फॉलोअर

०६ डिसेंबर २०२५

भगवान छप्पर फाडके देता है

आज आपल्या भेटीचा दिवस—
एकांतात तुझी खूप वाट पाहिली.
तु येणार होतीस, तु भेटणार होतीस,
हीच आशा मनात रुंजी घालत होती.

मला तुला भेटायला खूप आवडतं,
तुलाही मला भेटण्याची तितकीच ओढ आहे.
दोघंही भेटण्यासाठी आतुर होतो.
तो दिवस आज यायचा होता.
भेटीचा दिवस ठरला होता.
पण तुला येता आलं नाही…
तरीही मी तुझी खूप वाट पाहिली.

आपल्या दोघांच्या बेडवर पडून,
प्रत्येक क्षण तुझ्यासोबतचा
डोळ्यांसमोर फिरत होता.
तुझ्या आगमनाची मनोमन आशा होती.
तु आली नाहीस,
तरीही तुझ्या वाटेकडे नजरा लागल्या होत्या.
मधूनच फोनकडेही लक्ष जात होतं—
कधी येईल तुझा कॉल?
कधी सांगशील— “येते आहे…!”
मी 5 वाजेपर्यंत तुझी खूप वाट पाहिली.

आणि मग—
तु नाही आलीस, पण तुझा फोन आला.
“कुठे आहेस सती? दहा मिनिटात मंदिरात ये.”
मी अंगावर पांघरून घेतलेलं चादर झटकून
खडकन उठलो,
तयार झालो
आणि आपल्या नेहमीच्या जागी,
मंदिराबाहेर पोहोचलो…

आणि तिथे—
माझ्या देवीचं दर्शन झालं.
मन आनंदाने फुलून आलं.
खरंच, सुखाचा झरा उडाला.

आज देवाने माझ्यासाठी
खूप काही खास ठरवलं होतं.
याहून सुंदर क्षण असूच शकत नाही.
आम्ही नवरा-बायकोसारखे
रांगेत उभे राहून मंदिरात गेलो.
देवाची पूजा केली,
जोडीनं नमस्कार केला.
डोळे बंद करून
एकमेकांसाठी खूप काही मागितलं.

आपलं सुख—
परस्परांच्या सुखातच सामावलेलं आहे.

एकत्र प्रदक्षिणा पूर्ण केली.
आज देवावरची श्रद्धा आणखी दृढ झाली.
भगवान छप्परफाड देतो—
सच्च्या भक्तांना नेहमी ऐकतो,
जे करतो ते चांगलंच करतो.

ओ सबकुछ…
ओ देवीजी…

तुझा— फक्त तुझाच,
तुझ्यासाठी जगणारा,
क्षणोक्षणी तुझी वाट पाहणारा…

— सती

Today was the day of our meeting.
I waited for you in solitude for so long.
You were supposed to come,
you were supposed to meet me.

I love meeting you,
and you too are eager to meet me.
Both of us were longing for this moment.
That day was supposed to arrive today.
Our meeting was decided for today.
You couldn’t come…
but still, I waited for you endlessly.

Lying on our bed,
every moment spent with you
flashed before my eyes.
I was filled with the hope of your arrival.
You didn’t come,
yet my eyes remained fixed on your path.
Again and again, my gaze drifted to the phone—
expecting your call,
hoping you would say, “I’m coming.”
I waited for you till 5 pm.

You didn’t come,
but your call came.
“Where are you, Sati? Come to the temple in ten minutes.”
I got up with a jolt,
quickly got ready,
and reached our usual place—
outside the temple.

And there…
I saw my Goddess.
My heart overflowed with joy.
A stream of happiness poured within me.

Today God had planned something special for me.
Nothing could have been more beautiful than this.
We stood in the queue like husband and wife
and went inside the temple together.
We did the puja together,
bowed down together.
With closed eyes,
we prayed for each other with all our heart.

Our happiness lies in each other’s happiness.

We completed the circumambulation side by side.
My faith in God grew stronger today.
God gives in abundance,
He listens to true devotees,
and whatever He does—He does for good.

Oh my everything…
Oh my Goddess…

Yours— only yours,
living for you,
waiting for you every single moment…

Sati



१४ नोव्हेंबर २०२५

आशिर्वादावर तुमच्या तरतो मी


दादा अनेकदा कराडला येतात, 
गप्पा मारतात, आराम करतात,
नातवांना चार गोष्टी सांगतात. 
विषय निघाला तर 
जुन्या आठवणी ताज्या करतात.
 
अधूनमधून माझ्या डोळ्यात खोलवर पाहतात.
माझ्यातला छोट्या सतीशला ओळखतात.

शक्यतो त्यांच्या समोर व्यक्त होत नाही मी !
त्यांचं वय आणि आदर यामुळे, 
आतल्या आत शब्द गिळून घेतो मी !

आज खुप दिवसांनी 
त्यांनी मला एक प्रश्न विचारला. 

तुला मानसिक त्रास होतो का?
कसं सहन करतोस मग हे सारं?
काय करतोस मग अशा वेळी?

डोळ्यात पाणी आलं होतं,  
गळा दाटून आला होता !
पण आवरलं मी... ;
खिडकीतून दूर पाहत बोललो मी,

अहो दादा, 
सगळं पाठीवर टाकून पुढं जातो मी !
सतत माणसाच्या गर्दीत राहतो मी !

दुःखाचा बाजार का करायचा ?
आनंदाचा गुणाकार करतो मी !

छंद आवडीचे जपतो मी !
मित्रांसोबत रमतो मी !
मुलांकडे बघून जगतो मी,
आशिर्वादांवर तुमच्या तरतो मी! 
आशिर्वादांवर तुमच्या तरतो मी!



दादांचा सतीश 
१४.११.२५

११ नोव्हेंबर २०२५

एक मुलाखात जरूरी है


🌙 ग़ज़ल — “एक मुलाक़ात ज़रूरी है, दुलारी...” 🌙

मुझे कुछ अरज़ करना है, बहुत कुछ सुनना है,
सति के दिल में अब भी वही जुनूँ बसना है...

फिर उसी मोड़ पर, इक बार मिलना है,
जहाँ छोड़ा था वक़्त, वहीं फिर ठहरना है...

आपका दामन थामकर, आपको निखरना है,
दुलारी की आँखों में, सति को ढूँढना है...

बस ख़ामोश बैठना है, आपको तकना है,
देखकर आपको, आप में ही फ़ना होना है...

एक मुलाक़ात ज़रूरी है, दुलारी...
आज... कल... या आने वाला कोई पल प्यारी...

जीना है, संवरना है, हाथ थामकर कुछ कहना है,
लबों से नहीं, दिल से इज़हार करना है...

देखना है, दिखाना है, वो पल सजाना है,
लाडली को आगोश में लेकर मुस्कुराना है...

तड़प हैं सति, तड़पे हो आप भी,
धड़कन को धड़कन में समाना है अभी...

आपको सब पता है, सति का हाल बेहाल है,
बस एक मुलाक़ात ही अब सवाल है...

मुलाक़ात तो बहाना है, सजनी की नज़रों में झाँकना है,
प्यार का सिलसिला पुराना है, पर अब भी वही अफ़साना है...

एक मुलाक़ात ज़रूरी है, दुलारी...
आज... कल... या कल...

१५ ऑक्टोबर २०२५

बच्चन नामाच्या महिम्यामुळं तरलं २४ तास बच्चन गाण्याचं धनुष्य !



🎬 अमिताभ बच्चन नामाच्या महिम्यामुळं तरलं २४ तास बच्चन गाण्याचं धनुष्य !

कराडात घडला इतिहास आणि विक्रमही !

काही क्षण आयुष्यात असे येतात जे फक्त घडत नाहीत,ते इतिहास घडवतात.अमिताभ बच्चन यांच्या ८३व्या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये झालेला “२४ तास बच्चनप्रेमी बच्चनगाणी” हा सोहळा असाच एक क्षण होता. माझ्यासाठी,आमच्या ग्रुपसाठी आणि प्रत्येक बच्चनप्रेमीकरिता भावनांचा पर्वणीचा दिवस!

🌟 संकल्पाची सुरुवात – एक वेड, एक वचन

मी सतीश मोरे सतिताभ..सतीश मधला 'सती' आणि अमिताभ मधला 'ताभ' अर्थात सतिताभ. लहानपणापासून अमिताभ बच्चन यांचं जग माझ्या हृदयात वसलेलं आहे.त्यांचे संवाद, अभिनय, विचार, आणि संघर्ष — हे सगळं माझ्या आयुष्याचं मार्गदर्शन आहे. 

अमिताभ बच्चन यांच्यावरील प्रेमातून किंवा त्यांचा बाबत सतत चिंतन चर्चा करण्यासाठी अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपचा जन्म 2015 साली 8 जानेवारीला झाला.अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपने गेल्या दहा वर्षात अनेक उपक्रम राबवले. महानायक अमिताभ बच्चन यांचे 'सिलसिला ,कालिया,नमक हलाल' यासारखे चित्रपटाचे स्पेशल शो कराडच्या प्रभात चित्रपटगृहात आयोजित केले. अमिताभ बच्चन यांच्यावरील गाण्याचा सुंदर कार्यक्रम 'एक शाम अमिताभ के नाम' आणि 'बेमिसाल अमिताभ' कराडमध्ये आयोजित केला. उल्लेखनीय म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये स्वच्छता अभियानामध्ये आम्ही भाग घेतला. याच निमित्ताने अमिताभ बच्चन साहेबांच्या वाढदिवसादिवशी आम्ही देशात पहिल्यांदाच एक आगळावेगळा उपक्रम राबवला. तो उपक्रम होता अमिताभ बच्चन यांच्या जीवनावरील व्याख्यान... होय अमिताभ बच्चन हा व्याख्यानाचा विषय आहे, होता आणि आणि असेल. ते व्याख्यान दिले नितीन बानगुडे पाटलांनी ! या कार्यक्रमाला हाऊसफुल्ल गर्दी झाली होती. दीड तास अमिताभ बच्चन या विषयावर बोलल्यानंतर नितीन बानगुडे सरांनी 'अमिताभ बच्चन हा 24 तास बोललं तरी कमी पडणारा विषय आहे' अशी एक वेगळी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

दरवर्षी अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी खास करण्याची इच्छा असते. पण यंदा मनात एक आगळी कल्पना आली —
'२४ तास अखंड बच्चनगाणी ! बच्चन प्रेमी, बच्चन गाणी !

ही कल्पना जितकी सुंदर, तितकीच कठीण होती.अशा प्रकारचा कार्यक्रम याआधी कधी झाला नव्हता —२४ तास सतत गाणी, संवाद, उत्साह, आणि प्रेक्षकांचा सहभाग ! पण मनात एकच गोष्ट ठरवली होती — “हे स्वप्न पूर्ण करायचंच. हे माझं बच्चनप्रेमाचं अर्पण आहे.” आमच्या बच्चन प्रेमीच्या बैठकीमध्ये हा विचार बोलून दाखवला. बैठकीमधील उपस्थित निम्म्याहून आधी सदस्यांनी माझ्या या संकल्पानंतर गप्प राहणे पसंत केले कारण हे कसं शक्य असा विचार त्यांच्या मनामध्ये आलेला होता. मात्र कायम माझ्यावर विश्वास असणाऱ्या सर्व सदस्यांनी यांनी मूक संमती देऊन गोष्टीला फुल्ल पाठिंबा दिला. कारण ग्रुपच्या अध्यक्षावर त्यांचा विश्वास होता.अध्यक्षांनी जी कल्पना मांडली आहे त्या कल्पनेवर त्यांचा विश्वास होता आणि ते हे करू शकतात याची त्यांना गॅरंटी होती. माझ्या ग्रुप मधील सतीश भोंगाळे, राहुल पुरोहित, जाॅन्टी थोरात, संजय शिंदे माझे जवळचे 24 तास उपलब्ध शिलेदार आहेत, त्यांनी तरी हा विषय इतका उचलून धरला की मी ठरवलं हा कार्यक्रम करायचाच.

कार्यक्रम घ्यायचे ठरल्यानंतर पहिला प्रश्न आला कुठे घ्यायचा ? कराडमध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती सदन आणि वेणूताई चव्हाण सभागृह असे दोन मोठे सांस्कृतिक हॉल उपलब्ध आहेत. मात्र या ठिकाणी 24 तासाला लागणारे भाडे अवाक्या बाहेरचं होतं. शिवाय त्या ठिकाणी चोवीस तास सांस्कृतिक वातावरण कसे निर्माण करायचं, कसं टिकवून ठेवायचं याबाबत शंका आल्यामुळे तो नाद सोडला आणि पंकज एक्झिक्युटिव्ह हॉटेलचा एसी हॉल ठरवायचं निश्चित केलं. पंकज हॉटेलचे मालक राहुल शहा यांनी फक्त फोनवर ही कल्पना इतकी उचलून धरली की तुम्हाला हा उपक्रम माझ्या हॉटेलमध्येच करावा लागेल, मी तुम्हाला सर्व सहकार्य करायला तयार आहे, असे सांगितले .24 तासासाठी अत्यल्प दरामध्ये हा हाॅल उपलब्ध करून देऊन राहुल शहा यांनी आम्हाला पहिल्याच बैठकीत बळ दिलं. या कार्यासाठी लागणारा खर्च एक लाख रुपयाच्या घरात होता. आमच्या ग्रुपचे यंग आणि डायनॅमिक बच्चन अतुल शिंदे यांनी ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. दोन बैठकीमध्ये फक्त जाग्यावर बसून फोन लावून त्यांनी चांगले सहा प्रायोजक पाहिले आणि मग आमचा विषय मिटला. 

पुढचा प्रश्न होता या 24 तास बच्चन गाणी गाण्यासाठी गायक कोण ? ओपन फोरम ठेवला तर तिथे गायक येतील पण त्यांना स्लॉट कसे द्यायचे,नोंद कशी करायची हा विषय डोक्यात आल्यानंतर कराड मधील कराओके संगीत ग्रुप गायकांना आपण बोलवावं असा विचार मी मांडला, मी या विषयालाही सर्वांनी पाठिंबा दिला. किशोर कुमार फॅन क्लब च्या माध्यमातून नेहमी अग्रस्थानी असणारे डॉ. नितीन जाधव आणि सुधाकर बेडके यांच्यावर मी ही जबाबदारी दिल. दोघांनीही ही जबाबदारी पेलली. कराड मधील संगीत प्रेमी ग्रुपना आम्ही निमंत्रण दिले. ही कल्पना सांगितली. 24 तास बच्चनची गाणी होणार आहेत आणि एक रेकॉर्ड होणार आहे हे त्यांना पटवून दिल्यानंतर हसतमुखपणे याला पाठिंबा दिला. मग त्यांचे स्लॉट पाडणे त्यांना हे पण महत्त्वाचे होते. या सर्व ग्रुपनी सकाळी सहा वाजल्यापासून रात्रीच्या बारापर्यंत आम्ही या कार्यक्रमाला येऊ शकतो अशी संमती दर्शवली. मग विषय राहिला रात्री बारा ते सकाळी सहा काय करायचं? खरंतर ही अतिशय किचकट टाईम आहे किंवा अडचणीची वेळ आहे. झोपायची वेळ असलेल्या रात्री ते बारा ते सकाळी सहा दरम्यान गाणी कोण बरं म्हणणार? मग मी ही जबाबदारी आमच्या बच्चन प्रेमी ग्रुप मधील जे टॉप सिंगर आहेत त्यांच्यावर सोपवली डॉ. नितीन जाधव, सुधाकर बेडके, मंगेश हिरवे ,दीपक रैनाक, संजय शिंदे, माणिक बनकर यांनी रात्रीची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी त्यांच्या संपर्कातून कराडमधील टॉपचे गायकांना याच कालावधीत गाणी म्हणण्यासाठी निमंत्रित केले. महत्वाचे म्हणजे निशाचर जॉन्टी थोरात यांनी त्यांच्या संपर्कातील अनेक गायकांना फोन करून रात्री ते बारा ते सहा तुम्हाला यावंच लागेल असा दम दिला आणि अनेक जण जमा झाले. रात्रीच्या बारा वाजता समीर संदे, श्री व सौ विजय वळवडे,विजय शिंदे देवेंद्र साळुंखे यांच्यासहित अनेक जण पंकज हॉटेलच्या हॉलमध्ये उपलब्ध झाले आणि त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. गुगल फॉर्मवर आम्ही नोंदणी केली होती.या नोंदणी मध्ये रात्री बारा ते सहा हा स्लॉट रिकामा ठेवला होता. या स्लॉटमध्ये ऑनलाइन नोंदणी केलेले अनेक गायकही रात्री बारा ते सहा या ठिकाणी उपस्थित राहिले.

---

🎶 २४ तासांचा संगीत प्रवास

शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजता विजय पाटील यांच्या दमदार आवाजात आम्ही *‘अग्निपथ अग्निपथ’* च्या बच्चन स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर लगेच आमच्या अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपचं थीम सॉंग 'एक दुसरे से करते है प्यार हम' हे आम्ही सर्वांनी एकत्रितपणे गायलं आणि आमची ताकद एकवटली.त्या क्षणापासून कराडचं पंकज एक्झिक्युटिव्ह हॉल संगीताच्या लहरींनी भरून गेलं.

रात्रीपासून पहाटे सहा पर्यंत ३५ कलाकारांनी बच्चनजींची गाणी सादर केली. या कालावधीत संजय शिंदे, दिपक रैनाक, मंगेश हिरवे , श्री व सौ विजय वळवडे, समीर संदे, देवेंद्र साळुंखे यांनी गायलेली गाणी अप्रतिम होती. खऱ्या अर्थाने रात्री बारा ते पहाटे सहा खरी महफिल झाली. पहाटे चार ते पाच या मैफिल मध्ये गायकांची संख्या दहाच्या वर होती होती आणि ऐकणारांची संख्या चार होती. मी स्वतः रात्री 12 ते 4 याठिकाणी उपस्थित होतो. चार नंतर सतीश भोंगाळे, जॉन्टी थोरात, राहुल पुरोहित, दीपक रैनाक मिलिंद रैनाक, शैलेंद्र कणसे यांच्याकडे सूत्रे सोपवून मी तिथेच झोपी गेलो. या टीमने पुन्हा पुढचे तीन तास महफिल गाजवली.सकाळी सात वाजता पुन्हा हजर झालो. 

पहाटेपासून दुपारपर्यंत ‘साथिया’, ‘स्वरसाज’, ‘रागमंजिरी’ आणि ‘रॉयल कराओके ग्रुप’च्या गायकांनी सभागृह दुमदुमवलं. दुपारी बारा पुन्हा केक कापून बच्चनजींचा वाढदिवस साजरा झाला — 

टाळ्यांचा कडकडाट, हसरे चेहरे, आणि डोळ्यांत चमक.

संध्याकाळी ‘साज और आवाज’, ‘स्वरसाधना’, ‘किशोर कुमार फॅन क्लब’, ‘कंम्पा अकॅडमी’ आणि ‘स्वरसंस्कार संगीत अकॅडमी’च्या कलाकारांनी एकापेक्षा एक सरस गाणी सादर केली.आणि मग रात्री अकरानंतर — टॉप सहा गायक मंचावर आले.त्याच्या सुरांनी कार्यक्रमाचं वैभव शिखरावर नेलं.मध्यरात्री पुन्हा बच्चनजींचा वाढदिवस साजरा करताना सभागृहात सगळ्यांच्या माझ्या सहित ग्रुप मधील सर्व सदस्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. नॉन स्टॉप संगीत 24 तास हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला त्याचा एक अभिमान वाटत होता.

---

🕰 थकवा नव्हता, फक्त उत्साह!

प्रामाणिकपणे सांगायचं तर,आठ दिवस मला झोप आलीच नाही. संपूर्ण तयारी, नियोजन, कलाकारांशी संपर्क — सगळं माझ्यासह टीम मधील सतीश भोंगाळे, राहुल पुरोहित पुरोहित, जॉन्टी थोरात, बंडा पाटील, सागर बर्गे, संजय शिंदे, दीपक रैनाक, प्रमोद गरगटे, सुधाकर बेडके आदी बच्चन प्रेमी सांभाळत होती. पण थकवा जाणवला नाही, कारण मनात एकच भावना होती —

> “हे बच्चनजींसाठी आहे. हे त्यांच्या प्रेरणेला सलाम आहे.” जेव्हा सभागृहात लोक डोळे मिटून गाण्यांत हरवलेले दिसत होते,तेव्हा वाटलं — याहून मोठं समाधान काहीच नाही.

---

🎨 रंगांनी घडलेला विक्रम – ८३ फुटांचा कॅनव्हास

या कार्यक्रमाच्या समांतर कला महाविद्यालयाचे प्रा. सतीश उपळावीकर यांनी इतिहास रचला.अमिताभ बच्चन यांच्या जीवनावर आधारित ८३ फुट लांबीचं पेंटिंग त्यांनी २४ तास सतत रेखाटलं!एका बाजूला गीतांचा जल्लोष आणि दुसऱ्या बाजूला रंगांची साधना —असा संगम देशात पहिल्यांदाच झाला.
कला आणि संगीत एकत्र आल्यावर जो चमत्कार घडतो,
तो त्या दिवशी कराडमध्ये घडला. उपळावीकर सरांनी रात्रीच्या बारा वाजता हा उपक्रम सुरू केला. 83 वा वाढदिवस असल्यामुळे 83 फुटाचे कॅनवास त्यांनी आणले होते. अन्न न खाता त्यांनी 24 तास मांडी घालून बसून अमिताभ बच्चन यांची 50 हून अधिक चित्रे काढली, हा एक विक्रमच आहे.

🙌 माझी टीम – माझी ताकद

हा कार्यक्रम एकट्यानं शक्यच नव्हता.आमच्या अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपच्या प्रत्येक सदस्याने आपली जबाबदारी मनापासून पार पाडली. सतीश भोंगाळे, जगन पुरोहित,जॉन्टी थोरात, डॉ. नितीन जाधव, अतुल शिंदे, संजय शिंदे,पोपटराव साळुंखे,बंडा पाटील, सुधीर एकांडे, प्रमोद गरगटे, शेरखान पठाण, संजय क्षीरसागर, दिपक रैनाक, विजय वाटेगावकर, संजय बदीयानी, मंगेश हिरवे, विजय पाटील,सुधाकर बेडके, शेरखान पठाण, सागर बर्गे, बाळासाहेब पाटील, विजय पाटील, कुमार नलवडे, संभाजी शेवाळे, सचिन देशमुख, माणिक बनकर,संजय क्षीरसागर,सोनवणे सर

.. कुणाकुणाची नावं घेऊ ! सर्वांनी खूप कष्ट घेतले —प्रत्येकानं आपला वेळ, ऊर्जा आणि प्रेम या उपक्रमात दिलं.त्यांच्या शिवाय हा सोहळा अपूर्ण राहिला असता.

💖 भावनिक क्षण
कार्यक्रमाच्या शेवटी जेव्हा घड्याळ्यात बारा वाजले आणि पुन्हा केक कापण्यात आला,
तेव्हा वातावरणात एक अवर्णनीय भावना होती.
गायक थकलेले होते, पण डोळ्यांत समाधान होतं.
प्रेक्षक टाळ्या वाजवत होते, पण हृदय भरून आलं होतं. खरं तर रात्री बारा वाजता हा कार्यक्रम संपणार होता. मात्र एक वाजेपर्यंत मैफिल सुरू होती. शेवटी जेवायला जायचं होतं आणि आम्ही माईक ठेवला आणि तेथील इतर गायकाच्या सोपवला. पुन्हा रात्रीच्या दोन वाजेपर्यंत गाणी सुरू होती. उपक्रम 24 तासाचा होता मात्र 26 तास अखंड गाणी सुरू होती.
त्या क्षणी मला वाटलं —

> “हो… हे केलं आपण, अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप मधील सर्वांच्या सहकार्यामुळे, ताकदीमुळे! हा केवळ कार्यक्रम नव्हता — हा प्रेमाचा उत्सव होता.”

---

🕊️ कराडचा अभिमान 

या २४ तासांच्या सोहळ्यानं कराड शहरात बच्चनप्रेम आणि संगीत यांची एक नवी परंपरा निर्माण केली आहे. लोक मला विचारतात — “हे तुम्ही कसं केलंत?”माझं उत्तर साधं आहे —

> “प्रेमात गणित नसतं. हे सर्व अमिताभ बच्चन या नामाच्या महिम्यामुळे झालं. अमिताभ बच्चन या नावाची जादू फार मोठी आहे" कार्यक्रमात 24 तास १२५ हून अधिक गायक आणि गायिकांनी गाणी गायली. 24 तासात हजार हून अधिक रसिकांनी उपस्थित दाखवली"

हा कार्यक्रम 24 तास फेसबुक वरून लाईव्ह होता. या माध्यमातून पुन्हा एकदा हजारो लोकांनी हा कार्यक्रम मोबाईलवर पाहिला.अमिताभ बच्चन यांच्या प्रेरणेनं, त्यांच्या कलेच्या आदरानं आम्ही हे केलं.आणि आज हे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर माझं मन एकच म्हणतं —

> “ज़िंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं…”
आणि ही ज़िंदगी आम्ही २४ तास गाण्यांच्या रूपात मोठी केली आहे!

*आभार नव्हे कृतज्ञता..*

कार्यक्रमाचे मुख्य प्रयोजक हॉटेल प्यासा गार्डन, शिवराज अक्का मसूर धाबा, शिवनेरी अक्का मसूर धाबा, राजोरी स्टील, नाकोडा स्टील, मंगेश हिरवे, अभियंता एन एस पवार यांचे मनःपूर्वक आभार.

म्युझिक सिस्टिम चे सागर सूर्यवंशी हे 26 तास उपस्थित होते. कोणतीही तांत्रिक अडचण न येऊ देता त्यांनी 24 तास ही सेवा उपलब्ध करून दिली. या कार्यक्रमाच्या यशामागे हे ही मुख्य कारण आहे संगीत नियोजन. 

24 तास हॉल उपलब्ध करून देणारे हॉटेल पंकजचे मालक राहुल शहा, श्रीनिवास गौडा आणि त्यांचा सर्व स्टाफ, अतिशय सुंदर डिझाईन आणि सर्टिफिकेट बनवून देणारे वैभव कांबळे (स्पर्श)आणि विशाल देशमुख, ही सर्टिफिकेट ऑनलाईन देण्यासाठी कार्यशील असणारे प्रशांत लाड सर, सर्टिफिकेट आणि अमिताभ बच्चन यांचे फोटो अत्यल्प दरामध्ये प्रिंट करून उपलब्ध करून देणारे कुलबुर्गी डिजिटल आर्ट, मुकंदर का सिकंदर अभिमान पत्राचा ड्राफ्ट तयार करणारे जगन पुरोहित याचं खुप आभार.

एसी सभागृहात लावण्यात आलेले आकर्षक अमिताभ बच्चन यांचे लाईव डिजिटल फोटो करून प्रिंट करून देणारे राहुल आर्ट्स, 24 तास हा कार्यक्रम ऑनलाईन प्रक्षेपित करणारे सुरेश पवार आणि विकास साळुंखे आणि सहकारी, प्री आणि पोस्ट व्हिडिओ करून देणारे हारुण मुलाणी, 24 तास कला सादर करणारे गायक आणि गायिका, २४ तास या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहीलेले प्रेक्षक आणि ऑनलाइनवर हा कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे.. आभार ...आभार... आभार..

---

💫 शेवटी…

मी मनापासून सांगतो —
अमिताभ बच्चन माझ्यासाठी केवळ अभिनेता नाहीत,ते माझ्या प्रेरणेचा स्रोत, माझ्या आयुष्याचा उत्सव आहेत.हा कार्यक्रम म्हणजे त्यांच्या कलेला आमचा नम्र अभिवादन! कराड शहराचं — बच्चनप्रेमींचं — सामूहिक स्वप्न जे अखेर सत्यात उतरलं, हे आनंददायी आहे.

---

🌹 “अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप कराड” – प्रेम, संगीत आणि प्रेरणेचा प्रवास अजून पुढे चालू आहे…कारण बच्चन म्हणतातच —

> “ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना आणि संगीताशिवाय आणि अमिताभ बच्चन शिवाय आम्ही जगूच शकत नाही!” 🎬✨

24 तास बच्चन प्रेमी बच्चन गाणी सोबत 24 तास कॅनव्हास वर अमिताभ बच्चन चे चित्र... हा उपक्रम देशात कुठेही झालेलं नाही. अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत हा उपक्रम पोहोचवण्याचे काम सुरू आहे. मात्र या उपक्रमाला कराड शहरातील रसिकांनी एक महफिल म्हणून जो प्रतिसाद दिला त्यासाठी कराडकरांना सलाम, कोपरापासून दंडवत. माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष समीर जोशी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांचेही आभार. तरुण, मध्यमवयीन, स्त्री पुरुष , बच्चन प्रेमी, जेष्ठ नागरिक यासह संगीत प्रेमी ग्रुपमधीलअडीचशे हून अधिक गायकानी या मैफिलमध्ये आपली कला सादर केली. असा संगीत महोत्सव अशी संगीत मेहफिल यापूर्वी कधी कराडात झालेली नाही, जिल्ह्यात नव्हे देशात झाली नसेल. हे सर्व शक्य झालं आहे केवळ आणि केवळ अमिताभ बच्चन यांच्या नामाच्या महिम्यामुळं..!

@सतीश मोरे सतिताभ

.. लेखन मर्यादा

२५ ऑगस्ट २०२५

ठरवून ठरवलं तरी


ठरवणं आणि ठरणं

आपल्या आयुष्यात प्रत्येकजण काही ना काही ठरवत असतो.
कधी एखादं ध्येय गाठायचं, कधी एखादं नातं टिकवायचं,
कधी एखादी चांगली सवय लावून घ्यायची—
"आजपासून मी हे करणारच!" असं ठाम मनाशी पक्कं ठरवतो.

पण प्रश्न असा आहे की,
ठरवलं तसं नेहमी घडतं का?
बर्‍याचदा आपल्याला वाटतं तसं होत नाही.
कधी परिस्थिती बदलते, कधी अडथळे येतात,
कधी आपल्या हातात नसलेल्या गोष्टी
संपूर्ण चित्र बदलून टाकतात.

म्हणूनच “ठरल्याप्रमाणे झालं, तर ठरवायला अर्थ आहे;
नाहीतर ती केवळ ठरवाठरवी ठरते” असं वाटतं.
आपल्या ठरवण्याला पूर्ण होण्यासाठी
वेळ, संधी आणि परिस्थितीची साथही हवीच असते.

तरीही जीवनाची गंमत हीच—
आपण न ठरवता देखील अनेक गोष्टी
आपोआप घडत जातात.
कधी न ठरवलेली माणसं भेटतात,
न ठरवलेल्या वाटा समोर येतात,
न ठरवलेल्या संधी आपल्याला उचलून नेतात.
तेव्हा लक्षात येतं की,
आपल्या पलीकडे कुणीतरी मोठा ठरवणारा आहे—
जो आपल्या आयुष्याची दिशा ठरवतो.

म्हणूनच जीवनाकडे पाहताना दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात—
१) आपण हवं ते नक्की ठरवणं, प्रयत्न करणं.
२) आणि न ठरलेलं जे घडेल त्याला समजूतदारपणे स्वीकारणं.

कारण शेवटी—
आपण ठरवतो तेवढंच नाही,
तर जे न ठरवता घडतं,
तेच कधी कधी आयुष्याला खरी दिशा देतं!

अपेक्षांचे दरवाजे बंद करा



अपेक्षांचे दरवाजे हळूहळू बंद करा,
समाधानाचे दरवाजे आपोआप खुले होतील !

खूप अपेक्षा धरल्यानंतर काय होतं आणि त्याचा शेवट काय होतो याचा अनुभव अनेकांनी अनेक वेळा घेतला असेल. छोटं उदाहरण देतो – आपण भर दुपारी उन्हातून घरी यायला लागतो. रस्त्यात आपण विचार करतो, आता मी घरी गेल्यानंतर माझी मुलगी किंवा माझी बायको माझं स्वागत करेल आणि थंड पाण्याचा ग्लास आणून देईल, टॉवेल आणून देईल. पण घरी गेल्यावर होतं त्याच्या उलट. आपण जेव्हा घरात जातो, तेव्हा ती व्यक्ती काहीतरी काम करत असते, किंवा ती तिच्या विश्वात असते. ती फक्त दरवाजा उघडते आणि आपल्याला आत घेते व पुन्हा आपल्या कामाला लागते. आपण मात्र अपेक्षा घेऊन आलेलो असल्याने त्या सर्व अपेक्षा भंग होतात आणि मनाला खूप वाईट वाटतं. “मी एवढं कुटुंबासाठी करतो आणि मला कोणी साधा पाण्याचा ग्लासही विचारत नाही” असे विचार मनात येतात.

या उलट आपण असं केलं तर? – कोणतीही अपेक्षा न करता घरात गेलो आणि घरात आपल्या बायकोने किंवा मुलांनी थंड पाण्याचा ग्लास किंवा वर सरबत आणून दिलं, तर किती आनंद होईल! खरंच हे करून बघा – अपेक्षेशिवाय एखाद्या व्यक्तीकडे गेल्यानंतर जे मिळतं, त्यातून मिळणारा आनंद हा दामदुप्पट असतो, अगदी एफडीसारखा!

अपेक्षा करून एखाद्या व्यक्तीकडे गेलो तर अपेक्षाभंग होण्याचा फार मोठा धोका असतो. आपण फक्त आपलं कर्तव्य बजावायचं आणि कोणालाही भेटायला जाताना निर्विकार भावनेने जायचं. कोणत्याही अपेक्षा घेऊन जायचं नाही. मग पहा – किती छान आनंद होतो. “अपयश मरणावून वोखटे” असं मी एकदा कुठेतरी ऐकलं होतं. पण मी असं म्हणतो – अपेक्षाभंग त्याहूनही अधिक वाईट!

अपेक्षा माणसाला खूप क्षीण बनवतात आणि दुसऱ्यावर अवलंबून राहायला शिकवतात. अपेक्षांच्या बाजारात आपण स्वतःला विकून टाकतो आणि स्वतःचं स्वत्व हरवून बसतो. क्षीण झालेला माणूस अपेक्षेच्या आशेने काहीतरी मिळेल असं गृहित धरतो आणि मनापासून काम करत नाही किंवा दुसऱ्यावर अवलंबून राहतो. अपेक्षेच्या या दबावाखाली आपण अपेक्षाभंगरूपी दुःखाला जवळ बोलावून घेतो. त्याऐवजी असं केलं तर? – विना-अपेक्षा आपण एखाद्याशी संबंध ठेवले, तर किती आनंद होईल बघा.

अपेक्षांचे दरवाजे सतत उघडे ठेवले, तर त्या दरवाजातून अपेक्षाभंगाची दुःखं येतात. त्याऐवजी अपेक्षांचे दरवाजे हळूहळू बंद करा, मग बघा – समाधानाचे दरवाजे आपोआप उघडले जातील.

✍️ सतीश मोरे सतिताभ

मोठ्या सुखाच्या शोधात धावू नका,
छोट्याशा आनंदात लपलेलं सुख शोधा !

१८ ऑगस्ट २०२५

ये इंसान क्या है, खुदा के भी आगे प्यार झुकता नही


माझे दक्षिणेतील आवडते निर्माते दिग्दर्शक के. सी. बोकाडिया यांच्या बॅनरखालील 1985 मध्ये रिलीज झालेला 'प्यार झुकता नही' हा चित्रपट मला खूप आवडतो. अमिताभ बच्चन यांच्या नंतर आवडणारा दुसरा सर्वात जवळचा हिरो म्हणजे मिथुन चक्रवती. 1985 साली आम्ही आठवी नववीला असेन. या काळात प्रेमाचं आकर्षण तर होतंच ! मात्र चित्रपटाचं आकर्षण फार होतं. चित्रपटातातील गाणी रेडिओवर किंवा टेप रेकॉर्डर ऐकण्याचा एक वेगळा ऑरा त्या काळात होता.

मला आठवते 'प्यार झुकता नहीं 'हा चित्रपट मी राजमहल थिएटरला पाहिलेला आहे. हा चित्रपट त्याकाळी खूप हिट झालेला होता. या चित्रपटातील 'तुमसे मिलकर ना जाने क्यू' हे गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. बिनाका गीतमाला मध्ये अनेक आठवडे हे गाणं टॉपला होतं. चित्रपटातील सर्वच गाणी छान होती. शब्बीर कुमार  आणि लता मंगेशकर यांच्या सुंदर आवाजातील ही गाणी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी स्वरबद्ध केली होती. या चित्रपटातील 'तुम्हे अपना साथी बनाने से पहले, मेरी जान मुझको बहुत सोचना है, हे गाणं मला खूप आवडतं. मी या गाण्याविषयीच आज थोडसं बोलणार आहे. 

तपूर्वी या चित्रपटाची स्टोरी तुम्हाला माहित नसेल तर सांगतो. गर्भ श्रीमंत कुटुंबातील एक तरुणी आणि सामान्य कुटुंबातील फोटोग्राफर तरूण यांची ही प्रेम कथा ! त्यांच्यातील हे प्रेम सहज फुलत जातं, दोघेही प्रेमात उत्कंठ बुडून जातात. लग्न करायचा निर्णय घेतात. मग ती तरूणी आपल्या वडलांसमोर आपल्या प्रेमाची कबुली देते. तिचे वडील त्याला एका पार्टीमध्ये यायचं निमंत्रण द्यायला सांगतात. प्रियकराला एका पार्टीमध्ये येतो. श्रीमंत बाप या छोट्या तरुणाला बाजूला घेऊन जातो आणि त्याची पूर्ण औकात काढतो. पार्टी सुरू झाली असते आणि अपमानित झालेला तो तरुण आपल्या भावना गीतातून व्यक्त करतो. 'तुम्हे अपना साथी बनाने से पहले, मेरी जान मुझको बहुत सोचना है' हे सांगताना गरीब श्रीमंतीतील मोठी दरी आपल्याला एक करू शकत नाही, तुझ्यावर मी आयुष्याची दोरी बांधू शकत नाही असं स्पष्ट सुनावतो. तुझ्याशी लग्न केलं किंवा तुझ्यासोबत लग्न गाठ बांधली तर तुला माझ्यासोबत अनेक संकटाला तोंड द्यावे लागेल, माझ्यासोबत तुला कधी उपाशी राहावं लागेल, जगाचे टोमणे ऐकून घ्यावे लागतील असं व्यक्त होत असताना असताना तो तरुण आपल्या मनातील गरिबीच्या भावना व्यक्त करतो. 

शब्बीर कुमार यांच्या गंभीर आवाजातील हे गाणं मला खूप आवडत होतं, आजही आवडतं. हा तरुण ही भावना व्यक्त केल्यानंतर थांबतो, पार्टीतून जायला लागतो मात्र ती तरुणी त्याला थांबवते. त्यानंतर त्या तरुणीने आपल्या आई-वडिलांसमोर त्या पार्टीमध्ये दिलेलं उत्तर मला त्याहून अधिक आवडतं. लतादीदींनी एका सुरात, एका दमात हे गाणं म्हटलं आहे. एस एच बिहारी यांनी लिहिलेल्या या गीतामध्ये अनेक उर्दू शब्द आहेत, त्याचा अर्थ मला त्यावेळी कळत नव्हता. आता थोडासा अभ्यास करून किंवा माहिती घेऊन माझ्या परीने मी या गाण्याचा अर्थ काढण्याचा मी थोडासा प्रयत्न केला आहे. बघा आपणाला आवडतो का?



मोहब्बत जिन्हें हो गई हो किसी से
मोहब्बत जिन्हें हो गई हो किसी से
मोहब्बत का अंजाम कब सोचते हैं?

ये ऐसा सुहाना सफ़र है कि जिसमें
हज़ारों हैं नकाम कब सोचते हैं
चराग़-ए-वफ़ा अपने हाथों में लेकर
मोहब्बत की राहों में जो चल पड़े हैं

बयाबाँ में होगी कि सहरा में होगी
कहाँ होगी अब शाम कब सोचते हैं
कहाँ होगी अब शाम कब सोचते हैं

मोहब्बत के मारों को अब और, ऐ, दिल
सताएँगी क्या सख़्तियाँ ज़िंदगी की?
जिन्हें थक के नींद आ गई पत्थरों पर
वो दुनिया का आराम कब सोचते हैं?

ये इंसान क्या है, ख़ुदा के भी आगे
कभी प्यार दुनिया में झुकता नहीं है
प्यार झुकता नहीं है

मोहब्बत ही जिनका ख़ुदा बन चुकी हो
किसी और का नाम कब सोचते हैं?

मोहब्बत जिन्हें हो गई हो किसी से
मोहब्बत का अंजाम कब सोचते हैं
मोहब्बत का अंजाम कब सोचते हैं

असे हे गाण्याचे बोल होते. यात खोलवर असा अर्थ आहे.

मोहब्बत जिन्हें हो गई हो किसी से
मोहब्बत का अंजाम कब सोचते हैं…
👉 ज्यांना खरं प्रेम झालं आहे, ते कधीच त्याचा शेवट किंवा परिणाम काय होईल हे विचार करत नाहीत. प्रेम हे सुंदर असतं ही भावना त्यांच्यामध्ये बसलेले असते त्यामुळे मी प्रेम केल्यावर काय होईल याचा ते का बर विचार करतील?


ये ऐसा सुहाना सफ़र है कि जिसमें
हजारों हैं नकाम कब सोचते हैं…
👉 प्रेमाचा प्रवास इतका सुंदर आहे की त्यात किती अडचणी येतात हे प्रेमिक कधी मोजतच नाहीत. या प्रवासात खूप सुंदर आठवणी मिळतात, खूप वेगळा अनुभव मिळतो हा अनुभव इतका सुखद असतो ती त्या अडचणीचा विचार प्रेमिक कधीच करत नाहीत



चराग़-ए-वफ़ा अपने हाथों में लेकर
मोहब्बत की राहों में जो चल पड़े हैं…
👉 ज्यांच्या हृदयात निष्ठेचा दिवा आहे आणि जे प्रेमाच्या मार्गावर निघाले आहेत,ते संकटे वा शेवटाची भीती बाळगत नाहीत. आलेली सगळी संकट त्यांना संधी वाढतात किंवा सोपी वाढतात. प्रेमाच्या या जादुई दिव्याच्या प्रकाशात ते अनेक वादळाला सामोरे जातात,त्यामुळे त्यांना संकटाची भीतीच वाटत नाही.


---

बयाबाँ में होगी कि सहरा में होगी
कहाँ होगी अब शाम कब सोचते हैं…
👉 त्यांच्या प्रेमाचा अंत कुठे होईल – ओसाड वाळवंटात की हिरव्या गालीच्यावर – हे ते कधीच विचार करत नाहीत. त्यांच्या दृष्टीने प्रेम एक सुंदर भावना असते त्या भावनेच्या विश्वात राहून सुखदुःखाची वाट ते सहज चालत राहतात. प्रेमाच्या या धुंद लहरी मध्ये ते चांगल्या वाईटाची पर्वा करत नाहीत.

मोहब्बत के मारों को अब और, ऐ दिल
सताएँगी क्या सख़्तियाँ ज़िंदगी की?
👉 जे आधीच प्रेमाच्या वेदनांनी विद्ध झाले आहेत, त्यांना आयुष्याची इतर अडचणी आणि त्रासाचा काय त्रास होणार? प्रेमात आलेल्या चांगल्या वाईट अनुभवाने ते आता इतके भक्कम झाले आहेत की त्यांना कसलाही त्रास झाला,कसलीही संकट आली तर त्याचं काहीच वाटत नाही.


जिन्हें थक के नींद आ गई पत्थरों पर
वो दुनिया का आराम कब सोचते हैं…
👉 जे थकून दगडांवरही झोपू शकतात, त्यांना जगाच्या सुखसोयींची काय पर्वा ? उन,वारा, वादळ  पाऊस याची त्यांना काही पर्वा नसते. खायला चांगलं अन्न मिळालं किंवा नाही मिळालं,चांगल्या सुविधा नाहीत मिळाल्या याचीही त्यांना पर्वा नसते. निखळ प्रेमाची भावना त्यांना सुखद गारवा देत असते.


ये इंसान क्या है, ख़ुदा के भी आगे
कभी प्यार दुनिया में झुकता नहीं है…
👉 माणूस देवासमोर झुकतो, पण खरे प्रेम कधीही कुणा पुढेही झुकत नाही. प्रेम हेच सर्वोच्च आहे. प्रेम आणि ईश्वर, प्रेम आणि जगाचा निर्माता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देव सुद्धा अनेकदा प्रेमासमोर नतमस्तक झाला आहे, मग जगासमोर हे प्रेमी कसे बरे हार मानतील ? खरं, निखळ प्रेम कधीच धमकी,दबाब,आकर्षण, पैसा ,सत्ता, प्रसिद्धी, बळजबरी किंवा दादागिरी यापुढे झुकलेले नाही, झुकणारही नाही.


---

मोहब्बत ही जिनका ख़ुदा बन चुकी हो
किसी और का नाम कब सोचते हैं…
👉 ज्यांच्यासाठी प्रेमच देव झाले आहे, ते दुसऱ्या कशाचाही विचार करत नाहीत. प्रेमात उत्कंठ बुडालेले आहेत.आता प्रेमालाच भक्ती मानू लागलेले आहेत. भक्ती आणि प्रेमाच्या रसाळ प्रवाहात डुंबून गेले आहेत. प्रेमाशिवाय ते इतर कोणताही  विचार कसा करतील?, प्रेम हेच त्यांच्यासाठी सर्वोच्च आनंद आहे. 


या गाण्यात प्रेमाची ताकद,त्यातील निष्ठा आणि त्याचे वेगळेपण सांगितले आहे. खऱ्या प्रेमिकांना अडचणी, शेवट, जगाच्या सुखसोयी किंवा संकटांची भीती नसते. त्यांच्यासाठी प्रेमंच ईश्वराहून सर्वोच्च असते. एस एच बिहारी यांनी यांनी प्रेमाच्या भावना कुट कुट भरून या गीतामध्ये व्यक्त केलेल्या आहेत. हे गाणं अजरामर आहे.


#सतीश मोरे सतिताभ

०८ ऑगस्ट २०२५

वेल्लूर किल्ला.. भव्य दिव्य पण मराठ्यांच्या इतिहास लपवला जातोय !


वेल्लूर किल्ला.. भव्य दिव्य 
पण मराठ्यांच्या इतिहास लपवला जातोय !

कांचीपुरमचा मुक्काम आटोपून आम्ही सकाळी लवकरच बाहेर पडलो.आज बुधवार आमचं डेस्टिनेशन होतं वेल्लोर. वेल्लोरला जाण्यासाठी खाजगी बस पकडली. वेल्लोर बस स्थानकावर उतरल्यानंतर रिक्षा केली.गेली तीन-चार दिवस आम्हाला चांगले रिक्षावाले मिळाले होते, मात्र वेल्लोर मध्ये रिक्षा चालकांनी आमच्या कडून अर्धा किलोमीटर साठी हटून, गटून दिडशे रुपये घेतले. उन कडक होते. रूमवर जाऊन आराम केला आणि दुपारी चार वाजता वेल्लोर पाहण्यासाठीसाठी बाहेर पडलो.

वेल्लूर पासून जवळच तिरूमलाईकोडी येथे  लक्ष्मी नारायणी मंदिर सुवर्ण मंदिर आहे लक्ष्मी नारायणी  विष्णू नारायणाची पत्नी आहे. हे मंदिर 40 हेक्टर (100 एकर) जमिनीवर स्थित आहे आणि वेल्लोर-आधारित धर्मादाय ट्रस्ट, श्री नारायणी पीडम यांनी बांधले आहे, ज्याचे अध्यक्ष अध्यात्मिक नेते श्री शक्ती अम्मा ज्यांना 'नारायणी अम्मा' म्हणून ओळखले जातं. सोन्याचे आच्छादन असलेले मंदिर, दिड टन सोन्याचा वापर  केले आहे.मंदिर कलेमध्ये तज्ञ कारागिरांनी जटिल काम केले आहे. सोन्याच्या पट्ट्या सोन्याच्या फॉइलमध्ये रूपांतरित करणे आणि नंतर तांब्यावर फॉइल बसवणे यासह प्रत्येक तपशील जपला आहे.हे मंदिर पाहिला दिवसातून सकाळी आणि संध्याकाळी पंधरा मिनिटे मोफत प्रवेश दिला जातो. इतर वेळेला मात्र हे मंदिर पहायचे असेल तर दीडशे रुपये तिकीट आकारले जाते. आम्ही तिकीट घेऊन मंदिर परिसरात गेलो. या ठिकाणी मोबाईल फोन येण्यास परवानगी नाही. मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी आहे. दर्शन बारी फार लांब आहे. या बारी मधूनच आपल्याला मंदिराला गोल वेढा घालून तेथे जावे लागते. सुवर्ण मंदिरातील भव्यता राहून डोळ्याचे पारणे फिटले. दर्शन बारी मध्ये चहापाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे.आम्हाला लगेच दर्शन मिळाले.या मंदिराच्या शेजारीच बालाजी मंदिर आहे, येथे लाडूचा प्रसाद दिला जातो. तामिळनाडूमधील अनेक मंदिरे पाहिली मात्र हे  सुवर्ण मंदिर श्रीमंताचे मंदिर असल्याचे माझी भावना झाली आणि इथे सर्व गोष्टीला पैसे आकारले जात होते.
सुवर्ण मंदिर दर्शन घेऊन आम्ही वेल्लोर किल्ल्याकडे निघालो. वेल्लोर किल्ल्याचा इतिहास काय आहे याबाबत थोडीफार माहिती होती. इतिहास तज्ञ व इंटरनेट वरून मिळालेली माहिती पुढीलप्रमाणे.

वेल्लूर किल्ल्याची मालकी विजयनगरच्या सम्राटांकडून , विजापूरच्या सुलतानांकडे , मराठ्यांकडे , कर्नाटकी नवाबांकडे आणि शेवटी ब्रिटिशांकडे गेली , ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत किल्ला ताब्यात ठेवला . ब्रिटिश राजवटीत, टिपू सुलतानचे कुटुंब आणि श्रीलंकेचे शेवटचे राजा , श्री विक्रम राजसिंहा यांना किल्ल्यात कैदी म्हणून ठेवण्यात आले होते. श्रीरंगारायाच्या विजयनगर राजघराण्याच्या हत्याकांडाचाही तो साक्षीदार आहे . 

1650 च्या दशकात, श्रीरंगाने म्हैसूर आणि तंजोर नायकांशी युती केली आणि गिंगी आणि मदुराईवर हल्ला करण्यासाठी दक्षिणेकडे कूच केले . त्याचा पहिला मुक्काम म्हणजे गिंजीचा किल्ला ताब्यात घेतला, परंतु मदुराईच्या थिरुमलाई नायकाने उत्तरेकडून वेल्लोरवर हल्ला करून श्रीरंगाचे लक्ष वळवण्यासाठी विजापूरच्या सुलतानाला विनंती केली . विजापूरच्या सुलतानाने तातडीने मोठी फौज पाठवून वेल्लोरचा किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर, मदुराई-विजापूरच्या दोन्ही सैन्याने वेल्लोर-तंजोर सैन्याचा पराभव करून गिंजीवर एकत्र आले. युद्धानंतर दोन्ही किल्ले विजापूरच्या सुलतानाच्या ताब्यात गेले. या पराभवाने विजयनगर सम्राटांच्या शेवटच्या थेट पंक्तीचाही अंत झाला. या घटनेनंतर 20 वर्षांच्या आत मराठ्यांनी विजापूर सुलतानांकडून किल्ला ताब्यात घेतला.


1676 मध्ये, थोर मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी तंजोर देशाकडे दक्षिणेकडे कूच केले. त्याच वर्षी, छ शिवाजी महाराजांचा भाऊ एकोजी याने तंजावरचा ताबा घेतला, परंतु त्यांच्या जवळच्या शेजारी मदुराई आणि विजापूर सुलतान यांच्याकडून त्यांना धोका होता , जे अनुक्रमे गिंगी आणि वेल्लोर येथे होते. शिवाजी महाराजांच्या सैन्याने 1677 मध्ये प्रथम जिंजीचा किल्ला ताब्यात घेतला, परंतु वेल्लोरवर हल्ला करण्याचे काम त्यांच्या सहाय्यकाकडे सोपवले आणि मुघल सम्राट औरंगजेबच्या प्रदेशावर हल्ला होत असल्याने ते दख्खनकडे गेले. 1678 मध्ये, प्रदीर्घ चौदा महिन्यांच्या वेढयानंतर, किल्ला मराठ्यांच्या ताब्यात गेला. शिवाजी महाराजांच्या प्रतिनिधीने गडाची तटबंदी मजबूत केली आणि त्या भागावर १६७८-१७०७ या कालावधीत शांततेत राज्य केले. 

मराठा साम्राज्याचा प्रतीक असलेलं वेल्लोर किल्ला पाहण्यासाठी खरंतर खूप उत्सुकता होती. हा किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे. या किल्ल्याचे अतिशय चांगल्या पद्धतीने जतन केले जात आहे. किल्ल्याच्या बाहेर समोरच भव्य गार्डन तयार करण्यात आलेले असून या गार्डनमध्ये सायंकाळी वेळेला फार मोठी गर्दी असते. किल्ल्याच्या तटबंदी  भक्कम आहेत ,तटबंदी समोर मोठा खंदक असून त्यामध्ये पाणी वाहत होतं . किल्ल्यावर टिपू सुलतानचा महाल आहे, भव्य मशिद आहे, भव्य सेंट जॉर्ज चर्च आहे आणि त्याहून डोळे दिपवणारे जलकंठेश्वरर मंदीर आहे. यापैकी जलकंटेश्वर मंदिर त्याच्या भव्य कोरीव कामांसाठी प्रसिद्ध आहे. किल्ल्याची बांधणी काहीशी जलदुर्गासारखी असून त्याच्या सभोवती दुहेरी दगडी चिरेबंदी तट आहे. तटाभोवती खोल व रुंद खंदक आहे. पूर्वेला किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. किल्ल्यात जलकंठेश्वर विजयानगर वास्तुशैलीतील भव्य मंदिर असून त्याच्या मंडपातील तीरशिल्पात देव-देवतांच्या पूर्णाकृती मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस नृत्यमग्न असलेल्या पार्वतीची त्रिभंगातील मूर्ती लक्षवेधक आहे. किल्ल्यात अनेक शासकीय कार्यालये असून येथील खंदकातील पाण्यावर मत्स्यसंशोधन केंद्र चालविले आहे.

जलकंठेश्वरर मंदीर पाहून झालं. पण हुरहूर लागली होती माझ्या शिवरायांचे नाव कुठे आहे काय याची, मराठा साम्राज्य उल्लेख कुठे आहे काय याची ! छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी हा किल्ला जिंकला होता याचा इतिहास मात्र या ठिकाणी कुठेही लेखी स्वरूपात पहायला मिळत नाही. याचं फार वाईट वाटलं. या परिसरात फिरताना अनेक जणांना याबाबत विचारलं मात्र याची माहिती कुणालाही नव्हती. रिक्षा ड्रायव्हरला विचारलं, सिक्युरिटी गार्डन विचारलं, आर्किलॉजिकल सर्वे विभागाच्या काही लोकांना विचारलं. मात्र कोणीही या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्य होतं याची माहिती नसल्यास सांगितले. नाही खूप वाईट वाटलं. अशाच प्रकारे इतिहास लपवण्याचा प्रकार आग्रा येथे केला जातो. तिथंही  छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला पराक्रम तेथील गाईड लोक कोणाला सांगत नाहीत. किमान आग्रा किल्ल्याच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराज यांचा असणारा भव्य पुतळा पाहून उत्साही किंवा उत्सुक पर्यटक विचारतात तरी हा पुतळा कुणाचा आहे. मात्र गाईड फक्त शिवाजी महाराजांचा पुतळा आहे एवढंच सांगतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेब बादशहाच्या हातावर तुरी देऊन आग्रा येथून स्वतःची सुटका केली होती याची माहिती दिली जात नाही. याचा मी स्वतः साक्षीदार आहे. वेल्लूर किल्ल्याचा परिसर भव्य आहे. हा किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात असला तरी किल्ल्याचा सविस्तर इतिहास इथे लिहिल्याचे कुठेही पाहायला मिळाले नाही. हे खाते भारत सरकारचे आहे की तामीळनाडू सरकारचं आहे याबाबत शंका आली..यावर काय करता येईल याचा विचार महाराष्ट्रातील गडप्रेमी, शिवप्रेमी आणि सत्ताधारी राजकारण्यांनी करण्याची गरज आहे.


सहा दिवसाचा दक्षिण भारत अभ्यास दौरा झाला. आता परतीच्या प्रवासाचे वेध लागले होते. रात्री साडेबारा वाजता वेल्लूर कंन्टेटमेंट स्टेशनवरती पोहोचलो आणि आमच्या कराडच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. गुरुवारी रात्री उशिरा पोहचणार आहे. भेटू लवकरच 

उद्या वाचा ..
दक्षिण भारतात आणि भारतीयांत वेगळे काय दिसलं?

*सतीश वसंतराव मोरे सतिताभ* 
9881191302

२९ मे २०२५

जीवनाचं खरं सौंदर्य दुसर्‍याच्या आयुष्यात बदल घडवणंराजकीय संघर्षातून घडलेल्या सत्तरीतील ‘तरुण’ डॉक्टरांनी उलगडले आयुष्यातील आनंदाचे रहस्य


जीवनाचं खरं सौंदर्य दुसर्‍याच्या आयुष्यात बदल घडवणं
राजकीय संघर्षातून घडलेल्या सत्तरीतील ‘तरुण’ डॉक्टरांनी उलगडले आयुष्यातील आनंदाचे रहस्य

संयमी व अभ्यासू नेतृत्व अशी ओळख असणारे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती आदरणीय डॉ. सुरेश भोसले यांचा आज वाढदिवस. सत्तराव्या वर्षीही पंचवीशीतील तरुणाइतका उत्साह असलेले डॉ.सुरेशबाबा हे मितभाषी, संयमी आणि सदाहरित नेतृत्व आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दैनिक ‘पुढारी’चे न्यूज ब्युरो चीफ सतीश मोरे यांच्याशी बोलताना त्यांनी आयुष्याचा प्रवास उलगडला. कृष्णा विद्यापीठ, कृष्णा कारखाना यांच्या निर्मितीपासून मुलगा डॉ.अतुल भोसले आमदार होण्यासाठी केलेले प्रयत्न यावर बोलत असतानाच संषर्घाशिवाय जीवन नाही असे सांगून शेवटच्या क्षणापर्यंत वैद्यकिय सेवेसह समाजकारणात कार्यरत राहणार, असा इरादा त्यांनी बोलून दाखविला....

प्रश्न ..70 वर्षांपासून आपल्या सामाजिक व राजकीय आयुष्यात अनेक चढ-उतार आले, संघर्ष आले याबाबत आपण काय सांगू शकाल....

उत्तर- 70 वर्षांचा प्रवास फार मोठा आहे. हा प्रवास फार संघर्षातून झाला. सर्व राजकारणी, समाजकारणी आणि सर्वसामान्यांना संघर्षातून जावं लागतं. सुरुवातीच्या काळात जो घरातील संघर्ष झाला, तो व्हायला नको होता. मात्र आम्ही त्याच्यातूनही पुढे आलो. एक वेळ अशी येते की, सर्व मागे ठेवावं लागतं आणि पुढे जावं लागतं. आपण त्याच्यापासून बाजूला जावं लागतं. आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायचं आहे त्यापासून आपला फोकस बाजुला करून चालत नाही. राजकीय सत्ता आपल्या हातात आली किंवा नाही याचा आपण कधीच विचार केला नाही. राजकारणामध्ये सुद्धा जेव्हा अतुलने ठरवलं की, आपल्याला राजकारणामध्ये काहीतरी करायचं आहे. दोनदा अपयश आलं. तरी तो खचून गेला नाही. तिसर्‍यांदा तो यशस्वी झाला. भाजपाची विचारधारा स्विकारायला वेळ गेल्याने यश मिळायलाही वेळ गेला. आपल्या येथे राष्ट्रीय काँग्रेसचा प्रवाह आहे, या प्रवाहाविरोधात तो निघालेला होता. आज रोजी भाजपचा प्रवाह लोकांनी स्विकारला आहे. आज त्याला यश मिळाल्यानंतर त्याच्यावर जबाबदारी आलेली आहे. 

प्रश्न ..आज तुम्ही वयाच्या 70 व्या वर्षात पदार्पण करीत आहात, मात्र तुम्ही पन्नाशीतील तरुणासारखे उत्साही दिसता. प्रत्येक गोष्ट संयमाने हाताळता. तुमच्या या तारुण्याचे रहस्य काय.....
उत्तर ...रहस्य वगैरे काही नाही. हा स्वभावाचा भाग आहे. आपल्या आयुष्यात समज-गैरसमज होतात ते शब्दाने. आपल्याला एखादी गोष्ट पटली नाही तर ती कशी मांडायची आणि कशी मांडायची नाही, हे शब्दच ठरवतात. कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत. कोणाचा अपमान होणार नाही किंवा कोणाला कमीपणा येईल असे वागायचे नाही. विरोधक असे तरीही करायचं नाही. जो-तो त्याच्या मार्गाने चालत असतो आपण आपल्या मार्गाने चालायचे असते. असं केलं तरच राजकारणात बदल होत असतो. निवडणुकीच्या काळात मला भेटायला येणारे इतरांच्या तक्रारी करतात. तो तुमचा कार्यकर्ता तुमच्याविषयी विरोधात बोलतो. तुम्हाला शिव्या देतो, तुम्ही हे कसे सहन करता? यावर मी म्हणतो, तो जर इतका आपल्याला शिव्या देत असेल तर प्रेम सुद्धा तितकंच करत असेल. हा एटीट्यूडचा प्रश्न आहे. तुम्हाला मी तरुण वाटतोय याचं आणखी एक कारण म्हणजे लाइफस्टाइल आहे. मी सर्वांना नेहमीच सांगतो, या जगामध्ये तुमचं काही नाही. प्रॉपर्टी आहे पण तुम्हाला ती सोडून जावी लागणार आहे. घर, मित्र-मंडळी, आई-वडील हे ही तुमचे नाहीत. कारण जाताना तुम्हाला ते ही सोडून जावं लागणार आहे. देवाने तुम्हाला अशी एकच गोष्ट दिलेली आहे ते म्हणजे तुमचे शरीर. त्यामुळे खर्‍या अर्थाने शरीराची काळजी करणं, हे तुमचं कर्तव्य आहे. ही जबाबदारी तुमची आहे. शरीर चांगलं ठेवण्यासाठी कोणी तुम्हाला मदत करू शकत नाही. ही जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागेल. मी माझ्या शरीराची काळजी घेतो. म्हणून मी सद़ृढ आहे. दुसरा विषय काही गोष्टी जेनेटेकली येतात. आप्पांच्याकडून मला ते मिळालेले वरदान आहे. 

प्रश्न...तुम्ही एवढ्या मोठ्या गर्भश्रीमंत कुटुंबात जन्माला आला आहात, मात्र तरीही तुमच्याकडील संयम, नम्रता, मितभाषीपणा हे गुण आहेत. हे तुम्ही कसे शक्य करु शकता..........
उत्तर- आप्पा नेहमी म्हणायचे, तुम्ही किती श्रीमंत आहात हे पैशाने कधीच ठरत नाही. तुम्ही दुसर्‍यासाठी काय केलं हीच खरी श्रीमंती आहे. तुमच्याकडे असलेल्या पैशांचा लोकांसाठी योग्य उपयोग करत नसाल तर त्या पैशाला काय अर्थ नाही. आम्हाला सत्ता आली किंवा गेली, याचं कधीच अप्रूप वाटत नाही. चेअरमन असलो किंवा नाही याचं काहीच वाटत नाही. लोकांनी आपल्याला जी जबाबदारी दिलेली आहे ती पार पाडायची, हे मी माझं कर्तव्य समजतो. लोकांनी भेटावं, नमस्कार करावा असं मला कधीच वाटंत नाही. आपल्याला सर्वसामान्यांसाठी काम करायचं आहे. मला स्तुतीपाठक लोक अजिबात आवडत नाहीत. चापलुसी करणारे लोक मी कधीच जवळ करीत नाही. माझ्याजवळ असे लोक तुम्हाला कधीही दिसणार नाहीत. जवळीक सुद्धा कुणाशी किती करायची हे पण तुम्ही ठरवलं पाहिजे. आपल्याला सगळे सारखे धरले पाहिजेत. जवळच्या लोकांना सुद्धा आपण त्यांच्या कामावरुन तोललं पाहिजे. आमच्या संस्थेमध्ये चांगला अधिकारी असेल तर त्याला योग्य न्याय मिळतो, मात्र वाईट असेल तर कसलाही विचार न करता दुसर्‍या दिवशी त्याला कमी करायला मला काहीच वाटत नाही. कारण मी कशामध्येही आणि कुणामध्येही गुंतलेलो नाही. कारखान्यातील संचालकांनाही मी नेहमी सांगतो, ही खुर्ची सांभाळण्यासाठी, टिकवण्यासाठी मी काहीही चुकीचे करणार नाही. मला इथे या पदावर राहायलाच पाहिजे असं काही नाही. माझ्या या स्वभावाचा संचालकावरही चांगला परिणाम होतो. 

प्रश्न ..तुमचे राजकीय गुरू कोण? तुमचे सर्व पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत..?
उत्तर- माझे कोणीही राजकीय गुरु नाहीत मात्र सर्व पक्षातील राज्यकत्यांशी माझे चांगले संबंध राहिले आहेत. स्व.विलासराव पाटील-उंडाळकर (काका) तसे फटकळ होते. मात्र माझ्याशी त्यांचे संबंध अतिशय चांगले होते. माझा त्यांच्याशी संवाद होत होता. शेवटच्या क्षणी रुग्णालयात असताना मी त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा तिथे असलेल्या सर्वांना त्यांनी बाहेर काढून माझ्याशी संवाद साधला. राजकारण कसं चालतं..., राजकारणात कसं वागलं पाहिजे..., या विषयावर त्यांनी मला मोलाचा सल्ला दिला. जे त्यांना त्यांच्या मुलाशी बोलायला पाहिजे होतं ते माझ्याशी बोलले. वाळवा तालुक्यातील जयंतराव पाटील यांच्याशीही माझे सलोख्याचे संबंध आहेत. इथं बाळासाहेब पाटील यांच्याशी जयवंत शुगर आणि विधानसभा निवडणुकीमुळे संबंध ताणले होते. मात्र झालेल्या चुका मान्य करुन आम्ही पुढे गेलो. आज आम्ही एकत्र काम करीत आहोत. 

प्रश्न ..कृष्णा विद्यापीठ आणि कृष्णा कारखान्याची एवढी मोठी जबाबदारी स्वीकारताना भविष्यातील बदलांकडे तुम्ही कोणत्या नजरेने पाहता... 
उत्तर ...जगभरात काय चालले आहे, त्याचा अभ्यास आम्ही सातत्याने करत असतो. सर्व व्यवसाय इंडस्ट्रीमध्ये फास्ट चेंजेस होत आहेत. त्यामुळे अडपटेशन तुम्हाला सातत्याने करावे लागतील. कारखान्याबाबत मी नेहमी म्हणतो, आजची जी कारखान्यात टेक्नॉलॉजी आहे. ती पुढच्या काळात चालणार नाही. त्यामुळे तुम्हाला नव्या बदलांसाठी सतत दक्ष राहावे लागेल, अभ्यास करावा लागेल. आरोग्यसेवेत सध्या काय नवीन ट्रेंड आहे, हे पहावे लागते. वैद्यकीय सेवेमध्ये डिसिजन मेकिंग अत्यंत महत्वाचा असतो. पेशंटला ट्रीट करताना योग्य डिसिजन घ्यावा लागतो, आणि तो डिसीजन विथ रिझन हवा. भविष्यात कुठे पोटेन्शिअल आहे याचा आम्ही विचार करतो. आम्ही मोठे निर्णय घेतो. मात्र त्याची अंमलबजावनी टप्प्याटप्प्याने करतो. मध्यंतरी कृष्णा कारखाना वीस वर्षे आमच्याकडे नव्हता. मात्र अन्य सर्व संस्था स्थिर आहेत, प्रगतीपथावर आहेत. एग्रीकल्चर कॉलेज असो किंवा मेडिकल कॉलेज यांच्या ब्रांचेस असो. फार्मसी कॉलेज असो नर्सिंगसह सर्व कॉलेजेस राज्यामध्ये नावाजलेले आहेत. आमच्या सर्व संस्थांचा पुढील पाच वर्षाचा प्लॅन तयार आहे. कारखाना आणि विद्यापीठात आजचे चॅलेंजेस आणि भविष्यात उद्भवणारे चॅलेंजेस याचा विचार करून आमचे प्लॅन तयार आहेत. जे आपल्याला चॅलेंज वाटते, आणि ज्याची आपल्याला भीती वाटते, त्याचं रूपांतर तुम्ही संधीमध्ये केलं पाहिजे. 

प्रश्न ..आपल्या वाढदिवसानिमित्त सभासद, शेतकरी आणि कराड तालुक्यातील जनतेला काय सांगाल.....
उत्तर ...आपला शेतकरी समाज शेतीवर अवलंबून आहे. गेल्या 50 वर्षांमध्ये इतके बदल झाले आहेत. हे सर्व शेतकरी अल्पभूधारक झालेले आहेत. शेतकर्‍यांचे राहणीमान सुधारलं असलं तरी फक्त शेतीवर त्यांचं चालणार नाही. शेतकर्‍यांच्या घरातील मुले शिकली पाहिजेत. नोकरी किंवा व्यवसायाचा मार्ग त्यांनी स्विकारला पाहिजे. भविष्यात सामुदायिक शेतीची कन्सेप्ट राबवावी लागणार आहे. कराड दक्षिणमध्ये कृष्णा साखर कारखान्याशिवाय एकही मोठी इंडस्ट्री नाही, म्हणून मी अतुलला सुद्धा भविष्यात या मतदारसंघात नव्या इंडस्ट्रीज आणाव्या लागतील, याबाबत सुचविले आहे. कृष्णा कारखान्याच्या संघर्षामध्ये जयवंत शुगर उभा राहिला. संघर्षच झाला नसता तर कृष्णेचे चार कारखाने झाले असते. ‘कृष्णा’ कारखान्याबाबत भविष्यात काही योजना आहेत, याबाबत आता सांगणे योग्य नाही. 

प्रश्न ...तुमच्या आयुष्यातील सर्वात सुखद अशी घटना कोणती..? अतुल आता आमदार झाला आहे. त्याविषयी काय सांगाल..?
उत्तर...मुले सेटल झाली. राजकारणात हे करिअर अतुलने स्वीकारलं. संषर्घातून तो आमदार झाला. हा एक आनंदाचा क्षण होता. अतुलकडे पोटेन्शिअल आहे म्हणून ते होऊ शकलं. याशिवाय छोटे-छोटे आनंदाचे प्रसंग माझ्या आयुष्यात रोज घडतात. एखादा कॅन्सरचा पेशंट बरा होऊन घरी जातो तेव्हा त्याच्या चेहर्‍यावर जो आनंद असतो, तो आनंद पाहण्यात वेगळा आनंद असतो. या विभागात काम करणारांना तुम्ही भाग्यवान आहात, असे मी म्हणतो. एवढ्या वेगवेगळ्या कामांत बिझी असूनही रोज सकाळी मी ऑपरेशन थिएटरमध्ये जातो. कारण यामध्येच आनंद आहे. आज स्त्रियांमध्ये कॅन्सरचे प्रमाण फार मोठे आहे. कॅन्सरची ट्रीटमेंट करणं फार गरजेचे आहे हा विचार करूनच कृष्णा रूग्णालयाचे कोबाल्ट युनिटमध्ये सुरू आहे. कॅन्सरबाबत जनजागृती करण्याचे आमचे प्रयत्न असतात. कोबाल्ट युनिटमधून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही 30 हजारांहून अधिक रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत. अतुलसुद्धा माझ्यासारखा थोडा संयमी व्हायला लागला आहे. 2006 सालापासून अतुलने सक्रिय राजकारण सुरु केले. तेव्हापासून त्याच्यामध्ये अनेक बदल झाले आहेत. प्रयत्नांती परमेश्वर हे या उक्तीप्रमाणे प्रयत्न करून अतुलने आमदारकी खेचून आणली आहे. त्यांने केलेल्या कामामुळे पक्षानेही अतुलला चांगला न्याय दिला आहे. भविष्यात तो अजून चांगले काम करेल. शिवाजी स्टेडियमसाठी 100 कोटी रुपये आणले आहेत. आपल्या जाण्यानंतर आपल्या पाऊलखुणा मागे राहिल्या पाहिजेत असं काम व्हायला पाहिजे. आरोग्य सेवा, आरोग्य विद्यापीठ हे नाव कायमस्वरूपी राहणार आहे. यशवंतराव चव्हाण यांनी राबविलेल्या योजनांमुळे आपण आजही त्यांचे नाव घेतो. कृष्णा रुग्णालय उभं राहण्यामध्ये चव्हाण साहेबांबरोबरच वसंतदादा पाटील यांचे फार मोठे योगदान आहे. 

प्रश्न ..जयवंतराव आप्पा यांनी मला एक गोष्ट सांगितली होती, मला चांगले लोक मिळाले म्हणून मी एवढे मोठे काम करू शकलो. हे खरं आहे का...........
उत्तर... हो, हे बरोबर आहे. हे टीमवर्क आहे. इतक्या विविध अडचणी असतात, कुठलेही काम करताना लोक तुमच्यासोबत असतील तर तुम्ही काहीही करू शकता. फक्त लोकांची साथ पाहिजे. एखादी वस्तू विकायची म्हणलं तरी सुद्धा लोकांची गरज लागतेच. लोकं बरोबर नसतील तर आपण काही करू शकलो नसतो. संस्थेत किती इक्विपमेंट आहेत..... किती इमारती आहे...... याच्यावर त्या संस्थेचे मूल्यमापन होत नाही. तर संस्थेत काम करणारी माणसं किती मोठी आहेत, त्यावर त्या संस्थेची किंमत ठरते. आज आमच्या दवाखान्यात जेवढा आमच्या वॉर्ड बॉयला किंमत दिली जाते सन्मान दिला जातो, तेवढाच सन्मान मोठ्या पदावरील डॉक्टरांना दिला जातो. अजून दुसरा कॅम्पस आम्ही निर्माण करत आहोत. काम अजून वाढवायचे आहे, जोपर्यंत शरीर साथ देतंय तोपर्यंत काम करीतच राहणार आहे. राजकारणातून निवृत्तीचा एक भाग असतो. मुळातच रिटायरमेंटचा कन्सेप्ट वेगळा असतो. मनापासून रिटायर होणे एक आणि कामापासून वेगळं होणं असे रिटायरमेंटचे प्रकार आहेत. आयुष्यभर जे काम केलं आहे, त्याच्यापासून आपण बाजूला राहू शकत नाही.


२१ मे २०२५

प्रतिभाशाली युवा लेखक यशराज देसाई


प्रतिभाशाली युवा लेखक.....यशराज देसाई 

राजकारणी लोकांच्या घरी राजकारणी, डॉक्टरांच्या घरी डॉक्टर, शिक्षकाच्या घरी शिक्षक,आयपीएस अधिकाऱ्यांच्या घरी आयपीएस किंवा सैनिकांच्या घरी सैनिक जन्माला येतो,अशी अनेक उदाहरणे आपण पाहिली असतील. पण राजकारणी लोकांच्या घरी एक लेखक जन्माला येतो आणि तो अवघ्या वयाच्या 27 व्या वर्षी तत्त्वज्ञान विषयक हे पुस्तक लिहितो असे उदाहरण क्वचितच पाहायला मिळते. 

होय, असा एक तरुण आहे आपल्या पाटण तालुक्यात. विनम्र आणि तितकाच डॅशिंग आणि उंचपुरा अशा युवा लेखकाला भेटण्याचा योग नुकताच मला आला. खरंतर  या पुस्तकाचे प्रकाशन दोन वर्षांपूर्वीच झालं आहे पण त्यानंतरच्या कालावधीत त्यांना भेटण्यासाठी मला वाट पहावी लागली. परवा वेळ घेऊन त्यांना भेटायला गेलो. दुपारी बारा वाजताची वेळ ठरलेली होती. साडे अकरा वाजताच त्यांच्या कार्यालयातून मला फोन आला 'कुठे पोहोचला आहात' त्यावेळी मी विहे घाटात होतो. पुढच्या पंधरा-वीस मिनिटात मी माझे मित्र धवल जाधव यांच्या समवेत त्यांच्या कार्यालयात अर्थात लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यावर मरळी येथे पोहोचलो. 

मी मगापासून बोलतोय तो युवा लेखक दुसरे कोणी नसून लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई आहेत. त्यांचे वडील सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री आहेत. 'लिविंग द ग्रेटर लाइफ' या इंग्रजी पुस्तकाचे लेखक यशराज शंभुराज देसाई... राजकारण्यांच्या घरात जन्माला आलेला एक प्रतिभाशाली लेखक. 27 व्या वर्षी तत्त्वज्ञान विषयक पुस्तक लिहीणं हे काय वय नाही. मात्र लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा वारसा, लहानपणापासून आई-वडिलांचे संस्कार आणि तितक्याच कडक शिस्तीत  वाढलेल्या आणि शिक्षणालाच महत्त्व देणाऱ्या देसाई कुटुंबाने महाविद्यालयाने शिक्षण पूर्ण होईपर्यंत यशराज देसाई यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सांगितले, राजकारणापासून त्यांना थोडं लांब ठेवले होते. यशराज देसाई यांनी सातारा येथील मोना स्कूल येथे शालेय शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT), पुणे येथून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. 

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांच्या मनात काही विचार घोळत होते, सकारात्मक विचारातून आयुष्यात कसं पुढे जायचं ? आयुष्यात काय केले पाहिजे, कसे राहिले पाहिजे लाइफ म्हणजे काय आहे यावर त्यांनी केलेल्या सखोल चिंतनातून जगण्याची प्रेरणा कागदावर उतरवली.   Living The Greater Life: It is what you and I do हे इंग्रजी पुस्तक जन्माला आलं. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झालं. 

"Living the Greater Life" हे पुस्तक आपल्या जीवनातील न बोलल्या जाणाऱ्या सत्यावर भाष्य करतं. प्रौढ वयात आपण स्वतःपेक्षा मोठ्या जबाबदाऱ्या घेतो – समाज, संस्था, आणि इतरांच्या भल्यासाठी. यामुळे आपल्याला नेहमीच "आपण काय करायला हवं आहे" यानुसार जगावं लागतं, जे "आपण कोण आहोत" यापेक्षा वेगळं असतं. डिजिटल जग, विशेषतः सोशल मीडिया, आपल्याला सतत प्रभावित करतं. या प्रभावामुळे आपले विचार, निर्णय, आणि जीवनशैलीही बदलते – जे कधी कधी आपल्याला खऱ्या आयुष्यातून दूर नेतं.

हे उच्च जीवन जगताना आपल्याला अनेकदा दोन व्यक्तिमत्त्वे बाळगावी लागतात – एक बाह्य जगासाठी आणि दुसरं आपल्यासाठी. याचा मानसिक ताण, गमावलेले क्षण आणि पश्चात्ताप यांचं ओझं वाटू लागतं. शेवटी एक प्रश्न सतत मनात राहतो. ही मोठी ('Greater') जीवनशैली खरंच जगण्यासारखी आहे का? आणि जर आपण ती जगलो नाही, तर काय? 

यावर यशराज देसाई यांनी यावर आपल्या साध्या आणि सोप्या लेखणीतून  पुस्तकातून प्रकाश टाकला आहे, आपली मतं व्यक्त केली आहेत, उपाययोजना सुचवल्या आहेत.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू असणारे यशराज देसाई सध्या राजकारणात ऍक्टिव्ह आहेत. सध्या ते लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून काम पाहत आहेत. फलटण येथील निंबाळकर घराण्यातील उच्चशिक्षित युवती सोबत त्याचा नुकताच विवाह झाला आहे. इंग्रजी पुस्तकाचे लेखक म्हणून त्यांनी साहित्य क्षेत्रात पाऊल ठेवले आहे  आणि याच एका कारणामुळे यशराज देसाई यांना भेटावे अशी माझी इच्छा होती. या भेटीत आम्ही दोघांनी त्यांचं पुस्तक आणि साहित्य याशिवाय  कोणतीही चर्चा केली नाही. पुस्तक निर्मितीचा प्रवास मांडताना महाविद्यालयीन जीवनातील काही आठवणी सांगितल्या. 

यशराज देसाई यांना भेटल्यानंतर  एका युवा साहित्यकाला भेटून आनंद झाला. भविष्यात त्यांनी उद्योग क्षेत्रातील करिअर आणि आव्हाने यावर लिखाण करावे. वडील शंभूराज देसाई यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी कमी वयात साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. साखर कारखान्यातील बदलती परिस्थिती,भविष्यात कारखान्यासमोरील आव्हाने आणि उपाय यावर त्यांचा हळूहळू अभ्यास होईल आणि या अभ्यासातून त्यांनी उद्योजकांना मार्गदर्शक पुस्तकाचे लेखन करावे अशा मी त्यांना शुभेच्छा दिल्या. लेखक यशराज देसाई यांना भेटून वेगळी प्रेरणा मिळाली.

...सतीश मोरे सतिताभ
9881191302

१९ मार्च २०२५

miss you धनंजय


धनंजय शिवाय फिकी पिकी रंगपंचमी...😓


आजची रंगपंचमी आपल्याला गेल्या वर्षी खेळलेल्या रंगपंचमीची आठवण करून देत आहे.गेल्या वर्षी आपण अमिताभ बच्चन प्रेमींनी एकत्र येऊन पाॅकेट कॅफे मध्ये एक छोटासा कार्यक्रम 'रंग बरसे' आयोजित केला होता. रंगपंचमीची गाणी म्हणत, ऐकत सर्व जण रंगात न्हाऊन गेलो. आपण खूप आनंद लुटला होता. कमी वेळात जास्त मजा आली होती. कार्यक्रम संपल्यावर ना धनंजय राजमाने यांनी आणलेला गॉगल घालून आपण सर्वांनी फोटो काढले होते, आठवतय का? या कार्यक्रमाची गावभर चर्चा झाली होती. याही वर्षी असाच कार्यक्रम करण्याचं नियोजन केले होते. याही वर्षी रंगपंचमी कार्यक्रम व्हावा म्हणून सर्वात जास्त आग्रह होता तो धनंजय राजमाने यांचा.

धनंजय आपल्यातील अतिशय गौरवशाली कलाकार, गायक आणि सच्चा अमिताभ बच्चन प्रेमी. त्यांनी हा कार्यक्रम गेल्या वर्षी प्रमाणे होण्यासाठी मला खूप वेळा फोन केला होता. आपण हा कार्यक्रम घ्यायचं ठरवलं पण होतं. संभाजी शेवाळे दाजी यांनासुद्धा त्यांनी फोन केला होता. शेवटी धनंजय यांच्या आग्रहाखातर या कार्यक्रम घेण्यासाठी मी पॉकेट कॅफेचे धनंजय माने यांना फोन करून कल्पना दिली होती.

सकाळची वेळ ठरली होती. धनंजय राजमाने कराओके सेट घेऊन येणार होते. पण नियतीच्या मनात वेगळेच होतं. आज धनंजय माने आपल्यात नाहीत. त्यांच्याशिवाय यावर्षी रंगपंचमी सुनीसुनी, फिकी पिकी आहे. धनंजय यांच्याशिवाय यावर्षी कसा बर रंग लावावा वाटेल ?

गेल्या वर्षी रंग बरसे कार्यक्रमात आपल्यातील एक बच्चन प्रेमी दिवंगत राहुल खोचीकर यांच्या स्मरणार्थ एबीपी संजय शिंदे मेहेरबान यांनी शोले चित्रपटातील गाणे म्हटले होते 'ये दोस्ती हम नही छोडेंगे' 
अतिशय भावूक वातावरणात हे गाणं त्यांनी सादर केलं होतं. ते ऐकताना राहुलची खूप आठवण आली होती. आज पुन्हा हे गाणे ऐकताना धनंजय राजमाने यांची खुप आठवण येते.

धनंजय, धनूशेठ, धनुदादा..
धनंजय बच्चन....

तू आम्हाला सोडून जायला नाही पाहिजे होतं... तू आम्हाला अजून हवा होतास.. तुझी खूप गाणी आम्हाला ऐकायची होती.. तुझ्यासोबत आम्हाला खूप फिरायचं होतं.. तुझ्यासोबत आम्हाला कराओके गाण्याचा कार्यक्रम घ्यायचा होता... तुझ्यासोबत आम्हाला परदेश दौरा करायचा होता... तुझ्यासोबत आम्हाला अमिताभ बच्चन यांचे अनेक कार्यक्रम घ्यायचे होते... तुला घेऊन पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांना भेटायला जायचं होतं... तुझ्यासोबत आम्हाला आयुष्यातील अनेक रंग उधळायचे होते... !

पण आज तू आमच्यासोबत नाहीस.. तू आम्हाला धोका दिलास... तू असं का केलंस...? नियतीच्या मनात जरी वेगळं असलं तरी नियती एवढी निष्ठूर कशी होऊ शकते ? धनंजय तुझ्या सारखा सच्चा अमिताभ बच्चन प्रेमी, सच्चा मनमिळावू आणि निष्पाप मित्र आपल्यातून जाणं ही माझी फार मोठी हानी आहे. खूप वाईट वाटतंय.. धनंजय राजमाने तुमच्या मुळे ओगलेवाडी मध्ये थांबायला एक जागा होती, स्पेस होता. आता ओगलेवाडी मध्ये आम्ही कुणासाठी थांबू ???. 

धनंजय, अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपच्या प्रत्येक कार्यक्रमात तू तुझं वेगळंपण टिकवलं होतंस. एकदा नमक हलाल चित्रपट लावलेला होता तेव्हा तू 'शहेनशहा' मधील अमिताभ बच्चन यांचा गेटअप करून आलेला होता. परवा 11 ऑक्टोबरला कालिया चित्रपट आपण प्रभात मध्ये लावलेला होता. कालिया चित्रपटातील कैदी नंबर 602 मेकअप करून तू आला होतास. तुला घेऊन हथकडी घातलेली पोज घेऊन आपण प्रभात मध्ये फोटो काढले होते.बच्चन प्रेमी ग्रुपच्या प्रत्येक कार्यक्रमात तू काही तरी वेगळे करायचा. ग्रुप मधील सर्वांना तू तुझ्या घरी गाणे ऐकायला बोलावलं होतं, ग्रुप मधील सर्वांना तुझ्या मुलाच्या लग्नाच्या वेळी बोलावलं होतं. ग्रुप मधील सर्वांनी तुझ्या घरी यावं, तुझं गाणं ऐकावं, त्यांनी एखादं गाणं सादर करावे अशी तुझी खूप इच्छा असायची. बच्चन प्रेमी मित्रांना तू अनेकदा लग्नाची, वाढदिवसाची पार्टी दिली होतीस. तु सर्वांना जपलं होतं, सगळे जण तुझ्या गाण्यावर, बच्चन वेडे पणावर प्रेम करत होते. तुझ्यासारखा सच्चा मित्र आणि दिलदार खरच मिळणार नाही. तेरे जैसा यार कहा...कहा ऐसा याराना !


!

मिस यु धनंजय....!


 *_सतीश मोरे सतिताभ आणि* 
*अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप सर्व सदस्य_* 

 _सोबत... संजय शिंदे यांनी सादर केलेलं गीत_

२६ फेब्रुवारी २०२५

खेळ मांडला


*चाकावर खेळ मांडला..* 
*व्यवस्थेचा...शिक्षणाचा आणि परिस्थितीचा...!*

सायंकाळी चारची वेळ असेल.. माझं काम आटोपून शेतात पाच मिनिटं जाऊन यावं म्हणून करवडीला गेलो होतो. शेतात जाऊन आलो, बाहेर रस्त्यावर उभा राहिलो. शेतासमोरच मोकळ्या जागेवर एका साखर कारखान्याची टोळी (फड) होती. या फडामध्ये झोपड्या (खोपा) मांडल्या होत्या. अर्थातच टोळीतील तोडकरी कुटुंब शेतात ऊस तोडायला गेले होते. 

या कष्टकरी कुटुंबाचा दिनक्रम आपल्यासारख्या पोट सुटलेल्या लोकांसारखा नसतो.  लेकरांवर त्यांचं फार प्रेम असतं. पण पोटाची खळगी भरण्यासाठी पहाटे चार पासून ही कुटुंब कामावर जातात. कामावर जाताना सारा स्वयंपाक करून ठेवला जातो. लहानग्या पोरा बाळांना कामावर नेता येतं किंवा कधी कधी नेता येत नाही. ती पोरं भगवान भरोसे त्या झोपड्यामध्ये सोडून ही कुटुंबं ऊस तोडायला जातात. मग या चिमुकल्या पोरांची जबाबदारी पडते त्यातल्या त्यात आठ दहा वर्षाच्या मोठ्या मुलांवर.  

अशीच अकाली पालकत्व आलेली दोन मुलं आणि एक मुलगी या फडावर होती. या तीन मुलांच्याकडे एकच काम होतं त्या झोपड्यांमध्ये असलेल्या छोट्या छोट्या मुलांची काळजी घ्यायची, त्यांना खाऊ घालायचं, त्यांना आधार द्यायचा, त्यांना खेळवायचं. हे काम त्यांनी चोख पार पाडलं होतं. खोपीमध्ये जे काय आहे ते खाऊन ही पोरं आता एक झोप काढून बाहेर पडली होती. सूर्याची प्रखर किरणे हळू कमी होऊ लागली होती आणि याच कालावधीत ही छोटी मुले झोपडी बाहेर आली. आणि  त्यांनी एक खेळ मांडला.

 शहरांमध्ये आपण व्हील चक्र, जायंट व्हिल किंवा मोठा झोपाळा पाहिला असेल. पण या शेतमजुरांच्या मुलांना कुठून मिळणार असला  झोपाळा ? एवढे पैसे कुठे आहेत त्यांच्याकडे? त्यांना जत्रेत जायला मिळेल? ? मुलांना घेऊन जत्रेला जावं ,त्यांना गोड गोड खाऊ घालावं, त्यांना जत्रेत फिरवावं? चिरमुरे द्यावेत? एवढा वेळ कुठे आहे त्यांच्या पालकांकडे ? मुलांना खाऊ घालण्यासाठी काम केले पाहिजे, कष्ट केले पाहिजे या एकाच उद्देशाने त्यांचे पालक शेतात ऊस तोडणी करत होते. 

तिथे एक बैलगाडी उभी होती. तर दुसरीकडे बंद पडलेली एक बैलगाडी होती. या बैलगाडीचे चाक काढलेले होते. बैलगाडीचे चाक एका उंचीवर मांडून यांच्या आई-वडिलांनी तिथे एक चक्र तयार केलेले होते. या चक्रावर बसून मग या मुलांनी खेळ मांडला. तिथे चार पाच छोटी छोटी मुलं होती . त्यांच्या अंगावर साधे कपडेही नव्हते. ही मुलं या चकरावर बसली. त्यांच्यातला एक थोरला मुलगा ते चक्र गोल गोल फिरवत होता. दुसरी एक मुलगी त्या छोट्या छोट्या मुलांना त्या चक्रावर बसवत होती आणि मग खेळ सुरू झाला..

काय आनंद होता या गोष्टींमध्ये काय सांगू...! ‌ किती निष्पाप मुलं होती ती.. इवलीसी...आहे त्या गोष्टींमध्ये आनंद मानत तो आनंद लुटण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. गोल गोल चक्र फिरल्यानंतर एक छोटीशी मुलगी खाली पडली. तिला उचलून एका मुलाने उभे केले. पुन्हा खेळ सुरू झाला. ती मुलं ओरडत होती, कोणी रडत होती, कोणी हसत  होती,आनंद लुटत होती आणि मी शांतपणे ते पाहत होतो.

लहानपणी असा खेळ आम्ही पण केलेला होता. पण तोडकरी कुटुंबातील मुलांचा हे खेळ पाहून मन हेलावलं. यातील एका दोघा मुलांना विचारलं तुम्ही शाळेत जाता का ? दोघांनी एका सुरात एकच उत्तर दिले.. 'आम्हाला शाळा काय माहित नाही .. शाळेत आम्ही कधी गेलोच नाही. '... ऊस तोडणी कामगारांची मुले जर शाळेत जात नसतील तर त्यांना भविष्य कसे चांगले असणार...? त्यांनी पण आपल्या आई-वडिलांच्या मागे  फक्त ऊस तोडत बसायचे काय ?

सोबतचा हा व्हिडिओ पाहताना जेवढा आनंद होत होता, तेवढेच ही मुलं शाळेत जात नाहीत  हे ऐकल्यानंतर डोळ्यातून पाणी येत होते...! काय करू शकतो आपण या मुलांसाठी ...?  बाजूला आलो आणि लेखणीच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली...!तुम्हाला भेटायला दोन दिवसानंतर पुन्हा येतो... असं वचन देऊन तिथून निघालो....!

आपण काय करू शकतो का या मुलांसाठी ? ज्यांच्या अंगावर कपडेही नाहीत... ज्यांना शिक्षण काय माहित नाही... ज्यांना पुस्तकं वह्या काय असतं याची माहितीही नाही...!

*सतीश वसंतराव मोरे सतिताभ*
9881191302

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...