फॉलोअर

२९ ऑगस्ट २०१८

Facebook remind me Delhi

फेसबुकने जागवली दिल्लीची आठवण !

आठ वर्षांपूर्वी लोकसभेमध्ये अणुऊर्जा संदर्भात एक बिल सादर करण्यात आले होते. हे बिल सादर करण्या मध्ये तत्कालीन पंतप्रधान कार्यालयीन राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोलाची भूमिका बजावली होती. याच कालावधीत दैनिक पुढारी च्या एका महत्त्वपूर्ण कामासाठी संपादक साहेब आदरणीय प्रतापसिंह जाधव यांनी माझी दिल्ली दौऱ्यासाठी पाचारण केले होते.
याची आठवण मला फेसबुकने आज करून दिली.

माननीय संपादक प्रतापसिंह जाधव यांच्यामुळेच मला यावेळी पहिल्यांदाच विमानात बसण्याची संधी मिळाली. विमानात कसे जायचे, कसे बसायचे, तिकीट कसे काढायचे , प्रवेश करायचा याबाबत काहीही माहिती नव्हती. मात्र अचानक एके रात्री साहेबांचा फोन आला तुला तुला उद्याच्या उद्या दिलेल्या जायचे आहे. त्यानंतर साहेबांचे स्वीय सहाय्यक रणजित झेंडे यांनी मेलवर विमानाचे तिकीट पाठवून दिले दुसऱ्या दिवशी सकाळी मी मुंबईला जायला निघालो. ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक यांच्या सोबत मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाऊन पोहोचलो. तानपाठक साहेबांच्या सहकार्यामुळे पहिला विमान प्रवास अगदी सहज झाला. मुंबईतून नऊ वाजता फ्लाईट होते. रात्री अकराच्या सुमारास आम्ही दिल्ली विमानतळावर उतरलो. विमानतळावर उतरल्यापासून पुन्हा विमानतळावर येईपर्यंत काय करायचे, टॅक्सी कुठे पकडायची, दिल्लीतले मुख्य रस्ते कोणते, मेट्रोने प्रवास कसा करायचा याची सर्व माहिती मला तानपाठक यांनी दिली. आमच्या दिल्ली ऑफिसमधील सहकारी रितेश भुयार आणि गिरीश अवघडे यांनी मला सारी दिल्ली फिरून दाखवली.

नामदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून मला लोकसभेत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाहण्याची संधी मिळाली. त्या कालावधीत पुढारीने टोमॅटो एफ एम नुकताच सुरू केला होता, या चॅनेल साठी अन उर्जा आणि अणुकरार याचे महत्व या विषयावर नामदार पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घ्यावी आणि ती टप्प्याटप्प्याने टॉवर प्रसारित करावी असा विचार आमचे आमचे युवा प्रबंध कार्यकारी संपादक योगेश प्रतापसिंह जाधव यांनी मांडला.

मी हा विषय तेव्हाचे दिल्लीचे पुढारी चे प्रमुख धर्मानंद कामत यांच्याबरोबर जाऊन पृथ्वीराज चव्हाण यांच्या कानी घातला.  पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या घराशेजारी पृथ्वीराज चव्हाण यांचे शासकीय निवासस्थान होते. या निवासस्थानात जाऊन माननीय बाबांच्या कानावर मी ही कल्पना मांडली. बाबांनी माननीय साहेबांशी चर्चा केली आणि होकार दिला. दोन दिवसांनी माननीय योगेशदादा दिल्लीत पोहचले.

अणुऊर्जा आणि अणुकरार या विषयावर माननीय योगेश दादा, धर्मानंद कामत, श्रीराम जोशी आणि मी नामदार पृथ्वीराज चव्हाण यांची सविस्तर मुलाखत घेतली. ही मुलाखत टोमॅटोसाठी रेकॉर्ड करण्यात आली आणि त्यानंतर प्रसारित झाली या घटनेला आज आठ वर्षे पूर्ण होत आहेत .

या कालावधीतच मला नामदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत अनेक विषयावर चर्चा करण्याची संधी मिळाली आणि तेव्हापासूनच बाबांचे आणी माझे संबंध दृढ होत गेले.

पुढारीकारांमुळेच हे सर्व शक्य झाहले.

२४ जुलै २०१८

मनोयन

दोन पाऊलं
तुझ्या सोबतची
मज भावून गेली!
मन धुंद होऊनी
दिल खुश झाहले !

तुझ्या सोबतचे दोन क्षण,
मला वेडाऊन गेले
मन तव गुंतले
ह्दय धडधडले.!
मन धुंद होऊनी
दिल खुश झाहले !

हाय तुझी अदा,
उफ तेरी एक नजर,
धडकन वाढवून गेले !
तुझ्या सोबतचे दोन क्षण
मला वेडाऊन गेले !
मन धुंद होऊनी
दिल खुश झाहले !

तु जवळ आहेस,
हे स्वप्नच भासले
दिल खुश झाहले !
तुझ्या सोबतचे दोन क्षण
मला वेडाऊन गेले !
मन धुंद होऊनी
दिल खुश झाहले !

तुझा एक कटाक्ष
तुझी चोरटी नजर
बेधुंद करून गेले
तुझ्या सोबतचे दोन क्षण
मला वेडाऊन गेले !
मन धुंद होऊनी
दिल खुश झाहले !

@ सतिताभ

२२ जुलै २०१८

प्रेमत्रागा

प्रेमत्रागा

आजपासून मी तुला
लव्ह यु म्हणणार नाही !
तुझं माझ्यावर प्रेम आहे का?
हे पण विचारणार नाही !

माझी आठवण काढतेस का?
माझ्या साठी झुरतेस का?
मला मिस करतेस का?
हे पण विचारणार नाही !
आजपासून मी तुला
लव्ह यु म्हणणार नाही !

माझी सावली होणार काय ?
माझ्या साठी काय करशील ?
मी तुला का आवडतो ?
हे पण विचारणार नाही !
आजपासून मी तुला
लव्ह यु म्हणणार नाही !

तु माझी आहेस ना ?
तुझ्या ह्दयात मला जागा आहे का ?
माझ्यासाठी तुला वेळ आहे का?
हे पण विचारणार नाही !
आजपासून मी तुला
लव्ह यु म्हणणार नाही !

किती दिन माझ्यावर प्रेम करणार?
माझ्या साठी काय काय करणार?
माझ्यासाठी किती वेळ वाट पाहणार?
हे पण विचारणार नाही !

आजपासून मी तुला
लव्ह यु म्हणणार नाही !

का म्हणू तुला
लव्ह यु ?
जे आहे ते तुला
माहितच आहे !
फक्त मी
म्हणत राहू अन्
तुझ्या लव्ह यु
साठी किती
वाट पाहू ?

@ सतिताभ.

२१ जुलै २०१८

प्रर्जेन्य नक्षत्रे कोणती

⛈🌈⛈⛱⛈🌈⛈
➖➖➖➖➖➖➖
_*🌀🙇🏻‍♂मनातील प्रश्न..*_

*☑ विज्ञानाचा आधार न घेता शेकडो वर्षांपासून पावसाचे अंदाज आणि ठोकताळे कसे बांधले जातात...??*

*🌀 पर्जन्य नक्षत्रे कोणती..???*

*🌀 पावसाला पडलेली नावे कोणती..??  तरणा पाऊस, म्हातारा पाऊस म्हणजे काय..??*
➖➖➖➖➖➖➖
_*📚

तुम्हाला बिरबल-बादशहाची ती गोष्ट माहीत असेल. एकदा बादशहाने बिरबलाला विचारले की, ‘सत्तावीसातून नऊ गेले तर उरले किती?’

बिरबलाने उत्तर दिले ‘ शून्य!’

बादशहाने हे कसे असे विचारताच बिरबल म्हणाला, ‘सत्तावीस नक्षत्रांपैकी जर जास्त पावसाची मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त ही नक्षत्रे कोरडी गेली, पाऊस पडला नाही तर काहीही उरणार नाही!’ बिरबलाच्या या चतुर उत्तरावर बादशहा खूश झाला.
🔲🔲🔲

*🌀 पर्जन्य नक्षत्रे कोणती..???*

सूर्य ज्यावेळी मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती या नक्षत्रात असतो त्यावेळी आपल्याकडे जास्त पाऊस पडतो. त्यामुळे या नक्षत्रांना ‘पर्जन्य नक्षत्रे’ असे म्हणतात. प्राचीन काळापासून हिंदुस्थान हा शेतीप्रधान देश आहे. हिंदुस्थानात बऱ्याचअंशी शेती ही पावसावर अवलंबून असते. त्यामुळे दरवर्षी पाऊस कसा पडणार हे जाणून घेण्याची सर्वांचीच इच्छा असते.
🔲🔲🔲

*◼पावसाचा अंदाज आणि ठोकताळे कसे बांधले जातात....??*

पूर्वी विज्ञान आताच्या इतके प्रगत नव्हते. त्याकाळी अद्ययावत वेधशाळाही नव्हत्या. पावसाविषयी नक्षत्र वाहनांवरून ठोकताळे बसविले जायचे. पर्जन्य नक्षत्रांची वाहने पाहून पावसाविषयी अंदाज केले जायचे. नक्षत्रांचे वाहन ठरविण्याचा नियम असा आहे. सूर्य ज्या नक्षत्रात प्रवेश करील त्या नक्षत्रापासून प्रवेशकालीन चंद्र नक्षत्रापर्यंत नक्षत्रसंख्या मोजावी व त्या संख्येस नऊने भागवावे. जी बाकी राहील तिच्यावरून वाहन जाणावे. शून्य बाकी राहिली तर हत्ती, १-घोडा, २-कोल्हा, ३-बेडूक, ४-मेंढा, ५-मोर, ६-उंदीर, ७-म्हैस, ८-गाढव अशी वाहने ठरविली जातात.

▪घोडा वाहन असता डोंगर-पर्वतावर पाऊस पडेल.
▪कोल्हा व मेंढा वाहन असता पाऊस पडणार नाही.
▪मोर, गाढव व उंदीर वाहन असता कमी पाऊस पडेल.
▪बेडूक, म्हैस व हत्ती वाहन असता खूप पाऊस पडेल असे समजले जाते.

अर्थात यावरून तुमच्या लक्षात येईल की, या नियमाला कोणताही वैज्ञानिक आधार नसतो. हा केवळ ठोकताळाच असतो. कधी तो अंदाज चुकतो तर कधी तो अंदाज बरोबर येतो. पण ही पद्धत शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे.

🔲🔲🔲

*◼पावसालाही पडलेली नावे...*

स्वभावाप्रमाणे एकमेकाला नावे ठेवण्याची माणसाची सवयच आहे. त्याप्रमाणे प्रत्येक नक्षत्रात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावरून पावसालाही नावे ठेवण्यात आलेली आहेत.

*▪तरणा पाऊस -* दरवर्षी सूर्य साधारणतः ५ ते १८ जुलै या काळात पुनर्वसू नक्षत्रात असतो. या काळात साधारणतः सतत मुसळधार पाऊस पडत असतो. म्हणून पुनर्वसूच्या पावसाला ‘तरणा पाऊस’ म्हणतात.
*▪म्हातारा पाऊस -* पुष्य नक्षत्राचा काळ १९ जुलै ते १ ऑगस्ट हा असतो. या कालात पाऊस मध्ये मध्ये थांबत असतो म्हणून पुष्य नक्षत्रात पडणाऱया पावसाला ‘म्हातारा पाऊस’ म्हणतात.
*▪आसळकाचा पाऊस -*
आश्लेषा नक्षत्र २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट असते. या नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘आसळकाचा पाऊस’ म्हणतात.
*▪सासूंचा/सासवांचा पाऊस -*
सूर्य १६ ते २९ ऑगस्ट मघा नक्षत्रात असतो. या नक्षत्रात मेघगर्जनेसह जोरात पाऊस पडतो म्हणून मघा नक्षत्रात पडणाऱया पावसाला ‘सासूंचा पाऊस’ म्हणतात.
*▪सुनांचा पाऊस -*
३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालात सूर्य पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात असताना पाऊस शांतपणे पडतो म्हणून या नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘सुनांचा पाऊस’ असे म्हणतात.
*▪रब्बीचा पाऊस -* उत्तरा फाल्गुनी नक्षत्रातील १३ ते २५ सप्टेंबर या काळात पडणारा पाऊस रब्बीच्या पिकांना उपयुक्त ठरतो म्हणून या पावसाला ‘रब्बीचा पाऊस’ म्हणतात.
*▪हत्तीचा पाऊस -* २६ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालात पडणाऱ्या हस्त नक्षत्रातील पावसाला ‘हत्तीचा पाऊस’ म्हणतात.

Astro विशारद दा. कृ. सोमण यांच्या माहितीतुन..

_*📚 ..✒*_
➖➖➖➖➖➖➖
⛈🌈⛈⛱⛈🌈⛈

२७ जून २०१८

पाऊस कसा पडतो

_*🌀🙇🏻‍♂मनातील प्रश्न..*_

💦🌧⛈💦🌧⛈💦
➖➖➖➖➖➖➖
*☑ नेमका कसा पडतो पाऊस..? ढगांचे प्रकार कोणते...? पावसाचे ढग कोणते...? पावसाचे प्रकार किती...?*
➖➖➖➖➖➖➖

भूप्रुष्ठावरील मोठ्या प्रमाणावरील पाणीसाठ्याची (जसे समूद्राचे पाणी) सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होते आणि ती वरती आकाशाकडे जाते . या सततपणे तयार होणाऱ्या वाफेचे ढग बनतात.वाढत्या उंचीप्रमाणे वातावरणातल्या दाबाच्या जास्त- कमी फरकाने हवा एका ठिकाणाहून दुसरीकडे हे ढग घेऊन वाहू लागते. विशिष्ट उंचीवर ती हवा संतृप्त बिंदू (ज्या तापमानाला हवेतील बाष्पाचे प्रमाण अधिकतम असते ते तापमान) गाठते . मात्र या बाष्पाचे पून्हा द्रवीकरण होण्यासाठी हवेत पुरेशा संख्येने आर्द्रतेस शोषणारे केंद्रके उपस्थित असावे लागतात तरंच बाष्पाचे जलबिंदूत रूपांतर होते.
🔲🔲🔲

_*◾ढगांचे ढोबळमानाने चार प्रकार आहेत.*_

*◼१) राशीमेघ वा क्युम्युलस (ढिगाप्रमाणे दिसणारे) ढग.-* ह्या ढगांमधे पाणी बाष्प व द्रव रूपात असून पाण्याचे प्रमाण कमी असते. ह्या ढगांची भूपृष्ठापासूनची उंची जास्त नसते. हे सहसा चमकदार पांढर्‍या रंगाचे असतात (‘कापूस पिंजून ठेवलाय जसा’ वाला ढग).
*◼२) वर्षामेघ वा निंबस (पावसाळी) ढग.-* हे ढगही ढिगाप्रमाणे दिसतात आणि त्यांच्यातील पाण्याचे प्रमाण खूप अधिक असल्याने काळे दिसतात व जास्त उंचावर नसतात. हे ढग पाऊस देतात._
*◼३) तंतूमेघ वा सिरस (पिंजलेल्या दोर्‍याप्रमाणे वा पिंजारलेल्या केसांप्रमाणे दिसणारे) ढग.-* हे राशीमेघ वा वर्षामेघांपेक्षा अधिक उंचीवर असतात.
*◼४) स्तरीमेघ वा स्ट्रॅटस ढग.-* हे पांढरे असून विरळ चादरीप्रमाणे दिसतात. ह्यातील पाणी हे हिमकणांच्या रूपात असते. हे वातावरणामध्ये बर्‍याच उंचीवर असतात.
🔲🔲🔲
ह्या चार प्रकारातील काही प्रकार मिळून तयार होणारे ढग उपप्रकारात मोडतात. तंतूस्तरमेघ वा सिरोस्ट्रॅटस हा उपप्रकार तंतू व स्तरी प्रकारचे ढग मिळून तयार झालेला असतो.
🔲🔲🔲

*◾ढगांची जाडी :* हवेच्या दाबानूसार ढग सतत फिरत असतात. त्यात जलबिंदू असले तरी ते पाऊसरूपाने जमिनीवर पडतीलच याचा नेम नसतो. साधारणपणे ढगांची जाडी जसजशी वाढत जाते तसतशी त्यांची पर्जन्यक्षमताही वाढते. ३,६५० मी. पेक्षा अधिक जाडी असलेल्या ढगांतून हमखास पाऊस पडतो. ढगात सूक्ष्म जलकणांचे मोठ्या पर्जन्यबिंदूत रूपांतर होण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सहजच उपलब्ध असतात त्यापैकी सर्वांत प्रभावी म्हणजे जलबाष्पयुक्त हवेची ऊर्ध्वगती, पाऊस किती पडेल हे यावर बहुतांश अवलंबून असते. अशा प्रकारे दव, धुके, मंद तुषार , अतिवृष्टी , गारा ,हिमवर्षाव असे निसर्ग आविष्कार पहायला मिळतात.
🔲🔲🔲
जेव्हा जलकणांचा व्यास २० ते ४०μ असतो तेव्हा त्यांचा वातावरणातून खाली येण्याचा वेग ०.०१ ते ५.०० सेंमी./से. असतो आणि ते पर्जन्यरूपाने खाली पडूच शकत नाहीत. मंद तुषारांत जलबिंदूचा व्यास ०.२ मिमी. ते ०.५ मिमी. असतो. हे कण साधारणपणे हवेच्या मंद प्रवाहांबरोबर भ्रमण करीत असतात. जेव्हा जलबिंदू व्यास २ ते ६ मिमी आणि त्याचा खाली येण्याचा वेग ७० सेंमी./ से. ते ९ मी./ से. असा असतो तेव्हा पाऊस पडतो. या जलबिंदूचे पाऊस म्हणून रूपांतर होवून जमिनीवर येतानाच्या प्रवासात हवेची उर्ध्व वा आडवी गती याप्रमाणे थेंबांचे आकार कमी-जास्त होतात, त्यांचा पतनवेगही वाढतो वा कमी होतो आणि त्यानुसार थेंब पर्जन्यरूपाने खाली पडू लागतात वा अधःप्रवाह रूपाने दुसऱ्या दिशेने वाहून जातात. काही शीत ढग हिमरेषेपेक्षा म्हणजे वातावरणात ०° से. तापमान असलेल्या पातळीपेक्षा उंच वाढतात. बर्फकणांवर अतिशीत जलबिंदूचे आक्रमण होवून बर्फकणांचे आकारमान वाढून ते बर्फवर्षाव म्हणून खाली पडू लागतात. हि झाली पाऊस पडण्याची प्रक्रिया.... ,
🔲🔲🔲

*◾यानूसार पावसाचे प्रमुख तीन प्रकार केलेले आहेत.*

*🌀१. आरोह किंवा अभिसरण पर्जन्य :* विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर हवा थंड होते. हवेच्या अशा प्रकारे वरच्या दिशेस जाण्याच्या प्रक्रियेला आरोह असे म्हणतात. थंड हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते त्यामुळे या हवेचे सांद्रीभवन होऊन जलकणात रूपांतर होऊन पाऊस पडतो. ज्या प्रदेशात हवेची ऊर्ध्वगामी हालचाल मोठ्या प्रमाणात होते; तसेच क्षितिज समांतर रेषेत ती फारशी होत नाही अशा प्रदेशात या प्रकारचा पाऊस पडतो. विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडतो.

*🌀 २ . प्रतिरोध पर्जन्य -* समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे बाष्पयुक्त वारे मार्गात येणाऱ्या उंच पर्वतरांगांमुळे अडवले जावून. पर्वताला अनुसरून वरवर जाऊ लागतात. उंचीवरील कमी तापमानामुळे या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते आणि पाऊस पडतो. अडथळ्यामुळे हा पाऊस पडतो म्हणून अशा पावसाला प्रतिरोध पर्जन्य म्हणतात. ज्या दिशेने वारे पर्वताला अनुसरून वरवर जातात, त्या उतारावर पाऊस जास्त पडतो, तर पर्वत ओलांडल्यावर येणाऱ्या भागात वाऱ्यातील बाष्पाचे प्रमाण कमी झाल्याने व हवेची बाष्पधारण क्षमता वाढल्यामुळे पावसाचे प्रमाण अतिशय कमी होते. अशा कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशाला पर्जन्यछायेचा प्रदेश असे म्हणतात.

*🌀३. आवर्त पर्जन्य -* एखाद्या प्रदेशात आवर्ताची निर्मिती होत असताना आवर्तातील हवा वर जाऊ लागते. हवा वर जात असताना तिचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते व पाऊस पडतो, अशा पर्जन्यास आवर्त पर्जन्य म्हणतात. आवर्त एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असतात ते ज्या प्रदेशावरून जातात तेथे पाऊस पडतो. अशा प्रकारचा पाऊस समशीतोष्ण पट्ट्यामध्ये जास्त प्रमाणात पडतो. तसेच उष्ण पट्ट्यामध्येदेखील काही प्रमाणात "आवर्त पर्जन्य' पडतो तो वादळी स्वरूपाचा असतो.
🔲🔲🔲
_जगात सर्वांत जास्त भागात वरील तीन प्रकारच्या पावसापैकी प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. आरोह प्रकारच्या पावसात तशी निश्चितता असते परंतु त्यामानाने प्रतिरोध व आवर्त पर्जन्यात निश्चितता कमी असते. त्यामुळे या प्रकारांत काही वेळेस अतिवृष्टी, पूर, तर काही वेळा अवर्षणासारख्या आपत्तींना तोंड द्यावे लागते._

_
➖➖➖➖➖➖➖
💦🌧⛈💦🌧⛈💦

२६ जून २०१८

वकिलांचा ड्रेस काळा का

_*🌀🙇🏻‍♂मनातील प्रश्न..✍🏼*_

🤵🏻👨🏻‍⚕🤵🏻👨🏻‍⚕🤵🏻👨🏻‍⚕🤵🏻
➖➖➖➖➖➖➖
*☑ वकील काळा कोट आणि पांढरा बँड, तर डॉक्टर पांढरा कोट का घालतात? जाणून घ्या यामागचं लॉजिक...*
➖➖➖➖➖➖➖

या जगातल्या प्रत्येक गोष्टीमागं काहीतरी निमित्त किंवा कारण दडलेलं असतं भाऊ. काही कारणच नसतं तर त्या गोष्टीचं अस्तित्वच उरलं नसतं... असो, फिलॉसॉफी बाजूला ठेवूयात. आज आपण आपल्या ज्ञानात आणखी थोडी भर टाकूया. चला, जाणून घेऊया वकीलांचा युनिफॉर्म हा नेहमी काळा आणि डॉक्टरांचा पांढराच का असतो? काय आहे यामागचं कारण?
🔲🔲🔲
तुम्हाला माहितीच असेल की रंग हे नेहमीच आपल्या मनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम करत असतात. त्यामुळं वकील आणि डॉक्टरांच्या या विशिष्ट वेशभूषेमागेही एकप्रकारचं मनोविज्ञान दडलेलं आहे.  इथं वकिलांच्या काळ्या कोटाचा संबंध ब्रिटिश राजवटीशी येतो. म्हणजेच इतर अनेक पध्दतींप्रमाणं ही पध्दतही आपण ब्रिटिशांकडून घेतलीय.
🔲🔲🔲

*◾ड्रेस कोड मागील इतिहास..*

वकिलांच्या ड्रेस कोडची सुरुवात एडवर्ड तिसरा याने १३२७ साली केली. त्याकाळी रॉयल कोर्टामध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक न्यायाधीशासाठी एक पेहराव असावा असे सुचवले. पुढे १३ व्या शतकाच्या समाप्तीपर्यंत त्याने ठरवलेला पेहराव काहीसे बदल करून बंधनकारक करण्यात आला. त्याकाळी सार्जंट आपल्या डोक्यावर केसांचचा विग घालून बसायचे आणि सेंट पेल्सकॅथेड्रलमध्ये प्रॅक्टिस करायचे. तेव्हा वकिलांची स्टुडंट, प्लीडर, बेंचर आणि बॅरिस्टर या चार भागांमध्ये विभागणी करण्यात आली होती. त्या काळात सोनेरी लाल कपडे आणि खाकी रंगाचा गाऊन परिधान केले जात असे.
🔲🔲🔲
१६०० साली या ड्रेसकोडमध्ये काहीसा बदल झाला आणि १६३७ साली प्रीवी काऊन्सीलने सांगितलं की, समाजानुसार न्यायलयाने कपडे परिधान केले पाहिजेत. तेव्हापासून वकिलांनी पूर्ण अंग झाकले जाईल एवढ्या लांबीचा गाऊन घालण्याची प्रथा सुरु झाली. तेव्हा असं मानण्यात यायचं की, गाऊन आणि विग न्यायाधीश आणि वकिलांना इतर व्यक्तींपासून वेगळं दर्शवतात.
🔲🔲🔲
१६९४ साली राणी मेरीच्या मृत्युनंतर राजा विल्यम याने सर्व न्यायाधीश आणि वकिलांना राणीच्या मृत्यूच्या शोकाचे प्रतिक म्हणून काळा गाऊन परिधान करून न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आणि तेव्हापासून राजा विल्यमने दिलेला आदेश कधीही मागे घेण्यात आला नाही आणि वकील आणि न्यायाधीशांचा काळा कोट (गाऊन) हा ड्रेसकोड झाला. न्यायाधीश आणि वकिलांनी देखील या पेहरावावर आक्षेप घेतला नाही आणि काळ्या रागांचा पेहराव मान्य केला.
🔲🔲🔲

*भारतात १९६१ च्या ऍडव्होकेट अॅक्टनुसार देशातल्या सर्व कोर्टातल्या वकीलांसाठी हा काळा ड्रेसकोड आणि पांढरा बँड बंधनकारक आहे. महिला काळ्या कोटसोबत पांढरी साडी नेसू शकतात. त्याचबरोबर पांढरा कॉलर, पांढरा बँडही वकीलांचा वेशभूषेचा भाग आहेत.*
🔲🔲🔲
*_🔺It was believed that gowns and wigs gave a degree of anonymity to judges and lawyers. In India , the Advocate's Act 1961 makes it mandatory for advocates appearing in the supreme court., high courts, subordinate courts, tribunals or authorities to wear a dress that is sober and dignified._*
🔲🔲🔲
यामागची भावना अशी आहे की, या पेहरावामुळे वकिलांमध्ये एक शिस्त जोपासली जाते आणि त्यांच्या मनात न्यायाने लढण्याचा एक विश्वास निर्माण होतो. तसेच हा पेहराव त्यांना शांत आणि सन्मानजनक स्वरूप प्रदान करतो. तसंच त्यामुळं त्यांच्यात एकप्रकारची गंभीरता आणि रहस्यमय प्रवृत्तीची छाप दिसावी. काळा रंग त्यांचा उच्चभ्रू दर्जा दर्शवायचा. हाच काळा रंग निःपक्षपातीपणा आणि अधिकाराचं प्रतिकही समजला जातो. तो न्यायदानाच्या प्रक्रियेत बाह्य प्रभावांना प्रतिकार करण्याची प्रेरणा देतो. त्याचप्रमाणं पांढर्‍या आणि काळ्या रंगाचं मिश्रण हे औपचारिकतेचंही प्रतिक आहेत. या पेहरावामुळे वकिलांना आणी न्यायाधीशांना समाजामध्ये ओळख मिळते.
🔲🔲🔲
काळ्या रंगाचा पेहराव परिधान करण्यामागे अजून एक दावा असा केला जातो की, काळा रंग हा एकमात्र असा रंग आहे ज्यावर इतर रंग चित्रित केले जाऊ शकत नाहीत. म्हणजेच न्यायाधीशांनी दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय असेल जो बदलता येणार नाही आणि वकिलांसाठी या काळ्या रंगाचा अर्थ असा आहे की स्वत:ची मते आणि विचार न्यायदेवतेसमोर मांडताना त्यांनी विवेकी आचरण करावे.
🔲🔲🔲

*◾गळ्याला पांढरा बँड का?*
१६४० सालापासून आपल्या शर्टाची कॉलर लपवण्यासाठी वकिलांनी लिननच्या पांढऱ्या कपड्याचा वापर करण्यास सुरुवात केली. १८६० साली या कपड्याचे स्वरूप बदलून दोन आयताकारी भागांसारखा झाला. (म्हणजे जे आताचे बँड आहेत तसा) पांढऱ्या रंग हा शांतीचे प्रतिक असून न्यायाधीश आणि वकिलांनी सत्याच्या बाजूने लढून समाजामध्ये शांती प्रस्थापित करावी अशी भावना पांढऱ्या रंगामागे असल्याचे सांगितले जाते.
🔲🔲🔲

*◾डॉक्टरांचा पांढरा ड्रेस कोड...*

डॉक्टरांनी पांढरा कोट घालण्याची सुरुवात विसाव्या शतकाच्या दरम्यान झाली होती. खरेतर हा रंग स्वच्छतेचे प्रतिक असते आणि याचबरोबर हा रंग व्यक्तीची इमानदारी पावित्र्य आणि निष्ठेचेही प्रतिक आहे. यामुळेच दुनियेच्या सगळ्या पैलूंमध्ये पांढरा रंग श्रेष्ठ आणि पवित्र असा मानला जातो. पांढरा रंग हा शांतता स्वच्छता, पवित्रता, विश्वास आणि प्रामाणिकपणाचं प्रतिक आहे. म्हणूनच वैद्यकीय पेशासाठी हा रंग अत्यंत महत्वाचा ठरतो. हा रंग आपल्याला एकप्रकारची सकारात्मक उर्जा प्रदान करतो आणि त्यामुळं तणावापासुन मुक्ती मिळते. याच कारणामुळं डॉक्टर तसेच दवाखान्यातील अन्य कर्मचारीही पांढर्‍या रंगाचा ड्रेसकोड वापरतात. बहूतांश फार्मासिस्ट, लॅबमधले कर्मचारी आणि वैज्ञानिकही याच रंगाचे कपडे वापरतात.
🔺संकलन सचिन मणियार..✍🏼
➖➖➖➖➖➖➖
🤵🏻👨🏻‍⚕🤵🏻👨🏻‍⚕🤵🏻👨🏻‍⚕🤵🏻

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...