फॉलोअर

१९ मार्च २०२५

miss you धनंजय


धनंजय शिवाय फिकी पिकी रंगपंचमी...😓


आजची रंगपंचमी आपल्याला गेल्या वर्षी खेळलेल्या रंगपंचमीची आठवण करून देत आहे.गेल्या वर्षी आपण अमिताभ बच्चन प्रेमींनी एकत्र येऊन पाॅकेट कॅफे मध्ये एक छोटासा कार्यक्रम 'रंग बरसे' आयोजित केला होता. रंगपंचमीची गाणी म्हणत, ऐकत सर्व जण रंगात न्हाऊन गेलो. आपण खूप आनंद लुटला होता. कमी वेळात जास्त मजा आली होती. कार्यक्रम संपल्यावर ना धनंजय राजमाने यांनी आणलेला गॉगल घालून आपण सर्वांनी फोटो काढले होते, आठवतय का? या कार्यक्रमाची गावभर चर्चा झाली होती. याही वर्षी असाच कार्यक्रम करण्याचं नियोजन केले होते. याही वर्षी रंगपंचमी कार्यक्रम व्हावा म्हणून सर्वात जास्त आग्रह होता तो धनंजय राजमाने यांचा.

धनंजय आपल्यातील अतिशय गौरवशाली कलाकार, गायक आणि सच्चा अमिताभ बच्चन प्रेमी. त्यांनी हा कार्यक्रम गेल्या वर्षी प्रमाणे होण्यासाठी मला खूप वेळा फोन केला होता. आपण हा कार्यक्रम घ्यायचं ठरवलं पण होतं. संभाजी शेवाळे दाजी यांनासुद्धा त्यांनी फोन केला होता. शेवटी धनंजय यांच्या आग्रहाखातर या कार्यक्रम घेण्यासाठी मी पॉकेट कॅफेचे धनंजय माने यांना फोन करून कल्पना दिली होती.

सकाळची वेळ ठरली होती. धनंजय राजमाने कराओके सेट घेऊन येणार होते. पण नियतीच्या मनात वेगळेच होतं. आज धनंजय माने आपल्यात नाहीत. त्यांच्याशिवाय यावर्षी रंगपंचमी सुनीसुनी, फिकी पिकी आहे. धनंजय यांच्याशिवाय यावर्षी कसा बर रंग लावावा वाटेल ?

गेल्या वर्षी रंग बरसे कार्यक्रमात आपल्यातील एक बच्चन प्रेमी दिवंगत राहुल खोचीकर यांच्या स्मरणार्थ एबीपी संजय शिंदे मेहेरबान यांनी शोले चित्रपटातील गाणे म्हटले होते 'ये दोस्ती हम नही छोडेंगे' 
अतिशय भावूक वातावरणात हे गाणं त्यांनी सादर केलं होतं. ते ऐकताना राहुलची खूप आठवण आली होती. आज पुन्हा हे गाणे ऐकताना धनंजय राजमाने यांची खुप आठवण येते.

धनंजय, धनूशेठ, धनुदादा..
धनंजय बच्चन....

तू आम्हाला सोडून जायला नाही पाहिजे होतं... तू आम्हाला अजून हवा होतास.. तुझी खूप गाणी आम्हाला ऐकायची होती.. तुझ्यासोबत आम्हाला खूप फिरायचं होतं.. तुझ्यासोबत आम्हाला कराओके गाण्याचा कार्यक्रम घ्यायचा होता... तुझ्यासोबत आम्हाला परदेश दौरा करायचा होता... तुझ्यासोबत आम्हाला अमिताभ बच्चन यांचे अनेक कार्यक्रम घ्यायचे होते... तुला घेऊन पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांना भेटायला जायचं होतं... तुझ्यासोबत आम्हाला आयुष्यातील अनेक रंग उधळायचे होते... !

पण आज तू आमच्यासोबत नाहीस.. तू आम्हाला धोका दिलास... तू असं का केलंस...? नियतीच्या मनात जरी वेगळं असलं तरी नियती एवढी निष्ठूर कशी होऊ शकते ? धनंजय तुझ्या सारखा सच्चा अमिताभ बच्चन प्रेमी, सच्चा मनमिळावू आणि निष्पाप मित्र आपल्यातून जाणं ही माझी फार मोठी हानी आहे. खूप वाईट वाटतंय.. धनंजय राजमाने तुमच्या मुळे ओगलेवाडी मध्ये थांबायला एक जागा होती, स्पेस होता. आता ओगलेवाडी मध्ये आम्ही कुणासाठी थांबू ???. 

धनंजय, अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपच्या प्रत्येक कार्यक्रमात तू तुझं वेगळंपण टिकवलं होतंस. एकदा नमक हलाल चित्रपट लावलेला होता तेव्हा तू 'शहेनशहा' मधील अमिताभ बच्चन यांचा गेटअप करून आलेला होता. परवा 11 ऑक्टोबरला कालिया चित्रपट आपण प्रभात मध्ये लावलेला होता. कालिया चित्रपटातील कैदी नंबर 602 मेकअप करून तू आला होतास. तुला घेऊन हथकडी घातलेली पोज घेऊन आपण प्रभात मध्ये फोटो काढले होते.बच्चन प्रेमी ग्रुपच्या प्रत्येक कार्यक्रमात तू काही तरी वेगळे करायचा. ग्रुप मधील सर्वांना तू तुझ्या घरी गाणे ऐकायला बोलावलं होतं, ग्रुप मधील सर्वांना तुझ्या मुलाच्या लग्नाच्या वेळी बोलावलं होतं. ग्रुप मधील सर्वांनी तुझ्या घरी यावं, तुझं गाणं ऐकावं, त्यांनी एखादं गाणं सादर करावे अशी तुझी खूप इच्छा असायची. बच्चन प्रेमी मित्रांना तू अनेकदा लग्नाची, वाढदिवसाची पार्टी दिली होतीस. तु सर्वांना जपलं होतं, सगळे जण तुझ्या गाण्यावर, बच्चन वेडे पणावर प्रेम करत होते. तुझ्यासारखा सच्चा मित्र आणि दिलदार खरच मिळणार नाही. तेरे जैसा यार कहा...कहा ऐसा याराना !


!

मिस यु धनंजय....!


 *_सतीश मोरे सतिताभ आणि* 
*अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप सर्व सदस्य_* 

 _सोबत... संजय शिंदे यांनी सादर केलेलं गीत_

२६ फेब्रुवारी २०२५

खेळ मांडला


*चाकावर खेळ मांडला..* 
*व्यवस्थेचा...शिक्षणाचा आणि परिस्थितीचा...!*

सायंकाळी चारची वेळ असेल.. माझं काम आटोपून शेतात पाच मिनिटं जाऊन यावं म्हणून करवडीला गेलो होतो. शेतात जाऊन आलो, बाहेर रस्त्यावर उभा राहिलो. शेतासमोरच मोकळ्या जागेवर एका साखर कारखान्याची टोळी (फड) होती. या फडामध्ये झोपड्या (खोपा) मांडल्या होत्या. अर्थातच टोळीतील तोडकरी कुटुंब शेतात ऊस तोडायला गेले होते. 

या कष्टकरी कुटुंबाचा दिनक्रम आपल्यासारख्या पोट सुटलेल्या लोकांसारखा नसतो.  लेकरांवर त्यांचं फार प्रेम असतं. पण पोटाची खळगी भरण्यासाठी पहाटे चार पासून ही कुटुंब कामावर जातात. कामावर जाताना सारा स्वयंपाक करून ठेवला जातो. लहानग्या पोरा बाळांना कामावर नेता येतं किंवा कधी कधी नेता येत नाही. ती पोरं भगवान भरोसे त्या झोपड्यामध्ये सोडून ही कुटुंबं ऊस तोडायला जातात. मग या चिमुकल्या पोरांची जबाबदारी पडते त्यातल्या त्यात आठ दहा वर्षाच्या मोठ्या मुलांवर.  

अशीच अकाली पालकत्व आलेली दोन मुलं आणि एक मुलगी या फडावर होती. या तीन मुलांच्याकडे एकच काम होतं त्या झोपड्यांमध्ये असलेल्या छोट्या छोट्या मुलांची काळजी घ्यायची, त्यांना खाऊ घालायचं, त्यांना आधार द्यायचा, त्यांना खेळवायचं. हे काम त्यांनी चोख पार पाडलं होतं. खोपीमध्ये जे काय आहे ते खाऊन ही पोरं आता एक झोप काढून बाहेर पडली होती. सूर्याची प्रखर किरणे हळू कमी होऊ लागली होती आणि याच कालावधीत ही छोटी मुले झोपडी बाहेर आली. आणि  त्यांनी एक खेळ मांडला.

 शहरांमध्ये आपण व्हील चक्र, जायंट व्हिल किंवा मोठा झोपाळा पाहिला असेल. पण या शेतमजुरांच्या मुलांना कुठून मिळणार असला  झोपाळा ? एवढे पैसे कुठे आहेत त्यांच्याकडे? त्यांना जत्रेत जायला मिळेल? ? मुलांना घेऊन जत्रेला जावं ,त्यांना गोड गोड खाऊ घालावं, त्यांना जत्रेत फिरवावं? चिरमुरे द्यावेत? एवढा वेळ कुठे आहे त्यांच्या पालकांकडे ? मुलांना खाऊ घालण्यासाठी काम केले पाहिजे, कष्ट केले पाहिजे या एकाच उद्देशाने त्यांचे पालक शेतात ऊस तोडणी करत होते. 

तिथे एक बैलगाडी उभी होती. तर दुसरीकडे बंद पडलेली एक बैलगाडी होती. या बैलगाडीचे चाक काढलेले होते. बैलगाडीचे चाक एका उंचीवर मांडून यांच्या आई-वडिलांनी तिथे एक चक्र तयार केलेले होते. या चक्रावर बसून मग या मुलांनी खेळ मांडला. तिथे चार पाच छोटी छोटी मुलं होती . त्यांच्या अंगावर साधे कपडेही नव्हते. ही मुलं या चकरावर बसली. त्यांच्यातला एक थोरला मुलगा ते चक्र गोल गोल फिरवत होता. दुसरी एक मुलगी त्या छोट्या छोट्या मुलांना त्या चक्रावर बसवत होती आणि मग खेळ सुरू झाला..

काय आनंद होता या गोष्टींमध्ये काय सांगू...! ‌ किती निष्पाप मुलं होती ती.. इवलीसी...आहे त्या गोष्टींमध्ये आनंद मानत तो आनंद लुटण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. गोल गोल चक्र फिरल्यानंतर एक छोटीशी मुलगी खाली पडली. तिला उचलून एका मुलाने उभे केले. पुन्हा खेळ सुरू झाला. ती मुलं ओरडत होती, कोणी रडत होती, कोणी हसत  होती,आनंद लुटत होती आणि मी शांतपणे ते पाहत होतो.

लहानपणी असा खेळ आम्ही पण केलेला होता. पण तोडकरी कुटुंबातील मुलांचा हे खेळ पाहून मन हेलावलं. यातील एका दोघा मुलांना विचारलं तुम्ही शाळेत जाता का ? दोघांनी एका सुरात एकच उत्तर दिले.. 'आम्हाला शाळा काय माहित नाही .. शाळेत आम्ही कधी गेलोच नाही. '... ऊस तोडणी कामगारांची मुले जर शाळेत जात नसतील तर त्यांना भविष्य कसे चांगले असणार...? त्यांनी पण आपल्या आई-वडिलांच्या मागे  फक्त ऊस तोडत बसायचे काय ?

सोबतचा हा व्हिडिओ पाहताना जेवढा आनंद होत होता, तेवढेच ही मुलं शाळेत जात नाहीत  हे ऐकल्यानंतर डोळ्यातून पाणी येत होते...! काय करू शकतो आपण या मुलांसाठी ...?  बाजूला आलो आणि लेखणीच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली...!तुम्हाला भेटायला दोन दिवसानंतर पुन्हा येतो... असं वचन देऊन तिथून निघालो....!

आपण काय करू शकतो का या मुलांसाठी ? ज्यांच्या अंगावर कपडेही नाहीत... ज्यांना शिक्षण काय माहित नाही... ज्यांना पुस्तकं वह्या काय असतं याची माहितीही नाही...!

*सतीश वसंतराव मोरे सतिताभ*
9881191302

१३ सप्टेंबर २०२४

जब तक जिंदगी हैं तब तक संघर्ष है


अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांचे एक अतिशय सुप्रसिद्ध वाक्य आहे मी हे वाक्य अनेकदा ऐकले आहे, वाचले आहे. हरीवंशराय बच्चन म्हणतात, जब तक जिंदगी है तब तक संघर्ष है जिस दिन संघर्ष खतम हुआ उस दिन तुम्हारी जिंदगी भी खत्म हो जायेगी' आयुष्यात फक्त संघर्ष केला आणि यश मिळालं नाही असं एकही उदाहरण आपल्याला पाहायला मिळणार नाही. ज्यांनी संघर्ष केला त्यांना यश हे मिळतच आणि संघर्षाशिवाय यशाची चव ही चांगली लागत नाही.

जीवन जगत असताना आयुष्यात अनेक खाच खळगे येतात परंतु हे खाचखळगे जे कोणी भरतात त्यांनाच पुढे जाण्याच्या वाटा दिसतात. पुढे अडथळे दिसले म्हणून जो थांबतो तो तिथेच विसावतो आणि त्याची प्रगती होत नाही. अडथळे पार पाडण्याची कला ज्यांना अवगत आहे तो आलेल्या प्रत्येक संकटाला आनंदाने स्वीकारतो. जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे जर तुम्ही सकारात्मक दृष्टीने पाहत गेला तर जीवन संघर्ष असले तरी ते आनंदमय होऊन जाते. कधी कधी सर्व संपलय असं वाटतं, पुढे काहीच दिसत नाही, माझ्याच वाटायला हे का आलं? असं सुद्धा वाटू लागतं. अशा परिस्थितीत खूप जण संघर्ष करायचे सोडून देतात,पळून जातात. मात्र संघर्ष ज्यांनी स्वीकारलेला आहे ते या संकटावर मात करतात आणि जीवन सुंदर बनवतात. 

सफलताओं का आनन्द तभी सम्भव है जब मनुष्य में संघर्ष के लिए अपेक्षित इच्छा-शक्ति हो और दृढ़ इच्छा-शक्ति हो। इच्छा-शक्ति के अभाव में सामर्थ्यवान व्यक्ति भी अपने ध्येय तक पहुँचने में सफल नहीं हो सकता है। दृढ़ इच्छा-शक्ति और धैर्य उसके साथी हों तो सफलताएँ सदैव चरण चूमती हैं, अन्यथा इसके अभाव में ध्येय के निकट पहुँचकर भी धड़ाम से नीचे गिर सकते हैं। और अन्ततः निराशा ही हाथ लगती है और हाथ मलते रह जाते हैं।

१२ सप्टेंबर २०२४

मंगला बनसोडे करवडीकर २७ (७२) वर्षाची तमाशा सम्राज्ञी!


मंगला बनसोडे करवडीकर  
२७ (७२) वर्षाची तमाशा सम्राज्ञी!
 

महाराष्ट्राची तमाशा लोककला ज्यांनी जिवंत ठेवली,कला हेच जीवन असं ब्रीद डोळ्यासमोर ठेवून वयाच्या नव्या वर्षापासून तमाशा फळात आपली कला दाखवणाऱ्या, करवडी गावचे भूषण श्रीमती मंगला बनसोडे करवडीकर यांचा आज ७२ वा वाढदिवस. वय फक्त एक आकडा असतो असं म्हणतात आणि हे वाक्य मंगला बनसोडे यांना तंतोतंत लागू पडतं. आज सकाळी मी त्यांना भेटायला गेल्यानंतर 72 वा वाढदिवस नसून हा तुमचा 27 वाढदिवस आहे असा सहज बोलून गेलो.यामागे कारणही तसंच आहे. 27 वर्षाच्या तरुणीला लाजवेल अशी लावणी आजही त्या करतात, समोर असणाऱ्या हजारो तमाशा रसिकांना लावणीच्या तालावर नाचवतात, त्यांचं मनोरंजन करतात त्यांना दुःख विसरायला भाग पडतात. 

औद्योगिक क्षेत्रात जशी टाटा, बिर्ला, बजाज ही घराणी आहेत, किंवा सिनेमा क्षेत्रात जशी कपूर, खान, बच्चन, देओल घराणी आहेत तसे तमाशात क्षेत्रात शंभर वर्ष जुनं एक घराणे आहे.अनेकदा ‘ घराणेशाही ’ हा शब्द उपरोधानं वापरला जातो पण खरतरं मोठा नावलौकिक असलेल्या घरात जन्माला आल्यावर मोठी जबाबदारी असते, लोक आपल्या अगोदरच्या पिढीशी त्या व्यक्तीची तुलना करतात. या सगळ्या परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेलं कलाक्षेत्रातील आभाळाएवढं मोठ्ठ नाव म्हणजे
मंगल बनसोडे. आजोबा भाऊ बापू मांग नारायणगावकर, आई विठाबाई नारायणगावकर या दोन मोठ्ठा वारसा अभिमानाने आपल्या नावासोबत घेऊन मात्र स्वकर्तृत्वावर यश मिळवून आज तमाशासृष्टीवर मंगलताई अधिराज्य गाजवीत आहे.


तमाशा कलावंतांचे जीवन किती कष्टाचं असतं हे त्या कुळाला गेल्यानंतरच कळतं. मला थोडंफार कळलं,दिसलं त्यावरून मी म्हणू शकतो मंगलताईनीं खुप कष्ट सोसलं आहे. अनेक मी नेहमीच म्हणतो चित्रपटातील टॉपच्या हिरोईन पेक्षा मंगला बनसोडे कितीतरी पटीने श्रेष्ठ आहेत. आठ महिने तमाशा दौऱ्यामध्ये असताना त्या रोज कार्यात व्यस्त असतात. दिवसातील आठ दहा तास प्रवासात जातात. तमाशाच्या ठिकाणी पोचल्यानंतर मग थोडाफार आराम मिळतो, पुन्हा संध्याकाळी तमाशा सुरू होतो. रात्री उशिरा संपतो. पहाटे पुन्हा प्रवास सुरू होतो. कला सादर करत असताना रोज नवीन गावातील नवीन प्रेक्षक असतात. नव्या ढंगाचे असतात. कुणी तमाशा बघायला आलेला असतो, कुणी बाई बघायला आला असतो तर कोणी कला बघायला असतो.‌ मात्र या सर्वांसमोर अभिनय करताना त्या सर्वोत्तम द्यायचा प्रयत्न करतात. रोज नवा नवा अभिनय करत असतात. तमाशामध्ये रिटेक नसतो, चित्रपटांमध्ये अनेक रिटेक असतात. एका टेक मध्ये रोज तमाशाच्या फडात कला सादर करताना मंगला बनसोडे यांच्यातील कलाकार अजून प्रगल्भ होत जातो.

आई विठाबाई मांग नारायणगावकर यांच्यापासून वेगळी झाल्यानंतर मंगला बनसोडे यांनी स्वतंत्र फड सुरू केला. त्यावेळी आम्ही पाचवी सहावीत असेल. या तमाशाच्या रंगीत तालमी करवडी मध्ये होत असत. रंगीत तालमीसाठी आमच्या घरासमोर जनार्दन मोरे यांची बंद पडलेली पोल्ट्री निवडलेली होती. जुलै ऑगस्ट महिन्यात रिहसल सुरू व्हायच्या. त्याकाळी मनोरंजनाची फार साधने नसल्यामुळे आमच्या गावातील सर्व लोक हे बघायला तिथे जमायचे. आम्ही मुलं जात असू, काहीजण आम्हाला हटकत मात्र तरीही लांबून आम्ही गाणी,वगनाट्याच्या रंगीत तालमी पहात होतो. मंगला बनसोडे यांच्या सोबतीला त्यांचे पती रामचंद्र बनसोडे खांद्याला खांदा लावून वगनाट्यामध्ये आपला ठसा उमटवत होते. पुढे छोटा नितीन तमाशा मध्ये आला.मंगला बनसोडे यांचा थोरला मुलगा अनिल माझा पहिली ते चौथीचा जिल्हा परिषद शाळेतील क्लासमेट. शाळा सोडून त्याने तमाशा बॅक स्टेज सांभाळण्याची जबाबदारी घेतली. हळू तमाशा मोठा होत गेला. संगीताची राणी मंगला बनसोडे , लिटिल मास्टर नितीन बनसोडे आणि वग सम्राट रामचंद्र बनसोडे या तिघांच्या जोडीने राज्यात एक फार मोठा काळ गाजवला, तमाशा क्षेत्रात अक्षरश धुमाकूळ घातला. मंगला बनसोडे यांनी आई विठाबाई यांच्या पावलावर पाऊल टाकत बैठी लावणीच्या माध्यमातून तमाशाला एक उंची लावून दिली.
कधी काळी आई विठाबाईसोबत तमाशात काम करताना मंगलताईंनी बंडाचा झेंडा उभारला, पती रामचंद्र बनसोडे यांच्यासाठीने स्वतःचा स्वतंत्र फड उभारायचा हे जाहीर केलं. खरं तर सगळं सुरळीत सुरु असतांना धोका पत्करायचा नाही हे धोपट विचार करणाऱ्या माणसाचं धोरण असतं, पण जो धोका पत्करतो तोच इतरांपेक्षा अधिक यशस्वी होतो हे जगाचं यशाचं सूत्र आहे. आई विठाबाईच्या तमाशातून बाहेर पडल्यावर पती रामचंद्र यांच्यासोबत स्वतःचा तमाशा फड सुरु करताना ‘ पुनश्चः हरि ओम ‘ म्हणत आयुष्याच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात केली. या प्रवासात खडतर काटेरी रस्ता होता, अनंत अडचणी होत्या... पण स्व निर्मितीचा आनंद होता, रामचंद्रासोबतच्या सीतामाईने आहे ती परिस्थिती गोड मानली तशी इथेही रामचंद्रासोबत आहे त्या परिस्थिती सुख मानलं. रामचंद्र बनसोडे हे उत्तम कलारसिक, उत्तम वगलेखक त्यांच्या रसिक व्यक्तिमत्वाला ‘ मंगल ‘ नावाचं मांगल्याचं कोंदण लाभलं. महाराष्ट्राला विष्णू बाळा पाटील, बापू बिरू वाटेगावकर, जन्मठेप कुंकवाची, भक्त प्रल्हाद, येथे नांदते मराठेशाही असे एकाहून एक सरस वगनाट्य बघायला मिळाली. आज नीतिनकुमार आणि अनिलच्या रूपाने पुढची पिढी तमाशाचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहे. घरात नातवंडे बागडताहेत... मुलगी लक्ष्मी शेती आणि घराचा सगळा कारभार पाहत आहे. घराचं गोकुळ होणे म्हणजे यापेक्षा वेगळ ते काय असतं... 

मंगलताई तुमच्यातली अभिनेत्री, तुमच्यातली गायिका, तुमच्यातली नर्तिका, तुमच्यातली फड मालकीण, तुमच्यातली आई, तुमच्यातली बहिण.,तुमचं प्रत्येक रूप लोभस आहे. वर्षभर वेगवेगळ्या ताणतणावांनी त्रस्त झालेल्या हजारो रसिकजनांचे तुम्ही मनोरंजन करत आहात, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याच काम तुम्ही करत आहात.देवपूजा, ईश्वरभक्ती यापेक्षा वेगळी काय असणार! रसिकरंजन हे तर पुण्यांचं काम आहे. तुमच्या हातून रसिक रंजनाचे पुण्यकर्म पुढची अनेक वर्ष असेच होत राहो याच मनापासून शुभेच्छा.आपल्या मराठमोळ्या तमाशाला चांगले दिवस येवोत, तमाशाचे तंबू रसिकांच्या गर्दीने ओसंडून वाहोत .आज तुमच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 


सतीश वसंतराव मोरे 
सतिताभ 
9881191302



२२ ऑगस्ट २०२४

मी अनुभवलेला श्रावण आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा


श्रावण महिना आणि या महिन्यातील सण याचा आणि माझा खूप जवळचा संबंध आहे. आजचा श्रावण महिना आणि नव्वदच्या दशकातील श्रावण महिना यात जमीन आसमानचा फरक आहे. श्रावण महिना बदललेला नाही, निसर्ग बदललेलं नाही मात्र माणसं बदलली आहेत. ठीक आहे ...माणसं बदलायला पाहिजेत कारण बदलणे हा निसर्गाचा नियम आहे. माणसं बदलली म्हणून वाईट वाटण्याचं काय कारण नाही मात्र आम्ही अनुभवलेला श्रावण खरंच एक वेगळा होता. 1990 च्या दशकातला आमचा श्रावण, आमचे शालेय जीवन, आमचं कॉलेज जीवन आणि आमचा श्रावण महिन्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन खरंच वेगळा होता. मी अनुभवलेला श्रावण आज तुमच्यासाठी.

श्रावण महिन्यात बहुतांश गावामध्ये ज्ञानेश्वरी हरिनाम सप्ताह साजरा केला जातो. श्रावण महिना हा पवित्र महिना. या महिन्यात सोमवार, मंगळवार, शनिवार हे तीन उपवास तर प्रत्येक घराघरा मध्ये केले जात होते. काही घरांमध्ये गुरुवार पण केला जात असे. मात्र सोमवार हा आमचा आवडता वार. कारण करवडीपासून जवळच सदाशिवगड आम्ही आमच्यासाठी श्रद्धास्थान  होते . याचबरोबर सदाशिवगडाच्या पायथ्याशी असणारे जानाई मंदिर सुद्धा आमच्यासाठी श्रद्धास्थान होते. करवडी, वाघेरी विरवडे, पार्ले, बनवडी, टेंभू, गोवारे, सुरली, कामथी, सदाशिव गडाच्या सर्व माच्या या सर्व गावासाठी सदाशिवगड म्हणजे श्रद्धेचे स्थान. होते,आजही आहे. प्रत्येक श्रावणी सोमवारी सदाशिव गडावर जाऊन तेथील निसर्गाच्या सानिध्यात सोमवार आनंद लुटणे हे आमच्यासाठी पर्वणी होती. त्याकाळी या परिसरातील प्रत्येक शाळेची सहल श्रावण महिन्यात सदाशिव गडावर जात असे. सदाशिवगडावर जायचे, तिथून पुढे कच्च्या रस्त्याने खाली उतरून जानाई देवीच्या मंदिरात जायचे, असा आमचा दिनक्रम असे. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी सदाशिव गडावर जाण्यामध्ये जी मजा होती ती आज नाही. पण आम्ही लुटलेला श्रावण महिन्यातील आनंद हा खरंच वेगळा आनंद होता. 

आमच्या परिसरातील सर्व भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे जानाई देवी मंदिर. सुरलीच्या घाटात अलीकडे रस्त्याकडेला जानाई देवीचे मंदिर आहे. या मंदिरात श्रावण महिन्यातील तिसऱ्या मंगळवारी मोठी यात्रा भरते. या मंदिरात परिसरातील अनेक भाविक महिला येतात. जानुबाईच्या दारात जाऊन पाय ठेवल्यावर, डोकं ठेवल्यानंतर सगळ्या अडचणी दूर होतात, पूर्ण वर्षभराचा थकवा निघून जातो, जानुबाईची कृपा असेल तर सर्व काही शक्य असतं, अशी भोळी भोळी भावना या भावात भागातील महिलांची असते, आजही आहे. श्रावण महिन्यातील सोमवार आणि मंगळवार आमच्यासाठी आनंदाचे दिवस होते कारण या दिवशी शाळेला अर्धा दिवस सुट्टी असायची.धार्मिक स्थान किंवा परंपरा साठी सुट्टी देणे हे आजच्या नियमात बसत नाही. आणि हो मला आणखीन एक आठवते प्रत्येक शनिवारी आमच्या टिळक हायस्कूलमध्ये बजरंग बलीची उपासना केली जायची. मारुतीचा फोटो लावून  शनिवारी उपासना करून नारळ फोडत असू.आमच्या सोबत नारळ फोडणारे प्रसाद वाटणारे मुस्लिम सहित सर्व जाती धर्माचे विद्यार्थी होते. आज विनायक गरुड म्हणून  नावाजलेले वेदशास्त्र पंडित आहेत तो त्यावेळी आमचा गुरु. विनायकच्या पाठीमागे आम्ही वर्गात मारुती स्तोत्र म्हणत आणि वर्गातील प्रत्येकाच्या स्तोत्र पाठ झाले होते .

श्रावण महिन्यात करवडी गावामध्ये ज्ञानेश्वरी सप्ताह पारायण आयोजित केले जायचे. या पाराणात आमच्या गावातील शंभरहून अधिक भाविक, वारकरी ज्ञानेश्वरी पारायण वाचायला बसत असत. गावातील मुख्य चौकात असणारे हनुमान मंदिर, या मंदिरात हे पारायण होत असे. पहाटे काकड आरती, सकाळी सात ते बारा वाचन, त्यानंतर दुपारचे जेवण, पाच ते सहा प्रवचन, रात्री नऊ ते 11 कीर्तन असा अखंड हरिनाम सप्ताह असायचा. या पारायणामध्ये अखंड विणा धरण्याची पद्धत होती. हा विणा 24 तास खाली ठेवला जात नसे. दोन दोन तासाला विण्याचा विणेकरी बदलले जात असे. विणेकरी कोण असावा याचं नियोजन केले जात असे. पारायणासाठी गावातील श्रद्धाळू भाविक बसायचे. ज्याच्याकडे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे त्याला काय अडचण नसे. मात्र ज्याच्याकडे ग्रंथ नसेल त्यासाठी तो ग्रंथ उपलब्ध करून दिला जात असे. मी स्वतः करवडी गावामध्ये चार पारायण केलेली आहेत. मला चांगलं आठवतं सकाळी उठून लवकर आंघोळ करून ज्ञानेश्वरी ग्रंथ घेऊन जात. सात वाजता तिथे पोहोचल्यानंतर सोहळा प्रमुख आमच्या गावचे प्रसिद्ध कीर्तनकार ज्योतीराम महाराज करवडीकर हे आम्हाला सुरुवातीलाच भगवद्गगीते मधील एक श्लोक म्हणून दाखवत. सात ते बारा वाचन व्हायचे. एका सुरात एका वेगात आम्ही सर्वजण ग्रंथ वाचन करत असू. ज्ञानेश्वर पारायण सोहळा संपल्यानंतर दुपारी एका ठिकाणी तर सायंकाळी एका ठिकाणी जेवणाची पंगत असे. पारायणामध्ये बसलेल्या सर्व स्त्री पुरुष यांना या पंक्तीला जेवणाचे खास निमंत्रण असे. पंगतीमध्ये त्यांना पहिल्या मान असतो. अनेक वर्षे या ज्ञानेश्वर पारायणामध्ये सकाळ आणि संध्याकाळचे जेवण असे. कुणी जेवण द्यायचे याचे नियोजन केले जात असे किंवा ही यादी ठरलेली असे. 

मला सुरुवातीपासून या पारायणामधील एक गोष्ट आवडत असे ती म्हणजे प्रवचन. न चुकता या प्रवचनासाठी मी जात असे. कीर्तन रात्री नऊ ते अकरा असायचे. मात्र सकाळी लवकर शाळा असल्यामुळे मला ते शक्य होत नसे किंवा मला त्या काळात कीर्तन आवडत नव्हते. प्रवचनांमधून एक वेगवेगळे मुद्दे मिळत असत. प्रवचन सुरू होण्यापूर्वी 'श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम' हा जप दहा मिनिट जपला जात असे. त्यानंतर ज्ञानेश्वरी ग्रंथ समोर ठेवून एका प्रवचन केले जात असे. प्रवचनकार  वेगळे आणि कीर्तनकार वेगळे असायचे. हे प्रवचन संपल्यानंतर सायंकाळी ज्याच्या घरी पंगत आहे त्या ठिकाणी जावे असू. काल्याचे किर्तन हे अतिशय महत्त्वाचा दिवस  या दिवशी मात्र मी नक्की कीर्तन ऐकायला जात असे. या दिवशी संपूर्ण दिवसभर जन्माष्टमीचा उपवास असे. रात्री बारा वाजता जन्म सोहळ्यात  सुंठवडा खायला मिळत असे.आमच्या गावाचे चिंचकर उर्फ तेली मामा नावाचे एक मोठे वारकरी होते. धोतर पायजमा सोबत काठी आणि घोंगडं, जबरदस्त मिशा असं त्यांचं रुबाबदार नेतृत्व होतं. ते या सोहळ्याचे सूत्रधार म्हणा किंवा संयोजक म्हणा किंवा कंट्रोलर म्हणा. तेली मामांचा आमच्या गावात फार मोठा दरारा होता. पारायणासाठी आलेल्या सर्वांना योग्य ठिकाणी बसायला जागा देणे, कुणालाही उठू न देणे, कीर्तन सुरू असताना कोणता अडथळा येऊन देणे ही जबाबदारी त्यांच्याकडे असायची. त्याकाळी किर्तन ऐकायला फार मोठी गर्दी होत असे. पंचक्रोशीतील लोक कीर्तन ऐकण्यासाठी गावात यायचे.गोपाळ काल्याच्या दिवशी आम्ही दहीहंडी फोडायला जात असे .गोपाळकाला दिवशी आमच्या गावातील पारायणाची समाप्ती होत. ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहातील ते आठ दिवस म्हणजे आमच्या आयुष्यातील सुखद दिवस असायचे. 

प्रत्येक वर्षी पारायणाला बसायला मिळेल किंवा यामध्ये सहभाग व्हायला मिळेल अशी परिस्थिती नसायची‌ मात्र श्रावणातील काही व्रत्तवैकल्ये , परंपरा आम्ही नक्की करत असू.  शिखर शिंगणापूर हा आमचा कुलस्वामी. प्रत्येक सोमवारी आम्ही सकाळी न बोलता पाणी घालायला गावातील महादेवाच्या मंदिरात जात होतो. कोण लवकर उठते, कोण लवकर मंदिरात पोहोचते अशी आमच्या भावंडांमध्ये, मित्रपरिवारामध्ये स्पर्धा असायची. गावापासून अंतरावर इंजाळे नावाच्या परिसरात महालिंगेश्वर मंदिर नुकतेच उदयाला येऊ लागले होते. या ठिकाणी पायी सहल काढण्याची एक वेगळी परंपरा होती. संध्याकाळच्या वेळी आम्ही या मंदिरात जात असो. पुढील काळात कराड तालुका वारकरी संघाच्या पुढाकाराने बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली कराड शहरात दोन तीन मोठी पारायणे झाली. हा वारकरी संप्रदायाचा कराड तालुक्यातील उदय होता. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन सोहळ्यानिमित्त कराडात फार मोठा सोहळा झालेला होता. यात आम्ही सहभागी झालो होतो. आमच्या करवडी गावासहित कोपर्डे कार्वे, काले, शेरे, दुशेरे, कोडोली या गावातील वारकरी संप्रदायातील लोक पारायणात त्या संख्येने सहभागी झाले होते.कृष्णा घाटावर झालेला हा भव्यदिव्य पारायण सोहळा माझ्या अजूनही चांगल्या स्मरणामध्ये आहे. सकाळी उठून उठून आम्ही लवकर तयार होऊन सायकलवरून कराडला पोहचत. कृष्णा नदीच्या प्रीतिसंगगावर झालेला हा पारायण सोहळा अतिशय भव्य दिव्य झालेला होता. या सोहळ्यात राज्यभरातील नामवंत कीर्तनकार सर्वजनकार यांचा ज्ञानयज्ञ अजूनही स्मरणात आहे. दहा हजार लोकांची पंगत एका वेळेला बसण्याची व्यवस्था नदीच्या वाळवंटात झालेला हरिनामाचा गजर आजही कानात दुमदुमत आहे आहे. या पारायण सोहळ्या विषयी सविस्तर माहिती घेऊन मी लवकरच लिहिणार आहे.

आता श्रावण महिन्यात आमच्या गावातील पारायण सुरू झाले आहे .या सोहळ्यात सहभागी होणं मला शक्य नाही. मात्र परवा गावात जाण्याचा योग आला उद्यापासून पारायण सुरु होणार होते. मग हनुमान मंदिरात जाऊन बसलो. मंदिरात पोहोचल्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. सुमारे अर्धा तास या मंदिरात मी बसून होतो. माझ्यासोबत माझा गावातील जुना मित्र राहुल पाटील आणि आमचा शेजारी संजय पिसाळ हे दोघे होते. गावातील सर्व मंदिरात जाऊन आलो हनुमान मंदिरात आल्यावर चर्चा सुरू होती. आम्ही जुन्या आठवणीला उजाळा दिला. पारायणामध्ये ज्ञानेश्वरी वाचन करत असताना चार तास ते पाच तास बसावे लागत असे. या वेळेला पाठ खूप दुखत असे. ज्याला मंदिरातील खांबाशेजारी बसायला मिळत असेल त्याला खांबाला टिकून बसणं शक्य होतं.  त्या खांबाला टेकून मी परवा बसलो, खूप आनंद झाला. ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. असं वाटलं या ज्ञानेश्वरी पारायण मध्ये आपण सहभागी व्हावं, कीर्तन ऐकावं मात्र मला शक्य झालं नाही.

 पण मनातील ही इच्छा कुठेतरी खोलवर रुजलेली होती आणि ती इच्छा माऊलींच्या पर्यंत पोहोचली. काल बुधवारी माऊलींनी वारीमध्ये झालेल्या मजा मित्रांना कराडला पाठवून दिले. हे माझे मित्र म्हणजे हरिभक्त परायण सचिन पवार आळंदीकर‌‌.. सचिन पवार हे वारकरी दर्पण या मासिकाचे संपादक आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते आळंदी मधून वारकरी दर्पण या मासिकाचे प्रसिद्ध करतात. माऊली सचिन पवार हे माझ्या पुढारी कराड ऑफिसमध्ये आले,आम्ही गप्पा मारल्या आणि ते सहज बोलून गेले मला शेरे येथे किर्तन सेवेसाठी जायचे आहे. मी कसलाही विचार न करता त्यांच्यासोबत कीर्तनासाठी पोचलो. खूप वर्षानंतर सात ते नऊ या कालावधीत कसलेही फोन न घेता, कुणालाही एंटरटेन न करता दोन तास कीर्तन सोहळ्यामध्ये सहभागी झालो. सचिन पवार यांनी अतिशय सोप्या भाषेत वारकरी म्हणजे काय? भजन म्हणजे काय आणि संतांचे आपल्या आयुष्यातील महत्त्व देवाहून कसे अधिक आहे हे पटवून दिले. खूप दिवसातून कीर्तन ऐकायला मिळाले, कीर्तन अनुभवायला मिळाले. खरंच वारकरी संप्रदाय खूप मोठा आहे. या संप्रदाय विषय किती लिहावे तेवढे कमी आहे. वारकरी संप्रदायाची मला आवड निर्माण झाली माझ्या आजीमुळे. त्या आजीची आठवण हा लेख लिहिताना आल्याशिवाय राहत नाही.


सतीश वसंतराव  मोरे करवडी.

9881191302

२५ जुलै २०२४

नशा आणि आकर्षण


तु माझ्यासाठी नशा नाहीस !

नशा होते ...
प्रसिद्धीची,दारूची,सत्तेची, सौंदर्याची 
पैशातून मिळवलेल्या वस्तूंचीही..!
पण ही नशा उतरते कधीतरी !

तू माझ्यासाठी आकर्षणाचा केंद्रही नाहीस ! 

आकर्षण होतं...,
वस्तूचं, व्यक्तीचं, शरीराचं, सौंदर्याचं !
पण वस्तू किंवा व्यक्ती जशा जीर्ण होतात 
तसं ते आकर्षणही कमी होत जातं...!

एक सांगू लाडके, 

तू माझ्यासाठी एक आधार आहेस !
तू माझ्यासाठी एक परमाणू आहेस !
तू माझ्यासाठी मैलाचा दगड आहेस !
तू माझा आयुष्याचा आधार आहेस !
तू माझ्या आयुष्याची दोरी आहेस !
तू माझ्यासाठी वादळवेल आहेस !
तू माझ्यासाठी एक काठी आहेस !
बुडत्याला काडीचा आधार आहेस !
केवळ आणि केवळ जिच्या समोर,
माझं मन पुर्ण मोकळं करू शकतो ...
अशी तू माझी सखी आहेस !
अशी तू माझी सखी आहेस !

     ..... सतिताभ १३.०७.२०२४

१० जुलै २०२४

कलकी


उन्होंने भूत का किरदार निभाया, जिन्न बने, बच्चा बने, गॉड बने... खास बात ये है कि 65 वर्ष की उम्र की दहलीज पार करने के बाद उन्होंने इस तरह के चुनौतीपूर्ण किरदार निभाए। सब कुछ हटा कर अगर सिर्फ अभिनय की बात करें अमिताभ बच्चन ने 20वीं सदी में बॉक्स ऑफिस पर जितने चमत्कार किए थे, उसका कई गुना करामात उन्होंने 21वीं सदी में कर दिखाया है।

हाल ही में रिलीज हुई #Kalki2898AD की ही बात करें तो इतने बड़े-बड़े अभिनेताओं के होने के बावजूद ये अमिताभ बच्चन की फिल्म बन गई है और यही इस बूढ़े शेर की खासियत है। खासियत है इनकी कि उम्र के साथ इनकी आवाज़ और अधिक दमदार होती चली जा रही है और अभिनय की विभिन्न विधाओं का एक ही दृश्य में प्रदर्शन कर देना इनकी सबसे बड़ी क्षमता बनती जा रही है। अश्वत्थामा के किरदार में #AmitabhBachchan की कद-काठी उनका भरपूर साथ देती है, शेर की दहाड़ जैसी उनकी आवाज़ इस किरदार में जान डालती है और उनकी रहस्यमयी आँखें सचमुच ये एहसास दिलाती हैं कि ये किरदार 5000 वर्षों का इतिहास अपने भीतर समेटे हुए है।

असल में अमिताभ बच्चन ने छा जाने की ये विधा अपनी कमबैक फिल्म 'मोहब्बतें' से ही सीख ली थीं, जब उन्होंने 10 अभिनेता-अभिनेत्रियों के बीच अपने किरदार में ऐसी जान डाली कि इस फिल्म को उनके 'परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन' के लिए याद किया जाने लगा। शाहरुख़-सलमान की फिल्मों में एक ज़िंदादिल पिता का किरदार अदा करना हो या फिर 'सरकार' सीरीज में 'गॉडफादर' सदृश किरदार हो, अमिताभ बच्चन ने कभी इसकी परवाह नहीं की कि फिल्म में उनका कितनी देर का किरदार हैं या फिर कौन से और अभिनेता-अभिनेत्री हैं।

आप 'पीकू' को भी इसी श्रेणी में देख सकते हैं, जितने बंगाली अमिताभ बच्चन इस फिल्म में लगे हैं उतने बंगाली शायद बंगाल का कोई अभिनेता भी नहीं लगता। आप उन्हें 15-16 साल के बच्चों के साथ फिल्म में डाल दीजिए या फिर 'ऊँचाइयाँ' में बुजुर्गों के साथ, उन्हें कोई फर्क नहीं पड़ता। 'कल्कि' को और अच्छा बनाया जा सकता था, जिसमें कोई शक नहीं है, लेकिन, इस फिल्म में अगर बिग बी की जगह कोई और अभिनेता होता तो शायद आज प्रभाष गालियाँ सुन रहे होते। अमिताभ बच्चन ने इस फिल्म को ढोया है, उन्हें अधिक स्क्रीन स्पेस देकर निर्देशक ने भी चतुराई बरती है।

भारत के निर्माता-निर्देशकों को मैं यही कहूँगा कि अगर आपके पास कोई ऐसा किरदार है जो आपको अत्यधिक चुनौतीपूर्ण लग रहा हो या फिर आप संशय में हों कि किस अभिनेता को इसे दिया जाए, बेधड़क Amitabh Bachchan को एप्रोच कीजिए। इस व्यक्ति के पास जो भी समय बचा है, उसमें ही ये भारतीय सिनेमा को अपना सर्वश्रेष्ठ देने वाला है। मुझे अभी भी लगता है कि 81 वर्ष की उम्र के बाद अब भी उनका सर्वश्रेष्ठ प्रदर्शन बचा हुआ है। अगर #Kalki के दूसरे भाग में भी वो होते हैं और उम्र व स्वास्थ्य उनका साथ देता है तो वो भारत की सबसे अधिक कमाई करने वाली फिल्म होगी।

इस उम्र तक भला कौन ही अभिनय करता है, आप ही सोचिए न। 75 तक आते-आते धर्मेंद्र भी ठंडे पड़ गए थे, मिथुन चक्रवर्ती ने 74 की उम्र में बिस्तर पकड़ लिया है, विनोद खन्ना 70 की आयु में कैंसर से चल बसे, गोविंदा का तो 45 साल के होते-होते करियर ही खत्म हो गया, राजेश खन्ना ने 60 पार होते ही बी-ग्रेड फिल्मों में काम करना शुरू कर दिया था, शशि कपूर के बुढ़ापे का कोई रोल ही किसी को याद नहीं। हाँ, शम्मी कपूर ने ज़रूर बुजुर्ग होने के बाद कुछ अच्छे किरदार निभाए लेकिन सब में उन्हें गुस्सैल पिता ही बनाया गया। मुन्नाभाई सीरीज छोड़ दें तो सुनील दत्त भी बुढ़ापे के दिनों में सक्रिय नहीं रहे। जितेंद्र जैसे अभिनेता अंत में बड़े भाई का किरदार निभाते-निभाते थक कर निकल लिए। कुल मिला कर देखें तो अपने समय के अभिनेताओं में सबसे अधिक Versatile अमिताभ बच्चन ही निकले। उनकी यात्रा अनवरत जारी है।

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...