फॉलोअर

२४ फेब्रुवारी २०२६

गोव्यातील अध्यात्मिक महोत्सव... दोन दिवस


अध्यात्माच्या सागरात दोन दिवस — गोव्यातील माझा अविस्मरणीय अनुभव..

_सतीश मोरे पुढारी कराड पत्रकार_

जगभरात समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेले Goa यावेळी एका वेगळ्याच कारणासाठी उजळून निघाले होते. दोन दिवस चाललेल्या गोवा अध्यात्मिक महोत्सवात माझे मित्र जितेंद्र डुबल यांच्या सोबत सहभागी होताना मला जाणवले—हा केवळ धार्मिक कार्यक्रम नव्हता; तो आत्मजागृतीचा, आत्मविश्वासाचा आणि सांस्कृतिक अभिमानाचा महासंगम होता.Calangute Beachच्या समुद्रालगत उभारलेल्या भव्य व्यासपीठावर देश-विदेशातील संत, स्वामी, मताधिपती आणि धर्मगुरू एकत्र आले होते. समुद्राच्या लाटांमध्ये मंत्रोच्चार गुंजत होते आणि अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीने झालेली आरती मनाला विलक्षण शांतता देणारी होती.

🛕 संतांचा दिव्य संगम
या महोत्सवात अनेक पूज्य संत आणि धर्मगुरूंची उपस्थिती लाभली.
यामध्ये—
पूज्य स्वामी जितेन्द्रानंद सरस्वती जी
अनंत विभूषित जगद्गुरु रामानुजाचार्य
महंत रविंद्रपुरी स्वामीजी
महामंडलेश्वर स्वामी धर्मदेव महाराज जी
जगद्गुरु सत्यानंदाचार्य श्री ज्ञानेश्वराचार्यजी महाराज
महामंडलेश्वर श्री जनार्दन हरे स्वामीजी
अनंत श्री विभूषित श्री श्री 108 तपोनिधि जितेंद्रिय पूज्य स्वामी रामभद्राचार्यजी आचार्यजी – मैनपुरी
गोस्वामी सुशील महाराजजी – नई दिल्ली
अनंत श्री विभूषित महामंडलेश्वर स्वामी चिदानन्द सरस्वती जी – ऋषिकेश
महादलेश्वर नारायणानंद गिरि महाराज – उदयपुर
सनातन धर्मरक्षक डॉ. राजराजेश्वर गुरुजी – लंदन (UK)
श्री अनंतनाथ चेतन्य स्वामीजी – पुणे
महामंडलेश्वर यति यज्ञेश्वरानंद महाराज – इंदौर
अनन्त श्री विभूषित भैय्याजी स्वामीजी – हरिद्वार
महंत श्री नरेश पुरीजी – राजस्थान
संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज – महाराष्ट्र
मोहनदास रामजीजी – राजस्थान
स्वामी श्री अमृतानंद जी – जामनगर
महामंडलेश्वर श्री निर्गुण स्वामीजी – हरिद्वार या सर्व संतांच्या सान्निध्यात दोन दिवस घालवणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट होती. विविध पंथ, परंपरा आणि विचारधारा असूनही सर्वांचे एकच ध्येय होते—सनातन संस्कृतीचे जतन आणि अध्यात्मिक जागृती.


✨ माझ्यासाठी प्रेरणेचा केंद्रबिंदू

या महोत्सवाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय मंत्री चिराग पासवान होते. त्यांचे भाषण माझ्यासाठी या संपूर्ण कार्यक्रमाचा आत्मा ठरले.त्यांनी सांगितले की, “अध्यात्मिक ताकद हीच जीवनातील संकटांवर मात करण्याची खरी शक्ती आहे.”त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांचा उल्लेख केला. चार वर्षांपूर्वी मला माझ्याच पक्षातील लोकांनी पक्षातून बाहेर काढले. अतिशय कठीण परिस्थिती निर्माण झाली होती माझ्यासोबत कोणी नव्हतं मात्र माझी शंभू महादेवावर श्रद्धा होती. श्रद्धा आणि शंभू महादेवावरील विश्वासामुळेच आपण पुन्हा उभे राहू शकलो,असे नमूद केले. त्यांच्या शब्दांत केवळ राजकीय भाषणाची औपचारिकता नव्हती; तर जीवनानुभवातून आलेली प्रामाणिकता होती. त्या क्षणी मला जाणवले—अध्यात्म म्हणजे केवळ पूजा किंवा विधी नाही; ती अंतर्मनाला बळ देणारी ऊर्जा आहे.

गोव्याची नव्याने उमटलेली ओळख या दोन दिवसांत मला गोव्याची नवी ओळख दिसली. Shri Mangeshi Temple, Shantadurga Temple, Mahalasa Narayani Temple यांसारख्या मंदिरांची परंपरा, समुद्रकिनाऱ्यावरची आरती आणि संतांचा संदेश—हे सर्व मिळून गोवा केवळ पर्यटनस्थळ नसून अध्यात्मिक केंद्र आहे, याची जाणीव झाली.


गोवा अध्यात्मिक महोत्सव हा माझ्यासाठी केवळ कार्यक्रम नव्हता; तो आत्मविश्वास देणारा प्रवास होता. संतांचा आशीर्वाद, समुद्राची साक्ष आणि Chirag Paswan यांचे प्रेरणादायी शब्द—या सर्वांनी माझ्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवला.आता जीवनात कितीही आव्हाने आली, तरी त्या व्यासपीठावरील एक वाक्य मला आठवत राहील—
“अध्यात्मिक ताकद हीच खरी ताकद आहे.”

_सतीश मोरे दैनिक पुढारी कराड _

9881191302


०३ फेब्रुवारी २०२६

सुनेत्राताईनी जपली परंपरा


सुनेत्राताईंनी निभावली सत्तेपलीकडची परंपरा

 _प्रीतिसंगमावरून_ 
सतीश मोरे 
दैनिक पुढारी 

कराडचा प्रीतिसंगम हा महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरील एक साधा भूभाग नाही. तो एक विचारकेंद्र आहे. तो एक संस्कारस्थळ आहे. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तो एक राजकीय आत्मा आहे.स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीसमोर उभं राहणं म्हणजे केवळ श्रद्धांजली अर्पण करणं नाही, तर एका संपूर्ण वैचारिक परंपरेसमोर नतमस्तक होणं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते आले, अनेक गेले; पण काही स्थळं अशी असतात, जी व्यक्तींपेक्षा मोठी असतात. प्रीतिसंगम हे त्यातलं एक आहे.

अजित पवार यांचं प्रीतिसंगमाशी असलेलं नातं हे औपचारिक नव्हतं. ते राजकीय नव्हतं. ते भावनिक आणि वैचारिक होतं.ते चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी येऊन केवळ अभिवादन करत नसत, तर तिथे बसत असत. मौनात. चिंतनात. आत्मसंवादात.त्या शांततेतूनच ते प्रेरणा घेत असत, दिशा घेत असत, आणि कर्तव्याची जाणीव नव्याने जागी करत असत.

राजकारणात प्रेरणास्थानं असतात, पण त्यांच्याशी नातं फार काळ टिकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पाठोपाठ प्रीतीसंगमाचे आणि अजित पवारांचं नातं हे सातत्याचं होतं — परंपरेचं होतं — संस्कारांचं होतं. अजित दादांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांच्या पश्चात सुनिता ताईनी पण तेच केलं. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी कराडच्या प्रीतिसंगमाला दिलेली भेट, ही केवळ एक औपचारिक कार्यक्रम नव्हता. तो एक राजकीय संदेश होता — शांत, सौम्य, पण अर्थपूर्ण. 

अतिशय विपरीत, अनाकलनीय आणि दुःखद घटना घडून गेली. अशा परिस्थितीत सत्ता हाती आल्यानंतर पहिलं पाऊल कुठे टाकायचं, यावर नेतृत्वाची दिशा ठरते. मंचावर की स्मृतीस्थळी? प्रचारात की प्रेरणास्थानी? प्रसिद्धीत की परंपरेत? सुनेत्रा पवार यांनी प्रेरणास्थानाची निवड केली. ही निवड राजकीय गणिताची नव्हती,ती राजकीय संस्कृतीची होती.महाराष्ट्राच्या राजकारणात आज सत्तासंघर्ष,आरोप-प्रत्यारोप, वाद-विवाद आणि गदारोळ यांचा काळ आहे.या पार्श्वभूमीवर प्रीतिसंगमावरची शांतता अधिक बोलकी ठरते.

प्रीतिसंगमावर सुनेत्रा ताई पवार येण्यापासून ते परत गाडीतबसून निघेपर्यंतचा काळ,हा राजकीय कार्यक्रमाचा वेळ नव्हता.तो एका स्त्रीच्या अंतर्मनाचा अवकाश होता.डोळ्यांत साचलेलं पाणी स्पष्ट दिसत होतं.ते वाहत नव्हतं…ते दाबून धरलेलं होतं.दुःख, जबाबदारी आणि संवेदनशीलता —या तिन्ही गोष्टींचं मिश्रण त्या डोळ्यांत उतरलेलं होतं.त्या प्रीतिसंगमावर आल्या होत्या प्रेरणेसाठी. सत्तेच्या प्रदर्शनासाठी नव्हे. प्रतिमानिर्मितीसाठी नव्हे. राजकीय संदेशासाठी नव्हे —तर दिशा शोधण्यासाठी.

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारीआणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यासाठीचं आव्हान —हे दोन्ही ओझं त्या मनात घेऊन आल्या होत्या.या क्षणी त्या उपमुख्यमंत्री नव्हत्या.त्या एक स्त्री होत्या.एक आई होत्या. त्या अनेक महिलांना भेटल्या.हात धरले.संवाद साधला.पण त्या डोळ्यांत एक वेगळंच मौन होतं.ते मौन म्हणत होतं —“मी उपमुख्यमंत्री झाले असेन,पण मी आधी एक स्त्री आहे.”प्रीतिसंगमावर येणं ही एक औपचारिक भेट नव्हती.
ती एक अंतर्मनाची यात्रा होती. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा,कराडकरांची माती आणि प्रीतिसंगमाची शांतता —या तिन्ही गोष्टी त्या शोधत होत्या.त्या समाधीसमोर नतमस्तक झाल्या,पण खरं नमन त्यांनी जबाबदारीसमोर केलं. 

कारण इथे शब्द नाहीत — विचार आहेत.इथे घोषणा नाहीत — मूल्य आहेत.इथे राजकारण नाही — संस्कार आहेत. अजित पवार यांना जिथे प्रेरणा मिळायची,तिथेच सुनेत्रा पवार यांनी नतमस्तक होणं,ही केवळ श्रद्धांजली नाही —ती एक परंपरेची सातत्यपूर्ण साक्ष आहे. सत्ता ही बदलत राहते.पदं येतात-जातात.नेते बदलतात.पण परंपरा टिकली पाहिजे.विचार टिकले पाहिजेत. संस्कार टिकले पाहिजेत.प्रीतिसंगम याचाच साक्षीदार आहे. उपमुख्यमंत्री म्हणून आलेल्या सुनेत्रा ताईंचीची कराड भेट ही एक बातमी नाही,ती एक संपादकीय अर्थ असलेली घटना आहे.कारण ती सांगते —सत्तेचा वारसा नव्हे,तर संस्कारांचा वारसा पुढे जात आहे.आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला आज सर्वाधिक गरज आहे —ती याच वारशाची.

सतीश मोरे, 
दै.पुढारी कराड 
9881191302

Sunetra Ajit Pawar 
Ajit Pawar

०२ फेब्रुवारी २०२६

पडद्यावरचा अमिताभ आवडतो आणि पडद्याबाहेरचा भावतो

पडद्यावरचा अमिताभ आवडतो आणि
पडद्याबाहेरचा अमिताभ अधिक भावतो...कारण
सतिताभ की नजरसे अमिताभ 
भाग २

बॉलिवूडच्या इतिहासात अनेक सुपरस्टार आले, गेले…
पण काही जण फक्त कलाकार नसतात, ते युगपुरुष बनतात.अमिताभ बच्चन हे त्यातलेच एक नाव. जंजीर पासून सुरु झालेला प्रवास आज अॅग्री ओल्ड मॅन पर्यंत तसाच आहे. अन्यायाच्या विरुद्ध उभा राहणारा आणि तरुण पिढीला भावलेला अमिताभ आज 82 वर्षाचा झाला तरीही सर्व गटातील चाहत्यांना आवडतो. त्याचे एक एक चित्रपट अनेकदा पाहिले आहेत, अक्षरशः त्याचं पारायण केलं आहे. त्याच्या चित्रपटातील अनेक संवाद मुखदगत आहेत.तो पडद्यावरचा बच्चन आम्हाला भावतोच. मात्र पडद्या बाहेरचा अमिताभ आम्हाला जगण्याची दिशा देतो, प्रेरणा देतो स्फूर्ती देतो. याची कारण दोन आहेत.

त्यांची कथा ही फक्त सिनेमाची नाही, ती आहे संघर्षाची, स्वाभिमानाची आणि न झुकणाऱ्या जिद्दीची.साल 1999 — अमिताभ बच्चनांच्या आयुष्यातील सर्वात अंधारलेला काळ.त्यांची कंपनी ABCL (Amitabh Bachchan Corporation Ltd) पूर्णपणे कोसळली होती.Miss World Pageant च्या आयोजनामुळे आर्थिक संकट अधिकच गडद झालं.परिस्थिती इतकी बिकट होती की — अमिताभ यांच्यावर जवळपास 90 कोटी रुपयांचं कर्ज होतं.

बँक खात्यात शून्य शिल्लक होती.निवासस्थान असलेल्या ‘प्रतीक्षा’ बाहेर रोज कर्जदारांची गर्दी, धमक्या, शिवीगाळ सुरू होती.घराचा निलाव करण्याची प्रक्रिया सुरू होण्याच्या मार्गावर होती.धीरूभाई अंबानी यांनी मदतीचा हात पुढे केला,पण अमिताभनी स्वाभिमानाच्या भूमिकेतून नकार दिला.ते म्हणाले नाहीत, पण त्यांच्या कृतीतून स्पष्ट होतं — “भीक मागून नाही, मेहनतीने उभा राहायचं.”

शहंशाहाचा नम्र क्षण
एक सकाळ.अमिताभ बच्चन घरातून बाहेर पडले. प्रतीक्षा पासून पाचशे मीटरच्या अंतरावर ते चालत पोहोचले. रस्त्यावर आलेला अमिताभ रस्त्यावरून चालत निघाला होता. ते थेट आपल्या जुन्या मित्राकडे — यश चोप्रा यांच्याकडे गेले.हात जोडून त्यांनी काम मागितलं.तो क्षण केवळ भावनिक नव्हता,तो बॉलिवूडच्या इतिहासातला सर्वात मोठा आत्मसन्मानाचा क्षण होता —जिथे ‘महानायक’ अहंकार न ठेवता उभा राहिला.

‘मोहब्बतें’ : नव्या पर्वाची सुरुवात
यश चोप्रा आणि आदित्य चोप्रा यांनी त्यांना ‘मोहब्बतें’ मधील नारायण शंकर ही भूमिका दिली.शिस्तप्रिय, कडक, तत्त्वनिष्ठ प्रिन्सिपल —भूमिका लहान, पण प्रभावी होती.
अमिताभ बच्चनांनी ती स्वीकारली — कोणतीही अट न घालता.

टीव्हीचा धोका आणि इतिहास
त्याच काळात स्टार प्लसवर सुरू झालं होतं. त्या काळात मोठे कलाकार टीव्हीवर जाणे म्हणजे करिअर संपल्याचं लक्षण मानलं जायचं.टीव्हीला “छोटा पडदा” म्हणत उपहास केला जायचा.पण अमिताभ बच्चनांनी वास्तव स्वीकारलं. कोणतेही काम वाईट नसतं जर तर समोर आलेल्या प्रामाणिकपणे केलं तर यश मिळतं हा पिताश्री हरिवंश राय बच्चन यांचा संदेश त्यांच्या मनावर खोलवर कोरलेला होता. त्यांनी धोका पत्करला. KBC साइन केला.

2000 : एका युगाचा पुनर्जन्म
साल 2000 मध्ये दोन घडामोडी घडल्या —टीव्हीवर KBC घराघरात पोहोचला.आवाज घुमला —“लॉक किया जाए?”
आणि सिनेमागृहात ‘मोहब्बतें’ सुपरहिट ठरली.अमिताभ बच्चनांना फिल्मफेअर बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर पुरस्कार मिळाला.या दोन प्रोजेक्ट्सनी फक्त कर्ज फेडलं नाही,तर अमिताभ बच्चन यांना नव्याने घडवलं.त्यांची प्रतिमा पुन्हा उभी राहिली.ते पुन्हा एकदा देशाचे महानायक बनले.

पडद्यावरचा नाही, पडद्याबाहेरचा बच्चन मोठा

माझ्या दृष्टीने अमिताभ बच्चन फक्त अभिनेता नाहीत.मला पडद्यावरचा बच्चन आवडतोच, पण त्याहून अधिक आवडतो —
👉 पडद्याबाहेरचा बच्चन
जो संघर्षाला कधी झुकला नाही
जो अपयशासमोर कधी गुडघे टेकला नाही
जो अपमानाने थांबला नाही
जो सतत काम करत राहिला
जो वयाने नाही, वृत्तीने तरुण राहिला जो पडला… पण पुन्हा उभा राहिला.
तोच माझ्यासाठी खरा अमिताभ बच्चन आहे.

*अमिताभ_निती*

अमिताभ बच्चन यांची कहाणी म्हणजे फक्त कमबॅक नाही,
ती आहे मानवी जिद्दीची जिवंत गाथा.ही कथा सांगते —

“गिरना बुरा नहीं है,
गिरकर न उठना बुरा है।”

“हालात चाहे कितने भी नीचे क्यों न हों,
अगर हौसला ज़िंदा है — तो वापसी तय है।”

 _आज अमिताभ बच्चन हे नाव अभिनेता म्हणून मोठं नाही,तर संघर्षाचं प्रतीक म्हणून मोठं आहे._ 

आय लव्ह अमिताभ बच्चन.

सतीश मोरे सतिताभ.
अमिताभ बच्चन प्रेमी.
9881191302

Amitabh Bachchan Amitabh Bachchan Premi Group - Karad,Satara Abhishek Bachchan

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...