फॉलोअर

१४ ऑगस्ट २०२१

कायम...

सखी सख्याची !

परवा सखी अचानक आली.
थोडीशी घाबरलेली,
थोडीशी विस्कळीत,
थोडीशी हरवलेली !
डोळ्यात अश्रू दाटलेले !

जवळ आली अन बिलगली.
आज तिच्या डोळ्यात
वेगळाच भाव होता !
मनात विचाराचे काहूर होते ,
खूप काही सांगायचे होते ,
स्वतःला सावरायचे होते.

बिलगलेल्या सखीला
मी सावरायचा प्रयत्न केला.
बिलगलेल्या सखीला,
मी सावरायचा प्रयत्न केला.
मग ती अधिकच बिलगली.

अन् म्हणाली ,
आजपासून आपण थांबू या,
एकमेकापासून थोडे दूर राहु या ,
फार जवळ यायचं नाही ,
थोडंसं अंतर ठेऊ या !

सखीचं हे अजब रूप 
मी पहिल्यांदाच पहात होतो.
तिच्या मनात खोल काहूर होतं,
ज्यानं मला निशब्ध केलं होतं !

डबडबलेले ते डोळे
मला प्रश्नावत होते !
माझ्या डोळ्यात
तिला शोधत होतो !

मग मीही सावरलो,
मग मीही सावरलो.
तिलाही सावरलं .
अन् मग तिला सुनावलं.

सखी आपलं नातं वेगळ आहे ,
सखी आपलं नातं वेगळ आहे !
तुझ्यासाठी मला सर्वमान्य आहे,
तुझ्यासाठी मला सर्वमान्य आहे !

कुठेही राहिलीस
तरी तु माझी आहे,
माझ्या जवळ नसली
तरीही तु माझी सावली आहे !

तुझ्या सुखात मी अद्ष्य आहे,
दुःखात तर मी हाजीर आहे !
तू सुखी राहा,
यापेक्षा मला काही नको आहे.

जिथे जाशील,
तिथे तू माझ्यातच आहे !
मी तर तुझ्या
रोमारोमात आहे !

आपण दोघे कधी वेगळे नव्हतो,
आपण दोघे कधी वेगळे नव्हतो,
चार हात दूर राहिलो,
म्हणून वेगळे होणारच नव्हतो !

तुझ्या प्रत्येक श्वासात
मी असणार आहे.
माझा श्वास तर
तर तुझ्याविना गुदमरला आहे!

तू जिथे असशील
तिथे मी आहे .
तू जिथे स्मरशील
तिथे मी उमटणार आहे.

फक्त भेटणं म्हणजे
प्रेम आहे का?
भेटलो नाही म्हणून,
तुझे स्मरण होणार नाही का ?

माझ्या अखेरच्या
क्षणापर्यंत तू असणार आहेस !
तुझ्या रोमारोमात
मीच वास करणार आहे !

तू आणि मी एकच आहोत,
एकच राहणार आहोत !
पुढच्या जन्मात तर आपण,
एकच होऊन येणार आहोत !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...