फॉलोअर

०४ फेब्रुवारी २०१८

CIBIL काय आहे सिबिल स्कोर

_*🔺🙇🏻‍♂ मनातील प्रश्न...*_

🏦💰🏦💰🏦💰🏦
➖➖➖➖➖➖➖
*☑ सीबील/CIBIL आर्थात (क्रेडिट ब्युरो) म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मशन ब्युरो इंडिया लिमिटेड (Credit Information Bureau India Limited) किंवा सिबिल (CIBIL)*

*☑ सिबिल (CIBIL) काय आहे आणि त्याचा कर्जाशी काय संबंध आहे?.....*
➖➖➖➖➖➖➖
एखाद्या बँकेकडून जेव्हा आपण कर्ज घेण्यासाठी जातो तेव्हा कर्ज द्यायचे की नाही हा निर्णय घेण्यासाठी बँकेला आपल्याबद्दल काही गोष्टी माहिती करून घ्यायच्या असतात.

▪१) तुमचे सध्याचे उत्पन्न किती आहे?

▪२) तुमच्यावर सध्या कुठले कर्ज आहे का आणि असेल तर किती आहे?

▪३) यापूर्वी तुम्ही कर्ज घेतलेले असेल तर तुम्ही त्याची परतफेड वेळेवर केली होती का?

बँकेला पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळणे सोपे आहे. तुम्ही बँकेला तुमच्या उत्पनाचे कागद दिले (सॅलरी स्लिप, इनकम टॅक्स रिटर्न) की बँक खात्रीने तुमच्या सध्याच्या उत्पन्नावर तुम्हाला जास्तीत जास्त किती कर्ज देता येईल ते ठरवू शकते.
🔲🔲🔲
पण तुमच्यावर सध्या कुठले कर्ज आहे का हे किंवा यापृवी घेतलेल्या कर्जाची तुम्ही वेळेत परतफेड केली होती का हे जाणून घेण्यासाठी बँकेला जो कर्ज घेतोय त्याने दिलेल्या माहितीवर विसंबून रहावे लागू शकते. बँकेला यात जोखीम आहे कारण कर्ज मागणाऱ्याने दिलेली माहिती नेहमीच खरी असेल याची हमी नाही.
🔲🔲🔲
जसे उत्पन्न दर्शविण्यासाठी स्वतंत्र कागदपत्रे असतात तसेच जर दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तराची माहिती देण्यासाठी एखादी स्वतंत्र संस्था असती तर बँकांसाठी चांगले झाले असते. ह्या विचारातूनच २००५ साली एक कायदा पारित करण्यात आला. त्या कायद्याने कर्जाची माहिती गोळा करणाऱ्या कंपन्यांना, ज्यांना क्रेडिट ब्युरो (Credit Bureau) असेही म्हणतात, सक्षम केले गेले आणि त्यांना अधिकार देण्यात आले कि त्या विविध बँका आणि वित्तीय संस्थांकडून माहिती गोळा करू शकतात. अशीच कर्जाची माहिती गोळा करणारी एक कंपनी (क्रेडिट ब्युरो) म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मशन ब्युरो इंडिया लिमिटेड (Credit Information Bureau (India) Limited) किंवा सिबिल (CIBIL).
🔲🔲🔲
सिबिल भारतातील अग्रगण्य बँका आणि इतर वित्तीय संस्थांकडून सर्वसामान्य व्यक्तींच्या कर्ज आणि क्रेडिट कार्ड बद्दल माहिती गोळा करते. नंतर ही माहिती सिबिल क्रेडिट अहवालाच्या स्वरूपात सादर करते, ज्यास सिबिल क्रेडिट रिपोर्ट किंवा क्रेडिट इन्फॉर्मशन रिपोर्ट (सीआयआर) देखील म्हणतात.
🔲🔲🔲
ह्या माहितीच्या आधारे सिबिल एक आकडा बनवते ज्याला सिबिल स्कोर (CIBIL Score) म्हणतात. सिबिल स्कोर व्यक्तीच्या कर्ज विषयक व्यवहारांची माहिती वापरून बनवलेला असतो. पुढे हाच सिबिल स्कोर बँका एखाद्या व्यक्तीला कर्ज देतांना विचारात घेतात. सिबिल स्कोर चांगला असेल तर बँका कर्ज द्यायला तयार होतात आणि सिबिल स्कोर जर चांगला नसेल तर बँक एकतर कर्ज नाकारू शकतात किंवा कर्ज दिलेच तर नेहमीपेक्षा जास्त व्याज दर आकारू शकतात.
🔲🔲🔲
सिबिल स्कोर कर्जाच्या अर्ज प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. अर्जदाराने अर्ज भरून बँकेला दिल्यावर बँक प्रथम अर्जदाराचे सिबिल स्कोर आणि क्रेडिट रिपोर्ट तपासते. जर सिबिल स्कोर कमी असेल तर बँक त्या अर्जावर विचार करायच्या आधीच त्यास त्यास नकार देऊ शकते. जर सिबिल स्कोर जास्त असेल तर बँक अर्जावर लक्ष देतील आणि अन्य तपशील विचारात घेऊन अर्जदार कर्ज देण्यायोग्य आहे का नाही हे ठरवतील. बँकेसाठी सिबिल स्कोर ही अर्जदाराची पहिली ओळख असल्या सारखे असते, जितका जास्त स्कोर, तितकी कर्ज मिळण्याची शक्यता जास्त .
🔲🔲🔲
क्रेडिट इन्फॉर्मशन ब्युरो इंडिया लिमिटेड म्हणजेच सिबिल ही काही एकच कर्जाची माहिती गोळा करणारी कंपनी नव्हे. तिच्या सारख्याच आणखी ३ कंपन्या आपल्या देशात कार्यरत आहेत जसेकी एक्विफॅक्स (Equifax), एक्स्पेरियन (Experian) आणि हायमार्क (Highmark). त्यांचेही सिबिल सारखेच स्वतःचे क्रेडिट स्कोर आहेत.
🔲🔲🔲

*◾क्रेडिट रिपोर्ट मध्ये काय असते?*

कर्ज घेतल्यावर तुमच्या कर्ज खात्यात जे काही घडले असेल त्यापैकी बहुतांश माहिती ही क्रेडिट रिपोर्ट मध्ये दिलेली असते.

जसेकी –

तुमचा पॅन कार्ड क्रमांक आणि तुम्ही घेतलेल्या गृह कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज या व अशा इतर कर्जाबरोबर क्रेडिट कार्डा ची माहिती दिलेली असते.पूर्वी घेतलेल्या प्रत्येक कर्जाचा प्रकार, कर्जाची रक्कम, परतफेडीची माहिती यामध्ये दिलेली असते.एखादे कर्ज तुम्ही फेडले नसेल तर तेही नमूद केले असते.बँकांशी कधी कर्जफेडीबाबत भांडण / तंटा झाला असेल आणि त्यामुळे कर्जखाते बंद केले असेल तर त्या कर्जसमोर ‘सेटल्ड’ (Settled) असे लिहिलेले असते.तुम्ही कर्ज घेण्यासाठी अर्ज केला असेल पण कर्ज घेतले नसेल तर त्याचीही नोंद यात केली जाते.सध्या चालू असलेल्या कर्जाच्या बाबतीत किती कर्ज फेडणे अद्याप शिल्लक आहे तेदेखील यात सांगितलेले असते.मागील ३६ महिन्याचा परतफेडीचा इतिहास प्रत्येक कर्जाच्या बाबतीत सांगितला जातो.तुमच्या क्रेडिट कार्डाची माहिती जसेकी प्रत्येक क्रेडिट कार्डांची क्रेडिट मर्यादा आणि कॅश मर्यादा नमूद केलेली असते.कर्जाचे व क्रेडिट कार्डाचे हप्ते वेळच्यावेळी भरले जातात का ही बाबही ३६ महिन्यांच्या परतफेडीच्या इतिहासाकडे बघून कळते.
🔲🔲🔲
आणि ह्या सर्व मापदंडांचा उपयोग करून बनवलेला सिबिल स्कोर क्रेडिट रिपोर्ट मध्ये दिलेला असतो.
🔲🔲🔲

*◾चांगला सिबिल स्कोर म्हणजे किती?*

सिबिल स्कोर कमीत कमी ३०० आणि जास्तीत जास्त ९०० एवढा असू शकतो. सिबिल स्कोर ९०० च्या जेवढा जवळ असेल तेवढा चांगला आणि बँका तेवढे तुमच्या कर्ज परतफेडण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवतील. सामान्यतः ७५० पेक्षा जास्तचा सिबिल स्कोर हा चांगला समजाला जातो.
🔲🔲🔲
*_सिबिलच्या संकेतस्थळावर (www.cibil.com) वर पैसे भरून तुम्ही स्वतःचा क्रेडिट रिपोर्ट आणि सिबिल स्कोर बघू शकतो._*
🔲🔲🔲
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सिबिल स्कोर चांगला आहे म्हणून कर्ज मिळेलच ह्याची कुठलीही हमी नाही. शेवटी कर्ज देण्याचा निर्णय हा पूर्णपणे बँकेवर अवलंबून असतो.
🔲🔲🔲
सिबिल स्कोर हा जसे व्यक्तीच्या क्रेडिट रिपोर्टला थोडक्यात आकड्याच्या स्वरूपात दर्शवतो तसेच सिबिल जेव्हा एखाद्या कंपनीच्या क्रेडिट रिपोर्ट ला आकड्याच्या स्वरूपात दर्शवते तेव्हा त्याला सिबिल रँक (CIBIL Rank) असे म्हणतात. सिबिल रँक १ ते १० मध्ये असतो, जेथे १ हा सर्वोत्तम रँक असतो. सिबिल रँक फक्त अशाच कंपन्यांना प्रदान केला जातो ज्यांच्यावरील कर्ज  हे १० लाख रुपयांपासून १० कोटी रुपयांपर्यंत असते.
➖➖➖➖➖➖➖
🏦💰🏦💰🏦💰🏦

०३ फेब्रुवारी २०१८

Horn OK Please संग्रहित

_*🙇🏻‍♂🔺मनातील प्रश्न.....*_

*🚛 Horn 🆗 Please*
➖➖➖➖➖➖➖
*🤔 रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या बऱ्याचशा गाड्यांवर Horn Ok Please लिहिलेलं वाचतो पण काय असावं बरं त्याचं कारण....*

*☑“Horn OK Please” : या शब्दप्रयोगाच्या जन्मामागची कथा....*
➖➖➖➖➖➖➖
कधी रस्त्यावर ट्रक नजरेसमोरून गेला की त्या ट्रक मागे लिहिलेला Horn OK Please हा शब्द हमखास आपलं लक्ष वेधून घेतो, आणि जन्मापासून हा शब्द नजरेस पडत असल्यामुळे आपण देखील दिसल्या दिसल्या नकळत तो मनातल्या मनात वाचतो देखील! केवळ ट्रकच नाही तर ट्रान्सपोर्टच्या अनेक गाड्यांवर सर्रास हा शब्द तुम्हाला लिहिलेला आढळेल, पण तुम्ही कधी विचार केलाय का, “या शब्दाचा नेमक उगम कसा झाला?”
चला तर जाणून घेऊया या कोड्या मागचं बहुतेक कोणालाच माहित नसलेलं उत्तर!

*▪तत्पूर्वी जाणून घेऊ या या शब्दामागचा सर्वमान्य समज/अर्थ:*

त्या शब्दामध्ये OK हा शब्द अधिक मोठा आणि ठळक शब्दांत लिहिलेला आढळतो. कारण मागील वाहनाने समोरच्या वाहनापासून सुरक्षित अंतर राखावे असे त्यांना सांगायचे असते. आणि Horn व Please हे शब्द लहान अक्षरांत असतात. मागील गाडी अधिक जवळ आल्यास त्यांना ते शब्द दिसावेत आणि त्यांनी आपल्या गाडीचा हॉर्न वाजवून पुढे जाण्याची वाट मागावी – असा सामान्य संकेत ह्यातून दिसतो.
आता जाणून घेऊ या याचा उगम कसा झाला.
🔲🔲🔲
ह्या शब्दप्रयोगच्या उगमाची ३ वेगवेगळी कारणं सांगितली जातात.
भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्याकाळी ट्रक इंडस्ट्रीमध्ये केवळ टाटा कंपनीचे वर्चस्व होते. त्यामुळे कंपनीने आपल्या नव्या प्रोडक्ट्सची जाहिरात करण्यासाठी याच ट्रकचा मुव्हिंग होर्डींग्ज म्हणून वापर करण्याचे ठरवले.
🔲🔲🔲
*_त्या काळच्या टाटा कंपनीने सादर केलेल्या नव्या साबणाच्या प्रोडक्टचा लोगो म्हणजे कमळाच्या फुलाचे चित्र होते आणि आजही बहुसंख्य ट्रक्स वर OK शब्दाच्या वरती कमळाच्या फुलाचे चित्र असलेला हा लोगो आढळून येतो._*
🔲🔲🔲
परंतु दुसरा दावा असे सांगतो की, पूर्वीच्या काळी सर्वच रस्ते हे सिंगल लेनचे होते, ज्यावरून ओव्हरटेक करणे सोपे नसायचे. तेव्हाच्या ट्रक्सना रियर मिरर व्हूज देखील नसल्यामुळे मागून एखादी लहान गाडी ओव्हरटेक करायचा प्रयत्न करत असेल, तर ते देखील कळायला मार्ग नसायचा. परिणामी अपघात होण्याची शक्यता असायची.
म्हणजे – मागून येणाऱ्या गाडीने Horn Please! ह्या विनंती नुसार हॉर्न वाजवायचा.
ट्रक ड्रायव्हरने OK शब्दावरील बल्ब पेटवून त्याला सिग्नल द्यायचा की “पुढचा रोड क्लियर आहे”.
🔲🔲🔲
*हळूहळू मल्टीलेनचे रोड्स तयार होऊ लागले आणि बल्ब सिग्नल सिस्टम गायब झाली. पण ‘Horn OK Please’ हा शब्द मात्र तसाच राहिला.*
🔲🔲🔲
तिसराही एक दावा केला जातो ज्यात थेट दुसऱ्या महायुद्धाचा संदर्भ येतो.
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी इंधनाची कमतरता असल्याने ट्रक्स केरोसीन वर चालवले जायचे, पण त्यात असा धोका होता की लहानश्या अपघाताने देखील ट्रकचा स्फोट व्हायचा. त्यामुळे सावधानी बाळगण्यासाठी ट्रक्सच्या मागे ‘On Kerosene’ (OK) असे लिहिले जायचे, म्हणजे मागू येणाऱ्या गाड्या उगाच ओव्हरटेक करण्याची घाई करणार नाहीत आणि मोठा अपघात होणार नाही.
🔲🔲🔲
या तीन पैकी टाटा कंपनीच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजिचा दावा हा सर्वमान्य मनाला जातो. इतर दावे त्यापुढे दुबळे ठरतात. पण अजूनही हा गमतीशीर शब्दप्रयोग आला कुठून हे खात्रीशीर रित्या स्पष्ट झालेले नाही. असो पण काही का असेना Horn OK Please या शब्दने आजही वाहतुकीची शिस्त शाबूत आहे हे मान्य करावे लागेल.
➖➖➖➖➖➖➖
*🚛 Horn 🆗 Please*

मिलिटरी वाहनांच्या नंबर प्लेट्स संग्रहित

_*🔺 🙇🏻‍♂मनातील प्रश्न...*_

🇮🇳 🚛 🇮🇳 🚛 🇮🇳 🚛
➖➖➖➖➖➖➖
*☑ मिलिटरी गाड्यांवरच्या नंबर प्लेट्स वेगळ्या का असतात...?*
➖➖➖➖➖➖➖
भारतात प्रत्येक गाडीला RTO ऑफिसमधून एक वाहन क्रमांक दिला जातो. तो वाहन क्रमांक म्हणजे त्या गाडीची ओळख! त्या वाहन क्रमांकावरून मग गाडीचा मालक कोण? गाडी कधी घेतली? अश्याप्रकारे गाडीची सर्व माहिती उपलब्ध होते. प्रत्येक राज्याचे RTO ऑफिस त्यांच्या निर्धारित कोड आणि क्रमांकानुसार आपल्या राज्यातील गाड्यांना क्रमांक पुरवते.
🔲🔲🔲
Central Motor Vehicle Rules नुसार गाडीच्या मालकाला RTO ऑफिसकडून मिळालेला क्रमांक गाडीच्या पुढल्या आणि मागच्या बाजूला दिसेल अश्या स्थितीमध्ये लावणे बंधनकारक असते.
🔲🔲🔲
या नंबर प्लेट देखील विविध रंगात असतात. त्यावरून त्या गाडीचा प्रकार ओळखला जातो. पांढऱ्या नंबर प्लेटच्या गाड्या या खाजगी/वैयक्तिक असतात. पिवळ्या नंबर प्लेटच्या गाड्या पब्लिक वाहन (बस, रिक्षा टॅक्सी) असतात. काळ्या नंबर प्लेट हे दर्शवते की त्या गाड्या व्यावसायिक (commercial) वापरासाठी आहेत. आणि निळ्या रंगाच्या नंबर प्लेटवर असणाऱरी पांढरी रेषा हे दर्शवते की ती गाडी कोणत्या तरी देशाच्या वकिलातीची आहे. हे झालं या नेहमीच्या रोजच्या गाड्यांबद्दल....
🔲🔲🔲

*◼पण या सर्व गोष्टी आणि नियम मिलिटरी गाड्यांना मात्र लागू होत नाहीत. असे का...??*

▪मिलिटरी गाड्या या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत रजिस्टर असतात. या गाड्यांवर एक वरच्या बाजूला दाखवलेला बाण असतो आणि बाणाच्या पुढे ज्या वर्षी गाडी बनवली गेली किंवा आयात (Import) केली गेली त्या वर्षाचे शेवटचे दोन क्रमांक असतात. उदा. २००३ हे वर्ष असेल तर (03)!

▪या दोन क्रमांकाच्या पुढे असतो बेस कोड, त्यापुढे असतो वाहन क्रमांक आणि त्यापुढे असतो गाडीचा दर्जा..! मिलिटरी गाड्यांच्या नंबर प्लेटवर बाण यासाठी दाखवतात की समजा चुकून नंबर प्लेट उलटी लागली तर त्या बाणामुळे ते लक्षात येते. हा बाण तुम्हाला संरक्षण मंत्रालयाच्या फक्त गाड्यांवरच नाही तर प्रत्येक मालमत्तेवर दिसेल.

▪मिलिटरी गाड्यांच्या नंबर प्लेट हिरव्या किंवा काळ्या रंगाच्या असतात. संरक्षण खात्यातले अधिकारी केवळ अधिकृत कामासाठीच या गाड्यांचा वापर करू शकतात. मिलिटरी गाड्यांना सिग्नल सुटेपर्यंत वाट पाहण्याची गरज नसते. म्हणजेच या गाड्यांना सिग्नल तोडायची मुभा असते.

▪फक्त सिग्नलचा नियमच नाही तर वाहनासंबंधीचे अनेक नियम जे तुम्ही आम्ही सर्वसामान्य पाळतो ते मिलिटरी वाहनांना लागू नाहीत.

▪तसेच या मिलिटरी गाड्यांवर तुम्ही स्टार्स देखील पाहिले असतील. हे स्टार्स अधिकाऱ्याच्या हुद्द्यानुसार त्याच्या गाडीवर लावले जातात. जर लष्करातील दलप्रमुख (Chief Of Staff) अधिकारी असेल तर गाडीवर लाल रंगाची दुसरी प्लेट लावलेली असते ज्यावर चार स्टार्स असतात.

▪जर वायुदलातील कोणी दलप्रमुख अधिकारी असेल तर त्याच्या गाडीवर आकाशी रंगाची दुसरी प्लेट लावलेली असते ज्यावर चार स्टार्स असतात. त्याचप्रकारे जर नौदलातील कोणी दलप्रमुख अधिकारी असेल तर गाडीवर नेव्ही ब्ल्यू रंगाची दुसरी प्लेट लावलेली असते ज्यावर चार स्टार्स असतात.

▪या अधिकाऱ्यांच्या वरच्या पदी असणारे अधिकारी म्हणजे लष्करप्रमुख, नौदलप्रमुख किंवा हवाईदल प्रमुख असतील तर त्यांच्या गाड्यांवर पाच स्टार्स असतात. हे स्टार्स असे दर्शवतात की हे अधिकारी त्यांचे युनिफॉर्म निवृत्त झाल्यानंतरही मरेपर्यंत घालू शकतात.

*▪याव्यतिरिक्त इतर अधिकृत गाड्यांबद्दल सांगायचे झाल्यास राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना सरकार कडून देण्यात येणाऱ्या गाड्यांवर सोनेरी अशोकस्तंभ असतो. या गाड्यांना वाहन क्रमांक नसतो. ही गोष्ट बहुधा सगळ्यांचा माहित नसेल.*
➖➖➖➖➖➖➖
🇮🇳 🚛 🇮🇳 🚛 🇮🇳 🚛

०१ फेब्रुवारी २०१८

मनमोकळा



सवय...आहे...
तुझी वाट पहाण्याची
तू येणार नसतानाही !

सवय... आहे...
तुझ्याशी गप्पा मारण्याची
तू जवळ नसतानाही !
.

अगं,
आजकाल काय झालंय
माझं मलाच कळतच नाही,
तुझ्या ध्यास आणि भासात
मग मी माझाच रहात नाही !

खरं सांगू,
माझं मलाच कळतं नाही
मी तुझ्या समोर इतका
मनमोकळा का होतो ?

कुणालाही बोलू शकत नाही
शेअर करु शकत नाही,
असं तुला का सांगतो?

भावनांच्या दुरगावी
एक सतिताभ राहातो
जागेपणी क्षणोक्षणी
तुझी स्वप्ने पाहातो !


तुझं माझं नातं
मनापासुन ‌घट्ट आहे !
तुझ्या प्रत्येक सादाला
माझा हो आहे !
तुझ्या नकारालाही
माझा होच आहे !

१३ जानेवारी २०१८

कविता करता येईल




तुझ्या स्मित हास्यावर
एक कविता करता येईल
तुझ्या गोड गालावर
एक कविता करता येईल

तुझ्या अल्लडपणावर
एक कविता करता येईल
तुझ्या समंजसपणावर
एक कविता करता येईल

आपल्या जीवन संगीतावर
एक कविता करता येईल
आपल्या सुंदर नात्यावर
एक कविता करता येईल

तुझ्या सहवासावर
एक कविता करता येईल
तुझ्या विरहावर
एक कविता करता येईल

तुझ्या प्रेमळ आवाजावर
एक कविता करता येईल
तुझ्या सहज खुलण्यावर
एक कविता करता येईल

तुझ्या माझ्या प्रीतीवर
एक कविता करता येईल
तुझ्या माझ्या भेटीवर
एक कविता करता येईल

तुझ्या मोहक सौंदर्यावर
एक कविता करता येईल
तुझ्या मोकळ्या केसांवर
एक कविता करता येईल

तुझ्या लाजण्यावर
एक कविता करता येईल
तुझ्या मुरडण्यावर
एक कविता करता येईल

११ जानेवारी २०१८

मराठी माणसाचा दावणगिरी डोसा

दावणगिरी A1 डोसा : कराडचे टेस्ट पाॅईंट

साउथ इंडियन उडपी मॅनेजमेंट चा बाऊ करत गेली अनेक वर्षे आपण ठराविक हाॅटेलमध्येच चांगले खायला मिळते असे म्हणत आलो आहे. कराड, सातारा येथे काही साऊथ इंडियन हाॅटेलमध्ये खायला मिळणाऱ्या डिशेस आता खाऊन खाऊन कंटाळा आला आहे.

हे सांगताना आता नवीन काय पर्याय आहे का असा प्रश्न पडला असेल ना? हो आहे.  गेली सात वर्षे कन्या शाळेच्या शेजारी A1 दावणगिरी डोसा नावाचे एक रेस्टॉरंट कम गाडा सुरू आहे.  मी अनेकवेळा तिथे डोसा खाल्ला आहे.  अतिशय सुंदर आणि टेस्टी असा दावणगिरी लोणी खाऊन मन तर तृप्त होतेच पण जाताना हा डोसा कसा करता हे विचारण्याची इच्छा होते .

आता प्रश्न पडला असेल मी हे का सांगतोय?  मी का त्यांची जाहिरात करतोय?  त्याचा माझा संबंध काय? होय संबंध आहे.  कारण नावाप्रमाणेच A1 डोसा करणारा एक मराठी माणूस आहे. पटणार नाही पण हे खरं आहे. मराठी माणसाला बळ देण्यासाठी मी ही पोस्ट मुद्दाम इथे टाकत आहे,  होय मराठी माणूस हेही करू शकतो हे सांगण्यासाठी मी ही पोस्ट टाकली आहे.  मराठी माणसाला असला धंदा जमणार नाही,  हे करू जाणे उडपी लोकांनीच असे म्हणणारांना ही चपराक आहे. 

या युवकाचे नाव आहे सुरेश केशव जगताप. यांचे गाव आहे कराड तालुक्यातील कोडोली.  आठ वर्षांपुर्वी सुरेशच्या कोल्हापूर येथील नातेवाईकानी त्याला हा व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला.  या नातेवाईकाची रंकाळा तलाव जवळपास मोठ्ठी पिठाची गिरण आहे , या गिरणीत  अनेक  उडपी लोक लोणी डोसा पीठ दळायला येत. या लोकांच्या संपर्कातून सुरेशला त्यांनी दावणगिरी येथील  कुक गाठून दिला, कराडात गाडा सुरू झाला. पण हा कुक फक्त 25 दिवसच टिकला, काम सोडून पळून गेला. सुरेशने मग स्वतः हा व्यवसाय पुढे न्यायचा निर्णय घेतला आणि काम सुरू केले.

हळूहळू धंद्याचे बस्तान बसले, दावणगिरी डोसा म्हणजे काय या उस्तुकतेपोटी आलेले लोक  ही टेस्ट चाखून पुन्हा पुन्हा येऊ लागले. आज कन्या शाळेजवळचा दावणगिरी डोसा कराडकरांसाठी टेस्ट पाॅईंट झाला आहे.  आपण या मराठी युवकाला बळ द्यायला हवे , एकदा तरी टेस्ट घेऊन.

सतीश मोरे @ karawadikarad.blogspot.com

सिक्किम राज्यपाल पत्रकार दिनानिमित्त

पत्रकारितेला फार मोठी परंपरा
पत्रकारांनी काळानुरुप बदलण्याची आवश्यकता
   - सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी  :- पत्रकारितेला फार मोठी परंपरा आणि इतिहास लाभला आहे. दिवसेंदिवस पत्रकारितेत बदल, सुधारणा आणि परिवर्तन होत असून पत्रकारांनी बदलत्या परिस्थितीला सामोरे जात काळानुरुप बदलण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी आज येथे बोलतांना केले.
कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने मराठी पत्रकार दिन पुरस्कार वितरण सोहळा सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाटयगृहात संपन्न झाला, त्यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धनंजय महाडीक, महापौर स्वाती यवलुजे, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमीका महाडीक आदि मान्यवर उपस्थित होते. आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करुन दिपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण सुरु करुन मराठी पत्रकारितेची खरी सुरुवात  केली. त्यानंतर लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, शि.म. परांजपे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले अशा थोर विभुतींनी पत्रकारितेच्या माध्यमातून प्रबोधन आणि समाजजागृती केली. आज पत्रकारितेत काळानुरुप फार मोठे बदल आणि सुधारणा होत आहे. वृत्तपत्राबरोबरच इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे आणि सोशल मिडिया अशा गतीमान बदलांना वृत्तपत्रकारांनी सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी काळानुरुप बदलण्याची गरज असून त्यानुसार पत्रकारिता क्षेत्रात होत असलेले  बदलही समाधानकारक असल्याचेही सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी कोल्हापूर पत्रकारितेचाही मुक्त कंठाने गौरव केला.
सामाजिक परिवर्तनाचे फार मोठे सामर्थ पत्रकारितेत असून पत्रकारिता हा समाजाचा आरसा असल्याचे सांगून सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले की, सामान्य माणसांची सुख-दु:खे बातमीव्दारे समाजासमोर मांडून सामान्याला पत्रकार आपलासा वाटावा, अशी पत्रकारिता करण्यातही पत्रकारांचे योगदान आहे, पत्रकारांनी सदैव निर्भिडता जोपासून वस्तुनिष्ठ बातम्याव्दारे समाजाची विश्वासार्हता जोपासणे महत्वाचे आहे. यावेळी त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात काळानुरुप होत असलेल्या बदल आणि परिवर्तनावर सविस्तर विवेचन केले. फार मोठी परंपरा आणि इतिहास असलेली पत्रकारिता यापुढेही दर्जेदारपणे वाढावी, बहरावी, यासाठी प्रत्येकाने आपले सकारात्मक योगदान देणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
समारंभाचे अध्यक्ष श्रीमंत शाहू छत्रपती महाराज याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, पत्रकारितेला फार मोठा वसा आणि वारसा लाभला आहे. पत्रकारांवर मोठी सामाजिक जबाबदारी असून समाजात शांतता आणि सलोखा निर्माण करण्यातही त्यांचे फार मोठे योगदान आहे. समाज जागृतीव्दारे पत्रकारांनी समाजाला योग्य दिशा देण्यातही सक्रीय व्हावे, आचार्य बाळ शास्त्री जांभेकरांपासून सुरु झालेल्या पत्रकारितेतील अनेक मान्यवर संपादकाच्या योगदानाचाही त्यांनी आपल्या भाषणात गौरव केला.
खासदार धनंजय महाडिक याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, वृत्तपत्रांच्या माध्यमातून सामाजिक समतोल राखण्याचे महत्वपूर्ण काम होत असून आजच्या स्पर्धेच्या युगातही पत्रकारांकडून वस्तुनिष्ठ  चित्रण समाजासमोर आणलं जात आहे,ही समाधानाची बाब आहे. पत्रकार हा समाजजीवनाचा एक महत्वाचा घटक असल्याचेही ते म्हणाले.
महापौर स्वाती यवलुजे याप्रसंगी बोलतांना म्हणाल्या, वृत्तपत्राच्या माध्यमातून समाज जागृतीचं आणि समाज प्रबोधनाचे महत्वाचे कार्य होत आहे. आजच्या स्पर्धेच्या युगातही माहिती, ज्ञान आणि प्रबोधनाचे महान काम वृत्तपत्रकारितेव्दारे होत आहे. कोल्हापूर प्रेस क्लबचे कार्य समाजहिताचे असून कोलहापूरच्या जडणघडणीत फार मोठे योगदान आहे.
प्रारंभी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष लुमाकांत नलवडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष तानाजी पोवार यांनी आभार मानले. याप्रसंगी समीर देशपांडे (लोकमत), राहुल गायकवाड (टाईम्स ऑफ इंडिया), प्रताप नाईक (झी 24 तास), प्रमोद सौंदाळे (न्यूज 18 लोकमत) आणि अमरदिप पाटील (ॲड फाईन) यांना राज्यपाल श्रीनिवास पाटील‍ यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
समारंभास पोलीस अधिक्षक संजय मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, करवीरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, माहिती उपसंचालक सतीश लळीत यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, विविध वृत्तपत्रांचे संपादक,पत्रकार, प्रेसक्लबचे पदाधिकारी आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
000000

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...