फॉलोअर

१४ जून २०१७

14 जुन रक्तदान दिन

🅰🅱🆎🅾💉🅾🆎🅱🅰
〰〰〰〰〰〰〰〰〰
*☑१४ जून .......*
*जागतिक रक्तदाता दिन....*
*रक्तदान श्रेष्ठदान ..जीवनदान ...*
*रक्तदाता सुखी भव...!!!*
〰〰〰〰〰〰〰〰〰
_*आज १४ जून. ऑस्ट्रेलियातील डॉ. कार्ल लॅडस्टेनर यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी मानवी रक्तगटाचा शोध लावला, जागतिक आरोग्य संघटनेकडून हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून जगात साजरा होता.*_
🔲🔲🔲
प्रत्येक वर्षी एक सूत्र घेऊन हा दिवस साजरा केला जातो. माता सुरक्षा, रक्तदान श्रेष्ठ दान, डोनेट प्लेटलेटस् यासारखे सूत्र घेऊन त्याची माहिती दिली जाते, रक्तदानाचे आवाहन केले जाते. अटीतटीच्या वेळी रक्ताची गरज पूर्ण करणारे रक्तदाते नसते तर पुनर्जन्म मिळालाही नसता, हे एक प्रकारे रक्तऋणच आहे जे गरजू व्यक्तीला प्रत्यक्ष जगण्यामरण्याच्या रेषेवरून परत आणू शकते.
🔲🔲🔲

*🔺रक्तदानाविषयीची माहिती प्रश्न शंका आणि निरसन.....*

मानवाची निर्मिति ही ईश्वराची सर्वात श्रेष्ठ कलाकृती. मानवाचे जीवन म्हणजे ईश्वराची देणगी आहे. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक नवनवीन प्रयोग करत आपले जीवन निरोगी व सुखकर करण्याचा प्रयास चालवला आहे. असे असुनही मानवाला आजतागायत रक्ताला पर्याय शोधता आला नाही. एका मानवाचेच रक्त दुसर्‍या गरजु मानवाला चालते.आजच्या युगात ते सर्वश्रेष्ठ दान मानले जात आहे. मानवी रक्ताला कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने रक्तदान करणे हा एकमेव पर्याय समाजापुढे आहे.
🔲🔲🔲
आजच्या काळात विज्ञानाने बरेच चमत्कार आपल्याला दाखवले आहेत.अनेक असाध्य गोष्टी साध्य करुन विज्ञान नेहमीच आपल्याला थक्क करत आले आहे.डोळ्याला न दिसणारया अणुरेणुंपासुन,समुद्राच्या तळापासुन,आकाशगंगेतील नवीन ग्रहांपासुन ते पृथ्वीच्या उत्पत्तीपर्यंत अनेक गो्ष्टींचा उलगडा आपल्याला हया विज्ञानाने करुन दिला पण आपल्या अगदी जवळच्या आणि अविरत कार्य करणारया एका यंत्राचे-मानवी शरीराचे गुढ अजुन विज्ञानाला पुरेसे उलगडता आलेले नाही.
🔲🔲🔲
*आजवर आपण कृत्रीम रक्ताची निर्मिती करु शकलेलो नाही हे एक सत्य आहे आणि हे सत्य जगभरातील वैज्ञानिकांना नेहमीच आव्हान देत राहील आहे.हयामुळेच अपघातामुळे , आजारामुळे किंवा छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया करतांना कोणाला रक्ताची गरज भासल्यास ते दुसरया कोण्या व्यक्तीकडुनच घ्याव लागते,आणि हया गोष्टीचा थेट संबध त्या व्यक्तीच्या जीवन मरणाशी असतो म्हणुनच तर रक्तदानाला विशेष महत्व आहे*
🔲🔲🔲
दर २ सेकंदांनी कोणा ना कोणा व्यक्तीला रक्ताची गरज भासते. तुमच्या रक्तामुळे एकाच वेळी अनेकजणांचे प्राण वाचू शकतात. अपघात झालेल्या व्यक्ती, वेळेआधीच जन्मलेली बालके, मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरे जाणारे रुग्ण यांना पूर्ण रक्ताची गरज असते जिथे तुमच्या रक्ताची आवश्यक ती तपासणी झाल्यावर ते रक्त थेट वापरले जाते. अपघात, रक्तक्षय किंवा इतर काही शस्त्रक्रियांनी त्रस्त असणा-या व्यक्तींना मुख्यत्वे केवळ लाल रक्तपेशींची गरज असते ज्या तुमच्या रक्तातून वेगळ्या केल्या जातात. रक्तदान व रक्त भरणे हे शब्द आपण ऐकलेले असतात. प्रौढ व्यक्तीच्या शरीरात सुमारे पाच लिटर रक्त असते. आपल्या आयुष्यात काही वेळा रक्त भरण्याची गरज लागू शकते.
🔲🔲🔲
▪कधीकधी अचानक रक्तस्राव होतो. शस्त्रक्रिया, बाळंतपणातील अतिरक्तस्राव, अपघात, इ. प्रसंगात बाहेरून रक्त देण्याची गरज निर्माण होते.
▪जास्त प्रमाणात रक्तपांढरी असेल तर रक्त भरावे लागते.
▪रक्ताचा कर्करोग, सर्पदंशातील रक्तस्राव, इत्यादी प्रसंगीही रक्त द्यावे लागते.
▪एखादा आटोक्यात न येणारा जंतुदोषही योग्यायोग्यविचार करून रक्त दिल्यावर आटोक्यात येऊ शकतो.
▪हिमोफिलिया व थॅलसीमिया या आजारात वारंवार रक्त भरावे लागते.
🔲🔲🔲
रक्तदान हे या दृष्टीने खरेच जीवदान आहे.रक्तदान करणारी व्यक्ती निरोगी असणे आवश्यक आहे. यासाठी रक्तद्रव्याचे प्रमाण निदान 10 ग्रॅम च्या वर असावे. तसेच गेल्या सहा महिन्यांत कावीळ किंवा विषमज्वर झालेला नसावा. एड्स व सांसर्गिक आजार नाही याची खात्री करावी लागते. मात्र तरीही एड्सचा धोका पूर्णपणे टळत नाही. यानंतर अशा व्यक्तीचे सुमारे 250-350 मि.ली. रक्त काढून घेतले जाते. लगेच गरज नसेल तर ते 4 सेंटीग्रेड तपमानात थंड ठेवले जाते. गरज पडेल तेव्हा हे रक्त शरीराच्या तपमानाच्या जवळ आणून योग्य गटाच्या व्यक्तीला देण्यात येते.
🔲🔲🔲
रक्तदानाबद्दल लोकांच्या मनात फार भीती आहे. पण ही भीती पूर्णपणे अनाठायी आहे. शरीरातल्या एकूण रक्ताच्या फक्त पाच टक्के रक्त काढले जाते. शस्त्रक्रियेच्या वेळी बरेच नातेवाईक रक्तदानास घाबरतात. अपरिचित व्यक्तीकडून रक्तदानातून काही सांसर्गिक आजार पसरण्याची शक्यता असते. (कावीळ, एड्स, इ.) या धोक्यामुळे आता व्यावसायिक रक्तदात्यांकडून रक्त घेतले जात नाही. आता रक्तदान शिबिरातून रक्त गोळा केले जाते.रक्तदानानंतर त्यातले काही रक्त घटक वेगळे केले जातात. काही रुग्णांना पूर्ण रक्त देण्याऐवजी विशिष्ट घटक द्यावे लागतात. याला इंग्रजीत कंपोनंटस् असे नाव आहे.
🔲🔲🔲
_पुढीलप्रमाणे घटक वेगळे केले जातात. – तांबडया रक्तपेशी, ग्रॅन्युलोसाईट (पांढ-या पेशी), प्लाझ्मा, प्लेटलेट्स (रक्तकणिका)._
🔲🔲🔲

*🔺रक्तदानासाठी काही सूचना:-*

▪रक्तदान करण्यापूर्वी किमान ३ तास आधी पोटभर जेवून घ्यावे.
▪रक्तदान झाल्यावर तुम्हाला दिलेला नाश्ता खा. नंतर व्यवस्थित जेवा.
▪रक्तदानाच्या एक दिवस आधी धूम्रपान करणे थांबवा.
▪रक्तदानाच्या ४८ तास आधी जर तुम्ही मद्य घेतले असेल तर तुम्ही रक्तदान करू शकणार नाही.
🔲🔲🔲

*🔺रक्‍तगट (ब्लडग्रुप) म्हणजे काय?*

जर सर्वच माणसांचे रक्‍त लाल असते तर त्यात फरक का असतो? तर हा फरक असतो रक्‍ताच्या गुणधर्मातील फरकामुळे. रक्‍ताची चार भागात विभागणी केली आहे. आपले रक्‍त प्रमुख्याने प्लाझ्मा, प्लेटलेट्स, पांढर्‍या पेशी व लाल पेशी या घटकांनी मिळून बनलेले आहे. त्याच प्रमाणे रक्‍तात एक प्रकारचे प्रोटीन (ऍण्टीजन) ही असतात. या ऍण्टीजनच्या भिन्‍नतेमुळे वेगवेगळ्या माणसांचे रक्‍त वेगवेगळे असते. या वेगवेगळ्या रक्‍तांनाच रक्‍तगट वा ब्लडग्रुप म्हणतात. ए, एबी, बी, आणि ओ असे चार प्रमुख गट असून आर एच पॉझिटिव्ह व आर एच निगेटिव्ह असे या प्रत्येक गटाचे दोन प्रकार मिळून आठ रक्‍तगट होतात. ए. (प्रोटीन) असलेला ‘ए’ रक्‍तगट, बी असलेला ‘बी’ रक्‍तगट, दोन्ही असलेले ‘एबी’ रक्‍तगट यापैकी एकही प्रोटीन नसलेला ‘ओ’ रक्‍तगट. रक्‍तातील आर एच हे सुध्दा एक प्रोटीनच, ज्यांच्या रक्‍तात ते असते त्यांना आर एच पॉझिटिव्ह व नसणार्‍अयांना आर एच निगेटिव्ह म्हणतात. रक्‍तगट अनुवंशिक नसतात. त्यामूळे भावा- बहिणींचे रक्‍तगट एकच असेल असे नाही.
‘ओ’ राक्‍तगटाचे रक्‍त इतर सर्व गटांना चालू शकते म्हणून या रक्‍तगटाच्या व्यक्‍तींना ‘युनिव्हर्सल डोनर’ असे म्हणतात. जगामध्ये ‘ओ’ रक्‍तगटाचे वर्चस्व असून या रक्‍तगटाची एकूण टक्‍केवारी ४६ टक्‍के आढळून येते. निगेटिव्ह रक्‍तगट दुर्मिळ असतात, त्यात एबी निगेटिव्ह रक्‍तगट तर पाच हजार3 व्यक्‍तींमध्ये एकाचा असतो. रक्‍तचढविण्या आधी रुग्णाचा रक्‍तगट आणि रक्‍तदात्याचा रक्‍तगट यांचे क्रॉसमॅच होणे जरुरी असते.
🔲🔲🔲

*🔺रक्‍तदान कोणी करावे व कसे?*

रक्‍तदानासाठी आलेल्या रक्‍तदात्याची निवड करताना काही नियमावली घालून दिलेली आहे.
▪1]त्याचप्रमाणे रक्‍तदात्याचे वय १८ ते ६० पर्यंत असावे.
▪2]वजन ४५ किलोपेक्षा जास्त असावे. हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ ग्रॅम ट्क्‍क्‍यांपेक्षा जास्ते असावे.
▪3]हिमोग्लोबिनचे प्रमाण ठरविण्यासाठी निळया रंगाचा कॉपर सल्फेट द्राव वापरतात. रक्‍तदात्याच्या बोटातून घेतलेला रक्‍ताचा थेंब बुडाल्यास हिमोग्लोबिन १२.५ पेक्षा जास्त आहे असे ठरते.
▪4]रक्‍तदात्याने आधी किमान तीन महिने रक्‍तदान केलेले नसावे. हृदयरोग, मधुमेह, रक्‍तदाब किंवा इतर आजार व त्यामधील औषधे चालू असतील तर डॉक्टर सल्ला घ्यावा.
▪5]उपाशीपोटी किंवा खाऊन झाल्यावर अर्ध्यातासापर्यंत रक्‍तदान करु नये.
▪6]रक्‍तदात्याची निवड झाल्यावर विशेष निर्जंतुक बॅगेमध्ये ३५० मि.लि. रक्‍त घेतले जाते. या बॅगेमध्ये रक्‍त गोठू नये म्हणून द्रव आधीच मिसळलेला असतो. रक्‍त घेण्याच्या क्रियेसाठी सुमारे १० ते १५ मिनिटे इतकाच वेळ लागतो. प्रत्येक रक्‍तदात्यासाठी डिस्पोझेबल सुई व बॅग असल्यामुळे रक्‍तदात्यास रक्‍तदानापासून रोग संक्रमण होण्याची अजिबात भीती नसते. अशी ही रक्‍ताची बॅग विशिष्ट अशा शीतकपाटात २ ते ६ डिग्री अंश सेंटीग्रेड तपमानाला ठेवली जाते. या शीतकपाटात रक्‍त ३५ दिवस खराब न होता राहू शकते.
🔲🔲🔲
रक्‍तदात्याच्या रक्‍तावर व्ही. डी. आर. एच. आय. व्ही. हिपॅटायटीस बी, हिपॅटायटीस सी, मलेरिया इत्यादी चाचण्या केल्या जातात. या सर्व चाचणी द्वारा योग्य ठरवलेले रक्‍तच रुग्णासाठी वापरले जाते.
निरोगी रक्‍तदात्याचे समगटाचे रक्‍त व रुग्णाचे रक्‍त यांच्यामध्ये क्रॉस मॅचिंगच्या चाचण्या केल्या जातात. मेजर क्रॉसमॅचिंगमध्ये रक्‍तदात्याच्या लालपेशी रुग्णाच्या प्लाझ्मा (रक्‍तातील द्रव) बरोबर, तर मायनर क्रॉसमॅचिंगमध्ये रक्‍तदात्याचा प्लाझ्मा रुग्णाच्या लालपेशींबरोबर मिसळला जातो. क्रॉसमॅचिंगमधील दोन्ही नमुने सूक्ष्मदर्शकाखाली तपासले जातात. सुदृढ मनुष्याच्या शरीरात साधारणपणे ५ ते ६ लीटर रक्‍त वहात असते. रक्‍तदानाच्या वेळी त्यातील ३५० मि. ली. एवढेच रक्‍त घेतले जाते. पुढील ४८ तासात संपूर्ण रक्‍त व रक्‍तघटक पूर्ववत भरपाई शरीरात होते. रक्‍तदानानंतर ताबडतोब नेहमीचे कामकाज करु शकतो.
🔲🔲🔲
_रक्‍तदानाविषयी कोणताही भयगंड न बाळगता प्रत्येक निरोगी व्यक्‍तीने निरपेक्ष रक्‍तदानाचा संकल्प करणे आवश्यक आहे.निरोगी रक्‍तदाता दर तीन महिन्यांनी रक्‍तदान करु शकतो. मात्र एका व्यक्‍तीने १०० वेळा रक्‍तदान करण्यापेक्षा १०० व्यक्‍तींनी दरवर्षी एकदा रक्‍तदान केले तर जास्त उपयुक्‍त ठरते. कारण या १०० व्यक्‍तींनी त्यांच्या आयुष्यात (त्यांनी २५ ते ४० वेळा रक्‍तदान केले तर) २५०० ते ४००० बाटल्या रक्‍त देऊ शकतील._
🔲🔲🔲
*वाढदिवसाला रक्‍तदान करायला हवे हा संदेश समाजात रुजला तर आपल्या देशात कधीही रक्‍ताची चणचण भासणार नाही.*

*🔺रक्तदान केल्यानंतर घ्यावयाची काळजी*

व्यक्तीने रक्तदान केल्यानंतर आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. रक्तदानानंतर काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे.
▪रक्तदानानंतर कमीत कमी ४ तास धुम्रपान करू नये.
▪कमीत कमी २४ तासांपर्यंत कोणत्याही प्रकारचे मद्यपान करू नये.
▪रक्तदानाच्या दिवशी जास्तीत जास्त पाणी घेणे.
▪रक्तदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे जड वाहन चालवू नये व अति उष्ण ठिकाणी काम करणे टाळावे.
▪रक्तदानाच्या दिवशी भरगच्च पोटभरून जेवण करू नये. हलक्या स्वरूपाच्या पदार्थाचे सेवन करावे.
▪रक्तदानाच्या दिवशी गोड आणि मांसाहार अन्नाचे सेवन करू नये.
▪हातावर व शरीरावर जास्त ताण पडणारे खेळ टाळावे. उदा. क्रिकेट, व्यायाम, गिर्यारोहण, मैदानी खेळ, इ.
▪रक्त काढलेल्या ठिकाणाहून रक्तस्त्राव होत असल्यास हात वर करून त्यावर दाब द्या.
▪रक्तदात्यास चक्कर अथवा अंधारी येत आहे असे वाटल्यास झोपावे व पायाखाली उशी ठेवावी. तसेच शिबीरातील डॉक्टरांशी तात्काळ संपर्क साधावा.
▪रक्तदानानंतर काही त्रास झाल्यास त्वरित रक्तपेढीच्या पत्त्यावर संपर्क करावा.
🔲🔲🔲
रक्तदानादरम्यान आणि रक्तदानानंतर रक्तदात्याने आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
🔲🔲🔲

*🔺रक्तदानासंबंधी काही गैरसमज:-*

▪रक्तदान केल्यानंतर मला थकल्यासारखे आणि गळून गेल्यासारखे वाटेल:❓
➡जर तुम्ही द्रव पदार्थ आणि योग्य आहार घेतला तर तुम्हाला थकल्यासारखे आणि गळून गेल्यासारखे वाटणार नाही.

▪मी पुन्हा कामावर जाऊ शकत नाही:❓
➡तुम्हाला थोडा वेळ विश्रांती घेण्यास सांगितले तरी तुम्ही कामावर जाऊ शकता.

▪माझे रक्त कमी होईल:❓
➡जर डॉक्टरांनी तुम्हाला रक्त दान करण्यास परवानगी दिली असेल तर रक्तदान केल्यानंतरही तुमच्या शरीरात पुरेसे रक्त उपलब्ध असते.

▪मी मद्य घेऊ शकत नाही:❓
➡तुम्ही दुस-या दिवशी घेऊ शकता.

▪रक्तदान करताना त्रास होतो❓
➡तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही.

मला चक्कर येईल आणि गरगरायला होइल:❓
➡रक्तदान केल्यानंतर तुम्हाला असे काहीही होणार नाही.

▪HIV ची भीती आहे का!:❓
➡नाही! डिस्पोझेबल सुया वापरल्या जात आहेत आणि निर्जंतुकीकरणाच्या सर्व पद्धती वापरल्या जात आहेत याची खात्री करा.

▪माझे रक्त सामान्य आहे. मला नाही वाटत त्याला काही मागणी असेल!:❓
➡म्हणूनच तुमच्या रक्ताची मागणी दुर्मिळ रक्तगटापेक्षा जास्त आहे.
🔲🔲🔲

*🔺रक्ताविषयी काही सत्ये:-*

▪रक्त हा जीवनचक्र चालू ठेवणारा द्रवपदार्थ आहे ज्याचे शरीराच्या हृदयातून, शिरा, धमन्यांमधुन अभिसरण होत असते.

▪रक्ताद्वारे शरीराला पोषकद्रव्ये, इलेक्ट्रोलाइट्स, हार्मोन्स, जीवनसत्त्वे, ऍण्टीबॉडीज, उष्णता, ऑक्सीजन पुरविला जातो.

▪रक्त शरीरातून निरुपयोगी पदार्थ आणि कार्बनडायऑक्साइड बाहेर टाकण्यास मदत करते.

▪रक्त जंतुसंसर्गाशी लढते आणि जखमा ब-या करण्यास मदत करुन आपल्याला निरोगी ठेवते.

▪रक्त आपल्या एकुण वजनाच्या ७% असते.

▪नवजात बालकाच्या शरीरात सुमारे १ कप रक्त असते.

▪रक्तातील पांढ-या पेशी शरीरातील जंतुसंसर्गावर सर्वप्रथम हल्ला चढवतात.

▪ग्रॅन्युलोसाइट्स नावाच्या पांढ-या रक्तपेशी रक्तवाहिन्यांच्या भित्तिकांशी असतात. त्या विषाणू शोधतात आणि त्यांना नष्ट करतात.

▪लाल रक्तपेशी शरीराच्या अवयवांना आणि उतींना रक्तपुरवठा करतात.

▪रक्ताच्या दोन-तीन थेंबामध्ये जवळपास एक अब्ज लाल रक्तपेशी असतात.

▪लाल रक्तपेशी अभिसरण प्रक्रियेमध्ये १२० दिवस जगतात.

▪रक्तकणिकांमुळे जखम भरुन येण्यास मदत होते आणि रक्ताच्या किंवा इतर कर्करोगाने आजारी असणा-या व्यक्तींना जीवन पुन्हा एकदा जगण्याची संधी मिळते.
🔲🔲🔲

*🔺रक्तदान का करावे?*

सारे जीवन रक्तावरच आधारलेले असते. रक्तामध्ये ६०% द्रवपदार्थ आणि ४०% घन पदार्थ असतात. यातील द्रवपदार्थाला प्लाज्मा म्हणतात ज्यात ९०% पाणी आणि १०% पोषकघटक, हार्मोन्स, इत्यादी असतात. या घटकांची झीज अन्न, औषधे यांच्या साहाय्याने सहज भरुन काढता येते. मात्र घन पदार्थ, उदाहरणार्थ लाल रक्त पेशी, पांढ-या रक्त पेशी आणि रक्तकणिका यांची झीज भरुन निघण्यासाठी बराच वेळ लागतो.येथेच तुमची भूमिका सुरू होते. या गोष्टींची झीज भरुन काढण्यासाठी लागणार वेळ रुग्णाचे प्राण घेऊ शकतो. कधीकधी तर शरीर ही झीज भरुन काढण्याच्या अवस्थेत नसते.तुम्हाला माहीत आहे की रक्त निर्माण करता येत नाही ते केवळ दान करता येते. म्हणजेच तुम्ही रक्तदान करुन एखाद्या व्यक्तीचे आयुष्य वाचवू शकता. म्हणूनच ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ आहे . दरवर्षी भारतामध्ये २५०० सीसी रक्ताच्या ४०० लाख घटकांची गरज असते ज्यापैकी केवळ ५००००० च उपलब्ध होऊ शकतात
🔲🔲🔲

*🔺रक्‍तदानामुळे होणारे फायदे.*

▪1]रक्‍तदान हे सर्वात महान दान मानले गेले आहे. रक्‍त प्राप्त करणर्‍या व्यक्‍तीलाच त्याचा लाभ होतो असे नाही तर रक्‍तदान करणार्‍यालाही अनेक बाबतीत फायदा होतो. रक्‍तदानामुळे तुमच्या रक्‍ताची नियमितपणे तपासणी होते.
▪2]रक्‍तदानामुळे तुम्हाला तुमचा रक्‍तगट कळू शकतो. कारण रक्‍तदानाचे कार्ड दिले जाते. त्यावर हा रक्‍तगट लिहिलेला असतो.
▪3]रक्‍तदानामुळे मनुष्याचे हृदय आरोग्यपूर्ण बनते. कारण शरीरातील अतिरिक्‍त लवण (मीठ) रक्‍तदानाद्वारे निघून जाते.
▪4]रक्‍तदान करणार्‍यांना जे रक्‍तदाता कार्ड मिळते त्यामुळे तुम्हाला कधीही आपत्कालीन गरज पडल्यास रक्‍त मिळु शकते.
〰〰〰〰〰〰〰〰〰
🅰🅱🆎🅾💉🅾🆎🅱🅰

२२ मे २०१७

Google Lens

*☑गुगलचं एक भन्नाट अॅप, सुंदर पिचाईंकडून घोषणा!*
➖➖➖➖➖➖➖➖
नुकत्याच पार पडलेल्या डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एका नव्या गुगल अॅपची घोषणा केली आहे. ‘गुगल लेन्स’ असं या अॅपचं नाव असून हे अॅप अतिशय भन्नाट आहे. या अॅपमुळे मोबाइलच्या कॅमेऱ्याची व्याख्याच पूर्णपणे बदलली जाणार आहे. या अॅपमध्ये कम्प्युटर व्हिजन आणि आर्टिफिशियल इंटेडलिजेंस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. म्हणजेच तुमच्या स्मार्टफोन कॅमेऱ्यामध्ये AI तंत्रज्ञान येणार आहे.
🔲🔲🔲
उदा. एखाद्या फोटोबाबत तुम्हाला काही माहिती हवी असेल तर गुगल लेन्स वापरा. गुगल लेन्स सुरु करताच तुम्ही काढलेला फोटो स्कॅन होईल आणि त्या फोटोसंबंधी सर्व माहिती एका क्षणात तुमच्या मोबाइल स्क्रिनवर दिसेल.  त्यामुळे तुमच्या मोबाइलचा कॅमेरा आता फक्त कॅमेरा राहणार नाही. तर तुम्हालरा फोटो कशासंबंधी आहे याचीही माहिती देईल. असा कंपनीचा दावा आहे. समजा, तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटचा फोटो स्कॅन केला तर तुम्हाला पुढच्या काही वेळात त्याबाबत संपूर्ण माहिती मिळेल.
🔲🔲🔲
गुगल लेन्स अॅप हे गुगल अॅसिस्टेंटसोबतही वापरता येणार आहे. अॅसिस्टेंट अॅपमध्ये नव्यानं दिलेल्या ऑप्शन सिलेक्ट करुन यूजर बोलताना देखील लेन्स अॅक्टिव्हेट करु शकतो. त्यामुळे बातचीत सुरु असताना देखील एखाद्या फोटोबाबत जाणून घ्यायचं असेल तर यूजर्स संबंधित फोटो स्कॅन करुन त्याबाबत माहिती मिळवू शकतो. एवढंच नाही तर, गुगल अॅसिस्टेंटच्या साथीनं गुगल लेन्स यूजर्सला भाषांतर करण्यासही मदत करेल.
➖➖➖➖➖➖➖➖
🔲◼🔲◼◼🔲◼🔲

१६ एप्रिल २०१७

वाढदिवस भारतीय रेल्वेचा

🚂🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃
➖➖➖➖➖➖➖➖➖
*☑ आज १६ एप्रिल*
*आज भारतीय रेल्वेचा वाढदिवस*.
➖➖➖➖➖➖➖➖➖
आज १६ एप्रिल १८५३ रोजी या दिवशी बोरीबंदर ते ठाणे देशातली पहिली रेल्वे धावली. भारतात जगन्नाथ सेठ आणि जमशेदजी जीजीभाई यांनी पहिल्यांदा रेल्वे रुळ आणले. त्यांनीच जीआयपी अर्थात ग्रेट इंडीयन पेनिन्सुला रेल्वेच्या संचालकपदावर राहून भारतात पहिली रेल्वे आणली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भारतात मुंबई ते ठाणे या मार्गावर देशात पहिली रेल्वे धावली. त्या दिवशी बोरीबंदर ते ठाणे असा ३५ किमीचा प्रवास ४५ मिनीटांत पहिल्या रेल्वेने पार पाडला होता. या रेल्वेला १४ डब्बे होते. या रेल्वेत जवळपास ४०० लोकांनी प्रवासाचा अनुभव घेतला होता. लोकल हा शब्द ट्रेनच्या इतिहासात पहिल्यांदा १ फेब्रुवारी १८६५ रोजी निघालेल्या वेळापत्रकात वापरण्यात आला. कल्याण ते उत्तर आणि माहिम ते पश्चिम या विभागांसाठी हा शब्द वापरण्यात आला होता. काळानुरुप या लोकलमध्ये खूप बदल होत गेले. ६ डब्यांपासून १५ डब्यांपर्यंत लांबलचक झाली ही गाडी. पादचारी पूल तयार झाले. पश्चिम रेल्वेवरच जगातली पहिली लेडीज स्पेशल ट्रेन धावली, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ रवींदर भाकर यांनी दिली. त्यानंतर भारतात दरवर्षी या रेल्वेच्या डागडुजीसाठी अर्थसंकल्प तयार करण्यात येवू लागला.
🔲🔲🔲
दरम्यान, १९२४ मध्ये इस्ट इंडीया कमिटीचे चेअरमन विल्यम एक्वठर्थ यांनी रेल्वेअर्थसंकल्पाला युनियन बजेटपासून वेगळे केले होते. तेव्हापासून ते आजपर्यंत रेल्वेचे अर्थसंकल्प हे वेगळेच सादर करण्यात येत होते. भारतीय रेल्वेच्या निर्मितीनंतर जवळपास ५० वर्षानंतर अर्थात १९०९ मध्ये रेल्वेत शौचालये तयार करण्यात आली. रेल्वे प्रवासादरम्यान ओखिल चंद्र सेन या प्रवाशाने आपल्या वाईट अनुभवाविषयी साहिबगंज विभागीय कार्यालयास पत्राव्दारे माहिती दिली होती. त्यानंतर या पत्राची दखल घैत ब्रिटीश सरकारने रेल्वेत शौचालयांची सुविधा सुरू केली. सेन यांनी लिहीलेले पत्र आजही भारतीय रेल्वे संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. आशियात सर्वात मोठे भारतीय रेल्वेचे जाळे आहे. तसेच जगात एकाच मॅनेजमेंटच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणारी भारतीय रेल्वे ही जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या भारतात ११५००० किमीचे रेल्वे रुळ आहेत. दररोज जवळपास १२,६१७ रेल्वे धावतात. तसेच २३ लाख प्रवासी रोज रेल्वेचा प्रवास करतात. भारतीय रेल्वे रूळाची एकूण लांबी ही ६४ हजार किमी एवढी आहे. तसेच यार्ड, साइडिंग्स यासर्वांना जोडून रेल्वेरुळाची लांबी ही १ लाख १० हजार किमीपेक्षा जास्त आहे. दरम्यान, आजही जगातील सर्वात जुन्या वाफेवरची रेल्वे ही आजही भारतात धावते. या रेल्वेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद करण्यात आली आहे. फेअरी क्वििन नावाची ही रेल्वे सध्या नवी दिल्ली ते राजस्थान दरम्यान धावते तसेच या रेल्वेला आंतरराष्ट्रीय स्तरावर हेरिटेज ऍवार्डने सन्मानित करण्यात आले आहे. 
🔲🔲🔲
जुलै १९८६ मध्ये भारतीय रेल्वे मंत्रालयाने पहिल्यांदा रेल्वेला आधुनिकतेचा टच दिला. आणि रेल्वेची सर्व माहिती ही सीआरआयएस आणि आयसीआरएस व्दारे करण्यात आली. या संगणकीय जोडीमुळे भारतीय रेल्वेचे पुर्णपणे रुपडेच बदलून गेले. त्यानंतर भारतीय रेल्वेच्या प्रगतिचा आलेख चढतच गेला. भारतीय रेल्वेचा शुभंकर म्हणून भोलू हत्तीला ओळखले जाते. हे एक कार्टून असून ज्याच्या हातात हिरवा कंदील देण्यात आला आहे. या हत्तीच्या प्रतिकास भारतीय रेल्वेच्या १५० वर्षाची पुर्तता झाल्याच्या पार्श्वतभूमीवर १६ एप्रिल २००२ मध्ये बंगळूरूमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. त्याच्या बरोबर एका वर्षानंतर अर्थात २००३ मध्ये सरकारकडून या भोलू हत्तीला अधिकृतपणे प्रतिक असल्याचे घोषित करण्यात आले.
२०१४ मध्ये प्रति तास १६० किमी वेगाने चालणाऱ्या रेल्वेचे यशस्वी चाचणी घेण्यात आले होती. याच्या काही महिन्यानंतर लगेच सेमी हाय स्पीड ट्रेन गतिमान एक्सनप्रेसची चाचणी घेण्यात आली. ज्यामध्ये दिल्ली ते आग्रा हा प्रवास ९० मिनीटात पार करण्यात या रेल्वेला यश आले होते. या ट्रेनमुळे जवळपास प्रवाशांचे ३० मिनीटे वाचली. नवी दिल्ली भोपाळ शताब्दी एक्साप्रेस ही सध्या सर्वात वेगाने धावणारी रेल्वे आहे. या रेल्वेचा वेग हा १५० किमी प्रति तास असून ही रेल्वे फैजाबादवरून आग्राला पोहचते. तर दुसरीकडे मेतुपलयम ऊटी नीलगिरी पॅसेंजर ही देशातील सर्वात कमी वेगाने धावणारी भारतीय रेल्वे आहे. या रेल्वेचा वेग हा १० किमी प्रति तास आहे. भारतीय रेल्वेमध्ये नवी दिल्ली रेल्वे स्टेशनमध्ये जगातील सर्वात मोठे रूट रिले इंटरलॉकिंग सिस्टीम आहे. याच सिस्टीमची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, भारतात ओडीशातील एका रेल्वे स्टेशनला सर्वांत छोटे नाव अर्थात इब असे नाव आहे. तर दुसरीकडे सर्वात मोठे रेल्वे स्टेशनचे नाव म्हणून व्यंकटनरसिंहराजुवारीपटा या स्टेशनला ओळखले जाते. या स्टेशनच्या नावात तब्बल २९ अक्षरे आहेत. हावडा - अमृतसर ही रेल्वे आपल्या निश्चीेत ठिकाणा पर्यंत पोहचताना जवळपास १११ ठिकाणी थांबते. तसेच आणखी एक बाब म्हणजे गोरखपुरमध्ये जगातील सर्वात लांब अर्थात १३६६.३३ मिटरचे प्लॅटफॉर्म आहे. सध्या देशात त्रिवेंद्रम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस ही कुठेही न थांबता सर्वांत लांब पल्ल्याची रेल्वे आहे. ही रेल्वे वडोदरा-कोटा दरम्यानचा ५२८ किमीचा प्रवास जवळपास ६.५ तासात पुर्ण करते. तसेच भारतीय रेल्वेतून लाखो लोकांना रोजगार मिळतो अशा क्रमवारीत ही जगातील ९ व्या क्रमांकावर आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
🚂🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃

१० एप्रिल २०१७

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कसे दिले जातात

*🛣National🛣Highway🛣*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🔺🙇🏻 मनातील प्रश्न.....*

*☑राष्ट्रीय महामार्गांना.......*
*क्रमांक कसे दिले जातात....?*
➖➖➖➖➖➖➖➖➖
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणची स्थापना १९८८ साली करण्यात आली. देशातील राष्ट्रीय महामार्गांचा विकास करणे, देखभाल करणे आणि त्यांचे संरक्षण करण्याचे काम हे प्राधिकरण करतं. भारतात आजवर ५,४७२,१४४ किमी रस्त्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ज्यामध्ये ९७,९११ किमी अंतराचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. भारताचे रोड नेटवर्क हे जगातील दुसरे सर्वात मोठे रोड नेटवर्क आहे.
🔲🔲🔲
गुगल मॅप्स वापरताना आपल्याला अनेकदा AH, NH and SH यांसारखी सांकेतिक चिन्हे दिसतात. त्यापैकी National Highways (NH) म्हणजे राष्ट्रीय महामार्ग होय. State Highways (SH) म्हणजे राज्य महामार्ग होय आणि Great Asian Highways (AH) म्हणजे आशियायी आंतरराष्ट्रीय महामार्ग होय. जो आशिया मधील देशांना जोडतो.
🔲🔲🔲
उत्तर-दक्षिण (जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारी) या मुख्य रस्त्याचे एकूण अंतर आहे ४००० किमी! पूर्व पश्चिम (पोरबंदर ते सिलचर) या मुख्य रस्त्याचे एकूण अंतर आहे ३३०० किमी!
🔲🔲🔲
सुवर्ण चौकौन मार्ग (The Golden Quadrilateral -GQ) जो दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या भारतातील मुख्य शहरांबरोबरच पुणे, बंगलोर आणि अहमदाबाद या शहरांना देखील जोडतो. या रस्त्याचे एकूण अंतर आहे ५८४६ किमी!
🔲🔲🔲

*🔺राष्ट्रीय महामार्गांना क्रमांक कसे दिले जातात?*

सर्व उत्तर-दक्षिण दिशेच्या महामार्गांना सम संख्या क्रमांक दिला जातो.उदा, NH 8: दिल्ली ते मुंबई.
आणि सर्व पूर्व-पश्चिम दिशेच्या महामार्गांना विषम संख्या क्रमांक दिला जातो. उदा, NH 13: तवांग ते आसाम *सर्व प्रमुख राष्ट्रीय महामार्गांसाठी एक अंकी किंवा दोन अंकी संख्या वापरली जाते.*
🔲🔲🔲
जसजसे आपण पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो तसतसे उत्तर-दक्षिण राष्ट्रीय महामार्गांचे क्रमांक मोठे होत जातात. म्हणजेच मध्य भारतात किंवा पश्चिम भारतात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक हा पूर्व भारतातील महामार्गाच्या क्रमांकापेक्षा मोठा असेल.

_उदा. समजा NH 4 हा पूर्व भारतामध्ये आहे , तर NH 34 हा पश्चिम भारतामध्ये असणार आणि हे दोन्ही रस्ते सम संख्या असल्यामुळे उत्तर-दक्षिण जाणारे असणार._
🔲🔲🔲
त्याचप्रकारे जसजसे आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे जातो तसतसे पूर्व-पश्चिम राष्ट्रीय महामार्गांचे क्रमांक मोठे होत जातात. म्हणजेच मध्य भारतात किंवा दक्षिण भारतात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक हा उत्तर भारतातील महामार्गाच्या क्रमांकापेक्षा मोठा असेल.

_उदा. समजा NH 7 हा उत्तर भारतामध्ये आहे , तर NH 83 हा दक्षिण भारतामध्ये असणार आणि हे दोन्ही रस्ते विषम संख्या असल्यामुळे पूर्व-पश्चिम जाणारे असणार._
🔲🔲🔲

*🔺तीन आकडी क्रमांक असणारे महामार्ग मुख्य महामार्गाचे उपमार्ग असतात.*

_उदा. १४४, २४४, ३४४ हे महामार्ग NH 44 चे उपमार्ग आहेत. या उपमार्गांना देण्यात आलेल्या क्रमांकामध्ये जर पहिला क्रमांक हा विषम असेल तर समजावं की तो रस्ता पूर्व-पश्चिम दिशेला स्थित आहे. जर पहिला क्रमांक हा सम संख्या असेल तर समजावं की रस्ता उत्तर-दक्षिण दिशेला स्थित आहे._

_A,B,C,D हे तीन आकडी क्रमांक असणाऱ्या उप महामार्गांच्या नावाशी जोडले जातात. ज्यावरून उपमहामार्गांच्या भागांचे संकेत मिळतात. उदा. 966-A, 527-B_
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🛣National🛣Highway🛣*

०१ एप्रिल २०१७

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया स्थापना दिवस 1 एप्रिल

🏦💰🏦💰🏦💰🏦💰🏦
➖➖➖➖➖➖➖➖➖
*☑आज १ एप्रिल*
*भारतीय रिझर्व बँकेची स्थापना दिवस.*
➖➖➖➖➖➖➖➖➖
१ एप्रिल १९३५ रोजी भारतीय रिझर्व बॅंकेची स्थापना एक खासगी संस्था म्हणून करण्यात आली होती. भारतीय रिझर्व बँकेच्या स्थापनेत मा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. भारतीय रिझर्व बँकेने शैली आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘दि प्रोब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सल्यूशन’ या पुस्तकातून घेतल्या गेलेल्या आहेत, बाबासाहेबांनी सादर काम मार्गदर्शक सूचनांनुसार संकल्पना असताना, केंद्रीय विधानसभा सादर मार्गदर्शक तत्त्वे या मार्गदर्शक तत्त्वे पार आधारित संकल्पना होते. १९४९ पर्यंत या केंद्रीय बँकेचे राष्ट्री यकरण झालेले नव्हते.
🔲🔲🔲
आर्थिक देशात १ एप्रिल ते ३१ मार्च हे आर्थिक वर्ष समजले जाते. मात्र, रिझर्व बॅंक ऑफ इंडियाचे आर्थिक वर्ष १ जुलै व ३० जून असे मानले जाते. रिझर्व बॅंक ऑफ इंडियातर्फे देशाच्या चलनी नोटांची छपाई केली जाते. नाणे बनवण्याचे काम भारत सरकारद्वारा केले जाते. के.जे.उडेशी बनल्या पहिली महिला डेप्युटी गव्हर्नर रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला डेप्युटी गव्हर्नर बनण्याचा मान के.जे.उडेशी यांना मिळाला आहे. २००३ मध्ये उडेशी यांची नियुक्ती झाली होती. पाच व दहा हजारच्या नोटा देखील छापल्या. रिझर्व बॅंकेने ५००० व १०००० रुपये मुल्य असलेल्या नोटांची छपाई १९३८ मध्ये केली होती. यानंतर १९५४ व १९७८ मध्येही या नोटांची छपाई करण्यात आली होती. रिझर्व बॅंक भारताशिवाय पाकिस्तांन व म्यानमारमध्ये सेंट्रल बॅंकेच्या रुपात आपली भूमिका पार पाडत आहे.
🔲🔲🔲
आरबीआयने जुलै १९४८ पर्यंत पाकिस्तायन व एप्रिल १९४७ पर्यंत म्यानमारमध्ये (वर्मा) सेंट्रल बॅंकेच्या रुपात काम केले. सर ओस्बॉर्न स्मिथ हे रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर होते. त्यांनी १ एप्रिल १९३५ रोजी आपला कार्यभार स्वीकारला. ते दि. ३०जून १९३७ पर्यंत आपल्या पदावर होते आणि त्या काळातील एकाही नोटवर त्यांची स्वाक्षरी नाही. त्यानंतर सरय जेम्स ब्रेड टेलर हे दि. ०१ जुलै १९३७ ते दि. १७ फेब्रुवारी १९४३ या काळात गव्हर्नर होते. सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय गव्हर्नर, ते ११ ऑगस्ट १९४३ रोजी या पदावर विराजमान झाले. १९५० ते १९५६ या काळात त्यांनी भारताचे पहिले वित्त मंत्री म्हणून काम पाहिले. आधी वित्त सचिव आणि नंतर गव्हर्नर अशी दुहेरी भूमिका बजावणारे अधिकारीही झाले आहेत. त्यातही डॉ. मनमोहन सिंग हे भारताचे वित्त मंत्री आणि पुढे पंतप्रधान पद भूषविणारे आतापर्यंत एकमेव गव्हर्नर ठरले आहेत.
🔲🔲🔲
दि. १९३५ पासून २००८ पर्यंत २१ विविध सनदी अधिकाऱ्यांनी गव्हर्नर म्हणून काम केले आहे. दि. २०१३ पासून या पदावर रघुराम राजन गव्हर्नर म्हणून होते. २०१६ पासून उर्जीत पटेल यांनी रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदाचा कार्यभार सांभाळला आहे. भारतात केंद्रीय बॅंक अर्थात रिझर्व बॅंक ऑफ इंडियाची (आरबीआय) स्थाळपना 'हिल्टंन यंग कमिशन'च्या आधारावर झाली होती.रिझर्व बॅंक ऑफ इंडियामध्ये व्दितीय श्रेणीचे कर्मचारी नाहीत. प्रथम श्रेणीत, तृतीय श्रेणी व चतुर्थ श्रेणीत एकूण १७ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या मुंबईतील मुख्यालयात मॉनिटरी म्युझियम (मुद्रा संग्रहालय) आहे. रिझर्व बँकेचा लोगो ईस्टय इंडिया कंपनीच्या डबल शिक्क्याने प्रेरित आहे. त्यात थोडा बदल करण्यावत आला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
🏦💰🏦💰🏦💰🏦💰🏦

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...