फॉलोअर

२७ ऑक्टोबर २०१८

lस्वप्नवत दिवाळी अमिताभजी सोबत


lस्वप्नवत दिवाळी अमिताभजी  सोबत


स्वप्नपुर्तीचे पहिले पाऊल

हॅलो सर्व बच्चन प्रेमी,

ज्या दिवसाची आपण खुप दिवसा पासून वाट पाहत होतो
तो दिवस आज उजाडला.

सातारा येथील बच्चन प्रेमी पंकज चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे आज कौन बनेगा करोडपती च्या सेटवर मला आणि दीपक प्रभावळकर यांना जाण्याचा सन्मान मिळाला, संधी मिळाली.

कराड आणि सातारा येथे आपल्या बच्चन प्रेमी ग्रुपच्या झालेल्या मेळाव्यात मी आणि दीपक प्रभावळकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे आपल्या अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपला लवकरच अमिताभ बच्चन यांना भेटावयास जायची संधी मिळण्यासाठी ज्या प्रयत्नांची गरज आहे, त्या प्रयत्नांचा पहिला भाग आज पूर्ण झाला.

अमिताभ बच्चन यांना भेटून सातारकर जनतेच्या वतीने पंकज चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली. त्याचबरोबर दीपक प्रभावळकर यांच्या वतीने छत्रपतींची शिवमुद्रा भेट देणारी देण्यात आली.

*आपल्या अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपच्या वतीने गेल्या वर्षभरात आपण राबवलेल्या विविध उपक्रमांना एक पुस्तिका तयार केली होती.ती पुस्तिका महानायक अमिताभ बच्चन यांना कौन बनेगा करोडपती कार्यक्रमाचे शुटींग संपल्यानंतर आम्ही भेट दिली.*

*या पुस्तिकेवर अमिताभ बच्चन यांनी स्वतः ऑटोग्राफ दिला आहे.*

बच्चन प्रेमी ग्रुपने सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल आपल्या ग्रुपचे कौतुक करत त्यांनी पुस्तिकेवर स्वतःची सही केली आहे.

*कराड सातारा येथील सर्व बच्चन प्रेमींना आपणास मुंबई येथे भेटण्याची वेळ द्यावी ,अशी मागणी मी आणि दीपक प्रभावळकर यांनी त्यांना केली. या मागणीस त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.*

*आपण राबवत असलेल्या कामाची एक पुस्तिका त्यांना भेट देऊन दुसऱ्या पुस्तिकेवर त्यांची सही घेतली, हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे.*

अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर घडलेल्या सर्व घडामोडी विषयी सविस्तर लिहिणार आहे.

*आता फक्त एवढेच सांगतो आपल्या अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप चे स्वप्न लवकरच साकार होणार आहे .*

आपला बच्चन प्रेमी ग्रुप पुढील काळात कार्यरत राहून आपले उपक्रम अमिताभ बच्चन यांच्या पर्यंत पोहोचतील .

आपल्या सर्वांच्या वतीने पंकज चव्हाण ,दिलीप प्रभावळकर आणि मी सतीश मोरे आम्ही तिघांनी अमिताभ बच्चन यांच्या पर्यंत आपल्या ग्रुपचे कार्य पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

*आजचा दिवस माझ्या आयुष्यातील मंतरलेले दिवस आहे.*

*हा दिवस आपल्या सर्वांमुळे आला आहे,लवकरच  आपल्या सर्वांच्या आयुष्यात हा क्षण येणार आहे.*

*आपल्या सर्वांचे सदैव ऋणात आम्ही राहणे पसंत करतो.*

*आम्ही बच्चन प्रेमी*
...पंकज चव्हाण
...दीपक प्रभावळकर
...सतीश मोरे

२१ ऑक्टोबर २०१८

100 %अमिताभ बच्चनप्रेमी



आमचा श्वास
आमचा ध्यास
अमिताभ अमिताभ
आणि फक्त अमिताभ !

असे ब्रीदवाक्य असलेला अमिताभ बच्चन यांच्या कलागुणांवर निखळ प्रेम करणारा असा आमचा ग्रुप गेली तीन वर्षे अखंड पणे सुरु आहे.

अमिताभ बच्चन जणू आमचा श्वास आहे.
अमिताभ बच्चन यांचे चित्रपट पाहता पाहता
आम्ही लहानाचे मोठे झालो ,
मोठ्याचे समजदार, प्रौढ झालो,
आता पन्नाशीकडे, साठीकडे निघालो आहे.
मात्र आमचं बच्चन प्रेम तसूभरही कमी झालेले नाही.

बच्चन प्रेमाचा धागा पकडून तयार झालेला आमचा ग्रुप पडद्यावरील आणि पडद्याबाहेरील अमिताभ बच्चन यांच्या कलागुणांना डोक्यावर आणि डोक्यात घेऊन नाचतो, या गुणाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो .

फार मोठ्या पदावर जाऊन देखील जमिनीवर असणारा आमचा अमिताभ !

लहान मोठा तर कोणीही भेटला
तर त्याला आदराने बोलणारा आमचा अमिताभ;!

सर्वांचा सन्मान ठेवणारा
आमचा अमिताभ !

भारत सरकारच्या सर्व अभियानामध्ये
हिरीरीने सहभाग घेणारा आमचा अमिताभ !

स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून घराघरात जनजागृती करणारा आमचा अमिताभ !

एक चांगला कलाकार,
चांगला पती ,चांगला वडील
आणि आदर्श देशप्रेमी असा आमचा अमिताभ !

अमिताभ बच्चन यांच्या कलागुणावर  प्रेम करणारा आमचा सातारा जिल्ह्यातील अमिताभ बच्चन एकमेव व्हाट्सएप ग्रुप आहे.

अमिताभ बच्चन यांच्या गुणाचे अनुकरण करताना या ग्रुपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत समाजासाठी काहीतरी करण्याचा आम्ही वसा घेतलेला आहे.

याचाच एक भाग म्हणून अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसादिवशी 11 ऑक्टोबरला आम्ही कराड शहरात स्वच्छता अभियान राबवले.

अमिताभ बच्चन हे भारत सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचे ब्रँड अँबेसिडर आहेत. गावागावात स्वच्छतेची चळवळ वाढली पाहिजे पाहिजे यासाठी अमिताभ बच्चन यांनी या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश गावोगावी पोहचवला आहे.

अमिताभ बच्चन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अमिताभ बच्चन प्रेमी अर्थात एबीपी या आमच्या ग्रुपने कराड शहरात प्रवेशद्वाराजवळ असणारा भाग, रस्ते स्वच्छ केले.

सुमारे तीन तास आम्ही 40 अमिताभ बच्चन प्रमीनी श्रमदान केले , सुमारे 4 टन कचरा गोळा केला.

समाजासाठी काहीतरी करायचं हा अमिताभ बच्चन यांचा संदेश आम्ही काही प्रमाणात सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला आहे.

आमचा ध्यास अमिताभ बच्चन यांना भेटणे हा तर आहेच परंतु रोज फेसबूक, ट्विटर इंस्टाग्राम आणि ब्लॉग च्या माध्यमातून  वेगळं लिखाण करुन समाजासाठी काहीतरी करण्याचा अमिताभ बच्चन यांनी घेतलेला वसा आम्हालाही पुढे चालवायचा आहे.
म्हणूनच आम्ही अमिताभ बच्चन असा वेगळा ग्रुप तयार केला आहे.

आम्ही अमिताभ बच्चन यांचे  फॅन नाही तर 100% प्रेमी आहोत. आम्हाला पडद्यावरील आणि पडद्याबाहेरील अमिताभ बच्चन खूप आवडतात.

त्यांचा आदर्श घेत आमचा ग्रुप अमिताभ बच्चन यांच्यासारखेच कार्य करण्यासाठी यापुढील काळात कार्यरत राहणार आहे.

जयहिंद.

सतीश वसंतराव मोरे
09881191302

चिफ एडमिन
अमिताभ बच्चनप्रेमी ABP ग्रुप.
कराड- सातारा.

Our Passion, Our Mission and Our Breathe has only name; Amitabh Bachhan


Amitabh Bachchan is in our heart.


We grew up watching and enjoying  Amitabh Bachchan's films. Now we grown up as matures and traveling towards fifties. Yet our love for Amitabh has not diminished even with single Nano particle.

Our group is built by Bachchan passion thread, tries to imitate the every single on-screen and off-screen act of our only idol.

Amitabh is one of the very few persons, who is always down to earth despite of his larger than life image.

Every single person gone through his magical existence is overshadowed by his ever humbleness and sophisticated behavior.

Amitabh invests respect and get refunds million folds of it.

He always takes initiative in implementation of various government schemes.

Amitabh Bachhan is playing a huge part in clean India campaign. He is the brand ambassador of  Clean Survey Campaign for the Government of India.


He is an actor of the millennium. He maintained great family values with being a good husband and an ideal father.

We are appreciating Amitabh Bachhan’s legendry work through a whatsapp group named Amitabh Bachhan Premi ABP. This is the only group in satara district which is only made for AB. Our group has soulful attached with love for living legend Amitabh Bacchan since last three years with various mediums. Through ABP group we are organizing various events and activities related with Amitabh’s Art and his social awareness. We try to imitate his social efforts.

We celebrated AB’s birthday on 11th October as cleanliness campaign in Karad city. Hundreds of people from different streams took part in this unique drive.  On this event ABP group clean swiped roads near the gateway of karad. This campaign last over 3 hours and result was collection of nearly 4 tons garbage. We did it as a follow act of Amitabh’s message to do your part for society.

No wonder we want to meet our mentor someday. However this is not our only goal. We are spreading Amitabh’s era using various social media platforms. Feeling proud to say that we are not just ordinary AB fans. We just love his thorough charisma. ABP group will follow and spread AB brand allover and forever.


.

Jaihind

Satish Vasantrao More
09881191302

Chief Admin,
Amitabh Bachchan Premi
( ABP) Group.
Karad- Satara.
Maharashtra.

१४ ऑक्टोबर २०१८

Amitabh birthday 1

एक सिनेमा आला होता, नाव डॉन. हेलन गाणे गाऊन त्याला अडकवते आणि त्याच्या पिस्तुलातल्या गोळ्या काढून घेते. यावेळी मुद्रा-अभिनयात या माणसाने जे काही करून दाखवले आहे ते गझब आहे. खूनशी आणि कोणतीही दयामाया न दाखवणारा डॉन त्याने एकही डेसिबल आवाज न वाढवता रंगवला आहे. त्या हिरव्या रंगाच्या शर्टात त्याने अनेकींच्या हृदयाचे ठोके चुकवले आहेत.

एक सिनेमा आला होता, नाव जंजीर. पोलीस स्टेशन मध्ये फाईल बघत बसलेला इन्स्पेक्टर आणि हजर झालेला शेर खान. खुर्चीला पडलेली लाथ आणि मघ येणारा डायलॉग. प्राण साहेबांसारखा उत्तुंग मोठा अभिनेता आणि याची जेमतेम सुरवात. परत एकदा कोणताही आक्रस्ताळेपणा न करता त्याने पंचला पंच मॅच केला आहे.

सिनेमा आला होता दिवार, खुर्चीवर आपले लांबच लांब पाय ठेवून बसलेला तो, तोंडात बिडी, खाकी पॅन्ट आणि तो जगप्रसिद्ध निळा शर्ट. पीटरची गॅंग त्याच्याकडे दात ओठ खावून बघते आहे आणि म्हणतात न, झुंड में तो सुअर आते है, शेर अकेला आता है. इथे चार पाच लोकांना लोळवतांना तो कुठेही कमी वाटत नाही. दिवार हा सिनेमा फक्त आणि फक्त त्याचा आहे. बाकीचे सगळे फक्त तोंडी लावायला.

नमक हराम मध्ये राजेशला परत न्यायला आलेला तो. लांब लांब ढांगा टाकत तो वस्तीत येतो आणि संपूर्ण वस्तीला आव्हान देतो. राजेश खन्ना परतायला नकार देतो आणि मग जुगलबंदी. प्रीमियर संपल्यावर राजेश खन्ना म्हणाला होता और एक सुपरस्टार आ गया.

हे काही सिन्स आहेत साल २००० च्या आधीचे पण बच्चन मला त्याच्या सेकंड इनिंगमध्ये पण तितकाच आवडतो. त्याला पैशाची गरज होती आणि बुजुर्गच्या भूमिकेसाठी बॉलीवूडला देखणा आणि सशक्त अभिनेत्याची. किती दिवस ओम पुरी सारखे चेहरे बघणार. मृत्यूदाता, लाल बादशाह, अजूबा आणि असे अनेक तद्दन भिकारडे चित्रपट त्याचे करून झाले होते. डोक्यावर एबीसीएलच भलेमोठे कर्ज होते. वय ५८ झाले होते. या वयात आपण रिटायरमेंट प्लान्सवर जमा झालेला बोनस बघतो. तो मात्र आपली संपूर्ण मायनस झालेली बॅलन्स शिट बदलायला निघाला होता. दिवाळ्याचा अर्ज मागवून हात वर करणे हा सगळ्यात सोपा मार्ग त्याने मागे टाकला होता.

सिनेमा आला मोहबत्ते आणि सिनेमाचा प्रीमियर बघून शाहरुखला वाटले असणार. सुपरस्टार वापस आ गया.
पाठोपाठ आला अक्स. या सिनेमा त्याने खाऊन टाकला आहे. त्याला सिनेमात घेण्याचा मोह कारण जोहरला देखील आवरला नाही. त्याच्यासाठी स्क्रिप्टमध्ये तुफानी बदल करण्यात आले. त्याला शोभेल अशी भूमिका लिहिण्यात आली आणि चित्रपट आला कभी खुशी कभी गम. चित्रपट भिकारडा होताच पण बच्चन आणि काजोलने चार चांद लावले सिनेमाला. मग पांढऱ्याशुभ्र केसात अनिल कपूर सोबत अरमान. अनिलला हा चित्रपट आणि त्यात अभिनय करणे किती जड गेले असेल याचा मला अंदाज आहे. हे सगळे व्यवस्थीत सुरु असतांना बूम का केला असेल त्याने, कदाचित पैशासाठी. पैशाचे, कर्जाचे ओझे माणसाला काहीही करायला लावते.

पण मग आला बागबान आणि अमिताभ हेमाची तुफान केमेस्ट्री सगळ्यांना आवडून गेली. शेकडो वेळा हा सिनेमा टीव्हीवर लागला असेल. पण मी थांबतो बघत, मला या चित्रपटाचा अंत आणि त्यावेळी त्याने केलेले भाषण फार आवडते. साला त्याने बोललेले शब्द किठेतरी मनात आरापार उतरतात.

असाच अजून आवडता सिनेमा म्हणजे खाकी. खाकीने त्याला हवे तेव्हडे व्यावसायिक यश दिले नसेल पण बच्चन नावाचे नाणे बॉलीवूड मध्ये परत एकदा खणखणीत वाजायला लागले होते.  संजय लीला भंसालीचा ब्लॅक अभिनेता म्हणून त्याची कसोटी बघणारा. बच्चनने तुफानी काम केले आहे. अमोल पालेकरने काढलेला पहेली. समांतर चित्रपट करायचा पण व्यावसायिक यश मिळवायचे हा किडा शाहरुखला चावला होता. शाहरुखने या चित्रपटात अतिशय सुंदर काम केले आहे. बच्चनचा गदारिया मात्र आपली वेगळी उंची दाखवून जातो.

बंटी और बबली कदाचित त्याने अभिषेक साठी केला असावा. कोणाला आपला मुलगा पुढे यावा असे वाटत नाही. त्यात चूक पण काही नाही. सिनेमा संपल्यावर मला उगाच वाटून गेले बाप बेटा एकत्र नको होते. अभिषेकच्या सुंदर कामावर बच्चन भारी पडलाय.

किती लिहिणार अजून, वाढदिवस आहे. थोडक्यात असावे. पिकू, पिंक, चीनी कम आणि असे अनेक.

त्याने काय नाही केले. सिनेमा केला, कविता वाचून दाखवल्या, रोज सकाळी उठून लोटापार्टीला बाहेर जाऊ नका असे सांगितले. पोलिओचे डोस द्यायला सांगितले. कचरा करू नका, त्याचे कम्पोस्ट करा असे सांगितले. गिरचे सिंह बघायचे त्याने आमंत्रण दिले तर ताडोबातल्या वाघाच्या पिल्लाचा जन्मोत्सव साजरा केला. आजही त्याचा कौन बनेगा करोडपती सारखा शो आला की टीव्हीची संपूर्ण टीआरपी त्याने खेचलेली असते. मग त्यावेळी त्याच्या समोर कोणता चित्रपट किंवा कोणता क्रिकेटचा सामना दम मारू शकत नाही. अनेकांनी हे सगळे त्याने पैशासाठी केले असे बेछूट आरोप केले. पैशासाठीच केले. कर्जात बुडलेला असतांना पळून तर गेला नाही न तो.

अमिताभच हे ऑनस्क्रीन यश अनेकांना भावते. मला पण. पण मला त्याचे इतर अनेक गुण आवडतात. अनेक दुर्धर आजार उरावर घेवून तो धावतोय हे मला आवडते. बोफोर्स सारख्या प्रकरणात त्याने न केलेली शो बाजी आवडते आहे. मुख्यमंत्री जायचे आहेत म्हणून त्यांच्या जाण्याची वाट बघत उभा असलेला बच्चन आवडतो. आपल्या जुन्या सहकारयांना त्याने केलेली मदत आवडते. स्त्री मग कोणत्याही वयाची असो, तिला मान म्हणून उठून उभा राहणारा बच्चन आवडतो. स्वतः भीष्म पितामह असतांना अंगात असलेला नम्रपणा आवडतो.

बच्चन साहेब, आपणास वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. आप को अभी और बहोत काम करना है, क्यो कि आज भी आप जहां खडे हो जाते है, बॉलीवूड मे लाईन वही से शुरू होती है !!!

०६ सप्टेंबर २०१८

दो रास्ते

आयुष्यात अशा काही वाटा असतात,ज्या वाटेकडे जावं लागतं, टाळावं लागतं किंवा जाण्याची आपल्यावर वेळ येते. आपण जेव्हा वाटा निवडतो तेव्हा ती वाट योग्य आहे की अयोग्य आहे याबाबत लगेच काही जण टीका करू लागतात, चर्चा करू लागतात,तुमच्या पायात आडवे येण्याचा प्रयत्न करतात.  मला पहायला मिळालेल्या , भावलेल्या दोन.वाटाबाबत मी आज बोलणार आहे



गेली 20 वर्षे कराड शहरात रहायला आल्यापासून माझे सोमवार पेठेतील घर ते ऑफिस  या मार्गावरून ऑफिसला येताना कामावर जाताना, कुठेही जाताना किंवा परत घरी येताना सकाळच्या वेळी येताना अथवा दुपारी सायंकाळी ऑफिसवरून परत जाताना मी हमखास दोन रस्त्यावरूनच , या वाटेवरूनच घरी परततो, याची कारणेही आहेत. ती  ती कारणे सांगण्याचा मी आज प्रयत्न करत आहे. काहीना हे आवडेल किंवा आवडणार नाही. माझा जाण्याचा येण्याचा दिवसभरातील एक मार्ग निश्चित आहे हा मार्ग थोडासा वेगळा आणि आपणास न पटेल असा पद्धतीचा आहे.

आज हा प्रसंग पाठवण्याची किंवा लिहिण्याची आठवण मला आली कारण काही दिवसांपूर्वी राष्ट्र संत तरुण सागर महाराज यांचे निधन झाले. 2003 मध्ये तरूण सागर महाराज यांचे इस्लामपूर येथे तीन दिवस कडवे प्रवचन येथील जैन बांधवांनी आयोजित केले होते. तरूण सागर महाराज यांचे टीव्हीवरील आणि वृत्तपत्रातील रकान्यांमध्ये व प्रसिद्ध झालेले कडवे विचार ऐकून मी त्यांच्या विचारांकडे थोडाफार आकृष्ट झालो होतो आणि याच भावनेतून मी सहकुटुंब इस्लामपूर येथे तरूण सागर महाराज यांचे प्रवचन यासाठी तीन दिवस गेलो होतो. तरूण सागर महाराज यांचा एक प्रभावी व कडवा असा विचार मला खूप आवडला.

तरूण सागर महाराज म्हणतात, मनुष्य  अतिशय हुशार प्राणी आहे. त्याने विचारपूर्वक मंदिरे गावाच्या मध्यभागी बांधली आहेत आणि त्याहून अधिक विचारपूर्वक स्मशानभूमी गावाच्या बाहेर बांधलेल्या आहेत. गावाच्या मध्यभागी बांधलेल्या मंदिरात तो जाता-येता वेळ मिळेल तेव्हा देव दर्शन घेतो, देवाजवळ भीक मागतो, इच्छा व्यक्त करतो. फक्त संकट आले की देवाचा धावा करतो .हातात संपत्ती आणि प्रसिद्धि आली की तो मौजमजेत गुंग राहतो आणि केवळ दुःख आले की त्याला देवाची आठवण होते. संत कबीर म्हणतात दुखमे स्मरण सब करे ,सुख मे करे ना कोई, जो सुख मे स्मरण करे, दुख कायेको होए . मात्र मनुष्य हे सर्व विसरून जाऊन फक्त दुःखाच्या वेळेतच ईश्वराचे स्मरण करतो. मंदिरात जातो आयुष्यभर मौजमजा करतो पण त्याला आपण कधीतरी मरणार आहोत याचे भान राहत नाही. मृत्युच्या भीतीने किंवा मी मरणारच नाही, मी अमर आहे ,मला काही होतय, मी सर्वांच्या पेक्षा मोठा आहे या अविर्भावात राहतो. मृत्यूकडे दुर्लक्ष करतो. तरूण सागर महाराज पुढे म्हणतात खरे तर मंदिरे गावाच्या बाहेर निवांत ठिकाणी डोंगरावर असली पाहिजेत आणि स्मशानभूमी गावाच्या मध्यभागात असली पाहिजे. असे असेल तर महिन्यातून एकदा दोनदा त्याला गावाच्या मध्यभागी कुणाचेतरी प्रेत जळताना पहावयास मिळेल, कुणाचा तरी मृत्यू झालेला आहे, याची त्याला जाणीव होईल आणि कधीतरी मला या ठिकाणी जायचे आहे, मला मृत्यू येणार आहे याचे भान त्याला राहिल,असे तरूण सागर महाराज म्हणतात .

तरुण सागर महाराजांचा हा विचार जेव्हा मी इस्लामपूर मधील कार्यक्रमात ऐकला तेव्हा मलासुद्धा या विचाराने प्रभावित करून सोडले. बालपण संपते, तरुणपण येतं ,परत प्रौढत्व येतो म्हातारपण येत आणि माणसाचा शेवट होतो.  कधीतरी माझा मृत्यू होणार आहे या जाणीवेतूनच मनुष्य चांगल्या विचारांचा किमान विचार तरी करतो आणि या भावनेतूनच मलासुद्धा कराड मधील मंगळवार पेठेत असलेल्या स्मशानभूमीकडे जाणारा आखरी रास्ता आवडू लागला. रोज घरातून बाहेर पडताना या स्मशानभूमीच्या उताराकडे माझी पावले वळू लागली. ऑफिसला जाण्याची वेळ दहा असल्यामुळे याच दरम्यान या स्मशानभूमीचा आखरी रास्ता वर मला रक्षाविसर्जन विधी अथवा दशक्रिया विधीसाठी येणारे लोक पाहायला मिळू लागले. कधीतरी एकादी अंत्ययात्राही पहायला मिळाली. या लोकांच्याकडे पाहिल्यानंतर मृत्यूचं सत्य मला उलगडलं . जो मृत्यू होऊन निघाला आहे त्यालाही माहिती होतं की त्याचा मृत्यू येणार आहे. मृत्यूच्या या रस्त्यावर जाण्यापूर्वी आपण काहीतरी वेगळं करावं असा विचार येत राहतो. मला एखादी अंत्ययात्रा पाहायला मिळाली की समोरून येणाऱ्या अंत्ययात्रेत मी सहभागी होत नाही. मात्र तिरडीवर बांधलेल्या त्या निर्जीव देहाकडे पाहून माझे हात आपोआप जोडले जातात आणि मनातून प्रार्थना बाहेर पडते. हे ईश्वरा, या व्यक्तीने आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी समाजासाठी खूप खस्ता खाल्ल्या असतील .त्याच्या जाण्याने समाजाचे कुटुंबाचे फार मोठे नुकसान झाले आहे. या कुटुंबाच्या दुःखात तर आम्ही सहभागी आहोत. या कुटुंबाला ही व्यक्ती पुन्हा कधी भेटणार नाही. व्यक्ती संपला की त्याची कारकीर्द संपते. या व्यक्तीच्या वारसदाराने त्याचे कर्तृत्व पुढे चालवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी प्रार्थना माझ्या तोंडातून आपोआप बाहेर पडते.  गेल्या आठ ते दहा वर्षात स्मशानभूमीचा हा आखरी रास्ता मला खूप भावतो. अनेकजण म्हणतात समोरून अंत्ययात्रा आलेले चांगले नसतं, अशुभ असतं. माझा अनुभव वेगळा आहे, आनंददायी आहे.  एवढ्या वर्षात या रस्त्यावरून जाताना मला अनेक अंत्ययात्रा पहायला मिळाल्या, रक्षाविसर्जन विधीसाठी जाणारे अनेक लोक पहायला मिळाले. त्यांच्या डोळ्यात एक दुःख पहायला मिळाले आणि या दुःखातूनच मृत्यू अटळ आहे. जिंदगी तो बेवफा हे, एक दिन ठुकरायेगी, मौत मेहबुबा है, अपने साथ लेकर जायेगी, हे माझ्या आवडत्या हिरो अमिताभ बच्चन यांचे मुकंदर का सिकंदर मधील गाणे माझ्या डोळ्यासमोर येते. म्हणूनच हा रस्ता कधी सोडलेला नाही, टाळलेला नाही.

फार वर्षांपूर्वी महाविद्यालयीन काळात एक कादंबरी वाचलेली होती . मला लेखकाचे नाव आठवत नाही मात्र त्या लेखकाने हिंदुस्थानात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या एका समाज व्यवस्थेबाबत एक टिप्पणी केली होती. ही टिप्पणी होती कुंटणखाना ,वेश्याव्यवसाय आणि अलीकडच्या काळातील शब्द घ्यायचा तर कॉलगर्ल रेडलाईट येरीया बाबत. ही एक व्यवस्था अनेक वर्षापासून समाजात कार्यरत आहे. सर्वच प्श प्रमुख शहरात असा एक भाग आहे ज्याला वेश्यावस्ती, कुंटणखाना अशा नावाने ओळखले जाते. या भागाकडे कोणीही चांगल्या नजरेने पाहत नाही एक घाणेरडा भाग म्हणून लोक तिकडे पाहतात. त्या गावातील स्थानिक स्वराज संस्थाही या लोकांना चांगल्या नागरी सुविधा कधी पुरवत नाहीत. ही समाजव्यवस्था कुणी सुरू केली आहे ,कधी सुरू केली आहे, ती योग्य आहे का अयोग्य आहे? स्त्रीला  देवी मानणाऱ्या भारतात स्त्रीचा असा व्यवसाय कोणी सुरू केला? याच्या खोलात गेलो तर याची उत्तरे सापडतीलही. मात्र या समाज व्यवस्थेमुळे समाजाचे आरोग्य सुस्थितीत राहिले आहे असे त्या लेखकाने त्याच्या एका लेखात मांडले होते. हे पटवून देताना त्या लेखकाने पुढे असे म्हटले होते, जर ही व्यवस्था नसती तर समाजात रावणरुपी, कंसरुपी,  गिधाडरुपी काही लोक आहेत त्यांनी भर दिवसा स्त्रियांना ओरबाडून खाल्ले असते. ही व्यवस्था असल्यामुळे अशा प्रकारचे वासनांध  आपली वासना शमवण्यासाठी त्या विभागात जातात. पैसे देऊन आपली भूक भागवतात. हेच लोक बाहेर येऊन उच्चभ्रू समाजात मी नाही त्यातला या भावनेत वावरतात.  मात्र या लोकांनी आपली भूक जर अशा वेश्यावस्तीत जाऊन भागवली नसते तर हे तर हे लोक समाजात,  घरात घुसले असते. रस्त्यावर स्त्रियांना त्यांनी ओरबाडून खाल्ले असते, म्हणून ही व्यवस्था योग्य आहे असे त्या लेखकाने मांडले होते. हा विचार मी माझ्या मनात कायम राहिला होता. याबाबत माझ्या सद्गुरु महाविद्यालयातील एका प्राध्यापकांनाही मी प्रश्न चालला होता. त्यांनीही याला दुजोरा दिला होता.  रामायण, महाभारत आर्वाचीन काळापासून समाजात राक्षसरुपी लोक आहेत आणि त्यांची भूक भागवण्यासाठी त्याच लोकांनी अशा प्रकारची व्यवस्था करून ठेवली आहे, असे मला एका प्राध्यापकांनी सांगितले होते. हा विचार मनातून जात नव्हता परंतु अशा प्रकारच्या महिलांना समाजात वाईट नजरेने पाहिले जाते मला पटत नव्हते. ज्या स्त्रिया पुरुषांच्या वासनेसाठी स्वतःला बळी देतात, स्वतःच्या देहाचे लचके तोडण्याचे अधिकार त्या पुरुषाला देतात , त्यांना वाईट का म्हणायचे ? पोटासाठी हा व्यवसाय करणाऱ्या अशा स्त्रिया समाजाचे सुद्धा सरंक्षन करत आहेतच ना ! मग त्यांना वाईट का बोलायचे ,असे मला सतत वाटत होते . 2001 मध्ये जेव्हा मी पुढारी वृत्तपत्रात वार्ताहर घेऊन हजर झालो. माझ्या कार्यालयाच्या पाठीमागे एसटी स्टँड परिसरातच  ही वस्ती आहे. स्टँड परिसरात गिर्‍हाईकाच्या शोधात उभे असलेल्या या स्त्रिया पाहून माझ्या मनात त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना सतत निर्माण होत होती. या स्त्रियांसाठी आपण काही करू शकत नसलो तरी किमान समाजाच्या आरोग्यासाठी स्वतःच्या शरीराचा बळी देणार्‍या या स्त्रियांप्रती कृतज्ञतेचा भाव सतत माझ्या मनात येत राहिला. समोरून अशा प्रकारची महिला आली तर मी अंतकरणापासून तिचे आभार मानत होतो . माऊली , तुझ्यामुळे समाजातील माझ्या बहिणींची आईची अब्रू वाचते आहे, मी तुझा खूप ऋणी आहे अशा प्रकारचे भाव सतत माझ्या मनात येत राहिले .

2008 झाली आम्ही पुढारी कार्यालय दुसऱ्या ठिकाणी हलवले त्यानंतर याच काळात मी सोमवार पेठ रहायला गेलो. मात्र घरी जाताना किंवा कार्यालयात येताना एकदातरी मी या परिसरातून जातो. या वस्तीकडे पाहून कृतज्ञतेचा भाव माझ्या मनात सतत येत राहतो. या स्त्रियांनी फक्त पैसे कमावण्यासाठी हा मार्ग स्वीकारलेला नाही, त्यांनासुद्धा आई-वडील बहिण-भाऊ आहेत. शरीराचा व्यवसाय करून या माऊली कर्नाटकात त्यांच्या आई-वडिलांना पैसे पाठवतात, आई वडिलांची सेवा करतात, याची मला माहिती मिळाली.

लाखो रुपये पगार असणाऱ्या काही मंडळींचे आई-वडील वृद्धाश्रमात आहेत ,ते त्यांना सांभाळत नाहीत. अशी एकीकडे परिस्थिती असताना स्वतःच्या शरीराचा व्यवसाय करून आई-वडिलांचा सांभाळ करणाऱ्या या माऊली कितीतरी पटीने त्या उच्चभ्रू लोकांपेक्षा श्रेष्ठ आहेत, याची मला जाणीव झाली..

आखरी रास्ता हा येणारच असतो, मिळणारच असतो, आपल्याला मृत्यू च्या वाटेला जावे लागणारच आहे, इच्छा असली तरी नसली तरीही ! दुसरीकडे शरीराचा व्यवसाय करणारा हा रस्ता या महिलांनी मनापासून कधी स्वीकारला नसेल, त्यांच्या पण काहीतरी अडचणी असतील.

दो रास्ते  प्रती माझा कृतज्ञतेचा भाव आयुष्यभर राहील.

सतिताभ@
karawadikarad.blogspot.com

०३ सप्टेंबर २०१८

Selfie with Ex CM Ashok Chavan

सेल्फी विथ खासदार अशोक चव्हाण

आज सकाळी हॉटेल पंकज मध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकारांसाठी चहापाण्याला निमंत्रण देण्यात आले होते. पत्रकार परिषदेत यादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना मी एक प्रश्न विचारला, संघर्ष यात्रा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर भाजप सरकार अपयशी कसे ठरले आहे याच्यावर झोड उठवत आहे. मात्र स्थानिक पातळीवर काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात?  जुन्या काही निष्ठावंत लोकांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेणार आहात का? तुमचे जवळचे मित्र अजूनही काँग्रेसमध्येच आहेत त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये मानाचे स्थान देणार का ?

माझ्या या प्रश्नावर खासदार अशोक चव्हाण यांनी कोण मित्र असा खोचक सवाल मुद्दामहून केला. यावेळी माझ्या पत्रकार मित्रानी विलास काका असे नाव घेताच  काका पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत , त्यांच्याबाबत पृथ्वीराज चव्हाण बाबा हेच निर्णय घेतील असे सांगितले.

उंडाळकरांबाबत खासदार चव्हाण यांना विचारलेल्या प्रश्नाचा रोख त्यांनी चांगलाच ओळखला आणि शेवटी तुमच्या मनात आहे  ते मला माहिती आहे असे म्हणत हसतमुखाने पत्रकार बैठक संपवली

त्यानंतर खासदार अशोक चव्हाण यांनी मला जवळ बोलावून घेतले. तुमचा पेपर कोणता , नाव काय नाव काय हे विचारून चौकशी केली. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी मला बाजूला घेतले, काय चालले आहे विचारून चौकशी केली. हर्षवर्धन पाटील यांना मी अशोक चव्हाण यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी विचारले.  पाटील यांनी अशोक चव्हाण यांना कराडचे हे पत्रकार आहेत त्यांना तुमच्यासोबत सेल्फी घ्यायचा आहे असे सांगितल्यानंतर हो माझी त्यांचे आत्ताच ओळख झाली आहे .मोरे पुढारीचे पत्रकार आहेत असे सांगून सेल्फीसाठी पोज दिली. खासदार अशोक चव्हाण यांची एखाद्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवण्याचे खुबी मला आज चांगलीच आवडली.

दरम्यान पुन्हा बाहेर आमचे काही मित्रांनी पुन्हा खासदार अशोक चव्हाण यांच्याशी अनौपचारिकपणे बोलताना उंडाळकर काकांचा विषय काढला. यावेळी हा विषय कसा मिटवायचा , काय मार्ग आहे का,पर्यायी मतदारसंघ आहे का असा प्रतिप्रश्न खा. चव्हाण यांनी पत्रकारांना केला. मतदारसंघ नाही, मात्र विधानपरिषदेचा पर्याय आहे असे पत्रकारांनी सांगितले. काही असो उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण गटांमध्ये समेट ठेवावा अशी खासदार अशोक चव्हाण यांची इच्छा आहे हे तरी यानिमित्ताने दिसून आले.

२९ ऑगस्ट २०१८

Facebook remind me Delhi

फेसबुकने जागवली दिल्लीची आठवण !

आठ वर्षांपूर्वी लोकसभेमध्ये अणुऊर्जा संदर्भात एक बिल सादर करण्यात आले होते. हे बिल सादर करण्या मध्ये तत्कालीन पंतप्रधान कार्यालयीन राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोलाची भूमिका बजावली होती. याच कालावधीत दैनिक पुढारी च्या एका महत्त्वपूर्ण कामासाठी संपादक साहेब आदरणीय प्रतापसिंह जाधव यांनी माझी दिल्ली दौऱ्यासाठी पाचारण केले होते.
याची आठवण मला फेसबुकने आज करून दिली.

माननीय संपादक प्रतापसिंह जाधव यांच्यामुळेच मला यावेळी पहिल्यांदाच विमानात बसण्याची संधी मिळाली. विमानात कसे जायचे, कसे बसायचे, तिकीट कसे काढायचे , प्रवेश करायचा याबाबत काहीही माहिती नव्हती. मात्र अचानक एके रात्री साहेबांचा फोन आला तुला तुला उद्याच्या उद्या दिलेल्या जायचे आहे. त्यानंतर साहेबांचे स्वीय सहाय्यक रणजित झेंडे यांनी मेलवर विमानाचे तिकीट पाठवून दिले दुसऱ्या दिवशी सकाळी मी मुंबईला जायला निघालो. ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक यांच्या सोबत मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाऊन पोहोचलो. तानपाठक साहेबांच्या सहकार्यामुळे पहिला विमान प्रवास अगदी सहज झाला. मुंबईतून नऊ वाजता फ्लाईट होते. रात्री अकराच्या सुमारास आम्ही दिल्ली विमानतळावर उतरलो. विमानतळावर उतरल्यापासून पुन्हा विमानतळावर येईपर्यंत काय करायचे, टॅक्सी कुठे पकडायची, दिल्लीतले मुख्य रस्ते कोणते, मेट्रोने प्रवास कसा करायचा याची सर्व माहिती मला तानपाठक यांनी दिली. आमच्या दिल्ली ऑफिसमधील सहकारी रितेश भुयार आणि गिरीश अवघडे यांनी मला सारी दिल्ली फिरून दाखवली.

नामदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून मला लोकसभेत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाहण्याची संधी मिळाली. त्या कालावधीत पुढारीने टोमॅटो एफ एम नुकताच सुरू केला होता, या चॅनेल साठी अन उर्जा आणि अणुकरार याचे महत्व या विषयावर नामदार पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घ्यावी आणि ती टप्प्याटप्प्याने टॉवर प्रसारित करावी असा विचार आमचे आमचे युवा प्रबंध कार्यकारी संपादक योगेश प्रतापसिंह जाधव यांनी मांडला.

मी हा विषय तेव्हाचे दिल्लीचे पुढारी चे प्रमुख धर्मानंद कामत यांच्याबरोबर जाऊन पृथ्वीराज चव्हाण यांच्या कानी घातला.  पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या घराशेजारी पृथ्वीराज चव्हाण यांचे शासकीय निवासस्थान होते. या निवासस्थानात जाऊन माननीय बाबांच्या कानावर मी ही कल्पना मांडली. बाबांनी माननीय साहेबांशी चर्चा केली आणि होकार दिला. दोन दिवसांनी माननीय योगेशदादा दिल्लीत पोहचले.

अणुऊर्जा आणि अणुकरार या विषयावर माननीय योगेश दादा, धर्मानंद कामत, श्रीराम जोशी आणि मी नामदार पृथ्वीराज चव्हाण यांची सविस्तर मुलाखत घेतली. ही मुलाखत टोमॅटोसाठी रेकॉर्ड करण्यात आली आणि त्यानंतर प्रसारित झाली या घटनेला आज आठ वर्षे पूर्ण होत आहेत .

या कालावधीतच मला नामदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत अनेक विषयावर चर्चा करण्याची संधी मिळाली आणि तेव्हापासूनच बाबांचे आणी माझे संबंध दृढ होत गेले.

पुढारीकारांमुळेच हे सर्व शक्य झाहले.

२४ जुलै २०१८

मनोयन

दोन पाऊलं
तुझ्या सोबतची
मज भावून गेली!
मन धुंद होऊनी
दिल खुश झाहले !

तुझ्या सोबतचे दोन क्षण,
मला वेडाऊन गेले
मन तव गुंतले
ह्दय धडधडले.!
मन धुंद होऊनी
दिल खुश झाहले !

हाय तुझी अदा,
उफ तेरी एक नजर,
धडकन वाढवून गेले !
तुझ्या सोबतचे दोन क्षण
मला वेडाऊन गेले !
मन धुंद होऊनी
दिल खुश झाहले !

तु जवळ आहेस,
हे स्वप्नच भासले
दिल खुश झाहले !
तुझ्या सोबतचे दोन क्षण
मला वेडाऊन गेले !
मन धुंद होऊनी
दिल खुश झाहले !

तुझा एक कटाक्ष
तुझी चोरटी नजर
बेधुंद करून गेले
तुझ्या सोबतचे दोन क्षण
मला वेडाऊन गेले !
मन धुंद होऊनी
दिल खुश झाहले !

@ सतिताभ

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...