फॉलोअर

१९ डिसेंबर २०२१

एकाला जायची घाई झाली होती...


एकाला जायची घाई झाली होती, एकाला यायची !
@ मराठी बाणा शामगाव घाट

'पुढारी' वर्धापन दिनानिमित्त कराड पाटण तालुक्यातील गावागावांत,मान्यवरांच्या संस्थेत दौरे सुरू आहेत.काल शनिवारी सायंकाळी शामगावच्या घाटात नव्याने सुरू झालेल्या हाँटेल 'मराठी बाणा'मध्ये जाण्याचा योग आला. मुंबई महापालिकामध्ये सहायक अभियंता म्हणून काम पाहणारे अंतवडी गावचे सुपुत्र कृष्णा शिंदे आणि सौ.सुजाता शिंदे यांनी हे हाँटेल सुरू केले आहे. अजून बरंच काम बाकी आहे.सध्या फक्त चहा-नाश्ता तसेच शाकाहारी आणि मांसाहारी जेवण विभाग सुरू केला आहे.निसर्गरम्य ठिकाणी सुरू झालेल्या या हाँटेलला एकदा भेट द्यायला हवी. सुमारे साडे चार एकर क्षेत्रावर विकसित होत असलेल्या 'मराठी बाणा' मध्ये भविष्यात कृषी पर्यटन, रेसार्ट,जलतरण, वाॅटर बोटींग आणि बरंच काही करण्याचा शिंदे सरांचा मानस आहे.


मी,दिलीप माने सरांच्या सोबत सायंकाळी सहाच्या सुमारास 'मराठी बाणा' येथे पोहचलो. अतिशय दुर्मिळ, अविस्मरणीय आणि सुंदर असं दृश्य आणि निसर्गाचा आविष्कार आज एकाच वेळी मला याठिकाणी अनुभवायला आला,पाहता आला. 

एकीकडे पश्चिमेला 'सुर्यनारायण' मावळतीला निघाले होते तर दुसरीकडे 'चंद्रदेव' शामगावच्या डोंगरातून डोकावत होते. एकाला जायची घाई होती, एकाला यायची! दोघेही निसर्गाचे अखंड,अढळ, अटल,अनिवार्य,अविभाज्य,अनुपम,अतुट,अविरत कार्यरत घटक. योग्य वेळीच यायचे,योग्य वेळीच जायचं. कधीही वेळ चुकवायची नाही. आपलं काम चोख बजवायचे ! जाताना सर्वांना प्रकाशित करत जायचं,देत रहायचं. देत असताना परत काही मिळेल याचा हिशोब नाही ठेवायचा. एक प्रखर दुसरा शितल. दोघांशिवाय जग चालूच शकत नाही. जीवनात काही वेळी आक्रमकता हवी तर कधी संयम हवा, हेच तर हे दोघं सांगत आहेत. 

निसर्ग आपल्याला खुप काही शिकवून जातो. निसर्गाचा हा आविष्कार पाहताना आज मी पुन्हा एकदा 'चंद्रमा'च्या प्रेमात पडलो होतो, 'दिनकरां'च्या रंग उधळणीवर भाळलो होतो.

@सतीताभ
१९.१२.२०




1 टिप्पणी:

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...