणि माणसं आजारी पडण्याचे प्रमाण वाढायला सुरुवात होते. योगासनांचा आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. यामुळे आपल्या शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी योगाभ्यास गरजेचा आहे. याच कारणाने या वातावरणीय बदलाचा पहिला दिवस हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून निवडण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जूनला साजरा केला जातो. तसेच हा दिवस वर्षातील सर्वांत मोठा दिवस असतो आणि योगासने ही माणसाला दीर्घायुष्याचा लाभ मिळवून देऊ शकतात अशी धारणा आणि विश्वास असल्याने हा दिवस योग दिवस म्हणून निवडला गेला._
🔲🔲🔲

_*📌 या उपक्रमसाठीची पार्श्वभूमि आणि इतिहास...*_

_या आधी डिसेंबर २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय मानवतावादी ध्यान आणि योग गुरू श्री श्री रविशंकर आणि इतर योग गुरूंनी पुर्तगाली योग परिसंघाच्या प्रतिनिधी मंडळाचे समर्थन केले होते आणि संपूर्ण दुनियेत २१ जून हा योग दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी केली. यानंतर ‘योग: विश्व शांतीसाठी एक विज्ञान’ नावाचे संमेलन ४-५ डिसेंबर २०११ मध्ये भरविण्यात आले होते. जगत गुरु अमृत सूर्यानंद यांच्या म्हणण्यानुसार, विश्व योग दिनाचा विचार त्यापूर्वी दहा वर्षांपासून डोक्यात होता. पण संपूर्ण भारतातून इतक्या मोठ्या संख्येने या विचाराचे समर्थन करणे हे प्रथमच होत होते. त्या दिवशी श्री श्री रविशंकर यांच्या नेतृत्वाखाली विश्व योग दिवस २१ जून रोजी संयुक्त राष्ट्र आणि यूनेस्कोद्वारा घोषित करण्यासाठी स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. कित्येक मोठमोठे योगविद्येत पारंगत असलेले योगी याला उपस्थित होते. या उपक्रमाला कित्येक वैश्विक नेत्यांनी सुद्धा समर्थन दिले. सगळ्यात आधी नेपाळचे प्रधानमंत्री सुशील कोइराला यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या प्रस्तावाचे समर्थन केले. संयुक्त राज्य अमेरिकेसकट १७७ हून अधिक देशांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. “आजवर आलेल्या कोणत्याही संयुक्त महासभेच्या प्रस्तावातील सहप्रायोजकांपेक्षा यातील सहप्रायोजकांची संख्या सर्वाधिक होती. ११ डिसेंबर २०१४ ला १९३ सदस्य असलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेने बहुमताने ‘योग आंतरराष्ट्रीय दिवस’ २१ जूनला साजरा करण्याची परवानगी दिली._
🔲🔲🔲

_*📌 विश्व योग दिवसाची उद्दिष्टे:*_
📍योगाभ्यासाच्या अद्भुत आणि प्राकृतिक फायद्यांबद्दल लोकांना माहिती उपलब्ध करुन देणे.
📍योगाच्या माध्यमातून लोकांना ध्यानधारणेची सवय लावणे.
📍योगसाधनेच्या फायद्यांबद्दल संपूर्ण जगातील माणसांचे लक्ष वेधून घेऊन लोकांमधील दुर्धर आजारांचे प्रमाण कमी करणे.
📍आपल्या व्यस्त वेळापत्रकातून आरोग्यासाठी एक दिवस काढून जनसमुदायाला एकमेकांच्या जवळ आणणे.
📍संपूर्ण विश्वामध्ये वृद्धी, विकास आणि शांती याचा प्रसार करणे.
📍लोकांमध्ये वैश्विक बंधुभाव जागवणे.
📍योगाभ्यासद्वारे तणावमुक्त जीवन जगण्यास मदत करणे.
📍लोकांना शारीरिक आणि मानसिक आजाराबद्दल जागरूक करणे आणि योगाच्या माध्यमातून त्यावर उपाय शोधणे.
📍मानसिक स्वास्थ्य जपून दीर्घकालीन स्वास्थ्य प्राप्त करणे.
📍योगाभ्यासातून लोकांना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा अनुभव देणे.
🔲🔲🔲

_*📌 आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये मनःशांती टिकवून ठेवण्याचा सुरक्षित आणि सोपा मार्ग म्हणजे योग.*_

योगाभ्यासात शारीरिक कृती आणि योग्य पद्धतीने श्वास घेणे यांचा अभ्यास केला जातो. शरीर, मन आणि आत्मा हे शरीराचे तीन मुख्य घटक; यांच्यातील परस्पर संबंधांचे नियमितीकरण असणे आवश्यक असते. दर दिवशी नियमित योगाभ्यास केल्याने शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होऊन आपल्याला अंतर्बाह्य आराम मिळतो. योगातील विविध आसनांमधून मानसिक आणि शारीरिक संतुलन राखले जाते. यातून चांगुलपणाची भावना निर्माण होते. योगाभ्यासातून बौद्धिक पातळी सुधारते आणि आपण आपल्या भावना स्थिर ठेवून एकाग्र होऊ शकतो. योगाभ्यासातून स्व-अनुशासन साधले जाते. सिंधू संस्कृतीत सुद्धा योगमुद्रा आणि समाधी स्थितीतील मूर्त्या आढळतात. हिंदू धर्मात साधू, संन्यासी आणि योगी सुरुवातीपासूनच योगमार्गाचे आचरण करत मात्र सामान्य लोकांचा याच्याशी फारसा संबंध नव्हता. अलीकडेच सामान्यांमध्ये स्वस्थ, निरोगी, शांततापूर्ण जगण्यासाठी योगाभ्यासाचे महत्त्व वाढते आहे. कारण आजकालची तणावपूर्ण जीवनशैली ही सर्वसामान्यांची दिनचर्या बिघडवून टाकत आहे.
🔲🔲🔲
_होणारे आजार बरे व्हावेत या करिता आपन औषधे तर घेतोच पण ‘Prevention is better than cure’ असं कोणीतरी म्हणून ठेवलंय ते खरंच आहे. म्हणूनच या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी आणि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून योगाला आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान मिळायला हवे आणि ते मिळावे यासाठी आजचा हा योग दिवस. यंदाचं त्याचं चौथं वर्षं. आपणही या अभियानात सामील होऊयात… योग आचरणात आणूयात._

__
➖➖➖➖➖➖➖
😔🌎😔🌎😔🌎😔

३० मे २०१९


का हरले.. का जिंकले..!
सातारा लोकसभा मतदारसंघात श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला असला तरी या वेळची निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नव्हती. उदयनराजेंच्या विरोधात कधी नव्हे तेवढे गढूळ वातावरण निर्माण झाले. उदयनराजेंचा पराभव होणारच !, अशी अटकळ होती. मात्र मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांत निवडणुकीपर्यंत उदयनराजेंनी प्रचाराचा लावलेला धडाका, समोर येईल त्याला आपले म्हणत जवळ घेण्याची पद्धत, विरोधी आघाडीतील लोकांना आपलंसं करण्याची कला, छत्रपतींच्या गादीच्या वारस असल्याचे वलय आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे उदयनराजे यांनी दाखविलेला संयम. यामुळे हातातून गेलेली निवडणूक त्यांनी जिंकली.


दुसरीकडे शिवसेनेमधून आयत्यावेळी आयात केलेले माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना ही निवडणूक पहिल्यापासूनच सोपी होती. उदयनराजेंच्या विरोधात असलेले वातावरण ‘कॅच’ करणे एवढेच काम त्यांच्यासाठी राहिले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधीलच अनेक आमदारांचा उदयनराजेंना विरोध होता. कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण या ‘होमपिच’वर सकारात्मक वातावरण होते. त्याचबरोबर जिल्ह्यात माथाडी कामगारांचे असणारे नेटवर्कही त्यांच्या कामी येणार होते. मात्र, सामान्य जनतेपासून स्वत:च्या पक्षातील नेतेमंडळी, भाजपामधील वरिष्ठ नेते आणि प्रसिद्धी या तिन्ही गोष्टी व्यवस्थित हाताळता न आल्याने हातात आलेली निवडणूक नरेंद्र पाटील हरले.


उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून पुन्हा तिकिट मिळवण्यासाठी फार मोठे लॉबिंग केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सर्वच आमदारांचा उदयनराजे यांच्या उमेदवारीला विरोध होता. मात्र उदयनराजे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नाही, तर भाजपासहित इतर पक्ष त्यांना लगेचच उमेदवारी द्यायला तयार होते. छत्रपती शिवरायांचे थेट तेरावे वंशज म्हणून उदयनराजेंचा राज्यभर दबदबा आहे. उदयनराजेंचे वलय महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील गावागावांत आकर्षण आहे.  उदयनराजेंना उमेदवारी दिली नाही तर, भाजपा त्यांना तात्काळ आपल्याकडे ओढून घेईल आणि राज्यभर त्यांच्या वलयाचा फायदा करुन घेईल, अशी भीती खा. शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व दिग्गज नेत्यांना होती.


 पक्षातील उदयनराजे विरोधकांना वेळोेवेळी चुचकारत शरद पवार यांनी उदयनराजेे यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मकता दर्शविली होती आणि शेवटी त्यांनाच उमेदवारी फायनल केली. त्यानंतर उदयनराजेंनी त्यांच्या विरोधात असणाऱ्या राष्ट्रवादीमधील सर्व लोकप्रतिनिधींबाबत मवाळ धोरण स्विकारत त्यांच्या गाठीभेटी सुरु केल्या. सर्व सहा विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचे मेळावे घेताना तेथील आमदारांना विश्वासात घेतले. त्यामुळे हळूहळू उदयनराजे यांच्या विरोधातील वातावरण निवळत गेले.


उदयनराजे भोसले यांना सुरुवातीपासूनच कराड दक्षिण आणि पाटण विधानसभा मतदारसंघातून मताध्निय मिळणार नाही, याची खात्री होती. कराड दक्षिण मतदारसंघात उदयनराजेंचे गेल्या दहा वर्षांत असलेला अत्यल्प संपर्क, विकासकामांकडे केलेले दुर्लक्ष आणि कार्यकर्त्यांचे अत्यल्प नेटवर्क यामुळे दक्षिणमधील गावागावांत उदयनराजेंना विरोध वाढत होता. भारतीय जनता पक्षाचे तीन दिग्गज कराड दक्षिणमधील आहेत. ना. शेखर चरेगांवकर, ना. डॉ. अतुल भोसले आणि विक्रम पावसकर यांची ताकद दक्षिणमध्ये दखलनीय असल्यामुळे युतीच्या उमेदवाराला येथे मोठा पाठिंबा मिळेल, असे सुरुवातीपासूनच वातावरण होते. शिवाय नरेंद्र पाटील ढेबेवाडी खोऱ्यातील असल्याने त्यांचा कराड शहराशी असलेला मोठा संपर्क युतीच्या पथ्यावर पडेल, अशी अटकळ होती. या सर्व गोष्टींचा अभ्यास उदयनराजे भोसले यांनी सुरुवातीपासूनच केला. कराड दक्षिणमधून आपल्याला मताध्निय मिळणार नाही मात्र नरेंद्र पाटील यांच्याकडून आपल्यावर मोठे लीड बसू नये यादृष्टीने उदयनराजे यांच्या विश्वासू सहकाऱ्यांनी कराड दक्षिणमध्ये ‘फिल्डिंग’ लावली.


कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे मतदारसंघात चांगले प्राबल्य आणि लोकप्रियता आहे. पृथ्वीराज चव्हाण हे आघाडी धर्म पाळणारच आहेत. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे दुखावलेला त्यांचा गट उदयनराजेंच्या विरोधात होता. या गटाचा विरोध कमी करण्यासाठी उदयनराजे यांनी कराडात दोन-तीन मॅरेथॉन बैठका घेतल्या. राजेंद्रसिंह यादव आणि आ. आनंदराव पाटील यांच्यातील दुखावलेले व दुरावलेले संबंध कमी करण्यासाठी उदयनराजेंनी लक्ष घातले. पृथ्वीराज चव्हाण यांचे दक्षिणमधील नाना पाटील, बंडानाना जगताप, मनोहर शिंदे यांच्यासारख्या जवळच्या लोकप्रतिनिधींना आपलेसे करण्यासाठी उदयनराजेंच्या विश्वासू सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांनी कराड शहर, मलकापूर तसेच तालु्नयातील इतर गावांत पृथ्वीराज चव्हाण गटाला केलेला विरोध, वेळोवेळी केलेले पक्षांतर, निवडणुकीच्या तोंडावर घेतलेली भूमिका यामुळे निर्माण झालेले विरोधी वातावरण मवाळ  करण्यासाठी उदयनराजेंनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांची पाठ शेवटपर्यंत सोडली नाही. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत दक्षिणमधील बहुतांश गावांत उदयनराजे पोहोचले आणि याचा फायदा उदयनराजे यांना मोठ्या प्रमाणात झाल्याचे निवडणुकीतील मतदानाच्या आकड्यांवरून लक्षात येते.


गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी कराड शहरात उदयनराजे यांना कमी मते पडली होती. मलकापुरातही उलटे वातावरण होते. दक्षिण मतदारसंघात उदयनराजेंना  दहा हजार इतके मताध्निय होते. हे मताध्निय या निवडणुकीवेळी वाढवणे श्नय नव्हते. मग विरोधी मते तरी जास्त पडू नयेत, म्हणून राजेंद्रसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली उदयनराजेंच्या विश्वासू सहकाऱ्यांनी कराड शहरावर अधिक लक्ष केंद्रित केले होते. साताऱ्यातून तरुणांमध्ये क्रेझ असलेले युवा नेते संग्राम बर्गे यांच्यावरही उदयनराजेंनी कराडची धुरा दिली होती. त्यांनीही अनेक ठिकाणी जाऊन पॅचअप केले. सलग दीड महिना उदयनराजेंचे विश्वासू सहकारी कराड शहरात तळ ठोकून होते. दत्त चौकात शुभारंभाच्या सभेवेळी सर्वांना एकत्र आणण्यात उदयनराजे यशस्वी झाले. येथेच यशाची पहिली पायरी होती. त्यानंतर शहरातील लोकशाही, जनश्नती, यशवंत, लोकसेवा या सर्व आघाडीमधील दिग्गज नगरसेवकांना एकत्र आणण्यात, दुखावलेल्या काही नगरसेवकांना हाताळण्यात तसेच गल्ली-गल्लीतील आजी-माजी नगरसेवक, युवा नेते या सर्वांना आपलंसं करण्यात उदयनराजे यशस्वी झाले. या सर्व गोष्टींचा फायदा उदयनराजेंना झाला. गेल्यावेळी शहरातून विरोधात मते पडली होती. ही मते पुन्हा आपल्या बाजूने खेचण्यात आणि चार हजारांचे मताध्निय मिळवण्यात उदयनराजे यशस्वी झाले. शहरात शिवसेना-भाजपाचे नेटवर्क असतानाही नरेंद्र पाटील यांच्याऐवजी उदयनराजेंना मिळालेली मते उदयनराजेंच्या परिप्नव राजकीय खेळीचे उदाहरण आहे.



माथाडी कामगारांचे नेते म्हणून दबदबा असलेले नरेंद्र पाटील यांनी कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण या विधानसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच अधिक लक्ष देणे गरजेचे होते. उदयनराजेंच्या विरोधात वातावरण असलेले हे तीन मतदारसंघ शिवसेनेच्या पथ्यावर पडण्यासाठी नरेंद्र पाटील यांनी याच मतदारसंघावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे होते. मात्र या तिन्ही मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आणि  मतदारांना गृहित धरुन नरेंद्र पाटील सातारा, कोरेगाव, वाई, जावली या भागात प्रचार करत राहीले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून नरेंद्र पाटलांसाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात दोन सभा घेतल्या. मात्र या दोन सभा कुठे घ्यायला पाहिजे होत्या? याची परिप्नवता नरेंद्र पाटील आणि त्यांच्या जवळ सल्लागार म्हणून फिरणाऱ्या नेत्यांना नव्हती.


सुरुवातीपासूनच शिवसेनेमध्ये आयात केलेला उमेदवार म्हणून नाराज असलेल्या शिवसैनिकांनी नरेंद्र पाटील यांच्याकडे दुर्लक्षच केले होते. नरेंद्र पाटील यांनी आम्हाला विचारात घेतलेच नाही. ते भाजपाच्या नेत्यांनाच जवळ घेऊन फिरतात, अशी तक्रार शिवसैनिकांची होती. मात्र नंतरच्या काळात राजकीय घडामोडी घडल्यानंतर हळू-हळू शिवसैनिक प्रचारात उतरले. ना. शेखर चरेगांवकर, डॉ. अतुल भोसले, विक्रम पावसकर, मनोज घोरपडे हे सुरुवातीपासूनच भाजपचा उमेदवार म्हणून नरेंद्र पाटील यांच्यासोबत होते. या चौघांनी सूत्रेही चांगली फिरवली. नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी शिवसेनेचा उमेदवार भाजपचाच आहे, हे पटवून देण्यात भाजपा नेते यशस्वी ठरले. मात्र निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात घर टू घर जाऊन  मतदारांपर्यंत पोहोचण्यात शिवसेना-भाजपाचे कार्यकर्ते कमी पडले. या दोन्ही पक्षाकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी आहे. तेवढीच कामाला आली.







शेवटच्या टप्प्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा कराडात घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. ही सभा कोठे घ्यायची? यावरुन भाजपा नेते आणि नरेंद्र पाटील  यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले.  दक्षिण हा भाजपचा बालेकिल्ला असल्यामुळे भाजपच्या म्हणण्यानुसार कन्याशाळेसमोर सभा घेऊ असा आग्रह होता. मात्र शिवसैनिकांनी भाजपच्या लोकांना विरोध करण्यासाठी सभेचे ठिकाण शिवाजी स्टेडियम निवडले. भर दुपारी तीन वाजता उन्हात स्टेडियमवर सभा घेणे हे दिव्यच होते. हे दिव्य युतीच्या नेत्यांना पार पाडता आले नाही आणि त्याचा फटका युतीला बसला.


नरेंद्र पाटील यांच्यासोबत मुंबईवरुन आलेली माथाडी कामगारांची फळी  होती. त्यांनी जावली, कोरेगाव, वाई भागात दिवस-रात्र कष्ट घेतले. सौ. प्राची पाटील यांनीही जिल्हाभर प्रचारदौरा केला. मात्र कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण या मतदारसंघात जायला हवे होते, तितके जायला नरेंद्र पाटील कमी पडले. उदयनराजे यांच्या विरोधातील मते आपणास आपोआप मिळतील, हे त्यांनी गृहित धरले. मात्र मतदारांनी त्यांना नाकारल्याचे कराड दक्षिण व कराड उत्तरमधील मते पाहिले असता लक्षात येते. योग्य कार्यकर्त्यांची फळी आणि सल्लागार न मिळाल्यामुळे कराड दक्षिणमधून अपेक्षित धरलेले 40 हजारांचे मताध्निय मिळवण्यात नरेंद्र पाटील अपयशी ठरले. कराड उत्तरमध्ये तर कराड शहरालगतची काही गावे सोडली तर नरेंद्र पाटील खूपच मागे पडले. त्यांच्या मदतीला आला फ्नत त्यांचा स्वत:चा पाटण तालुका. पाटणमध्ये विधानसभेची रंगीत तालिम म्हणून आ. शंभूराज देसाई यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे नरेंद्र पाटील यांना 19 हजार इतके मताध्निय मिळू शकले. ‘हातचं सोडून पळत्याच्या पाठी’ या उ्नतीप्रमाणे नरेंद्र पाटील यांनी कराड उत्तर व कराड दक्षिणकडे केलेल्या दुर्लक्षामुळे हातात आलेली निवडणूक ते हरले. 

१७ मे २०१९

आज दूरसंचार दिवस

📡☎📲📡☎📲📡
➖➖➖➖➖➖➖
☑ १७ मे जागतिक दूरसंचार /


दुरसंदेशवहन दिन आणि माहिती दिन......

➖➖➖➖➖➖➖
🔺 _१७ मे १८६५ या दिवशी आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली. या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून १७ मे हा दिवस जागतिक दूरसंदेशवहन दिवस म्हणून १९७३ पासून साजरा केला जाऊ लागला. पुढे २००५ साली जागतिक माहिती समाज शिखर परिषदेत १७ मे या दिवसाला ‘जागतिक माहिती दिन’ म्हणून मान्यता देण्यात आली आणि त्यानंतर २००६ साली भरलेल्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार मंडळाच्या सभेत हा दिवस *‘जागतिक दूरसंदेशवहन आणि माहिती समाज दिवस’ (World Telecommunication and Information Society Day)* म्हणून साजरा  करण्याचा ठराव ६८ सभासद देशांच्या समितीने जाहीर केला._
🔲🔲🔲
हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश दळणवळणाच्या क्षेत्रातील इंटरनेट आणि तत्सम नवीन तंत्रज्ञानाचे जागतिक महत्व अधोरेखित करणे आणि या क्षेत्रात होणाऱ्या नवनवीन बदलांविषयी सामाजिक जागरुकता निर्माण करणे त्याचप्रमाणे या तंत्रज्ञानातील निरनिराळ्या प्रणालींचे एकसुत्रीकरण करणे हा आहे. त्याचबरोबर या दिनाच्या निमित्ताने दळणवळणाची विविध साधने, माध्यमे, त्याबाबतची राष्ट्रांची धोरणे, तंत्रज्ञानामधील फरक, विविधता, त्यांची जोडणी आणि इंटरनेट, टेलिव्हिजन, फोन यांच्या वापराने देशा-देशांमधील अंतरे कमी करणे अभिप्रेत आहे. दळणवळणाच्या या सर्व आधुनिक सोयी-सुविधा दूरवरच्या दुर्गम भागातील मागासलेल्या खेड्यापाड्यांमधील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठीची धोरणे, योजना तयार करणे हा देखील या दिवशी आखलेल्या अनेक कार्यक्रमांचा एक भाग आहे.
🔲🔲🔲
दूरसंदेशवहन म्हणजे एका ठिकाणाहून काही अंतरावरच्या दुसऱ्या ठिकाणी एखादा संदेश वाहून नेणे. फार प्राचीन काळापासून संदेशवहनाची कला माणसाला अवगत होती. पूर्वी हे काम विविध माध्यमातून केले जाई. कधी एका ठिकाणी धूर करून त्याद्वारे दुसऱ्या ठिकाणच्या लोकांना इशाऱ्याचे संदेश दिले जात तर कधी ढोल-नगारे वाजवून, हातवारे करून किंवा हातात धरलेल्या वस्तूंच्या किंवा झेंड्यांच्या विशिष्ट हालचाली करून संदेशाची देवाण-घेवाण करणे किंवा प्रकाशझोतांच्या सहाय्याने संदेश पाठवणे, सूचना देणे अशी माध्यमे संदेशवहनासाठी वापरली जात. पुढे यात सुधारणा होत जाऊन तंत्रज्ञानाचा विकास होऊन टपाल, तारायंत्र, दूरध्वनी, फॅक्स त्याबरोबरीनेच बिनतारी संदेशवहन जसे आकाशवाणी, दूरचित्रवाणी आणि आजच्या आधुनिक काळात उपग्रहाद्वारे संदेशवहन, संगणक, इंटरनेट, इ-मेल अशासारखी माध्यमे अस्तित्वात आली आहेत. नवी साधने आली की आधीची त्या ओघात नाहीशी होतात, बंद पडतात.
🔲🔲🔲
*भारतात एके काळी अत्यंत प्रभावी असलेले तारायंत्र (telegraph) हे माध्यम मोबाईल, इंटरनेट, इ-मेल यांच्या प्रभावामुळे नुकतेच बंद झाले.*
🔲🔲🔲

🔺 *तारायंत्राचा शोध -*

सॅम्युएल मोर्स हा खरं तर एकोणिसाव्या शतकातील एक प्रख्यात अमेरिकन चित्रकार. त्याने अनेक जागतिक कीर्तीच्या व्यक्तींच्या, राजकारण्यांच्या तसबीरी चितारलेल्या होत्या. १८२५ साली अमेरिकन स्वातंत्र्य लढ्यातील अग्रेसर, फ्रेंच सेनानी, जनरल लाफायेत याचे पोर्ट्रेट काढण्याची संधी त्याला मिळाली. सूर्यास्ताच्या भव्य पार्श्वभूमीवर या चित्राचे काम भरात असताना मोर्सला त्याची बायको आजारी असल्याचे त्याच्या वडिलांचे पत्र मिळाले. काढत असलेले चित्र अर्धवट टाकून मोर्स तातडीने न्यू हेवन येथील आपल्या घरी परतला. पण त्याला उशीर झाला होता. त्याच्या पत्नीचे केव्हाच निधन झाले होते आणि तिचा दफन विधीही आटोपण्यात आला होता. पत्नीच्या आजारपणाची आणि निधनाची बातमी त्याला फार उशिराने मिळाली होती. त्या काळी जलद दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती. एका ठिकाणाहून दुसरीकडे संदेश पोहोचविण्यास त्या काळात फार वेळ लागत असे. लांब अंतरांवर त्वरित संदेश पोहोचविण्यासाठी काहीतरी उपाय शोधण्याचा त्याने मनाशी निश्चय केला. आपली चित्रकला त्याने बाजूला सारली आणि तारयंत्र विकसित करून त्याद्वारे संदेश पाठवण्यासाठी मोर्स लिपी तयार केली. या लिपीमध्ये डॉट (●) आणि डॅश (━) या विद्युत स्पंदनांचा (electric pulses) वापर केला होता. या दोन प्रकारच्या सिग्नल्ससाठी यंत्राच्या ‘कट्ट’ आणि ‘कड’ या तारायंत्रामधून निघणाऱ्या ध्वनीचा उपयोगदेखील संदेश पाठविण्यासाठी केला गेला. संदेश पाठविण्याची ही पद्धत जगभर स्वीकारली गेली.
🔲🔲🔲
सुरुवातीला तारायंत्रांचा वापर युद्धविषयक बातम्या कमी वेळात पाठविण्यासाठी केला गेला. आधी या बातम्या घोडे, गाड्यांचा वापर करून टपालाद्वारे पाठविल्या जात. हे काम फार वेळखाऊ आणि धोकादायक असे. तारायंत्रांमुळे हे काम सोपे जलद आणि निर्धोक झाले. पुढे महत्वाचे संदेश जलद पाठविण्यासाठी नागरी सेवेत तारायंत्रे वापरात येवू लागली. या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठविण्याची सोयही उपलब्ध झाली.
🔲🔲🔲

🔺 *भारतीय तार सेवा*

भारतात तारायंत्राचे युग एकोणविसाव्या शतकाच्या मध्यावर भारत पारतंत्र्यात असताना अवतरले. भारतात १८५१ साली ‘ट्रान्सइंडिया टेलिग्राफ’ या नावाने पहिल्या तारायंत्राची स्थापना करण्याचे काम सुरु होऊन तीन वर्षांनी म्हणजे १८५४ साली हे काम पूर्ण झाले. पहिली जवळ जवळ तीस वर्षे भारताच्या कानाकोपऱ्यात होणाऱ्या स्वातंत्र्य लढ्यासंबंधीची माहिती गोळा करणे आणि त्वरित संदेश पाठवून ती आंदोलने, उठाव चिरडण्यासाठी आणि भारतावर आपला एकछत्री अंमल कायम राखण्याकरिता तारायंत्र हे ब्रिटीश सरकारसाठी एक महत्वाचे साधन बनले होते. हे माध्यम एवढे प्रभावी होते की स्वातंत्र्य लढ्याचा बिमोड करण्याचे ब्रिटीश सरकारचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी तारलाईन्स तोडणे, उध्वस्त करणे आणि ब्रिटीशांची दळणवळण यंत्रणा खंडित करणे हा क्रांतिकारकांच्या लढ्याचा एक प्रमुख भाग होऊन बसला होता.
🔲🔲🔲
त्यानंतर पुढे १८८५ साली भारतीय तारायंत्र अधिनियम-१८८५ हा कायदा ब्रिटीश सरकारने भारतात लागू केला. या अधिनियमानुसार तारायंत्र, दूरध्वनी, दळणवळण, रेडिओ या सेवांच्या वापरावर सरकारी नियंत्रण आले. यामुळे तारायंत्रांच्या जोडणीसाठी केबल्स टाकणे, जागोजागी तारकेंद्रांची उभारणी करणे, दूरध्वनी केंद्रांची स्थापना, विशिष्ट परिस्थितीत खाजगी फोन टॅप करणे, खाजगी जमिनींचे अधिग्रहण करणे अशासारखे अधिकार सरकारला मिळाले आणि तारायंत्रांचे जाळे झपाट्याने भारतभर पसरले.
🔲🔲🔲
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तार व टपाल खात्याच्या कामकाजात अनेक सुधारणा करण्यात आल्या आणि तारयंत्रणा जास्त सक्षम आणि लोकाभिमुख झाली. आजची एसएमएस, इ-मेल, मोबाईल फोन इत्यादी सेवांचे काम पूर्वी तार व टपाल खात्याची पोस्टकार्ड आणि तार या दोन सेवा चोख करीत असत. त्यातही तार या विषयाबद्दल सर्वसामान्यात भीती आणि उत्सुकता अशी संमिश्र भावना असे. अत्यंत गरजेच्या, तातडीच्या आणि आणीबाणीच्या प्रसंगी तार पाठवली जात असे. त्यामुळे एखादी तार आली की ती उघडून पाहीपर्यंत घरातले वातावरण गंभीर होई. कधी तारेमधून आनंदाची, गोड बातमीही समजे तर कधी परीक्षेचा निकाल कळवण्यासाठी तारेचा वापर केला जाई. लष्करातील आपल्या पोस्टींगची किंवा बदलीची वाट पहात असलेल्या जवानांसाठी ‘तार’ ही एक मोठीच उत्कंठेची बाब होती. शिवाय रजा मिळविण्यासाठी ‘. . स्टार्ट इमिजीयटली’ या तारेचीही हे जवान आतुरतेनी वाट बघत.
🔲🔲🔲
*भारतीय पुरावे अधिनियमांतर्गत (Indian Evidence Act) ‘तार’ ही सेवा पंजीकृत झालेली असल्यामुळे कागदोपत्री पुरावा म्हणून कोर्टात सादर करण्यासाठी या तारांचा वापर वकील लोक मोठ्या प्रमाणात करीत. बॉलीवूडदेखील या गोष्टीपासून लांब राहिले नव्हते. ‘शहरसे (किंवा गांवसे) तार आया है ।’ हे वाक्य हमखास प्रत्येक जुन्या सिनेमातील टर्निंग पॉईन्ट ठरत असे.*
➖➖➖➖➖➖➖
📡☎📲📡☎📲📡

०२ मे २०१९

दुलारी




दुलारी,

दुलारी आप खुशी हो,
आप प्यार कि मुऱत हो,
हमे आप कि आदत है,
आप हमारी जरुरत हो !

दुलारी आप प्यारी हो,
आप का प्यार दवा है,
हमे आपकाही असर है,
आप हमारी जरुरत हो !

दुलारी आप चाहत हो,
आपका दिल बढीया है,
हम आपके फनाह है,
आप हमारी जरुरत हो !

दुलारी आप कल्पतरू है,
आपका साथ इंन्द्रधनु है,
हम आपकी धारा है,
आप हमारी जरूरत हो!

दुलारी आप सबकुछ हो,
आप हमारी साया हो ,
हमारी जान आपकीही है,
आप हमारी जरुरत हो !


आपके सिवा कुछ भी नही
Dedicated to my beloved wife.
Love you by heart and soul.

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...