फॉलोअर

०२ डिसेंबर २०१७

Amitabh 2

त्रिशूल

अमिताभच्या पंचाहत्तरी निमित्त ही पोस्ट लिहिली पण उशीर झाला.

काल संध्याकाळी एका एफएम चॅनलवर एक आरजे लाडिक लाडिक स्वरात अमिताभला ट्रिब्युट वगैरे देत होती. त्याचे डायलॉग स्वतःच म्हणत होती. पिक्चर्स होते
मर्द, शहेनशहा, खुदा गवाह, मोहब्बते,अग्निपथ. एक अग्निपथ सोडल्यास बच्चनचे हे टुकार पिक्चर्स !! तिचा दोष नव्हता तिच्या वयाचा होता. अमिताभ कारकिर्दीच्या शिखरावर असताना त्याचा शेवटचा सॉल्लिड रोल म्हणजे शराबी. त्यानंतर तिचा जन्म झाला असावा. पण रेडिओवर येताना जरा अभ्यासोनी प्रकटावे ना !!

अमिताभची तुफान डायलॉगबाजी म्हणजे दीवार आणि त्रिशूल. बाकी जंजीर,शोले,अमर अकबर अंथॉनी, डॉन ,मुकद्दर का सिकंदर,शक्ती,शराबी आहेतच पण दीवार आणि त्रिशूलची सर नाही. हे माझे वैयक्तिक मत आहे. त्याचे टॉप तीन चित्रपट काढले तर तिसरा कोणता घ्यावा यावर डोकेफोड करीन.

त्यातही डावे उजवे करायचे तर दीवारपेक्षा मला त्रिशूल जास्त प्रिय.माझ्यामते सलीम-जावेद यांची त्रिशूलची कामगिरी म्हणजे सुनील गावस्करच्या बंगलोरच्या ९६.

"जिसने पच्चीस बरस अपनी मां को हररोज थोडा थोडा मरते हुए देखा है असे मौत से क्या डर लगेगा" इथून सुरुंगाच्या वातीवर विडी पेटवून तो स्क्रीनला जी आग लावतो ती "आज आप के पास आपकी सारी दौलत है मगर  आप जैसा गरीब मैने जिंदगी में नही देखा" असे संजीवकुमारला सांगत विझवतो. गरीब हा शब्द जो काही उच्चरला आहे त्याला तोड नाही. सगळा त्वेष ओतलाय. या दोन सीन दरम्यान तो आपल्याला जी चित्रानुभूती देतो ती पुण्याच्या भाषेत "अशक्य" आहे.

सगळा पिक्चर त्याने खोल,दुःख दर्शवणाऱ्या नजरेवर (ब्रूडिंग लुक्स ), गोळीबंद आवाजात मारलेल्या जबरदस्त डायलॉग्सवर, संवादाच्या लयबद्ध चढउतारांवर आणि घेतलेल्या पॉजेसवर पेलला आहे.समोर संजीवकुमारसारखे अभिनयाचे दुसरे विद्यापीठ उभे असताना हे करणे म्हणजे खायचे काम नाही.

"यू आर राईट मिस्टर आर के गुप्ता" पासून सुरू होऊन "मेरी बनाई कॉलनी मे मकान चाहीये तो तकल्लूफ मत किजीएगा. मिल जायेगा" इथे संपणारा सीन म्हणजे बोर्ग मॅकेन्रो  १९८० ची मॅचच !!

"किताबों में छपते है चाहत के किस्से  हकीकत की दुनिया में चाहत नही है" असे साहिरचे जळजळीत शब्द गाणारा विजय  "मै आज तुमसे बहोतसी दोस्ती, बहोतसा प्यार मांगता हूं" असे म्हणत प्रेमाची हळवी कबुली देतो.

"मै चाहता हूं मिस्टर आर के गुप्ता के खानदान से न सिर्फ उनकी दौलत,उनकी इज्जत छिन लू बलकी उनके दिल की हर खुशी, होटोंकी हर मुस्कराहट को मिटा दू खतम कर दू "
इतका जळजळीत विखार बाळगणारा अमिताभ जेंव्हा त्याच आर के गुप्ताचा म्हणजे त्याच्या अनौरस बापाचा प्रेम चोप्रा जेंव्हा अपमान करतो तेंव्हा तितक्याच त्वेषाने कानाखाली जाळ काढतो तेंव्हा "खून खून होता है पानी नही" हे आनंद बक्षीचे शब्द आठवतात.

१९७८ च्या मे महिन्यात ५ तारखेला ( चू भू द्या घ्या )  रिलीज झालेला त्रिशूल इतका भिनला आहे अंगात की कोणाचे म्हणणे मान्य असेल तर आजही "यू आर राईट मिस्टर आर के गुप्ता"असेच तोंडातून बाहेर येते. कोणाला येतो म्हणून सांगताना "मै आ रहा हूं मिस्टर आर के गुप्ता"
अशी वॉर्निंग देतो आणि कोणी मित्र मैत्रीण भेटायला वेळ देत नसेल ,नखरे करत असेल तर "फिर किसी दिन मेरे पास वक्त नही होगा मिस्टर आर के गुप्ता" असे आपसूक सुनावले जाते.

आता हे "मिस्टर आर के गुप्ता" प्रकरण काय आहे ? संजीवकुमारच्या किरदाराचे नाव आहे. यात हे नाव अमिताभ प्रत्येक वेळेस संपूर्ण उच्चारतो एक दोन अपवाद वगळता. यात कोणाला काही खटकले का ? हे सहज झालेले नसावे . काहीतरी कारण असावे असे तेंव्हा वाटले होते. खूप नंतर एक किस्सा ऐकला. खरे खोटे देव जाणे. तो किस्सा नंतर कधीतरी !!

त्या आरजे मुळे त्रिशूल आठवला आणि विचार केला की साला आपुनभी "ट्रिब्युट" देनाईच मंगता है !!

अमिताभ बच्चन यांना ७५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

आनंद देवधर

Amitabh 1

*भूलेंबिसरे गीत*

आज *भूलेंबिसरे गीत*मध्ये पाहू यात या *सदिचे महानायक अमिताभ बच्चन* यांच्या काही आठवणी.

*अँग्री यंग मॅन* म्हणून ज्या चित्रपटाने *अमिताभजींना ओळख दिली, त्या *जंजीर*च्या वेळची गोष्ट. *दीपक* होतकरू रंगभूषाकार होता. त्याचं काम *अमिताभजींना*  आवडलं. *अमिताभ* यांचा *खासगी मेकअपमन* होण्याची संधी मग त्याच्यासमोर चालून आली. दीपकनी ती स्वीकारलीच आणि सुरू झाला अमिताभ बच्चन यांचा पर्सनल मेकअप आर्टिस्ट म्हणून दीपक यांचा प्रवास. या गोष्टीला जवळजवळ ४५ वर्षे झालीत. आज दीपक ६९ वर्षांचे आहेत, तरीही ते तेवढ्याच उमेदीने आणि उत्साहाने अमिताभ यांच्याबरोबर काम करताहेत.

शोले’चं चित्रीकरण सुरू होतं. चित्रीकरणासाठीचं ठिकाण आणि निवासव्यवस्था यात अंतर होतं. एके दिवशी शूटिंग संपल्यावर अमिताभ आणि जया बच्चन निघाले. एकाच गाडीतून. पुढच्या सीटवर दीपक बसले होते आणि जया आणि अमिताभ मागच्या सीटवर. दीपक यांनी पुढचा दरवाजा ओढून घेतला आणि अचानक अमिताभ जोरात ओरडू लागले, ‘माझा हात, माझा हात, गेला माझा हात...’

दीपकच्या काळजाचा ठोकाच चुकला. जया बच्चनही गांगरून गेल्या. कोणाला काही कळेचना की झाले तरी काय? दीपकने घाबरत घाबरतच मागचा दरवाजा उघडला. तर ते जोरजोरात हसत होते. कोणालाही काही कळेच ना. मग लक्षात आलं, की ते  दीपकला उल्लू बनवण्याचा प्रयत्न होता. असा हा मिश्‍कील माणूस!’’

*एकाच महिन्यात चार चित्रपटांचं रिलिज आणि चारही सुपरहिट!* ही किमया *अमिताभ* यांनी  केलीय. *गंमत* म्हणजे त्यातल्या *दोन* चित्रपटांत त्याचा *डबलरोल* होता. ऑक्‍टोबर १९७८ मध्ये हा पराक्रम केला होता. या महिन्याच्या चारही शुक्रवारी अमिताभचे चार चित्रपट रीलिज झाले. *मुकद्दर का सिकंदर, कस्मे वादे, डॉन* आणि *त्रिशूल* हे ते चार चित्रपट होते! 

हिपॅटायटिस-बी विरोधातल्या मोहिमेच्या वेळी अमिताभने एक गौप्यस्फोट केला होता. हिपॅटायटिस बीमुळे त्यांचं ७५ टक्के यकृत निकामी झालं असून, सध्या फक्त २५ टक्के यकृत कार्यरत आहे. *‘जो भी है, उसीसेही काम चला रहा हूँ मैं’* हे त्याचे मिष्किल उद्‌गार होते, हे सांगताना! 

ते आज ७५ वर्षांचे असूनही त्याच उमेदीने काम करतात, जसे ४५ वर्षांपूर्वी सीनची तयारी करायचे, तशीच तयारी ते आजही करतात. असं वाटतच नाही, की ते ७५ वर्षांचे आहेत.

आज ऐकु या त्यांच्या आवाजातील एक सुंदर गाणं.

चित्रपट : *सिलसिला (१९८१)*
संगीतकार : *शिव हरी*
गीतकार : *जावेद अख्तर*
गायक : *अमिताभ बच्चन*

नीला आसमान सो गया..
नीला आसमान सो गया

ओ हो, ओंस बरसे रात भीगे होठ थर्राए
धड़कने कुछ कहना चाहे कह नही पाए
हवा का गीत माध्यम है..
समय की चाल भी कम है
नीला आसमान सो गया..

ओ, मेरी बाहो मे शरमाते लजाते ऐसे तुम आये
की जैसे बादलो मे चांद धीरे धीरे आ जाए
ये तन्हाई ये मै और तुम..
ज़मीन भी हो गयी गुमसुम
नीला आसमान सो गया...

*संग्राहक आणि संकलक:-  प्रफुल्ल गायकवाड*

२५ नोव्हेंबर २०१७

चेक

🏦✒🏦✒🏦✒🏦
➖➖➖➖➖➖➖
*☑ बँकचे ८ प्रकारचे चेक आणि त्या बद्दलची माहिती...*
➖➖➖➖➖➖➖
_अर्थमंत्र्यांनी नुकतेच जाहीर केले की चेक चे व्यवहार बंद करण्याचा कोणताही विचार नाही... त्या निमित्ताने पुन्हा एकदा नजर .... चेकच्या व्यवहाराच्या ८ प्रकारावर..._

*▪१. बेयरर चेक किंवा ओपन चेक*
या चेकवर Bearer हा उल्लेख आढळतो. बेयरर चेकची रक्कम त्या व्यक्तीला दिली जाते जो व्यक्ती तो चेक बँकेत घेऊन जाईल किंवा ज्याचे नाव त्या चेकवर लिहिलेले असेल. परंतु असा चेक देणे धोकादायक असते कारण जर चेक हरवला आणि कोणत्याही अज्ञात व्यक्तीला तो मिळाला तर तो व्यक्ती याचा वापर करून रक्कम काढू शकतो मग त्याचे खाते त्या बँकेत असो वा नसो काही फरक पडत नाही.

*▪२. ऑर्डर चेक....*
जेव्हा चेकवर लिहिलेला Bearer हा शब्द पेनाने खोडला जातो आणि त्याच्या जागी ऑर्डर असे लिहिले जाते तेव्हा अश्या चेकला ऑर्डर चेक म्हटले जाते. अश्या चेकची रक्कम त्या व्यक्तीला दिली जाते ज्या व्यक्तीचे नाव या चेकवर लिहिलेले असते. याव्यतिरिक्त यामध्ये त्या व्यक्तीला सुद्धा रक्कम दिली जाऊ शकते ज्या व्यक्तीच्या नावावर चेक हस्तांतरीत केला गेला आहे.

*▪३. क्रॉस चेक किंवा अकाउंट पेयी चेक...*
या चेकच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात दोन समांतर रेषा ओढल्या जातात. किंवा त्यावर AC Payee असे लिहिले जाते. क्रॉस चेकमुळे ज्याला पैसे मिळणार आहेत त्याला बँकेत चेक सादर केल्यावर हातात रक्कम मिळत नाही, ती रक्कम त्याच्या खात्यामध्ये जमा केली जाते.

*४. अॅंटे-डेटेड चेक...*
जर एखाद्या चेकवर तो चेक बँकेत जमा करण्याच्या आधीची तारीख लिहिलेली असेल तर त्या चेकला पूर्व-तारखेचा चेक म्हणजेच अॅंटे-डेटेड चेक म्हटले जाते .याप्रकारच्या चेकची वैधता चेक दिल्यानंतरच्या तारखेपासून तीन महिन्यांपर्यंत असते.

*▪५. पोस्ट डेटेड चेक...*
जर एखादा चेक येणाऱ्या तारखेसाठी (Future Date) देण्यात आलेला असेल तर अशा प्रकारच्या चेकला नंतरच्या तारखेच्या चेक म्हणजे पोस्ट-डेटेड चेक म्हटले जाते.या प्रकारच्या चेकमध्ये त्यावर दिलेल्या तारखेच्या आधीच चेक वटवला जाऊ शकतो.

*▪६. स्टेल चेक....*
जर चेक दिल्यानंतरच्या तारखेनंतर बँक मध्ये पास होण्यासाठी आल्यास अश्या चेकला शिळा म्हणजेच स्टेल चेक म्हटले जाते. अशा प्रकारचा चेक बँकेकडून वटवला जात नाही, कारण रिजर्व बँकच्या नियमांच्या हिशोबाने चेक दिलेल्या तारखेनंतर ३ महिन्याच्या आत वटवला गेला पाहिजे म्हणजेच रक्कम काढली पाहिजे.

*▪७. सेल्फ चेक.....*
या प्रकारच्या चेकचा उपयोग खाते असणाऱ्या व्यक्तीला स्वतःसाठी रक्कम काढण्यासाठी होतो. पहिल्या नियमांनुसार या प्रकारच्या चेकने केवळ त्याच बँकेमध्ये रक्कम काढता येत होती, ज्या बँकेत खाते धारकाचे खाते आहे. परंतु आता या प्रकारच्या चेकने संपूर्ण भारतामध्ये कुठेही रक्कम काढता येते.

*▪८. कॅन्सल्ड चेक...*
अश्या प्रकारचा चेक हा वटवला जात नाही, या चेकने तुम्ही कोणतीही रक्कम काढू शकत नाही. या चेकचा उपयोग एखाद्या व्यक्तीला आपल्या बँक खात्याची माहिती देण्यासाठी केला जातो. Employee Provident Scheme (EPS) साठी सुद्धा या प्रकारच्या चेकचा उपयोग केला जातो.
➖➖➖➖➖➖➖
🔲◼🔲◼🔲◼🔲

२३ नोव्हेंबर २०१७

औषध expire means?

_*🙇🏻 🔺मनातील प्रश्न....*_

*👨🏻‍⚕◼औषध एक्सपायर होते म्हणजे नेमके काय...?*
➖➖➖➖➖➖➖
*_औषध एक्सपायर होतं म्हणजे नक्की काय होतं हेच आपल्याला कळत नाही. काहींना असं वाटतं औषध एक्सपायर झालं म्हणजे त्यात विष तयार झालं आहे. तर औषध एक्सपायर होतं म्हणजे त्याच्या लेबलवर त्या औषधाची जी Strength लिहिलेली असते, (उदा. अमुक एका गोळीवर लिहिलेले असते Each Tablet Contains Paracetamol 500 mg, तर 500 mg ही झाली या औषधाची Strength) ती ज्या दिवशी १० टक्क्यांनी कमी होते ती झाली त्या औषधाची एक्सपायरी डेट!_*
🔲🔲🔲
_एक्सपायरी डेट (Expiry Date ) साठी वापरला जाणारे शास्त्रीय नाव आहे t-९०%. यातला t म्हणजे Time. औषध जेव्हा ९०% उरते (म्हणजेच १० टक्क्यांनी कमी होते) तो वेळ म्हणजेच एक्सपायरी डेट. म्हणजेच एक्सपायरी डेट जेव्हा उजाडते तेव्हा त्यावर दिलेल्या डोसपेक्षा औषधाची मात्रा कमी झालेली असते. त्यामुळे त्याचा परिणाम थोडाफार कमी होतो, तो शून्य होतो असे अजिबात नव्हे._
🔲🔲🔲

*🔺औषधाची Strength १० टक्क्यांनी कमी होते. पण म्हणजे नक्की काय होतं....?*

५०० मिलीग्रॅमऐवजी हे प्रमाण ४५० मिलीग्रॅम होऊ शकतं. तर औषध हे एक रसायन आहे आणि काळानुसार ते हळू-हळू रासायनिक क्रियेमुळे त्याचा प्रभाव कमी होतो. सगळी औषधे ही एक्सपायरीनंतर हानिकारक नसतात तर काही विशिष्ट औषधेच एक्सपायरीनंतर हानिकारक ठरु शकतात. हवेतील ऑक्सिजनमुळे ऑक्सिडेशन होऊन किंवा हायड्रोजनमुळे रिडक्शन होऊन किंवा सूर्यप्रकाशामुळे किंवा इतर असंख्य रासायनिक क्रियामुळे हे औषध हानिकारक होते.
🔲🔲🔲
एका औषधाचे वेगवेगळ्या मार्गाने दर्जा कमी होऊ शकतो आणि त्यामुळे एकाच वेळी त्याची वेगवेगळी उत्पादने (Reaction Products ) बनू शकतात. ही उत्पादने निरुपद्रवी असतील तर त्याचा परिणाम इतकाच होतो कि औषधाची Strength कमी होते. पण कधी-कधी मात्र ही उत्पादने अपायकारकही असू शकतात. एक्सपायरी डेटनंतरचा असा अभ्यास मात्र कंपनीने केलेला नसतो.
🔲🔲🔲
जर औषधावर लिहिलेली एक्सपायरी डेट २ वर्षे आहे. तर मग जो अभ्यास केला जातो तो या २ वर्षांचाच असतो. पण समजा हे औषध 2-3 वेगवेगळ्या Degradation Pathways ने त्याचा दर्जा कमी होते आहे, ज्यातला एक Pathway अत्यंत संथ आहे, त्याचे Reaction Product ४ वर्षानंतर बनतेय आणि ते अपायकारक आहे आणि असे औषध जर कुणी एक्सपायरी डेटनंतर घेतले तर अपाय होऊ शकतो.
🔲🔲🔲
औषधे ही त्यावर दिलेल्या सूचनांनुसार साठवली जायला हवीत. बहुतांश औषधे थंड आणि कोरड्या जागी ठेवायची असतात. त्यामुळे औषधावरील सूचना लक्षपूर्वक पाळली जायला हवी.
➖➖➖➖➖➖➖
💊💉💊💉💊💉💊

०९ नोव्हेंबर २०१७

कृतज्ञता

देवीओ और सज्जनौ ,
नमस्कार.

खरं तर हे शब्द अमिताभ बच्चन यांच्या  तोंडीच शोभून दिसतात.
आम्ही त्याचे अनुकरण केले  म्हणून काय  बिघडले ! 
आहोतच आम्ही पण बच्चन !

7 नोव्हेंबर रोजी माझा वाढदिवस होता.
माझ्या आॅफीसमधील सहकारी मित्रांनी तो वेगळ्या
उंचीवर नेऊन ठेवला.
दिवसभर मला शैक्षणिक, सामाजिक,आर्थिक संस्थेत
जायचा योग घडवून आणला.

दिवसभर मला सामान्य वाचक, मित्र,हितचिंतक,
भाजीवाले, दुकानदार, पेपरवाले, पत्रकार,
गाववाले, शेतकरी, 
अशा अनेक जणांचे फोन आले.

राज्यपाल, माजी मुख्यमंत्री, आजी  माजी आमदार, खासदार,
युवकप्रिय नेते,  समाजसेवक, 
यासहीत नगराध्यक्ष, सरपंच, नगरसेवक अशा अनेक मान्यवरांचे
फोन आले, अनेकांनी भेटून शुभेच्छा दिल्या.

खरंच धन्य  झालो माऊलींनो,
तुमच्या प्रेम वर्षावाने !

धन्यवाद न मानता तुमच्या
ऋणातचं राहणं आवडेल मला !
कारण....

आपलं प्रेम आहे निशब्द,
शब्दांनाही न उमगणारं !

आपलं प्रेम आहे गुपित,
कुणालाही न उलगडणारं !

आपलं प्रेम आहे भावनिक,
स्पर्शालाही न कळणारं !

आपलं प्रेम आहे अव्यक्त,
शब्दांच्या पलीकडले !

..... सतीश मोरे

०६ नोव्हेंबर २०१७

निःशब्द

लतिके,

आपलं प्रेम आहे निशब्द,
शब्दांनाही न सापडणारं !

आपलं प्रेम आहे गुपित,
कुणालाही न उलगडणारं !

आपलं प्रेम आहे भावनिक,
स्पर्शालाही न कळणारं !

आपलं प्रेम आहे अव्यक्त,
शब्दांच्या पलीकडले !

आपलं प्रेम आहे अमर,
मरणानेही न संपणारं !

अपुर्ण

०५ नोव्हेंबर २०१७

आर्थिक नियोजन हवेच

*☑ फायनान्शियल प्लांनिंग का व कसे करावे ?*
➖➖➖➖➖➖➖
आयुष्यात आपण प्रत्येक गोष्टीचे प्लांनिंग करतो ,शिक्षण कसे आणि कुठे करायचे , लग्न कधी करायचे अगदी रिटायर कधी होणार याचे देखील आपले प्लांनिंग असते . पण आपण काहीच व कधीच  आपल्या पैश्याचे प्लांनिंग करत नाही कारण याची आपल्याला गरज वाटत नाही किंवा कोणी सांगितले नाही किंवा आपणास माहिती नाही ,पण सगळ्यात जास्त गरज आपल्याला पैशाचे प्लांनिंग कसे करावे किंवा फायनान्शियल प्लांनिंग कसे करावे याचे आहे .
🔲🔲🔲
दैनंदिन गरज आपण लक्षात घेऊन आपले प्लॅनिंग आपण करतो , महिना भर चा किराणा भरताना आपण प्लॅन करतो पण आपल्या आयुष्यात लागणाऱ्या गोष्टी आपण प्लॅन करत नाही . उदाहरण : मुलांचे शिक्षण किंवा त्यांना मेडिकल / अभियंता / वकील /डॉक्टर बनवायचे असेल तर काय प्लान करायचा .
🔲🔲🔲
फायनान्शियल प्लांनिंग का ?
जर आपली नोकरी गेली तर काय ?
कायमचे आजारी पडलो तर काय ?
अचानक खुप पैसे मेडिकल साठी लागले तर काय ?
मुलाच्या ऍडमिश ला एकदम पैसे लागले तर कसे ?
अश्या अनेक गोष्टीसाठी प्लॅनिंग पाहिजे .
🔲🔲🔲
फायनान्शियल प्लांनिंग करताना खालील गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात .

१)अनियमित लागणार खर्च ( Emergency Planning or contingency planning  )
२)इन्शुरन्स प्लान किंवा रिस्क प्लांनिंग  ( टर्म प्लान /मेडिकल प्लान /रिस्क प्लॅनिंग )
३)शॉर्ट टर्म गोल प्लॅनिंग ( कार घेणे , घराला डाउन पेमेंट ,इत्यादी )
४) लॉन्ग टर्म प्लांनिंग ( घर,मुलाचे शिक्षण ,मुलांचे लग्न )
५)रिटायरमेंट प्लांनिंग
६)नेक्स्ट जनरेशन प्लांनिंग (विल प्लनिंग )
🔲🔲🔲
वरील प्रत्येक गोष्ट ह्या खुप खुप काळजीपूर्वक करणे अत्यंत गरजेचेआहे , आपण आपले बजेट कसे आहे ह्यावर लक्ष देणे खुप गरजेचे आहे , आपण कमावले १०० रुपये येणार कसे व जातात कसे याचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
आपण आपले प्लांनिंग कसे करायला पाहिजे
🔲🔲🔲

*🔺योग्यप्रकारे आर्थिक नियोजन कसे कराल.???*

*◼Perfect Financial planning, योग्य प्रकारे आर्थिक नियोजन*

1) आपल्या महिन्याच्या एकूण इनकम पैकी जास्तीजास्त 30%च रक्कम ही घरखर्चासाठी वापरली गेली पाहिजे

2) 30% रक्कम ही बँक कर्ज, देणी ई. साठी

3) 30% रक्कम ही भविष्य नियोजनासाठी बचत केली पाहिजे.

4) आणि उरलेले फक्त 10% रक्कम ही आपल्या मनोरंजनासाठी वापरली जायला हवी

5) कमीतकमी पुढील 6 महिन्यांचा घर-ऑफिस खर्चाची तरतूद अगोदरच असायला हवी, जेणेकरून नोकरी गेली, किंवा व्यवसायात मंदि आली तरी ही त्यावर 6 महिने पुढील सोय होईस्तोपर्यंत आपले खर्च चालतील.

6) सेकंड होम ही इन्व्हेस्टमेंट नाही, सर्व्हे असे दर्शवतो को सेकंड होम हे एकूण व्याज आणि खर्च , आणि वाढती महागाई वगळून जास्तीजास्त 5% फायदा करून देऊ शकते

7) 45 वयानंतर कुठली ही देणी, कर्जे आपल्या अंगावर असू नयेत. मुलांचे उच्चशिक्षण, लग्न ही या काळात होतात त्याचो प्लॅनिंग आपल्या 30 वयापासूनच व्हायला हवेत ….

8) बँकेत पती-पत्नीचे जॉईंट अकौंट असणे अनिर्वार्य आहे

9) आपली प्रॉपर्टी ही पती-पत्नी दोघांच्या नावे हवी, कारण as per legal act पती च्या मृत्यू नंतर पत्नी वारसदार असते आणि नंतर मुले

10) प्रत्येकाचा इन्शुरन्स असणे गरजेचे आहे

11) टर्म इन्शुरन्स असणे ही गरजेचे आहे, हेच पुढे तुमच्या कुटुंबाला संरक्षण देते

12) कुठलेही इन्व्हेस्टमेंट चे निर्णय हे भावनिक दृष्टिकोनातून घेऊ नये

13) मेडिक्लेम हा अत्यन्त गरजेचा आहे,

14) जर बँकेत चोरी, किंवा आग लागल्यास आपल्या बँकेतील लॉकर वर फक्त 1 लाख पर्यन्त रक्कम बँक रिटर्न म्हणून देऊ शकते, उरलेले नुकसान आपले असते

15) तुम्ही टॅक्स रिटर्न फाईल करणे टाळू नाही शकत, पण योग्य इन्व्हेस्टमेंट करून टॅक्स कमी करू शकतात, तुमचे इनकम जास्त असो वा कमी असो, टॅक्स फाईल केल्यास भविष्यात खूप फायदे होतात, सर्वात मोठा फायदा म्हणजे लोन, हेंच तुम्हाला व्यवसायात पुढे नेऊ शकते

16) सर्व फायनेन्शियल कागदपत्रे ही व्यवस्थित ठेवा, याची माहिती आपल्या कुटुंबाला देऊन ठेवा. जेणेकरून तुमच्या अनुपस्थितीत किंवा तुमच्या संकटात तुमचे फेमिली मेम्बर्स ते योग्यप्रकारे वापरु शकतील

17) आपला प्रोग्रेस ग्राफ दर सहा महिन्यांनी चेक करा. कारण त्या ग्राफ प्रमाणे आपली इनवेसेन्टमेंट, व्यवसाय निर्णय बदलता येतात

18) आपला अकौंटांट फक्त वर्षाची टॅक्स फाईल करणारा असल्यापेक्षा योग्य कन्सल्टंट असेल याची खात्री करा नाहीतर लगेच बदला, कारण योग्य इन्व्हेस्टमेंट हा योग्य सल्लागारच सुचवितो.
➖➖➖➖➖➖➖
🔲🔳🔲🔳🔲🔳🔲

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...